नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

गुरुवार, २३ जून, २०२२

पंडिता रमाबाई डोंगरे Pandita Ramabai Dongare

पंडिता रमाबाई Pandita Ramabai Dongare
२३ जून - जागतिक विधवा दिन निमित्त

पंडिता रमाबाई डोंगरे यांच्या कार्याचा आढावा

रमाबाई यांचा जन्म 23 एप्रिल 1858 रोजी कर्नाटक येथील गंगामूळ येथे झाला अंबाबाई व अनंतशास्त्री डोंगरे यांचे शेवटचे अपत्य. लहानपणापासून त्या बुध्दिमान होत्या. त्यांचे मराठी , संस्कृत , बंगाली , कन्नड , इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होते. 1877 साली त्यांच्या आई वडील यांचे निधन झाले. त्यांनी भारतभर फिरत असता त्यांचे संस्कृत भाषेवर असलेले प्रभुत्व बघून बंगाल येथील संस्थांनी त्यांना 1878 साली "पंडिता " आणी " सरस्वती " हया बिरुदावलीने गौरवण्यात आले.1880 साली भावाचे निधन झाले. त्यांना एकटेपणा जाणवू लागला. 1880 साली त्यांनी बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी विवाह केला. त्यांना मुलगी झाली तीचे नांव मनोरमा ठेवण्यात आले. 4 फेब्रुवारी 1882 रोजी त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यावेळेस रमाबाई अवघ्या चोवीस वर्षांच्या होत्या जेमतेम एक वर्षांच्या मुलीला सांभाळून त्यांनी पुढील आयुष्य अनाथ , विधवा , विकलांग स्त्रियांच्या समस्या सोडवण्यासाठी व त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी खर्ची करायचे ठरवले.
29 सप्टेंबर 1883 रोजी त्यांनी ख्रिस्ती धर्म स्विकारला परंतु शेवटपर्यंत शाकाहारी होत्या तसेच खादीची साडी नेसत असत. त्यांनी ख्रिस्ती धर्माचा प्रसार केला नाही. 11 मार्च 1889 ला त्यांनी शारदा सदनची स्थापना केली. स्त्रीशिक्षण , विधवाविवाह , स्वावलंबन या त्रिसूत्रीवर भर देणारी समाजसुधारक म्हणून त्यांचा लौकिक झाला.त्यांच्यावर टीका तर होत होतीच परंतु त्यांच्या कार्याचा गौरवसुध्दा होत होता.शासनातर्फे त्यांना "कैसर -ए-हिंद " पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

रमाबाईंनी सलग बारा वर्ष मेहनत घेऊन बायबलचे मराठीत भाषांतर केले. त्यांनी मराठी , इंग्रजी भाषेत अनेक पुस्तकं प्रकाशित केली. त्या देशात , प्रदेशात फिरत होत्या परंतु महाराष्ट त्यांची कर्मभूमी होती. त्यांची मुलगी मनोरमा हीचे 24 - 7 - 1921 रोजी निधन झाले.त्याचा त्यांना खुप धक्का बसला व अवघ्या नऊ महिन्यांत 5 एप्रिल 1922 रोजी रमाबाई यांचे निधन झाले.त्यावेळेस त्या 63 वर्षांच्या होत्या.
5 एप्रिल 2022 रोजी पंडिता रमाबाई यांचे निधन होऊन शंभर वर्ष पूर्ण झाली परंतु त्या कार्यरूपाने अजरामर झाल्या आहेत म्हणूनच करोना काळात ज्या महिला विधवा झाल्या त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकारने पंडिता रमाबाई यांच्या नावाने स्वयंरोजगारासाठी विशेष कर्ज योजना सुरू केली आहे. विधवा महिलांसाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते , सामाजिक संस्था , शासन यांनी कितीही काम केले तरी त्यांच्या कुटुंबीय आणी समाज यांनी त्यांना समजून घेतले तर विधवा महिलांना कोणत्याही समस्या येणार नाही व त्यांच्या आयुष्यात सुख समाधान प्राप्त होईल.
त्यांनी लिहिलेली इतर काही पुस्तके खालीलप्रमाणे आहेत : इबरी (भाषेचे) व्याकरण (१९०८); नवा करार (१९१२); मूळ ग्रीक व हिब्रू भाषांतून असलेल्या बायबलचे मराठी भाषांतर, प्रभू येशू चरित्र (१९१३); भविष्यकथा (२ री आवृ. १९१७), अ टेस्टिमनी, मुक्त्ति प्रेअर बेल अँड न्यूज लेटर्स, फॅमिन – एक्स्‌पिरिअन्स इन इंडिया इत्यादी.
पुरस्कार
1878 – कलकत्ता विद्यापीठातून बंगालमध्ये “पंडित” आणि “सरस्वती” पदवी.
1919 – ब्रिटीश सरकारने समुदाय सेवेसाठी कैसर-ए-हिंद पदक प्रदान केले.
यूएसए मधील एपिस्कोपल चर्चच्या लीटर्जिकल कॅलेंडरवर 5 एप्रिल रोजी तिला मेजवानीच्या दिवशी सन्मानित केले जाते.
26 ऑक्टोबर 1989 रोजी, भारत सरकारने भारतीय महिलांच्या प्रगतीसाठी त्यांच्या योगदानाची ओळख म्हणून एक स्मारक तिकीट जारी केले. 

एका अहवालानुसार जगात विधवा महिलांची संख्या 25 84 81058 आहे. फक्त भारतातच ४६ दशलक्ष विधवा आहेत. जागतिक पातळीवर विधवांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या "लुम्बाफौंडेशन " तर्फे २००५ पासून २३ जून हा दिवस विधवादिन म्हणून पाळला जात होता. संयुक्तराष्ट्र संघाच्या वतीने २०१० पासून हा दिवस " जागतिक विधवा दिन " म्हणून पाळण्यास सुरुवात झाली.


आगामी झालेले