नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

सोमवार, २४ मे, २०२१

वीर बाजी पासलकर


🤺 वीर बाजी पासलकर🏇
वीरमरण – २४ मे १६४९
समाधी स्थान – सासवड , पुरंदर, पुणे

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापना केले, जगाच्या इतिहासात एक तेजस्वी पर्वत निर्माण केले, रयतेच्या राजांनी असामान्य साहस, उदार देशभक्ती आणि रयतेचे कल्याण यासाठी कार्यरत राहण्याचे व्रत केले.
छत्रपती शिवरायांचे स्वराज्य कार्यात सुरुवातीस सहभागी झालेल्या बाजी पासलकर हे स्वराज्याचे पहिले सेनापती होते. ह्या पराक्रमी पुरूषांचा इतिहास प्रेरणादायी असाच आहे.
मोसे खो-यात मोसे बु. गावाचे हे भूमिपुत्र. 84 मोसे खो-यात हे वतनदार गोर-गरीबांचे समर्थक होते. रोहिड खोरे आणि गुंजन मावळात त्यांच्या सज्जनतेची आणि दिलदारपणाची ख्याती होती.
बाजी लढताना एक जखम त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या रिंग समशेरधारी उजव्या हातावर होते. वेदनेने कळवळलेले बाजी ते भ्याडाचे प्रतिकार करण्यासाठी त्याही पश्चात वळले आणि तोच क्षण साधत गनिमाची तलवार त्यांच्या छातीवर उतरली.
त्यांच्या मागे वळत असता लक्षात आले की फत्तेखान आपल्या सैन्यासह परत वळले. कवजी मल्हारला हे समजताच तसाच सासवडला धावला. आपल्या धन्याच्या जखमांवर बरीच सासवडली घोडी आणि कवजी मल्हार यांचे दुःख होते. पुरंदर येइतो बाजी देहाची शरीरातली धुगधुगी फक्त आपले विजयी राजा - शिवरायांनी पहायचे आणि दोन शेवटचे शब्द बोलणे बाकी राहिले होते. गडाच्या पायथ्यापासून बाजींची पालखी वर आली व वाट चुकली. पालखी उतरून त्यांनी बाजींचं जखमांनी छिन्नविच्छिन्न शरीर आपल्या मांडीवर घेऊन, ते म्हणाले, "बाजी, आम्हाला पोरकुन कुठे चालले?"
राजांचे अश्रु बाजीच्या जखमांवर पडले. खारट पाणी घासल्यासारख्या जखमा चुरचुरल्या पण आपल्या बलिदानास राजांनी आपल्या अभिषेकाने पावण केले ह्या जाणिवेन मरणाच्या दारात असलेल्या बाजीच्या गालमिशा थरारल्या ! ते क्षीण पण करारी आवाजात ते बोलले, "आरं मांज्या राजा, तू भेटलास, अक्खचा सोनं जाल मांज्या लेकरा! मला मारणा-या त्यो फत्तेखानाच मुंडक आणण्यासाठी मांजा नातू सर्जेराव बाजी जेदे बा कानोझी जेदे हाइती तुज्या बताती. हे सर्व दाव माफी कर राजा, महरला जलम गिनून यी न पन्यादा सवारज्यासाटी लडाया! म्या चालु रानजा, आपलं सवताच सवराज्य व्हनार, जय काकाई! ... .. "
अन् राजांच्या मांडीवर प्राण सोडले बाजींचे डोळे उघडेच होते, ते शिवबाने मिटले आणि दाबून ठेवले. हुंदक्यांना वाट दिली ....
प्राणाची बाजी लावण्या बाजी पासलकर शूर वीर होते. स्वारज्यासाठी ते जगले. गेले. अजरामर झाले. ते त्याचे पराक्रम धर्माचे स्मरणोत्सव आपण सगळे अभिवादन करूया.
बाजी पासलकरांच्या बलिदानामुळे स्वराज्यातील मावळ्यांत सर्वस्वाचा त्याग करण्याचा आदर्श निर्माण झाला.
वीर बाजी पासलकर (देशमुख) हे हिंदवी स्वराज्यासाठी पहिले बलिदान देणारे वीर होते.
पुण्याजवळील वरसगाव धरणातील जलाशयाला बाजी पासलकर यांचे नाव देण्यात आले आहे. बाजी पासलकरांची समाधी सासवड येथे आहे. बाजी पासलकर यांचे स्मारक पुण्यातील दत्तवाडी येथे तानाजी मालुसरे रोडवर आहे.

स्वराज्याची पहिली आहुती. वंदु तव मूर्ती.

🙏🌸 *विनम्र अभिवादन* 🌸 🙏

संकलित माहिती

आगामी झालेले