नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

गुरुवार, २८ फेब्रुवारी, २०१९

राष्ट्रीय विज्ञान दिवस



राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा !!!


*28 फेब्रुवारी*
*राष्ट्रीय विज्ञान दिन* आर सी व्ही रामन

पूर्ण नाव-  चंद्रशेखर व्यंकट रामन

जन्म- ७ नोव्हेंबर १८८८ (तिरुचिरापल्ली, तामिळनाडू)

मृत्यू- २१ नोव्हेंबर १९७० ( बंगरूळ, कर्नाटक)

विशेष कार्य– सी. व्हि. रामन यांनी भौतीकशास्र या विषयात केलेल्या संशोधनातून प्रकाशाचे मॉलीक्युलर स्कॅटरिंग म्हणजेच रामन इफेक्ट हा सिद्धांत मांडला. त्याबद्दल त्यांना भौतीकशास्र या विषयातील नोबेल पारितोषिक मिळाले.

आपण ज्यांच्या सन्मानार्थ २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतो त्या सर चंद्रशेखर व्यंकट रामन यांचा जन्म तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली या गावी ७ नोव्हेंबर १८८८ रोजी झाला. त्यांचे वडील चंद्रशेखर अय्यर हे एस. पी. जी कॉलेज मध्ये भौतिक शास्राचे प्राध्यापक होते. त्यामुळे त्यांना घरात भौतीकशास्राच वातावरण मिळालं. त्यांनी आपल्या चाणाक्ष बुद्धिमत्तेच्या जोरावर वयाच्या बाराव्या वर्षीच अत्यंत कठीण मानली जाणारी मेट्रिक्स परीक्षा उत्तीर्ण केली. त्यावेळी त्यांना डॉ. अॅनि बेझंट याचं भाषण ऐकण्याची संधी मिळाली. त्यांच्या विचारांचा प्रचंड पगडा सी.व्ही. रामन यांच्यावर पडला. त्या दरम्यान त्यांच्या वडिलांनी त्यांना परदेशात शिक्षणासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यांच्या प्रकृतीचा विचार करता एका डॉक्टरांच्या सांगण्यावरून त्यांना विदेशात न पाठवण्याचे ठरले. त्यामुळे त्यांना आपल्या देशात राहूनच शिक्षण घेण गरजेच होत. त्यांनी १९०३ मध्ये चेन्नई येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पुढे चालून त्यांनी प्रकाशाचे मॉलीक्युलर स्कॅटेरिंग हा शोधनिबंध प्रकाशित केला. ज्या दिवशी त्यांनी नेचर या मासिकात शोधनिबंध प्रकाशित करण्यासाठी पाठवला होता. त्या दिवसच स्मरण रहाव म्हणून भारत सरकारने हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. त्यांनी आपला देश घडावा म्हणून इंडियन इंस्टिट्युत ऑफ सायन्स, बंगरूळ येथे त्यांनी ज्ञानदानाच कामही केल. त्यांच्या आयुष्यात त्यांना अनेक पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्यांनी भौतीकशास्रात केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना १९३० सालचा सर्वोच्च पुरस्कार म्हणजे नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. त्यासोबतच लेनिन शांतता पुरस्कार, भारतातील सर्वोच्च मानला जाणारा भारतरत्न या पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. या महान शास्राज्ञाच्या नावाने  रॅन्चो नावाची संस्था २०११ सालापासून दरवर्षी डिसेंबर मध्ये पुरस्कार देत असते. या महान शास्रज्ञाचा देहांत २१ नोव्हेंबर १९७० मध्ये बंगरूळ येथे झाला.

जगातील सर्वात प्रभावशाली शास्त्रज्ञ कोण? ते कोणत्या देशाचे आहेत? आणि यात *भारतीय किती*? असे प्रश्न जर तुमच्या मनात येत असेल तर त्याच उत्तर आहे.
सर्वात जास्त शास्त्रज्ञ देणाऱ्या पाहिल्या दहा देशामध्ये म्हणजेच टॉप टेन मध्ये पहिल्या क्रमांकावर *अमेरिका* मग *ब्रिटन*, *चीन,* *जर्मनी* , *ऑस्ट्रेलिया*, *नेदरलँड*, *कॅनडा*, *फ्रान्स*, *स्विझर्लांड* आणि *स्पेन* आहे.

आपल्या मनात विचार आला असेल की *भारत का नाही* या यादीत? कारण या यादीत यायला किमान शंभर शास्त्रज्ञ तरी त्या देशाचे लागतात. जसे अमेरिकेचे *2639* शास्त्रज्ञांचा या यादीत स्थान मिळाले आहे, ब्रिटनचे *546*, चीनचे *482* शास्त्रज्ञांचा समावेश आहे आणि *भारताचे फक्त दहा* शास्त्रज्ञांचा या यादीत समावेश आहे. म्हणजे किमान शंभर शास्त्रज्ञांची तरी यादी हवी आणि त्याच्या जवळपास पण आपण भारतीय नाही आहोत.

 *"गेल्या साठ वर्षात आपण असा एक तरी असा शोध लावला आहे का की जेणेकरून जग बदलले आणि आपली आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली*" काय कारण असेल याचे? 125 कोटी लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे शंभर शास्त्रज्ञांचे नाव सुद्धा आपल्याला देता येत नाही.

आपण शिक्षणाचा अर्थ माहितीचा संग्रह करणे असा काढतो. आपल्या सर्वांना रेडीमेड उत्तराची सवय झाली आहे.

शिक्षणपद्धती ही प्रश्नांवर आधारित हवी. विद्यार्थ्यांना दररोज नवनवीन प्रश्न पडले पाहिजे. प्रश्न निर्माण होण्यासाठी शाळा-कॉलेजमध्ये तसे वातावरण हवे. *विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रीय दृष्टिकोन निर्माण करावा लागतो.*

शास्त्र विषय शाळेत कॉलेजमध्ये शिकवणे वेगळे आणि शास्त्रीय दृष्टिकोन बाळगणे वेगळे. त्यासाठी शिक्षणात अर्थात वर्गात जिज्ञासा, कुतूहल याला भरपूर वाव हवा. शिक्षणामध्ये अंधश्रद्धा दूर करणारे विचार हवे, *कारण अंधश्रद्धा केवळ अज्ञान नाही तर एक प्रक्रिया आहे.* तिचा देव धर्माशी संबंध नसतो. घराघरातून, शाळेतून विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवतो. इथूनच त्याची विचार करण्याची प्रक्रिया खुंटते आणि हळूहळू त्याला किंवा तिला प्रश्नच पडत नाही.

*जोपर्यंत विद्यार्थ्यांमध्ये चिकिस्ता करण्याची प्रवृत्ती निर्माण होत नाही तोपर्यंत शास्त्रीय दृष्टिकोन निर्माण होत नाही.* जर पुढील काही वर्षात भारतीय शास्त्रज्ञांची यादी 10 वरून 100 वर न्यायची असेल तर आज शाळेतील विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची मुभा दिली पाहिजे. शाळेमध्ये असे काही वातावरण निर्माण करावे लागेल की विद्यार्थी सातत्याने हात आणि मेंदू याचा वापर करतील. अर्थात कृतिशील उपक्रम मुलांना करायला मिळाला हवे. त्यातून त्यांना असंख्य प्रश्न पडतील त्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा ते स्वतःच शोधतील.
या करिता 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन प्रत्येक शाळेत प्रयोग करून साजरा करूया .


*28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन* आपण साजरा करतो त्या मागील कारण पण तसंच आहे.
Dr.C.V.Raman यांनी 28 फेब्रुवारी रोजी आपला शोध निबंध सादर केला होता त्या संशोधनाला नोबेल पारितोषिक मिळाले त्याची आठवण म्हणून आपण हा दिन साजरा करतो.

*आपण सर्वांनी विध्यार्थ्यांच्या  अवतीभवती जिज्ञासा, कुतूहल आणि प्रश्न निर्माण होतील वातावरण निर्माण करायचे आहे.* असे वातावरण प्रथम  घरातून शाळेत, शाळेतून कॉलेज, कॉलेज ते विद्यापीठ आणि विद्यापीठातून संपूर्ण समाजात निर्माण व्हायला हवे. चला आजपासून शिक्षणात सृजनशीलतेला वाव देऊ. लहान मुलांच्या प्रत्येक निरर्थक प्रश्नांची उत्तरे देऊ कारण आइन्स्टाइन यांनी म्हटले आहे की *The Important things is not to Stop Questioning.*


बुधवार, १३ फेब्रुवारी, २०१९

जागतिक रेडिओ दिन world radio day


जागतिक रेडिओ दिन हा १३ फेब्रुवारी ला दरवर्षी साजरा करण्यात येतो. जगभरातील लोक रेडिओ आणि त्यानुसार आपले जीवन कशे साकारू आणि विकसित करु शकतात. तसेच जग बदलण्यासाठी सकारात्मक संवाद साधण्यासाठी रेडिओ जगभरातील लोकांना एकत्र आणू शकतो ह्याच उद्देशाने साजरा करण्यात येतो.

रेडिओ हे जगातील जास्तीत जास्त जनतेच पोचणारे मोठे माध्यम आहे. हे एक शक्तिशाली संपर्क साधन आणि कमी खर्चाचे माध्यम म्हणून देखील ओळखले जाते. ह्या माध्यमातून दूर रहिवासीत असलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी खूप सोयीचे आहे. रेडिओ विशेषतः अशिक्षित, अपंग, महिला, युवक आणि गरीब अश्या लोकांपर्यंत पोहोचणयासाठी अनुकूल आहे. तसेच सार्वजनिक वादविवाद मध्ये भाग घेण्यासाठी हा एक मंच म्हणून उपयोगी पडतो कारण ह्यामध्ये लोकांच्या शैक्षणिक स्तरावरीळ भिन्नतेच फरक पडत नाही. याशिवाय, अपात्कालीन आणि नैसर्गिक संकट काळात संपर्क करण्यासाठी रेडिओची एक मजबूत आणि विशिष्ट भूमिका असते.
सध्याच्या ब्रॉडबँड, मोबाईल आणि टॅब्लेटसारख्या नवीन गोष्टींच्या जमान्यात रेडिओ सेवांमध्ये घडणारे बदल देखील खूप महत्वाचे आहेत. तरीसुद्धा, असे म्हटले जाते की आजपर्यंत एक अब्ज लोकांपर्यंत अद्याप रेडियो पसरमाध्यम पोहोचले नाही.
जनतेमध्ये जास्तीत जास्त जागरूकता निर्माण करणे आणि रेडिओ ह्या महत्त्वपूर्ण प्रसारमाध्यमाचा पसार करणे.  रेडिओमार्फत माहिती मिळवण्याची आणि प्रदान करण्यासाठी निर्मात्यांना प्रोत्साहित करणे. तसेच रेडिओ प्रसारमाध्यम करणाऱ्या संस्थांमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढविणे, हेच जागतिक रेडिओ दिनाचे महत्व आहे.
भारतात रेडिओ प्रसारणासंबंधीचे प्रयोग १९१५ साली सुरू झाले.बी बी सी च्या धर्तीवर इंग्रज सरकारने भारतात इंडियन ब्राॅडकास्टिंग काॅर्पोरेशन स्थापन करून पहिल्यांदा रेडिओ प्रसारणासाठी मुंबई कॆेंद्र निर्माण केले. मात्र प्रत्यक्ष प्रसारणास सुरुवात १९२४ साली मद्रास येथे सुरू झालेल्या एका खाजगी संस्थेने केली. त्याचवर्षी इंग्रजांनी भारतीय प्रसारण संस्था नावाच्या एका खासगी संस्थेला मुंबई व कलकत्ता येथे रेडिओ यंत्रणा स्थापित करण्याची अनुमती दिली. १९३० साली या संस्थेचे दिवाळे निघाल्यानंतर इंग्रजांनी ही दोन ठिकाणे आपल्या अधिपत्याखाली घेतली व कामगार व उद्योग या विभागाअंतर्गत ’भारतीय राज्य प्रसारण मंडळ’ नावाची प्रसारण संस्था स्थापन केली. १९३६ साली या संस्थेचे ’ऑल इंडिया रेडिओ’ असे नामकरण करून दूरसंचार विभागात याचे स्थलांतर केले. १९४७ साली जेव्हा भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले तेव्हा ’ऑल इंडिया रेडिओ’ नावाचा स्वतंत्र विभाग माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापन करण्यात आला. ’ऑल इंडिया रेडिओ’चे अधिकृतरीत्या ’आकाशवाणी’ हे नाव १९५७ साली ठरविण्यात आले. ते प्रसिद्ध हिंदी कवी पं. नरेंद्र शर्मा यांनी सुचविले होते.
म्हैसूर संस्थानाने १९३५ मध्ये स्थापिलेल्या रेडिओ-केंद्रास ‘आकाशवाणी’ हे नाव दिले होते. हेच नाव पुढे भारत सरकारने देशातील सर्व रेडिओ-केंद्रांसाठी स्वीकारले.[१]
जरी १९९० च्या दशकापासून खाजगी संस्था रेडिओ प्रसारणात उतरल्या असल्या तरीही देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात पोहोचणारी ’आकाशवाणी’ आपली लोकप्रियता टिकवून आहे.
2022 ची रेडिओ दिवसाची थीम आहे Radio And Trust! 13 फेब्रुवारी 2024 रोजी साजरा होणाऱ्या जागतिक रेडिओ दिनाची थीम " रेडिओ: एक शतक माहिती देणारी, मनोरंजन करणारी आणि शिक्षण देणारी " आहे. युनायटेड नेशन्स म्हणते, “2024 पाळणे रेडिओचा इतिहास आणि बातम्या, नाटक, संगीत आणि खेळांवर त्याचा प्रभावशाली प्रभाव हायलाइट करते.

रविवार, ३ फेब्रुवारी, २०१९

उमाजी नाईक

उमाजी नाईक

जन्म : ७ सप्टेंबर १७९१
मृत्यू : ३ फेब्रुवारी १८३२
हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील आद्यक्रांतिकारक होते.
भारताच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत काहींची नोंद झाली, काहींची दखलच घेण्‍यात आली नाही. सन १८५७ च्या उठावाअगोदरही अनेक उठाव झाले अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो की पळो करून सोडणारा व सर्व प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारा महाराष्ट्रातील निधड्या छातीचा वीर आद्यक्रांतिकारक नरवीर ठरला गेला.तो म्हणजे 'उमाजी नाईक'.
३ फेब्रुवारीहा या आद्यक्रांतिकाराचा स्मृतिदिन. रामोशी-बेरड समाजाशिवाय कोणाच्याच नेहमीप्रमाणे तो लक्षात राहत नाही. त्यामुळे, उमाजी नाईक फक्त रामोशी-बेरड समाजापुरते सीमित राहून गेल्यासारखे होत आहे.
क्रांतिकारकांचा आदर आणि त्यांचे स्मरण सर्वच जातिधर्मातील लोकांनी केले पाहिजे..मग हे उमाजी नाईक असे उपेक्षित का राहून गेले हे आश्चर्य आहे.. 'मरावे परि क्रांतिरूपे उरावे' अशी उक्ती आहे.ती आद्यक्रांतीकारक उमाजी नाईक यांच्याबद्दल तंतोतंत जुळते. ते स्वत:च्या कार्याने एक दीपस्तंभ ठरले आहेत.त्यांचा गौरव करण्यापासून इंग्रज अधिकारीही स्वत:ला रोखू शकले नाहीत. इंग्रज अधिकारी रॉबर्ट याने १८२० ला ईस्ट इंडिया कंपनीला लिहिताना म्हंटले आहे, "उमाजीचा रामोशी समाज इंग्रजांविरुद्ध तिरस्काराने पेटला असून तो कोणत्या तरी राजकीय बदलाची वाट पाहत आहे.जनता त्यांना मदत करत असून कोणी सांगावे हा उमाजी राजा होऊन छत्रपती शिवाजी सारखे राज्य स्थापणार नाही?"
तर टॉस म्हणतो, "उमाजीपुढे छत्रपती शिवरायांचा आदर्श होता.त्याला फाशी दिली नसती तर तो दुसरा शिवाजी झाला असता." हे केवळ गौरवोद्गार नसून हे सत्य आहे ... जर इंग्रजांनी कूटनीती आखली नसती तर कदाचित तेव्हाच स्वातंत्र्य लाभले असते.
नरवीर उमाजी नाईक यांचा जन्म रामोशी-बेरड समाजात लक्ष्मीबाई व दादोजी खोमणे यांच्या पोटी ७ सप्टेंबर १७९१ रोजी पुणे जिल्ह्यातील भिवडी येथे झाला. उमाजीचे कुटुंब पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत होते. त्यामुळेच त्यांना नाईक ही पदवी मिळाली होती. उमाजी जन्मापासूनच हुशार, चंचल, शरीराने धडधाकट, उंचापुरा आणि करारी होता. त्याने पारंपरिक रामोशी हेर कला लवकरच आत्मसात केली. जसा उमाजी मोठा होत गेला तसा त्याने वडील दादोजी नाईक यांच्याकडून दांडपट्टा, तलवार, भाला, कुऱ्हाडी, तीरकमठा, गोफण वगैरे चालवण्याची कला अवगत केली. या काळात इंग्रजांनी हिंदुस्तानात आपली सत्ता स्थापन करण्यास सुरुवात केली होती. हळूहळू मराठी मुलुख जिंकत त्यांनी पुणे ताब्यात घेतले. इ.स. १८०३मध्ये पुण्यात दुसऱ्या बाजीराव पेशव्यास स्थानापन्न केले आणि त्याने इंग्रजांचा पाल्य म्हणून काम सुरु केले. सर्वप्रथम त्याने इतर सर्व किल्ल्यांप्रमाणे पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाचे काम रामोशी समाजाकडून काढून घेऊन आपल्या मर्जीतील लोकांकडे दिले.त्यामुळे रामोशी समाजावर उपासमारीची वेळ आली. जनतेवर इंग्रजी अत्याचार वाढू लागले. अशा परिस्थितीत करारी उमाजी बेभान झाला. छत्रपती शिवरायांना श्रद्धास्फूर्तीचे स्थान देत त्याने त्यांचा आदर्श घेऊन स्वतःच्या अधिपत्याखाली स्वराज्याचा पुकार करत माझ्या देशावर परकीयांना राज्य करू देणार नाही, असा पण करत विठुजी नाईक, कृष्ण नाईक, खुशाबा रामोशी, बाबू सोल्स्कर यांना बरोबर घेऊन कुलदैवत जेजुरीच्या श्री खंडोबारायाला भंडारा उधळत शपथ घेतली व इंग्रजांविरोधात पहिल्या बंडाची गर्जना केली.
उमाजी नाईक यांनी इंग्रज, सावकार, मोठे वतनदार अशा लोकांना लुटून गोरगरिबांना आर्थिक मदत करण्यास सुरवात केली. कोणत्याही स्त्रीवर अत्याचार अन्याय झाल्यास तर तो भावासारखा धावून जाऊ लागला. इंग्रजांना त्रास दिल्यामुळे उमाजीला सरकारने इ.स. १८१८मध्ये एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा दिली. परंतु तो काळ सत्कारणी लावत तो त्याकाळात लिहिणे वाचणे शिकलला .आणि सुटल्यानंतर इंग्रजांविरुद्धाच्या त्याच्या कारवाया आणखी वाढल्या. उमाजी देशासाठी लढत असल्याने जनताही त्याला साथ देऊ लागली आणि इंग्रज मेटाकुटीला आले. उमाजीला पकडण्यासाठी इंग्रज अधिकारी मॉकिन टॉस याने सासवड-पुरंदर च्या मामलेदारास फर्मान सोडले. मामलेदार इंग्रजी सैन्य घेऊन पुरंदरच्या पश्चिमेकडील एका खेड्यात गेला असता तेथे त्यांच्यात आणि उमाजीच्या सैन्यात तुंबळ युद्ध झाले आणि इंग्रजांना पराभव स्वीकारावा लागला. उमाजीने ५ इंग्र सैनिकांची मुंडकी कापून मामलेदाराकडे पाठवली. त्यामुळे इंग्रज चांगलेच धास्तावले. उमाजीचे सैन्य डोंगरात टोळ्या करून राहत असे. एका टोळीत जवळ जवळ ५ हजार सैनिक होते.
१८२४ ला उमाजीने भाबुड्री येथील इंग्रज खजिना लुटून तो देवळाच्या देखभालीसाठी जनतेला वाटला होता. ३० नोव्हेंबर १८२७ ला इंग्रजांना त्याने ठणकावून सांगितले की, आज हे एक बंड असले तरी असे हजारो बंडे सातपुड्यापासून सह्याद्रीपर्यंत उठतील व तुम्हास जेरीस आणतील. फक्त इशारा देऊन न थांबता त्याने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. २१ डिसेंबर १८३० ला उमाजीनी आपला पाठलाग करणाऱ्या इंग्रज अधिकारी बॉईड आणि त्याच्या सैन्याला मांढरदेवी गडावरून बंदुका, गोफणी चालवून घायाळ करून परत पाठवले होते .आणि काहीचे प्राण घेतले होते.
उमाजीने १६ फेब्रुवारी १८३१ रोजी इंग्रजी सत्तेविरुद्ध एक जाहीरनामाच प्रसिद्ध केला. त्यात नमूद केले होते की, लोकांनी इंग्रजी नोकऱ्या सोडाव्यात. देशवासीयांनी एकाच वेळी एकत्र येऊन जागोजागी गोंधळ घालावा आणि इंग्रजांविरुद्ध अराजकता माजवावी. इंग्रजांचे खजिने लुटावेत. इंग्रजांना शेतसारा,पट्टी देऊ नये. इंग्रजांची राजवट आता लवकरच संपुष्टात येणार आहे. त्यांना कोणीही मदत करू नये तसे केल्यास नवीन सरकार त्यांना शासन करेल. असे सांगून उमाजीने एकप्रकारे स्वराज्याचा पुकारच केला होता. तेंव्हापासून उमाजी जनतेचा राजा बनला. या सर्व प्रकारामुळे इंग्रज गडबडले आणि त्यांनी उमाजीला पकडण्यासाठी युक्तीचा वापर केला. सावकार, वतनदार यांना मोठमोठी आमिषे दाखवण्यात आली उमाजीच्या सैन्यातील काहीना फितूर करण्यात आले. त्यातच एका स्त्रीचे अपहरण केले म्हणून उमाजीने हात कलम केलेला काळोजी नाईक इंग्रजांना जाऊन मिळाला. इंग्रजांनी उमाजीची माहिती देणाऱ्यास १० हजार रुपये आणि चारशे बिघे जमीन बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली. तसेच नाना चव्हाणही फितूर झाला. या दोघांनी उमाजीची सर्व गुप्त माहिती इंग्रजांना दिली.
१५ डिसेंबर १८३१ रोजी भोर तालुक्यातील उतरोली या गावी रात्री बेसावध असताना उमाजीला इंग्रजांनी पकडले. पुण्यात मामलेदार कचेरीतील एका काळ्या खोलीत त्याला ठेवण्यात आले.अशा या खोलीत उमाजी असताना त्याला पकडणारा इंग्रज अधिकारी मॉकिन टॉस दररोज महिनाभर त्याची माहिती घेत होता. त्यानेच उमाजीची सर्व हकीकत लिहून ठेवली आहे. उमाजीवर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला आणि या नरवीर उमाजीस न्यायाधीश जेम्स टेलर यांनी दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. देशासाठी फाशीवर जाणारा पहिला नरवीर उमाजी नाईक ३ फेब्रुवारी १८३२ला पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या ४१ व्या वर्षी हसत हसत फासावर चढला. इतरांना दहशत बसावी म्हणून उमाजीचे प्रेत कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून ठेवले होते. उमाजीबरोबर इंग्रजांनी त्याचे साथीदार खुशाबा नाईक आणि बापू सोळकर यांनाही फाशी दिली.
अशा या धाडसी उमाजीनंतर तब्बल १३ वर्षांनी १८४५ ला क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके जन्माला आले. त्यांनी त्यानंतर ३०० रामोशाना बरोबर घेऊन बंड सुरू केले. त्यावेळी दौलती रामोशी हा त्या बंडाचा सेनापती होता.त्यांचा लढा वर्षानुवर्षे प्रेरणा देत राहील.
** विनम्र अभिवादन  **
स्रोतपर माहिती 

आगामी झालेले