नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

छत्रपती थोरले शाहु महाराज

 छत्रपती शाहू महाराज जयंती 🚩


छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती थोरले शाहु महाराज यांच्याविषयी....

१८ मे १६८२ या दिवशी रायगडावर छत्रपती संभाजी महाराज व महाराणी येसुबाईसाहेब यांना पुत्ररत्न झाले हाच छत्रपती संभाजीपुत्र पुढे थोरले शाहु म्हणुन इतिहासात अजरामर झाले त्याचवेळेस लाखो सेनासागराबरोबर औरंगजेब स्वराज्यावर चालुन आला होता.छत्रपती संभाजीराजे मोठ्या आत्मविश्वासाने औंरजेबाशी संघर्ष करत होते नियतीने गलती केली आणि शिवपुत्र मुघलांच्या हाती पडला त्यावेळी हा छत्रपती संभाजीपुत्र अवघा आठ वर्षाचा होता रायगड पडल्यावर महाराणी येसुबाई व छत्रपती संभाजीपुत्र औरंगजेबाच्या कैदेत रहावे लागले तरीही राजाराम महाराजांचा नेतृत्वाखाली मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध अविरत चालुच होता ते स्वातंत्र्ययुद्ध तब्बल २७ वर्ष चालुन औरंगजेबाच्या शेवटच्या श्वासाबरोबर थांबले..

दरम्यानच्या दिर्घ काळात (१६८९ ते १७०७) शाहु हे मुघलांच्या कैदेतच होते औरंगेजेबाच्या मृत्यूनंतर तब्बल १८ वर्ष मोगलांच्या कैदेत असलेले संभाजीपुत्र शिवाजी उर्फ शाहू ह्यांची सुटका झाली अजिंक्यतारा किल्ल्यावर शाहु १२ जानेवारी १७०८ या दिवशी छत्रपती जाहले..पण या १८ वर्षात शाहुंना घडविणार्या मातोश्री येसुबाईसाहेब यांचे आभाळाएवढे कर्तृत्व आम्ही लक्षात घ्यायला हवे छत्रपती शाहू महाराजांचा काळ म्हणजे मराठा साम्राज्यातील सुवर्ण काळ मानला जातो छत्रपती शाहूंच्या मुत्सदी राजकारणाने अनेक मराठी घराणी उदयाला आली..

सामान्यातला असामान्यत्व उफाळून आलं शाहू महाराजांनी या घराण्यातील शूर पुरुषांचा कौशल्याने उपयोग करून घेतला त्यांच्या गुणाची कदर केली त्यांना उत्तेजन देऊ केले वेळोवेळी त्यांची पाठ थोपटली याचाच परिणाम म्हणून हे पुरुष मोठमोठी धडाडीची राजकारण स्वतःच्या ताकदीवर पेलून शिवाजी महाराजांनी लावलेल्या स्वराज्याचा रोपट्याला स्वतःच्या रक्तमांसाच खतपाणी घालू लागले बघता बघता या रोपट्याचा वटवृक्ष झाला तो फोफावला त्याच्या पारंब्यानी संबंध हिंदुस्थानावर आपली छाया धरली.. छत्रपती शाहूंनी अगदी विलासी आयुष्य जगले मराठा साम्राज्याचे छत्रपती असूनही त्यांचे अगदी साधे राहणीमान होते..

छत्रपती शाहू राजदरबारध्ये संपूर्ण आभूषणांसाहित राज दरबारातील बाकी सर्व सरदारांची माहिती खालीलप्रमाणे..,

१) खंडेराव दाभाडे (सेनापती) : शाहूंच्या महान सेनेचे नेतृत्व करणारे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व, खंडेराव दाभाडे उत्तरेमध्ये गुजरात व तत्सम प्रातांमध्ये पराक्रम व वचक ठेवण्याचं काम खंडेराव दाभाडे यांनी केलं..

२) बाजीराव प्रधान : शाहू महाराजांच्या विशेष मर्जीतले पराक्रमी व धाडसी व्यक्तिमत्व उत्तरेतील अनेक लढायांमध्ये मर्दुमकी गाजवत मराठा साम्राज्य वाढीला मोठा हात त्यांनी लावला..

३) राणोजी शिंदे : उत्तरेतील ग्वाल्हेर व जवळील प्रांतामध्ये मराठा साम्राज्याचा विस्तार त्यांनी केला..

४) दमाजी गायकवाड : उत्तर हिंदुस्थानामध्ये पराक्रम व मर्दुमकी गाजवली खंडेराव दाभाडे यांच्या नंतर गुजरात व राजस्थान भागामध्ये त्यांनी वचक ठेवला..

डाव्या हाताला

१) पिलाजीराव जाधवराव (मुख्य सल्लागार) :

छत्रपती शाहूंच्या प्रत्येक मोहिमेचा “मुख्य सूत्रधार” भारतभर मराठा रियासतीच्या चालू असलेल्या हरेक मोहिमवर लक्ष ठेवण्याचे व योग्य सल्ला देण्याचे काम पिलाजीराव जाधवराव करत छत्रपती शाहूंच्या दरबारामध्ये त्यांना विशेष स्थान होत..

२) मल्हारराव होळकर : माळव्याचे सुभेदार म्हणून संपूर्ण हिंदुस्थानात ओळख. मराठ्यांचे साम्राज्य उत्तरेत फैलावण्यासाठी होळकरांचे मोठं योगदान आहे. उत्तरेमध्ये मल्हारबाबांचा मोठा दबदबा होता..

३) फतेसिंह भोसले : दक्षिणेमध्ये मराठी साम्राज्याचा विस्तार भोसले घराण्याने केला. छत्रपती शाहूंच्या विशेष मर्जीतले, फतेसिंह भोसले. दक्षिणेतील भोसले घराण्याची भारताच्या सांस्कृतिक ठेव्यातल भरगोस योगदान सर्वश्रुत आहे..

४) उदाजी पवार : धारच्या पवार घराण्यातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्व. उत्तरेतील हरेक मोहिमेमध्ये उत्स्फूर्त सहभाग व पराक्रम...

――

* शाहू छत्रपतींनी स्वराज्याचे रुपांतर बलाढ्य अश्या मराठा साम्राज्यात केले.

* अटकेपार मराठ्यांचे घोडे दौडवण्याची महत्वाकांशा असलेला छत्रपति…शाहू म्हणतात "हिंदुस्थान सर्व आपले करावा असा बेत, अटकेपार घोडे चालवावेत"

* सर्व शुरात श्रेष्ठ, सर्व राजांमध्ये थोर ” – बादशाह बहादूरशाहचे शाहूंबद्दल गौरवोद्गार

* हिंदुस्थान चालविण्यास हिंदुपती शाहू हेच योग्य व्यक्ती आहेत.” – नादीरशहा (इराणचा बादशाह) चे शाहूंबद्दल गौरवोद्गार

* थोरले महाराजांचा (शिवरायांचा) संकल्प हिंदुस्थान काबीज करावे ऐसा राहिला,त्यासाठीच शाहूराजे स्वामींचा अवतार उदय जाहला आहे.पुण्याप्रताप हि तसाच आहे.” – थोरले बाजीराव

* महाराज स्वामींचे प्रतापे थोर यश पदरी पडले” – शाहुबद्दल उद्गार

* ऐसा गरिबनवाज राजा होणे नाही ” -शंकर दिनकरराव

* शाहूंची शिवाजी महाराजांवरील श्रद्धा आणि आदर –

“थोरले छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद व त्यांचे पायाचा प्रताप त्यांनीच इतके रक्षण करून हे दिवस दाखवले”

* "संपूर्ण हिंदुस्थान जिंकून छत्रपती स्वामींचे चरणी ठेवला तरी काळ अनुकूल आहे" - तत्कालीन मराठ्यांची ताकद

* शाहूंची मायाळू वृत्ती !

श्रीमंत पेशवा बाजीराव व मस्तानीचे प्रेम प्रकरण जेवा अगदी बाजीरावाच्या घरच्या मंडळींच्या विरोधामुळे विकोपाला गेले त्याची खबर सातार्यास छत्रपती शाहुंस लागली,व त्यांचे पत्र पेशवा चिमाजी आप्पास आले,त्यात ते लिहितात ' रायास कोणे एकी बिलकुल खट्टे न करणे....रायाच्या मर्जी विरुद्ध होईल ऐसे वर्तन न ठेवणे.....' यावरून शाहूस बाजीरावाची किती काळजी होती हेच दिसून येते.

* शाहू महाराजांचा शिक्का -

। श्री वर्धिष्णुर्विक्रमे विष्णोः। सा मूर्तिरिव वामनी । । शंभूसुतोरिव । मुद्रा शिवराजस्य राजते ।।

* अश्या या अजातशत्रू पुण्यश्लोक सर्वसेनाधीश छत्रपती थोरले शाहूयांना कोटी कोटी प्रणाम !

१५ डिसेंबर १७४९ रोजी निधन

हिंदनृपती छत्रपती थोरले शाहूमहाराजांना मनाचा मुजरा व जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा....🙏

संकलित माहिती

२ टिप्पण्या:

लक्षवेधी म्हणाले...

छान लिहिले ,💐💐💐

Master म्हणाले...

धन्यवाद 🙏 आपण नेहमीच मला प्रोत्साहन दिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

आगामी झालेले