नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

शनिवार, २७ जून, २०२०

फिल्ड मार्शल सॅम माणेकशा


 Field Marshal Sam Manekshaw: फिल्ड मार्शल सॅम माणेकशा हे नाव ठाऊक नसलेला क्वचित एखादा भारतीय असेल. आजपर्यंत कोणत्याही भारतीय लष्करी अधिकाऱ्याला जितकी लोकप्रियता मिळाली नाही तितकी माणेकशा यांना मिळाली. अर्थात त्यांच्या युद्ध कौशल्य आणि नेतृत्व गुणांमुळेच. कोणत्याही युद्धात जय-पराजयाची निश्चिती होते ती, सेनापतींनी आखलेल्या या युद्धनीतीवर. शत्रूची तयारी जोखून त्या अनुषंगाने मुत्सद्देगिरीने श्रेष्ठ युद्धनीती आखणारा सेनापती युद्धातील विजयावर शिक्कामोर्तब करत असतो. ही बाब भारताचे आठवे लष्करप्रमुख सॅम माणेकशा यांनी १९७१ मधील बांगलादेशच्या युद्धात निर्णायक विजय मिळवून सप्रमाण सिद्ध करून दाखविली. या युद्धात भारतीय लष्कराचे नेतृत्व करणाऱ्या माणेकशा यांच्या कामगिरीचा गौरव ‘फिल्ड मार्शल’ हा किताब देऊन करण्यात आला. स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय लष्कराचे ते पहिले फिल्ड मार्शल. पाकिस्तानी लष्कराला १८ दिवसांत शरण आणणारे आणि भारतीय लष्कराचा मानबिंदू ठरलेले माणेकशा यांची आज जयंती. त्यानिमित्त जाणून घेऊयात भारतीय लष्कारातील सर्वात लोकप्रिय अधिकारी ठरलेल्या माणेकशा यांच्याबद्दल…
३ एप्रिल १९१४ साली सॅम माणेकशा यांचा जन्म अमृतसरमधील एका पारशी कुंटुंबामध्ये झाला.
त्यांचे पूर्ण नाव सॅम हॉर्मूसजी फर्मजी जमशेदजी माणेकशा होते
भारतीय लष्करामध्ये फाइव्ह स्टारपर्यंतची बढती मिळून फिल्ड मार्शल झालेले ते पहिले अधिकारी ठरले
सॅम यांनी लष्करात जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्याला विरोध केला. त्यावेळस सॅम यांनी मला लष्कारात जाऊ देत नसाल तर लंडनला पाठवा तिथे मी डॉक्टरीची पदवी घेऊन मोठा गायनोकोलॉजिस्ट होईल असे इच्छा वडिलांना बोलून दाखवली. मात्र वडिलांनी या गोष्टीलाही नकार दिला. त्यामुळे सॅम यांनी अखेर भारतीय लष्कराची प्रवेश परिक्षा दिली.
सॅम चाळीस वर्षे भारतीय लष्करात कार्यरत होते. आपल्या चाळीस वर्षाच्या लष्करी सेवेत त्यांनी पाच मोठ्या लढाया लढल्या. यामध्ये दुसरे महायुद्ध, १९४७चे भारत-पाकिस्तान युद्ध, १९६२चे भारत-चीन युद्ध, १९६५चे भारत- पाकिस्तान युद्ध आणि १९७१चे बांगलादेश स्वतंत्र्य झाला ते भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाचा समावेश होतो. १९७१च्या भारत पाकिस्तान युद्धाआधी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सॅम माणेकशा यांना भारतीय लष्कर युद्धासाठी तयार आहे का असा प्रश्न विचारला असता, ‘मी कायमच तयार असतो स्वीटी’ (I am always ready sweetie)असे उत्तर दिले होते. ते स्वत: पारसी होते आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पती फिरोज गांधीही पारसीच होते. त्यामुळे भावनिक जवळीक असल्याने ते प्रिय या शब्दाऐवजी स्वीटी हा पारसी शब्द वापरायचे.
युद्धभूमीवर लढताना अनेकदा सॅम हे थोडक्यात बचावले आहेत. १९४२ साली लष्करामध्ये कॅप्टन पदावर असताना ते जपानविरुद्ध बर्मा येथे लढाईमध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांना ९ गोळ्या लागल्याने ते युद्धभूमीवरच गंभीर जखमी झाले. तेव्हा त्यांचे सहकारी शिपाय शेर सिंग हे त्यांच्या मदतीला धावून गेल्याने त्यांना वेळीच उपचार मिळाले आणि त्यांचे प्राण वाचले. त्यांची अनेक वाक्ये लोकप्रिय आहेत. त्यापैकी भारतीय लष्करातील गुरखा बटालीयन आणि गुरखा समाजातील व्यक्तींच्या शौर्याबद्दल त्यांनी व्यक्त केलेले दोन ओळीतील मत आजही गुरखा बटालीयन मोठ्या आदबीने वापरते. गुरखा लोकांबद्दल बोलताना एकदा सॅम म्हणाले होते, ‘जर एखादी व्यक्ती मरणाला घाबरत नाही असं म्हणतं असेल तर एकतर ती खोटं बोलतं असेल नाहीतर ती गुरखा असेल’
सॅम माणेकशा हे आपल्या हजरजबाबीपणासाठी ओळखले जात. असेच एकदा त्यांना फाळणीच्या वेळी तुम्ही पाकिस्तानमध्ये गेला असता तर काय झाले असते? हा प्रश्न कोणीतरी विचारला. त्यावेळी क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी उत्तर दिले की, ‘तर सगळ्या लढाया पाकिस्तान जिंकले असले’
🏆१९७२ साली राष्ट्रपतींच्या आदेशानुसार त्यांच्या सेवाकाळात सहा महिन्यांनी वाढ करण्यात आली होती. केवळ राष्ट्रपतींचा आदेश असल्याने तब्बेत ठीक नसतानाही त्यांनी कोणताच आक्षेप न घेता ही मागणी मान्य केली. सॅम माणेकशा यांना १९४२ साली मिलेट्री क्रॉस पुरस्कार, १९६८ साली पद्मभूषण आणि १९७२ साली पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले.
👉'थिएटर कमांड'ची गरज सर्वप्रथम १९७१च्या लढाईनंतर भारताचे सेनापती फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांनी व्यक्त केली होती. कारण, १९७१च्या लढाईनंतर त्यांना हे लक्षात आले होते की, जर सर्व एकत्रित असते तर झालेली लढाई अजून जास्त चांगल्या पद्धतीने लढता आली असती. युद्धाचे डावपेच सदैव बदलत असल्यानेच, युद्ध किंवा युद्धसदृश कारवाया आता विशिष्ट सैन्यदलापुरत्या मर्यादित राहणार नाहीत. युद्धातील अशा बदलत्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठीच भारतात 'थिएटर कमांड' गरजेचे आहे. १९७१ मध्ये भूदल आणि वायुदल यांनी एकत्रित कारवाई केली, त्याचे मुख्य कारण होते, फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांचे उत्तुंग, भव्य व्यक्तिमत्त्व़!
तसेच ते अखिल भारतीय क्रीडांगण खेळ समितीचे अध्यक्षही होते . सर्व शिपाई त्यांना ‘सॅम बहाद्दूर’ या नावाने संबोधीत असत. यावरून त्यांची लोकप्रियता निदर्शनास येते.
🏠वेलिंग्टन येथील लष्करी रुग्णालयात २७ जून २००८ साली न्यूमोनियाच्या उपचारादम्यान त्यांचा मृत्यू झाला. सॅम यांच्या अत्यसंस्काराला कोणताही राजकीय नेता उपस्थित राहिला नाही किंवा राष्ट्रीय दुखवटाही जाहीर करण्यात आला नाही ही शोकांकिकाच म्हणावी लागेल.
एक गोष्ट.....
महागडा सौदा!

ब्रिटीशांच्या राजवटीतल्या भारतीय लष्करात एक गोरागोमटा-देखणा पारशी अधिकारी होता. स्वभावाने हूड असलेल्या या अधिकाऱ्याला मोटरसायकलचे प्रचंड वेड होते. त्याने १९४७ च्या काळात जेम्स मोटरसायकल १६०० रुपयांना विकत घेतली. मात्र या मोटरसायकलवर त्याच्या एका कनिष्ठ अधिकाऱ्याचा डोळा होता. बहुतेक वेळेस तोच ही मोटरसायकल चालवत असे.

भारत-पाकिस्तान अशी फाळणी निश्चित झाली आणि मेजर हुद्यावर असलेला तो कनिष्ठ अधिकारी पाकिस्तानात जाणार हे ठरले. फाळणीच्या जेमतेम दोन दिवस आधी तो मेजर या अधिकाऱ्याला म्हणाला; "सर तुम्हाला भारतात सगळे काही मिळेल; मला पाकिस्तानात काहीही मिळणार नाही, त्यामुळे तुमची बाईक मला विका ही विनंती!"
अधिकाऱ्यानेदेखील मोठ्या मनाने आपली लाडकी मोटरसायकल १००० रुपयात विकायचे मान्य केले!

आता माझ्याजवळ पैसे नाहीत, मी पाकिस्तानात गेलो की लगेच पाठवून देतो, असे सांगून मेजर गाडी घेऊन गेला. शब्दाला जागला तर तो पाकिस्तानी कसला? अर्थात, हे एक हजार रुपये कधीच मिळाले नाहीत.

पुढे नंतर १९७१ च्या युद्धात हे अधिकारी भारताचे नेतृत्व करत होते; तर तो मेजर पाकिस्तानचे. युद्ध संपल्यावर बांगलादेशाची निर्मिती झाली. त्यावेळी या अधिकाऱ्याने सांगितले; "पाकिस्तानच्या लष्कराला त्यांचा भूतकाळ खूप महागात पडला! मी तर माझ्या मोटरसायकलचे फक्त १००० रुपये मागितले होते, ते न मिळाल्याने  मी त्यांच्याकडून अर्धा पाकिस्तानच घेतला आणि माझ्या बाईकची किंमत वसूल केली!"

पैसे बुडवणारा मेजर होता याह्याखान.......
आणि तो शूर अधिकारी म्हणजे अन्य कोणी नसून;
"जर एखादा माणूस मृत्यूला घाबरत नाही असे म्हणाला; तर एक तर तो खोटं तरी बोलतोय किंवा तो गुरखा आहे!" असे म्हणणारे फील्ड मार्शल सॅम होर्मसजी फ्रामजी जमशेदजी माणेकशा अर्थात भारताचे लाडके सॅम बहादूर!

*फिल्ड मार्शल सॅम माणेकशा* यांचा आज (२७ जून २००८) स्मृतिदिन!
त्यांच्या स्मरणदिनी त्यांच्या स्मृतींना सादर वंदन.....!           🙏🇮🇳🙏 संकलित माहिती 

शुक्रवार, २६ जून, २०२०

जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन

*जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन’*
              युनो जनरल असेंब्लीने २६ जून हा दिवस ‘अंमली पदार्थ विरोधी दिन’ पाळायचा’ आणि जगभरात चालू असलेल्या अमली पदार्थांच्या बेकायदेशीर व्यापारावर नियंत्रण आणायचे आणि जागतिक सोसायटीचे उद्दिष्ट – संपूर्ण सोसायटी अमली पदार्थमुक्त करण्याचे – पूर्ण कसे होईल यासाठी प्रयत्न करायचा. सर्वप्रथम हा निर्णय १९८७ मध्ये युएनच्या समोर मांडला गेला जेणे करून बेकायदेशीर अमली पदार्थांचा वापर जी जगासमोरील सर्वांत मोठी समस्या होती त्याला वाचा फुटली.
२०१८ वर्षाचा विषय (थीम) होती…
‘‘प्रथम ऐका – मुलांना व तरुणांना निरोगी व ज्ञानी बनविण्यासाठी मदत करण्याची पहिली पायरी म्हणजे प्रथम त्यांचे ऐकून घ्या.’’
अमली पदार्थांचा वापर टाळण्यास मदत करण्याचे हे पहिले पाऊल असून ते विज्ञानावर आधारित आहे व त्यामुळे मुले व तरुणांचे आयुष्य बनविण्यास उपयोगी ठरणार आहे. त्यांचे कुटुंब आणि त्यांचा समाज हा आज सर्वांत गंभीर परिणामांचा सामना करतो आहे. तरुणांच्या आरोग्याच्या समस्यांबरोबरच त्याचे अनेक दुष्परिणाम आहेत- जसे आर्थिक नुकसान, समाजविघातक वागणूक म्हणजे चोरी, हिंसा आणि गुन्हेगारी जो समाजाला लागलेला एक कलंक आहे. भारत सरकारने १९८८ मध्ये कायदा केला. मोठ्या शहरांमध्ये दारूच्या वापरासोबतच या अमली पदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बदलत चाललेली कौटुंबिक रचना आणि मित्रांचा वाढता दबाव ही काही कारणे याच्यामागे असावीत.
अमली पदार्थांच्या संपर्कात येणार्‍या व्यक्तींमध्ये काही गोष्टी दिसून येतात..
१) शारीरिक आरोग्य – अंमली पदार्थं सोडल्यानंतर दिसून येणारी लक्षणे, वाढती झोप किंवा सुस्ती, कोकेनमुळे वाढणारी हृदयाच्या ठोक्यांची गती आणि अल्कोहोलमुळे हातांमध्ये आलेला कंप.
२) मानससास्त्रीय आणि मानसिक आरोग्य – नैराश्य, चिंता
– बदलणारे मूड (मनःस्थिती), झोपण्यातील अडथळे
– रोजच्या कामातील आवड कमी होणे
– गोंधळ/भ्रम/नशा सोडल्यामुळे होणारा त्रास
– कुठलीही औषधे जास्त दिवस घेतल्यामुळे पुढे त्यांची मात्रा वाढवावी लागते
– धोकादायक मनःस्थितीत राहण्याची इच्छा.
३) सामाजिक विषय – चोरी, गुन्हा, हिंसा, आतंकवाद, समाज विघातक वागणूक, पैशांची गैरवाजवी मागणी.
रस्त्यावर किंवा फुटपाथवर राहणारी बरीच मुले ज्यांना भीक मागून किंवा लहान मुलांनासुद्धा मजुरी करून रहावे लागते त्यांना अमली पदार्थांच्या मार्गाने गेल्यास आपले कष्ट कमी होतील किंवा दुष्टांच्या तावडीतून आपली सुटका होईल, असे वाटते. दिल्ली कमिशनकडे आलेल्या लहान मुलांच्या दयाअर्जाच्या केसेसमध्ये असे आढळून आले की जास्तीत जास्त केसेस या अंमली पदार्थांच्या जाळ्यात अडकलेल्या होत्या. फुटपाथवर राहणारी मुले बरेच वेळा स्वस्त अमली पदार्थ वापरतात जसे रबर ग्लू. याच्यामुळे त्यांना रोजच्या त्रासातून जसे लैंगिक, शारीरिक किंवा मानसिक छळातून मुक्ती मिळते.

मित्रमैत्रिणींचा दबाव, अभ्यासाचा ताण, दारूचे व्यसन किंवा आईवडलांना असलेली अमली पदार्थांची सवय, एकच पालक असणे, आई-वडलांचे संबंध तणावपूर्ण असणे, पालक-पाल्यामध्ये सुदृढ संबंध नसणे इत्यादी कारणांमुळे मुलं अमली पदार्थांच्या आहारी जातात आणि त्यातच बुडून राहतात.

रस्त्यावर मिळणारे नशीली पदार्थ हे सहज उपलब्ध असतात. तंबाखू आणि दारू हे शाळकरी मुलांमध्ये सर्वांत जास्त प्रमाणात जसे ४० ते ८०% वापरले जातात. तरुणांवर मित्रांचा दबाव असतो, किंवा त्यांना प्रयोग करून बघायचा असतो आणि त्यांना त्यांच्या मित्रांनी स्वीकारावं असं त्यांना वाटत असतं.

नवयुवक आणि अंमली पदार्थांचा नशा –
किशोरवयीन काळ या अंमली पदार्थांच्या जाळ्यात अडकण्याचा व त्यांचा बेकायदेशीर व्यापार करण्याचा काळ आहे. प्रोत्साहक वागणूकच त्यांना चुकीचे निर्णय घेण्यास प्रवृत्त करते. शिवाय खालील काही कारणे आहेत… १. आत्मविश्‍वासाची कमी, २. मानसशास्त्रीय अडथळे, ३. प्रवृत्त करणारे घटक, ४. मित्रमैत्रिणींना नाही म्हणण्याचे किंवा विरोध करण्याचे कौशल्य नसणे, ५. अकाली लैंगिक सक्रीयता, ६. किशोरावस्थेत गर्भधारणा, ७. समाजविघातक वागणूक, ८. शिक्षणात अपयश, ९. सकारात्मक निरोगी वागणुकीबद्दलचे अज्ञान असणे, १०. दारु किंवा अमली पदार्थ वापरणे म्हणजे ‘शान’ची गोष्ट आहे. ११. एखाद्या गँग किंवा गटामध्ये सामील असणे.

बर्‍याच वेळा यामध्ये कुटुंबसुद्धा जबाबदार असते- जसे पालकांना दारु किंवा नशेची सवय असणे, नात्यातील दुरावा, मुलांबरोबर चांगला वेळ घालवण्याची सवय नसणे, दारू किंवा अमली पदार्थांच्या सेवनाबाबत नियम व त्यांच्या परिणामांबद्दल स्पष्ट कल्पना नसणे, कुटुंबातील भांडणाचा परिणाम, घरगुती हिंसा, नोकरी किंवा कामधंदा नसणे.

किशोरवयीन मुले या सवयीमध्ये अटकण्यास कारणीभूत शाळा आणि समाजही मुख्य भूमिका निभावताना दिसतात. शिक्षणात अपयश, शिक्षकांकडून चुकीचा सल्ला, चुकीचे उत्तेजन, शाळेशी असलेल्या जबाबदारीची जाणीव नसल्यामुळे नवतरुण वाहवत जाऊन ड्रग रॅकेटमध्ये अडकला जाऊ शकतो.
म्हणूनच घर, शाळा आणि समाजातर्फे दीर्घकालीन प्रयत्न होणे अत्यावश्यक आहेत.
* कुटुंबातर्फे करता येण्यासारखे बचावात्मक उपाय किंवा घटक….
१) घट्ट कौटुंबिक संबंध किंवा नाते प्रस्थापित करणे.
२) पालकांमध्ये असलेलं सामंजस्य
३) शिक्षणासाठी प्रेरणा देणे
४) विद्यार्थ्यांना ताणाशी सामना करण्याचे शिक्षण देणे
५) दारू आणि अमली पदार्थांच्या संयत वापराबद्दलचे ज्ञान तसेच अपेक्षांबद्दल पालकांनी स्पष्ट जाणीव मुलांना करून द्यायला हवी.
६) कौटुंबिक निर्णयात पाल्यांना सामील करा आणि त्यांच्यासोबत एखादी जबाबदारी वाटून घ्या.
७) कुटुंबातील सदस्य हे पोषक आणि सहकार्य करणारे असले पाहिजेत.
शाळासुद्धा तरुणांना गुंतवून ठेवून शाळेबद्दल त्यांच्या मनात एक घट्ट आणि सकारात्मक नाते निर्माण करू शकतात. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नियमित शाळेत येण्याबद्दल प्रोत्साहित केले पाहिजे, त्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी व चांगल्या वागणुकीसाठी प्रोत्साहित केले पाहिजे, शैक्षणिक ध्येय मिळवण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे आणि त्यांच्यात नेतृत्व गुण आणि निर्णयक्षमता वाढीस लागेल यासाठी विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून द्यायला हव्यात, त्यांना शाळेच्या कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यास प्रवृत्त करावयास हवे व शाळांनी विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

समाजसुद्धा या अंमली पदार्थ विरोधी चळवळीचा एक भाग होऊ शकतो…. कसे? – तरुणांना सामाजिक कार्यामंध्ये गुंतवून किंवा सामावून घेतले पाहिजे, कायद्याची अमलबजावणी समजावून दिली पाहिजे, सगळे नियम-कायदे त्यांना समजावून सांगून ते त्यांचे पालन काटेकोरपणे करतात की नाही याकडे लक्ष द्यायला हवे, समाजातील अमली पदार्थांचे धोकादायक परिणाम मुलांना व पालकांना समजावण्यासाठी कार्यक्रम घ्यावेत आणि त्यांच्याविषयीचे धोके मुलांना व पालकांना समजावून सांगावे.
गोवा हे सुंदर राज्य आहे व पृथ्वीवरील स्वर्ग आहे. गोव्यातील किनारी भागांमध्ये अमली पदार्थांचा उपयोग वाढत्या प्रमाणात होत असून पर्यटनामुळे याचा धोका दिवसेंदिवस वाढतच आहे. अमली पदार्थ उपलब्ध करून देणार्‍यांवर कायद्याचा बडगा उगारायला हवा. त्यांचा उपयोग करणार्‍यांनाच नेहमी पकडलं जातं व शिक्षा केली जाते आणि हे उपलब्ध करून देणारे दुसर्‍या गिर्‍हाईकांना पकडतात जे त्यांच्या उत्पादकांची विक्री बाजारात करीत राहतात
संकलित माहिती 

रविवार, २१ जून, २०२०

फादर्स डे (पितृदिन )




दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी अनेक देशात हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. फादर्स डे सर्वप्रथम १९ जून १९१० रोजी वॉशिंग्टनमध्ये साजरा केला गेला होता. सोनेरा डोड यांनी आपला सांभाळ करणाऱ्या वडिलांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा करण्याची सुरुवात केली होती, पुढे भारतातही हा दिवस स्वीकारून साजरा केला जाऊ लागला.
खरं तर आई-वडीलांविषयी व्यक्त होण्यासाठी कोणत्या खास दिनाची गरजच नाही. कारण प्रत्येक दिवस हा त्यांचाच असतो. पण कधी कधी आदरयुक्त दरारा असल्यामुळे आपण त्यांच्याजवळ व्यक्त होणं टाळतो. आपल्याला जन्म देण्यापासून ते ओळख देण्यापर्यंत आणि ती ओळख कशी जपावी याचे धडे देणाऱ्या वडिलांना थँक्यू म्हणण्याचा हा दिवस आहे. याच खास दिनी व्यक्त होण्यासाठी या टिप्स तुमच्या कमी येऊ शकतात.आज पितृदिन अर्थात फादर्स डे! आपण नेहमीच असं ऐकत आलो आहोत की मूलं आईपेक्षा वडिलांना जास्त घाबरतात. त्यामुळे कधी आपलं प्रेम वडिलांकडे ते व्यक्त करत नाहीत. अर्थात याला आताची आधुनिक मूलं अपवाद आहेत. पण अगदी १०-२० वर्षांपूर्वीही सामान्यत: वडिलांचा घरात खूप धाक असायचा. काहीही झालं की प्रत्येक मुल हे आईवर विसंबून असायचं कारण वडील रागावतील. ओरडतील अशी त्यांना भीती असे. पण जस जसं वय वाढत जातं, मुलं मोठी होतात तस तसे वडील मुलांना रागावणे ओरडणे बंद करतात आणि खूप शांत होतात. पण शेवटी वडिलांचा धाक हा मनात असतोच. तुम्ही सुद्धा आजवर कधीच वडिलांपुढे व्यक्त झाला नसाल किंवा कधीतरी त्यांच्या पुढे व्यक्त व्हावं असं वाटत असले तर पितृदिनापेक्षा खास दिन दुसरा कोणता नाही. त्यामुळे या पितृदिनाचे औचित्य साधून विसरा मनातील सगळी भीती आणि द्या आपल्या वडिलांना शूभेच्छा त्या सुद्धा आपल्या मातृभाषेतून अर्थात मराठीमधून!
१) प्रिय बाबा, आजवर कधी बोललो नाही पण खरंच तुमच्या बद्दल माझ्या मनात खूप आदर आहे. लहानपणापासून तुमच्याकडे पाहत मी मोठा झालोय आणि मी नेहमी देवाचे आभार मानतो कि मी तुमचा मुलगा म्हणून जन्म घेतला. बाबा नेहमी तुमचे आशीर्वाद पाठीशी राहू दे हीच इच्छा! तुम्हाला पितृ दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
२) बाबा म्हणजे झरा मायेचा, बाबा म्हणजे आधार आयुष्याचा, बाबा म्हणजे धडा मुल्यांचा, बाबा म्हणजे अवतार देवाचा, बाबा तुम्हाला पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
"बाप बाप असतो...
तो काही शाप नसतो....
तो आतून कँनव्हास असतो...
मुलासाठी राब-राब राबतो...
बुडणार्या सुर्याकडे उगाच पाहत बसतो.
पायाच्या नखानी माती उकरत असतो.
शेवटी सर्वानीच साथ सोडली असते.
पाखरं घर सोडून दुर निघुन गेलेली असतात.
बाप मात्र आपल्या पाखराची वाट पाहतो.


अमेरिकेत या दिवसाची सुरूवात झाली. या दिवसाबाबत अनेक कहाण्या सांगितल्या जातात. आज आम्ही तुम्हाला सगळ्यात लोकप्रिय कहाणी सांगणार आहोत. फादर्स डे ची सुरूवात अमेरिकेतील वॉश्गिंटनमध्ये सोनोरा लुईस स्मार्ट नावाच्या या महिलेनं केली. लहान वयातच सोनोराचं आपल्या आईला गमावलं होतं. त्यानंतर सोनोराच्या वडीलांनी संपूर्ण कुटुंबाचे पालन पोषण केले. वडीलांसह आईचेही प्रेम दिले.
१९१० ला पहिल्यांदा साजरा केला होता फादर्स डे
१९०९ मध्ये सोनोरानं एक सभेत मातृ दिनाबद्दल ऐकले तेव्हा तिच्या डोक्यात विचार आला की, आईची माया, ममता यासाठी एक दिवस समपर्ण केला जाऊ शकतो कर पित्याच्या योगदानासाठी का नाही? त्यानंतर फादर्स डे साजरा करण्यासाठी तिला खूप संघर्ष करावा लागला, लोकांशी बोलावं लागलं. त्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या गोष्टीचा स्वीकार केला. त्यानंतर १९ जून १९१० ला फादर्स डे साजरा केला गेला.
वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो फादर्स डे
जगभरातील सगळ्या देशात एकाच दिवशी फादर्स डे साजरा केला जात नाही. भारत, अमेरिकेसह अन्य काही देशात तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. पोर्तुगाल, स्पेन, क्रोएशिया आणि इटलीसह अन्य काही देशात १९ मार्च ला पितृ दिन साजरा केला जातो. तर न्यूजीलँड, फिजी आणि पापुआ, न्यू गिनीमध्ये सप्टेंबर महिन्यात फादर्स डे साजरा केला जातो.
बापाला प्रेम करणारे सुज्ञ पोरं लाभण ही त्याची फार मोठी उपलब्ध मानली जाते. संपत्ती कितीही असूनही अपत्य नीट नसेल तर ती आपत्ती ठरते. ज्यांना चांगले अपत्य लाभतात खरंच ती माणसं भाग्यवान. कारण अनेकांना मुलांचं प्रेम मिळत नाही, सन्मान मिळत नाही. मुलांच्या प्रेमासाठी तरसणाऱ्या बापाच्या हृदयाच्या ठिकऱ्या होतात, हे किती जणांच्या लक्षात येत असेल. बापाच्या हृदयाला झालेल्या जखमांवर कोणताही डॉक्टर उपचार करु शकत नाही. यावर मुलांचं प्रेम हेच एकमेव औषध रामबाण औषधी ठरते. मुलाची अधोगती पाहून' माझं कसं होईल याची चिंता बाप करत नाही लेकराचं कसं होईल म्हणून तो तळमळतो, हे समजायला बापच व्हावे लागते.
आईच्या तुलनेत बापाला फारच कमी मिळते महत्व दिले गेले आहे. आई जितकी महत्त्वाची तितकाच बापही महत्वाचा असतो. परंतु साहित्यिकांनी, लोकवाड्मय निर्मात्यांनी आईची सर्वाधिक महती गायली. बापाकडे दुर्लक्ष झाले. आई प्रेम व्यक्त करते. आई म्हणजे प्रेमाचा सागर असेच मुलांना ऐकायला आणि वाचायला मिळत असते. खरं तर आई म्हणजे व्यक्त प्रेम आणि बाप म्हणजे काही राग नसतो. बाप म्हणजे अव्यक्त प्रेम असते, याची जाणीव मुलांना करुन देणे गरजेचे आहे. सतत आई कृती आणि उक्तीतून व्यक्त होत राहते.
आपल्या क्षमता, कौशल्य आणि शहाणपणाच्या वरुन प्रगती साधत पुढे जाणे ही बाब बापासाठी सर्वांत मोठी भेट ठरेल, असा संकल्प करणे, बापाला समजून घेणे, प्रेम देणे, सन्मान देणे असे घडले तर फादर्स डे अर्थपूर्ण ठरेल.

आंतरराष्ट्रीय योग दिन

 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन


       योग हा व्यायामाचा एक असा प्रभावशाली प्रकार आहे ज्याच्या माध्यमातून केवळ शरीराच्या विविध अवयवांमधीलच नाही तर मन, शरीर आणि आत्मा यांच्यातील संतुलन राखले जाते. योगाभ्यासामुळे शारीरिक व्याधींबरोबरच मानसिक विकारांवर सुद्धा विजय मिळवता येऊ शकतो.

योग या शब्दाची उत्पत्ती युज या संस्कृत शब्दापासून झाली आहे. याचा अर्थ आत्म्याचा परमात्म्याशी संयोग किंवा आत्म्याचा चराचरात व्यापून उरलेल्या चेतनेशी संयोग. योग पद्धती जवळपास दहा हजार वर्षांपेक्षा अधिक काळापासून आचरणात आणला जाते आहे. वैदिक संहितांनुसार तपस्वी, ऋषी यांच्या संदर्भात प्राचीन काळापासून योगाभ्यासाचे संदर्भ आढळतात.

सिंधू संस्कृतीत सुद्धा योगमुद्रा आणि समाधी स्थितीतील मूर्त्या आढळतात. हिंदू धर्मात साधू, संन्यासी आणि योगी सुरुवातीपासूनच योगमार्गाचे आचरण करत मात्र सामान्य लोकांचा याच्याशी फारसा संबंध नव्हता. अलीकडेच सामान्यांमध्ये स्वस्थ, निरोगी, शांततापूर्ण जगण्यासाठी योगाभ्यासाचे महत्त्व वाढते आहे. कारण आजकालची तणावपूर्ण जीवनशैली ही सर्वसामान्यांची दिनचर्या बिघडवून टाकत आहे.

आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये मनःशांती टिकवून ठेवण्याचा सुरक्षित आणि सोपा मार्ग म्हणजे योग.

योगाभ्यासात शारीरिक कृती आणि योग्य पद्धतीने श्वास घेणे यांचा अभ्यास केला जातो. शरीर, मन आणि आत्मा हे शरीराचे तीन मुख्य घटक; यांच्यातील परस्पर संबंधांचे नियमितीकरण असणे आवश्यक असते. दर दिवशी नियमित योगाभ्यास केल्याने शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होऊन आपल्याला अंतर्बाह्य आराम मिळतो. योगातील विविध आसनांमधून मानसिक आणि शारीरिक संतुलन राखले जाते. यातून चांगुलपणाची भावना निर्माण होते.

योगाभ्यासातून बौद्धिक पातळी सुधारते आणि आपण आपल्या भावना स्थिर ठेवून एकाग्र होऊ शकतो. योगाभ्यासातून स्व-अनुशासन साधले जाते. योगाभ्यासाचे हे फायदे लक्षात घेऊन २१ जून २०१५ साली पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.

याआधी डिसेंबर २०११ मध्ये आंतरराष्ट्रीय मानवतावादी ध्यान आणि योग गुरू श्री श्री रविशंकर आणि इतर योग गुरूंनी पुर्तगाली योग परिसंघाच्या प्रतिनिधी मंडळाचे समर्थन केले आणि संपूर्ण दुनियेत २१ जून हा योग दिवस म्हणून साजरा करण्यात यावा अशी मागणी केली. यानंतर ‘योग: विश्व शांतीसाठी एक विज्ञान’ नावाचे संमेलन ४-५ डिसेंबर २०११ मध्ये भरविण्यात आले.

जगत गुरु अमृत सूर्यानंद यांच्या म्हणण्यानुसार, विश्व योग दिनाचा विचार त्यापूर्वी दहा वर्षांपासून डोक्यात होता. पण संपूर्ण भारतातून इतक्या मोठ्या संख्येने या विचाराचे समर्थन करणे हे प्रथमच होत होते.

त्या दिवशी श्री श्री रविशंकर यांच्या नेतृत्वाखाली विश्व योग दिवस २१ जून रोजी संयुक्त राष्ट्र आणि यूनेस्कोद्वारा घोषित करण्यासाठी स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. कित्येक मोठमोठे योगविद्येत पारंगत असलेले योगी याला उपस्थित होते.

या उपक्रमाचे सूतोवाच भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २७ सप्टेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतील आपल्या भाषणात केले होते ज्यात त्यांनी म्हटले होते,

“योग ही भारताच्या प्राचीन परंपरेची एक अमूल्य देणगी आहे. योग हे मेंदू आणि शरीराच्या एकतेचं प्रतीक आहे. मनुष्य आणि प्रकृती यांच्यात सामंजस्य आहे; योग हा विचार, संयम आणि पूर्णत्व प्रदान करणारा आहे त्याचप्रमाणे प्रकृतीस्वास्थ्यासाठी आणि विश्वाच्या भल्यासाठी एक समग्र दृष्टिकोण प्रदान करणारा आहे.

योगाभ्यासाचा आग्रह हा फक्त व्यायामापुरता नाही तर स्वतःच्या आत एक एकात्मतेची भावना जागवण्यासाठी आहे. आपल्या बदलत्या जीवनशैलीमध्ये योग हा चेतना बनून, आपल्या परिस्थितीतील बदलाशी जुळवून घ्यायला आपल्याला मदत करू शकतो. चला तर, एक आंतरराष्ट्रीय योग दिवस दत्तक घेण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू करूयात.”

यानंतर २१ जून हा दिवस “आंतरराष्ट्रीय योग दिवस” म्हणून घोषित करण्यात आला. ११ डिसेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्रातील १७७ सभासदांद्वारे २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यास मान्यता मिळाली.

प्रधानमंत्री मोदी यांचा हा प्रस्ताव ९० दिवसांच्या आत पूर्ण बहुमताने पारित करण्यात आला. हा संयुक्त राष्ट्रातील सर्वात कमी काळात पारित झालेला ठराव ठरला. लोकांच्या स्वास्थ्य आणि कल्याणासाठी संपूर्ण विश्वातील लोकांसाठी एक पूर्णतावादी दृष्टिकोण उपलब्ध करण्याच्या दृष्टीने आमसभेद्वारे ‘वैश्विक स्वास्थ्य आणि विदेशनीती’ अंतर्गत हा प्रस्ताव स्वीकारण्यात आला.

या उपक्रमाला कित्येक वैश्विक नेत्यांनी सुद्धा समर्थन दिले. सगळ्यात आधी नेपाळचे प्रधानमंत्री सुशील कोइराला यांनी प्रधानमंत्री मोदी यांच्या प्रस्तावाचे समर्थन केले. संयुक्त राज्य अमेरिकेसकट १७७ हून अधिक देशांनी या प्रस्तावाला मान्यता दिली. “आजवर आलेल्या कोणत्याही संयुक्त महासभेच्या प्रस्तावातील सहप्रायोजकांपेक्षा यातील सहप्रायोजकांची संख्या सर्वाधिक होती. ११ डिसेंबर २०१४ ला १९३ सदस्य असलेल्या संयुक्त राष्ट्र महासभेने बहुमताने ‘योग आंतरराष्ट्रीय दिवस’ २१ जूनला साजरा करण्याची परवानगी दिली.

भारतात २१ जून २०१५ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला गेला. योग दिवसाचा मुख्य कार्यक्रम दिल्लीच्या राजपथावर झाला ज्यात खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सहभाग घेतला होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राजपथावर जवळजवळ ३६००० लोकांबरोबर योगासने केली.

*२१ जून हाच योग दिवस का ?*

आंतरराष्ट्रीय योग दिवस हा २१ जूनला साजरा करण्यामागे वैज्ञानिक आणि पारंपरिक अशी दोन्हीही कारणे आहेत. खगोलशास्‍त्र असे सांगते की सूर्याच्या दोन स्थिती असतात. उत्तरायण आणि दक्षिणायन. जून महिन्याच्या २१ तारखेला सूर्य आपली स्थिती बदलतो म्हणजेच उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होते. हा एक नैसर्गिक बदल आहे. जेव्हा सूर्याचे दक्षिणायन सुरू होते तेव्हा सूर्याचा प्रकाश आणि उष्णता कमी होते. यामुळे वातावरणात बदल होऊ लागतो.

याने अनेक रोगांचे आणि आजारांचे उगमस्थान असलेले जीवजंतू, सूक्ष्मजीव आपलं काम करायला सुरुवात करतात आणि माणसं आजारी पडण्याचे प्रमाण वाढायला सुरुवात होते.

योगासनांचा आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडतो. यामुळे आपल्या शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी योगाभ्यास गरजेचा आहे. याच कारणाने या वातावरणीय बदलाचा पहिला दिवस हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून निवडण्यात आला.

 *आंतरराष्ट्रीय योग दिवस २१ जूनला साजरा केला जातो.*

तसेच हा दिवस वर्षातील सर्वांत मोठा दिवस असतो आणि योगासने ही माणसाला दीर्घायुष्याचा लाभ मिळवून देऊ शकतात अशी धारणा आणि विश्वास असल्याने हा दिवस योग दिवस म्हणून निवडला गेला.

*विश्व योग दिवसाची उद्दिष्टे:*

◆ योगाभ्यासाच्या अद्भुत आणि प्राकृतिक फायद्यांबद्दल लोकांना माहिती उपलब्ध करुन देणे.
◆ योगाच्या माध्यमातून लोकांना ध्यानधारणेची सवय लावणे.
◆ योगसाधनेच्या फायद्यांबद्दल संपूर्ण जगातील माणसांचे लक्ष वेधून घेऊन लोकांमधील दुर्धर आजारांचे प्रमाण कमी करणे.
◆आपल्या व्यस्त वेळापत्रकातून आरोग्यासाठी एक दिवस काढून जनसमुदायाला एकमेकांच्या जवळ आणणे.
◆ संपूर्ण विश्वामध्ये वृद्धी, विकास आणि शांती याचा प्रसार करणे.
◆ लोकांमध्ये वैश्विक बंधुभाव जागवणे.
◆ योगाभ्यासद्वारे तणावमुक्त जीवन जगण्यास मदत करणे.
◆ लोकांना शारीरिक आणि मानसिक आजाराबद्दल जागरूक करणे आणि योगाच्या माध्यमातून त्यावर उपाय शोधणे.
◆ मानसिक स्वास्थ्य जपून दीर्घकालीन स्वास्थ्य प्राप्त करणे.
◆ योगाभ्यासातून लोकांना शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचा अनुभव देणे.

औषधे ही केवळ असलेल्या रोगांना नष्ट करतात. त्यातही आयुर्वेद हाच रोगांना हळूहळू समूळ नष्ट करतो. मात्र इतर सर्व प्रकारच्या, आजार लवकर बरा व्हावा म्हणून दिल्या जाणाऱ्या औषधांमुळे एक ठिकाणचा आजार दाबला जाऊन शरीरात इतरत्र त्या औषधांचे दुष्परिणाम दिसू लागतात. ‘Prevention is better than cure’ असं कोणीतरी म्हणून ठेवलंय ते खरंच आहे.

म्हणूनच या रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी आणि निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली म्हणून योगाला आपल्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान मिळायला हवे आणि ते मिळावे यासाठी आजचा हा योग दिवस.  आपणही या अभियानात सामील होऊयात…
संकलित माहिती 

शनिवार, २० जून, २०२०

लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर


लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर
        (भारतीय मराठी उद्योजक)
जन्म : २० जून १८६९  गुर्लहोसूर 
मृत्यू : २६ सप्टेंबर १९५६               

राष्ट्रीयत्व : भारतीय
नागरिकत्व : भारतीय
पेशा : संचालक, किर्लोस्कर समूह
प्रसिद्ध कामे : किर्लोस्कर समूह
अपत्ये : शंतनुराव किर्लोस्कर
वडील : काशिनाथ किर्लोस्कर
                                        लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर हे मराठी, हे भारतीय उद्योजक होते. ते किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक होते. इ. स. १८८८ साली त्यांनी बेळगावात सायकल दुरुस्तीचे दुकान थाटत व्यावसायिक क्षेत्रात आपले पहिले पाऊल टाकले. शेतीसाठी त्यांनी बनवलेले लोखंडी नांगर हे पुढे विस्तारलेल्या किर्लोस्कर समूहाचे पहिले उत्पादन होते. किर्लोस्करवाडी येथे त्यांनी इ.स. १९१० साली कारखाना काढला; तसेच कारखान्यातील कर्मचाऱ्यांसाठी औद्योगिक वसाहत स्थापन केली.

त्यांच्यानंतर किर्लोस्कर समूहाची धुरा त्यांचे पुत्र शंतनुराव किर्लोस्कर यांनी सांभाळली.                             🌀 *किर्लोस्कर घराणे*                                                 भारतीय उद्योगधंद्यांच्या क्षेत्रातील एक प्रसिद्ध कारखानदार घराणे.  लक्ष्मण काशीनाथ किर्लोस्कर (२० जून १८६९—२६ सप्टेंबर १९५६) हे किर्लोस्कर उद्योगसमूहाचे संस्थापक. जन्म गुर्लहोसूर येथे.  धारवाड व कलादगी येथे प्राथमिक शिक्षण. अठराव्या वर्षी मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून चित्रकलेचा अभ्यास पूर्ण केला.  पुढे व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये प्रथम चित्रकला-शिक्षक व नंतर बाष्प-अभियांत्रिकीचे अध्यापक. १८९७ मध्ये ते मुंबई सोडून बेळगावला आले. थोरल्या भावाच्या मदतीने त्यांनी सायकल, पवनचक्की, कडबा कापणीयंत्र, लोखंडी नांगर वगैरे वस्तूंच्या उत्पादनास  प्रारंभ केला.  १९१० साली औंध संस्थानाधिपतींकडून सर्व प्रकारच्या सवलती मिळाल्याने लक्ष्मणरावांनी कुंडलच्या निर्जन व निर्जल माळावर `किर्लोस्कर ब्रदर्स’ या नावाने कारखाना उभारला व किर्लोस्करवाडीच्या वसाहतीस प्रारंभ केला. ह्या कारखान्यातून लोखंडी नांगर, चरक, मोटा, रहाट वगैरे कृषिअवजारांचे उत्पादन सुरू झाले.  भांडवल वाढविण्यासाठी १९२० साली कारखान्याचे मर्यादित कंपनीत रूपांतर करण्यात आले. तीमध्ये विविध प्रकारचे हात पंप, लहानमोठे यांत्रिक पंप, घरगुती लोखंडी फर्निचर, लेथ इत्यादींचे उत्पादन होऊ लागले.
१९३४—३८ मध्ये लक्ष्मणराव औंध संस्थानचे दिवाण होते. १९४५ मध्ये ते कारखान्याच्या संचालकपदावरून निवृत्त झाले. १९५३ साली प्रथमच ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’ चे सन्माननीय सदस्यत्व लक्ष्मणरावांना देण्यात आले. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांचे पुणे येथे निधन झाले.
औद्योगिक कारखाने चालविण्याचे व्यावसायिक शिक्षण घेतलेले नसताही लक्ष्मणरावांनी सर्व गोष्टी अतिशय परिश्रमाने साध्य केल्या. त्यांना वाचनाचा अतिशय नाद होता.  विश्वासू व कर्तबगार सहकारी निर्माण करण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती.  लक्ष्मणरावांच्या यशाचे रहस्य म्हणजे ग्राहकांच्या गरजांची पूर्वजाणीव आणि वस्तूच्या उत्कृष्ट गुणवर्त्तेचा आग्रह. कणखर शिस्त, पद्धतशीर काम, जगभर आपला माल लोकप्रिय करण्याची तीव्र आकांक्षा, हे त्यांचे वर्तनसूत्र होते. किर्लोस्करवाडीची रचना करताना `कॅडबरी’ किंवा `नॅशनल कॅश रजिस्टर’ ह्या सुविख्यात पश्चिमी कंपन्यांनी बांधलेल्या औद्योगिक वसाहती त्यांच्या नजरेसमोर होत्या. कारखान्याचे स्वतःचे एखादे मासिक असावे, हीही त्यांची एक आधुनिक कल्पना होती. लक्ष्मणराव यांत्रिकीकरणाचे कट्‌टे क्षेत्रात शिरण्याची स्फूर्ती मिळाली.  १९६९ साली भारत सरकारने लक्ष्मणरावांची जन्मशताब्दी देशभर साजरी केली त्या निमित्ताने टपाल खात्याने वीस पैशांचे एक तिकिटही काढले.
लक्ष्मणरावांनंतर त्यांचे चिरंजीव शंतनुराव (२८ मे १९०३ —  ) किर्लोस्कर उद्योगसमूहाचे अध्यक्ष आणि प्रमुख सूत्रधार बनले. सध्या विसांहून अधिक कारखान्यांचे ते संचालक आहेत. सोलापूर येथे जन्म, शालेय शिक्षण औध व पुणे येथे. अमेरिकेतील ‘मॅसॅचूसेट्‌स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ हया जगद्विख्यात संस्थेत अभियांत्रिकीमधील बी. एस्‌सी. ही पदवी मिळविली.  १९२६ साली किर्लोस्करवाडीच्या कारखान्यात कामास सुरूवात.  १९३५ मध्ये किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचे उपव्यवस्थापक. १९४१ नंतर हरिहर, खडकी, पुणे, बंगलोर, हुबळी, देवास, हडपसर, कोथरूड, कराड, नासिक इ. ठिकाणी विविध यांत्रिक सामग्रीचे किर्लोस्कर कारखाने स्थापण्यात पुढाकार. एंजिने व इतर यंत्रसामग्री आशिया, आफ्रिका, यूरोप, अमेरिका हया खंडांतील देशांस मोठ्या प्रमाणावर निर्यात करण्यात त्यांनी यश मिळविले. ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ऍंड इंडस्ट्री’चे अध्यक्ष (१९६५–६६) ‘बोर्ड ऑफ ट्रेड’चे सदस्य ‘इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स’चे पहिले अर्ध्यक्ष अनेक सरकारी समित्यांवर औद्योगिक सल्लागार. कलकत्ता येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ प्रॉडक्शन एंजिनिअर्स’च्या ‘इंडिया कौन्सिल’ने दिलेल्या ‘सर वॉल्टर पुकी पारितोषिका’चे मानकरी. १९६५ मध्ये भारत सरकारने शंतनुरावांना पद्‌मभूषण पदवी देऊन गौरविले. त्यांनी दिलेली व्याख्याने जेट युगातला मराठी माणूस (१९६८) या पुस्तकारूपात गुंफलेली आहेत. ‘कमिटी फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इन इंडिया’ या समितीचे अध्यक्ष. कलकत्त्याच्या ‘एंजिनिअरिंग असोसिएशन ऑफ इंडिया’ या संस्थेने १९७२ मध्ये त्यांना ‘कर्म वीरोत्तम’ ही पदवी दिली.
किर्लोस्कर घराण्यातील तिसरी कर्तबगार व्यक्ती म्हणजे शंकरराव वासुदेव किर्लोस्कर (८ ऑक्टोबर १८९१ — १ जानेवारी १९७५) ही होय.  यांचे शालेय शिक्षण बेळगाव व सोलापूर येथे झाले.  पुढे पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये एक वर्ष काढून त्यांनी मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये चित्रकलेचा अभ्यास केला. १९१४ सालापासून किर्लोस्करवाडीस विक्री-व्यवस्थापक, प्रचारक व कार्यालय-व्यवस्थापक म्हणून काम सुरू केले. लंडनमध्ये त्यांनी विक्रीशास्त्राची पदविकाही मिळविली (१९२३). (१९२०) मध्ये किर्लोस्कर छापखान्याची स्थापना झाली. त्यातूनच किर्लोस्कर (१९२०), स्त्री (१९३०) व मनोहर (१९३४) या मासिकांचे संपादन व प्रकाशन करण्यास त्यांनी प्रारंभ केली.  मराठीत ही तिन्ही मासिके अनेक दृष्टींनी क्रांतिकारक ठरली.  विशेषतः मासिक-प्रकाशनाचे निकाप असे व्यवसायीकरण करून ते यशस्वी करण्यात शंकररावांचा वाटा फार मोठा आहे. या मासिकांतून सतत पुरागामी दृष्टिकोनाचा व तशाच प्रकारच्या ललित व वैचारिक लेखनाचा त्यांनी पुरस्कार केला. चित्रे, छायाचित्रे व इतर सजावट यांनी मासिकांना आकर्षक व कलात्मक असे रूप देण्यातही शंकररावांनीच पुढाकार घेतला. मराठीत अनेक लेखक व विचारवंत घडविण्याचे कार्य या मासिकांनी केले आहे. `डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’ची स्थापना, `मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’चे कार्य, `कोयना धरण योजने’चा प्रथमपासून पाठपुरावा इत्यादींतून शंकररावांनी केलेले कार्य महाराष्ट्राच्या औद्योगिकीकरणास चालना देणारे ठरले.  दक्षिण महाराष्ट्रातील साहित्य, रंगभूमी, शिक्षण यांसारख्या सांस्कृतिक क्षेत्रांत त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. ते स्वतः उत्कृष्ट चित्रकारही होते.  शंषाकीय (१९७४) हे त्यांचे आत्मकथन म्हणजे एका उत्कृष्ट आत्मचरित्राचा नमुना होय. किर्लोस्कर घराण्याच्या औद्योगिक कार्यास शंकररावांनी सामाजिक आणि सांस्कृतिक उत्तरदायित्त्वाचे अधिष्ठान प्राप्त करून दिले.
किर्लोस्कर उद्योगसमूहात पुढील कंपन्या आहेत : (१) किर्लोस्कर  ब्रदर्स लि. (२) द म्हैसूर किर्लोस्कर लि.  (१९४१) (३) किर्लोस्कर इलेक्ट्रिक कंपनी लि.  (१९४८–४९) (४) किर्लोस्कर ऑईल एंजिन्स लि. (१९४६) (५) एफ्‌. एच्‌. शूले जी. एम्‌. बी. एच्‌.-किर्लोस्कर ऑईल एंजिन्सची दुय्यम कंपनी, भातसडीच्या यंत्रोत्पदनात अग्रेसर (६) किर्लोस्कर न्युमॅटिक कं. लि. (१९६२) (७) किर्लोस्कर कमिन्स लि. (१९६२) (८) किर्लोस्कर एसिआ लि. (१९६२) (९) किर्लोस्कर कन्सल्टंट्‌स लि. (१९६३) उद्योगधंद्यांबाबतच्या तांत्रिक, आर्थिक, व्यवस्थापन व विपणन यांविषयी सल्ला व मार्गदर्शन करणारी कंपनी (१०) शिवाजी वर्क्स लि. – किर्लोस्कर ऑईल एंजिन्सची दुय्यम कंपनी (११) किर्लोस्कर प्रेस- किर्लोस्कर ब्रदर्स लि.ची एक शाखा. किर्लोस्कर व स्त्री ही मासिके आणि मनोहर हे साप्ताहिक किर्लोस्कर प्रेसतर्फे निघते.  सध्या ह्या नियतकालिकांचे संपादन शंकररावांचे चिरंजीव मुकुंदराव करतात. किर्लोस्कर प्रेसतर्फे ग्रंथप्रकाशनाचेही कार्य चालते.  वरील उद्योगांशिवाय गेल्या दोन-तीन वर्षांत ट्रॅक्टर व पेट्रोल एंजिने यांचे उत्पादन करणारे दोन कारखाने या समूहाने नव्याने उभारले आहेत. `किर्लोस्कर प्रतिष्ठाना’मुळे देशातील शंभरांहून अधिक छोट्या कारखानदारांना साह्य मिळाले आहे.
भारतातील चार राज्यांत पसरलेल्या किर्लोस्कर उद्योगसमूहात सु. १८,००० लोक काम करतात. देशातील विजेच्या मोटारी, डीझेल एंजिने व सेंट्रिफ्युगल पंप यांच्या एकूण उत्पादनापैकी अनुक्रमे ३६, ६५ व ४० टक्के उत्पादन किर्लोस्करांकडून होते. ह्या समूहाचे एकूण वार्षिक उत्पादन ६३ कोटी रूपयांचे आहे. जगातील साठ देशांत त्याची निर्यातपेठ आहे.  किर्लोस्कर उद्योगसमूहात सेंट्रिफ्युगल पंप, व्हर्टिकल लेथ, स्लुइझ व्हॉल्व्ह्‌ज, शेंगा फोडण्याची यंत्रे, सील्ड काँप्रेसर्स युनिट, मशीन टूल्स, विद्युत्‌मोटारी, ३ ते ८०० अश्वशक्तीची वॉटरकूल्ड डीझेल एंजिने, भातसडीची यंत्रे, एअर काँप्रेसर, रेफ्रिजरेशन काँप्रेसर, स्विचगिअर, मोटर कंट्रोल गिअर, ट्रॅक्टर, कास्टिंग वगैरे यंत्रांचे उत्पादन होते. आता हा समूह तांत्रिक ज्ञानाचीही परदेशात निर्यात करू लागला आहे. फिलिपीन्स आणि मलेशिया ह्या देशांत अनुक्रमे वॉटरकूल्ड एंजिने आणि विद्युत्‌मोटारी ह्यांचे उत्पादन किर्लोस्करांच्या सहकार्याने होऊ लागले आहे. भारतातील औद्योगिकीकरणाच्या इतिहासात किर्लोस्कर घराण्याचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे.            

                                                                        

          🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳

🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌹🙏

         स्त्रोतपर माहिती 

रविवार, १४ जून, २०२०

जागतिक रक्तदाता दिन



जागतिक रक्तदाता दिन🩸🩸14 जून
द्रव्यदानं परम दानम्   
अन्नदानं ततोधिकम्  
ततः श्रेष्ठ रक्तदानम् 
रक्तदानाचे पुण्य फार मोठे आहे. चरकांच्या शास्त्राप्रमाणे जीवनदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्त म्हणजे जीव असे सुश्रुताचार्यांनी म्हटले आहे. त्यामुळे अगदी सामान्य व्यक्तीही रक्तदान करून दुसर्याचा जीव वाचवू शकते.
जागतिक रक्त संक्रमणामध्ये सिकलसेल, एडस या रोगाचे प्रमाण वाढत असल्यामुळे व अपघाताचे प्रमाण वाढत असल्याने ऐच्छिक रक्तदानाची चळवळ महत्वपूर्ण ठरत आहे.
सध्या कोविड-19(कोरोना) महामारीवर उपचार करण्यासाठी रक्ताची गरज भासत आहे.14 जून हा जागतिक रक्तदान दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. जे लोक ऐच्छिक रक्तदान करून जीवनदान करतात त्यांचे आभार मानणे व नवीन लोकांना रक्तदानासाठी प्रवृत्त करणे असे या दिवसाचे उद्दिष्ट ठरवलेले आहे. रक्तदान केल्यास आपणास काहीही त्रास होत नाही, हे सांगणेही आवश्यक आहे.
हा दिवस जागतिक पातळीवर साजरा करण्यासाठी वर्ल्ड हेल्थ सेंटर ऑर्गनायझेशन, इंटरनॅशनल रेडक्रॉस व रेडक्रिेसंट सोसायटी कार्यरत आहेत. सुरक्षित रक्त रुग्णाला मिळवून देण्यासाठी ऐच्छिक रक्तदान महत्वाचे ठरते. मानवतेच्या दृष्टीने रक्तदात्यांची संख्या वाढविणे, नियमित रक्तदाते तयार होण्यासाठी काय करावे याचा अभ्यास या दिवशी करून मोबदल्याची अपेक्षा न करता रक्तदान करण्यास प्रवृत्त करणे हे मोलाचे कार्य आहे. एकविसाव्या शतकात मानवाचे सर्वच क्षेत्रात अनेक शोध लावले आहेत. शरीरात कृत्रिम अवयव बसविले जातात. परंतु कृत्रिम रक्त तयार करण्याचे तंत्र मानवाने अद्याप आत्मसात केलेले नाही. मानव रक्तावर प्रकिया करतो, त्याचे विघटन करू शकतो, परंतु प्रत्यक्षात रक्त तयार करू शकत नाही. त्यामुळे मानवी रक्ताला पर्याय सापडलेला नाही. मानवी रक्त फक्त मानवी शरीरातच तयार होते. म्हणून रक्तदान करून ही गरज भागवावी लागते. त्याची रक्तगटानुसार नोंद ठेवावी लागते.
रक्तदानामुळे काहीही त्रास होत नाही. सुदृढ, सशक्त, रोग न झालेला माणूस रक्तदान करू शकतो. वयाच्या 18 व्या वर्षापासून 60 व्या वर्षापर्यंत रक्तदान करता येते. रक्तदानानंतर कोणतेही कष्टाचे काम  करू शकतो. रक्तदातचे वजन 45 किलोच्या वर असावे. रक्तदाताच्या रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण 12.5 असावे. नाडीचे ठोके 80 ते 100 असावेत.
आज धकाधकीच्या बर्याच ठिकाणी छोट्या मोठ्या अपघातात ऑपरेशनच्या वेळी रक्ताची मोठ्या प्रमाणावर गरज असते. त्यावर रक्तदान हाच एक उपाय आहे ओणि तो आपणासारखा सूज्ञ नागरिकच करू शकतो. आजच्या दिनी कोणतीही अपेक्षा न करता दर तीन महिन्यास मी रक्तदान करेन, असा संकल्प युवकांनी करावा.
*जागतिक रक्त दातांचा दिन कसा साजरा केला जातो?*
जगभरात रक्तदानाच्या महत्वाविषयी, तसेच सुरक्षित रक्तसंक्रमणाची गरज याबद्दल लोकांना जागरुक करण्यासाठी दरवर्षी जागतिक रक्तदाते दिन साजरा केला जातो. हे साजरी करण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक उपक्रम आणि कार्यक्रम आयोजित केले जातात.
जसे आरोग्य सेवा संस्था "जागतिक आरोग्य संघटना, रेड क्रॉस इंटरनॅशनल फेडरेशन आणि लाल क्रेसेंट संस्था (IFRC), रक्तदाता संस्था इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल सोसायटी (Aifbeedio) आणि रक्त संक्रमण (ISBT)" जागतिक स्तरावर लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यक्रम आयोजित करण्यासाठी एकत्र काम करतात.

युरोप परिषद अनेक वर्षे मोहिम साजरा करण्यासाठी तयार केले आहे. जगभरात सुमारे 9 2 कोटी लोकांना रक्तदान केल्यानेही दिवसेंदिवस सुरक्षित रक्तसंक्रमणाची गरज वाढत आहे. सार्वजनिक मोकळी जागा, शाळा, महाविद्यालये, इतर शैक्षणिक संस्था, कार्यक्रम, सभा, चर्चा, वादविवाद, प्रश्न-उत्तर स्पर्धा, वर्तमानपत्र जगभरातील संबंधित लेख आणि प्रकाशन कथा, वैज्ञानिक परिषद, लेख उपक्रम आणि विद्यापीठातील खंडणी आयोजन प्रकाशन, आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक जर्नल, क्रिडा क्रियाकलाप आणि इतर जाहिरात-संबंधित क्रियाकलाप ते आहेत जागतिक रक्त दाता दिन थीम
👉👉 जागतिक रक्त दाता दिन थीम👈👈
जागतिक रक्त दाता दिन 2020 थीम आहे ‘सुरक्षित रक्त, जीव वाचवते’ अशी या वर्षीच्या जागतिक रक्तदाता दिनाची थीम असून ‘रक्त द्या आणि जगाला एक आरोग्यदायी स्थान बनवा’ हे यावर्षीचं घोषवाक्य आहे.
जागतिक रक्त दाता दिन 2019  थीम ही ‘सेफ ब्लड फॉर ऑल’ सुरक्षित रक्त सर्वांना ही आहे. 
रक्तदान दिवस 2018 का थीम- “बी देयर फॉर समवन एल्स. गिभ ब्लड. शेयर लाइफ.” (Be there for someone else. Give blood. Share life).
जागतिक रक्त दाता दिन 2017 थीम आहे ‘‘जास्त रक्त, जास्त जीवन’’ 
जागतिक रक्त दाता दिन 2016 थीम आहे  ‘जगाला लाल रंगाने रंगवा’.
जागतिक रक्त दाता दिन 2015 थीम आहे "माझे जीवन जतन केल्याबद्दल धन्यवाद."
वर्ल्ड ब्लड डोनर डे 2014 थीम होती "माता जतन करण्यासाठी रक्त जतन करा."
वर्ल्ड ब्लड डोनर डे 2013 थीम होता "जीवन द्या: रक्त दान"
वर्ल्ड ब्लड डोनर डे 2012 थीम "प्रत्येक लोभी व्यक्ती एक नायक आहे."
जागतिक रक्त दाता दिन 2011 थीम "अधिक रक्त, अधिक जीवन होते."
वर्ल्ड ब्लड डोनर डे 2010 विषय "न्यू ब्लड फॉर द वर्ल्ड" होता.
वर्ल्ड ब्लड डोनर डे 200 9 ची थीम "रक्त आणि रक्त भागांचे 100% गैर-बळी अर्पण करणे" होते.
जागतिक रक्त दाता दिन 2008 थीम "नियमित रक्त द्या."
वर्ल्ड ब्लड डोनर डे 2007 थीम "सुरक्षित मातृत्वासाठी सुरक्षित रक्त" होता.
वर्ल्ड ब्लड डोनर डे 2006 थीम "सुरक्षीत रक्ताची सार्वत्रिक उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्धता" होती.
वर्ल्ड ब्लड डोनर डे 2005 थीम "आपल्या रक्तवाहिनीचे साजरे करा."
वर्ल्ड ब्लड डोनर डे 2004 ची थीम "रक्तजीवन वाचवते. माझ्याबरोबर रक्त वाचवणे प्रारंभ करा. "
जागतिक रक्त दातांचा दिवस
"मी 1 9 80 पासून रक्तदान करण्यामध्ये गुंतलो आहे कारण ही एक नाजूक गरज आहे." - डोना रीड
"रक्तदानकर्त्यांसाठी माझे जीवन आभारी आहे. ज्याने मला रक्त दिले त्याचे मी आभारी आहे. "- निकी टेलर
"माझे लक्ष्य आहे रक्तदात्यांसाठी अधिक गरज असलेल्या शब्दाचा प्रसार करणे." - निकी टेलर
👉👉 रक्तदान का करावे
दान केल्याचे समाधान मिळते.
शरीरात रक्तनिर्मितीस चालना मिळते.
रक्तातील कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते.
कर्करोग किंवा ह्रदयरोगासारख्या आजारांच्या धोक्याचे प्रमाण कमी होते.
👉👉 रक्तदान कोण करू शकते, काय आहेत आवश्यक अटी?
कोणतीही सुदृढ, सशक्त, रोग न झालेली व्यक्ती रक्तदान करू शकतो.
वयाच्या 18 व्या वर्षापासून 60 व्या वर्षापर्यंत रक्तदान करता येते. 
रक्तदानानंतर कोणतेही कष्टाचे काम करू शकतो. 
रक्तदान करण्यासाठी रक्तदात्याचे वजन 45 किलो हुन अधिक असावे. 
रक्तदाताच्या रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण 12.5 असावे. 
रक्तदाताच्या नाडीचे ठोके 80 ते 100 असावेत.
👉👉 रक्तदान कोण करू शकत नाही? 
- आजारी आणि अशक्त व्यक्ती 
- एचआयव्हीबाधित अथवा रक्ताची कावीळ झालेली व्यक्ती. 
- गरोदर स्त्रिया. 
- मलेरिया, टीबी यांसारख्या संसर्गजन्य आजाराने बाधित व्यक्ती. 
- मधुमेह, रक्तदाब यांसारखे विकार जडलेल्या व्यक्ती 
गर्भवती स्त्रिया आणि स्तनदा स्त्रिया रक्तदान करू शकत नाहीत.
👉👉 मानवी रक्ताबद्दल काही रंजक गोष्टी
नुकत्याच जन्मलेल्या बालकामध्ये फक्त एक कप (जवळपास 250 ML) रक्त असते आणि तरुण माणसामध्ये जवळपास पाच लिटर रक्त असू शकते, म्हणजेच शरीराच्या एकूण वजनाच्या सात टक्के रक्त असते.
प्लाझ्मा हे शरीरात प्रोटीन तयार करते आणि रक्ताला गोठण्यापासून वाचवते तर प्लेटलेट्स हे रक्ताला गोठ्ण्यास मदत करते, यांच्यामुळेच जखम झाल्यानंतर काही वेळ रक्त आल्यानंतर रक्त येण्याचे बंद होते.
1 ML रक्तामध्ये 10,000 पांढऱ्या रक्तपेशी आणि 2,50,000  प्लेटलेट्स असतात.
लाल रक्त पेशी ह्या ऑक्सिजनला घेऊन जात असतात आणि कार्बनडायऑक्साईड (CO2) संपवतात. पांढऱ्या रक्त पेशी ह्या शरीराला बॅक्टेरीया आणि वायरस यांच्यापासून वाचवतात त्यांना सैनिक पेशी सुद्धा म्हणतात.
आपल्या नसांमध्ये 400 किलोमीटर प्रतितास या वेगाने रक्ताभिसरण होते. जर आपल्या शरीराने रक्ताला बाहेर पंप केले, तर हे रक्त 30 मीटरपर्यंत उडू शकते.
दानात दान..! रक्तदान..!
रक्तदान..! एक श्रेष्ठ दान..!
==== संकलित माहिती 

शनिवार, १३ जून, २०२०

गणेश दामोदर सावरकर


   गणेश दामोदर सावरकर
    (मराठी क्रांतिकारक)
 जन्म : १३ जून १८७९ (भगूर, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र)
मृत्यू : १६ मार्च १९४५ (भारत)
चळवळ : भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना : अभिनव भारत, मित्रमेळा
धर्म : हिंदू
प्रभाव : शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक
वडील : दामोदर सावरकर
आई : राधाबाई सावरकर
पत्नी : यशोदा उर्फ येसूताई
अपत्ये : नाहीत.
टोपणनाव : बाबाराव
गणेश दामोदर सावरकर उर्फ बाबाराव सावरकर (जून १३, १८७९, मार्च १६, १९४५) हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व होते.
सावरकर घराणे मूळचे महाराष्ट्र राज्याच्या रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात असलेल्या गुहागर पेट्यामधील पालशेत येथील होते. त्या परिसरातील सांवरीच्या झाडांवरून काही जणांना सांवरवाडीकर म्हणून ओळखले जाऊ लागले. कालांतराने सांवरवाडीकर चे सावरकर झाले. पुढे कामानिमित्त काही मंडळी कोकण सोडून घाटावर स्थाईक झाली. बाळाजी बाजीराव पेशवे यांच्या काळात केलेल्या पराक्रमामुळे पेशव्यांनी नारायण दीक्षित (सावरकर) आणि त्यांचे स्नेही धोपावकर यांना नाशिक जिल्ह्यातील भगूर गावाच्या जवळ असलेल्या राहुरी गावाची जहागीर दिली. घाटावर स्थाईक झालेल्या सावरकर घराण्यातील नारायण दीक्षित (सावरकर) यांच्यापासून दामोदरपंत सावरकर हे सातव्या पिढीतील वंशज होते. दामोदरपंतांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले होते. भगूर परिसरात त्यांच्या इतके शिकलेले अन्य कोणीही नसल्याने त्यांना विशेष मान होता. पिढीजात जहागीर सांभाळणे आणि सावकारी हे त्यांचे व्यवसाय होते.
दामोदरपंत सावरकर यांचा विवाह मनोहर घराण्यातील राधाबाई यांच्याशी झाला. लग्नानंतर त्यांना दोन मुले झाली पण ती वाचली नाहीत. त्यानंतर या जोडप्याला तीन मुले व एक मुलगी अशी चार अपत्ये झाली. दि. १३-जून-१८७९ रोजी गणेश दामोदर सावरकर उर्फ बाबा यांचा जन्म झाला, दि. २८-मे-१८८३ रोजी विनायक उर्फ तात्या आणि नंतर साधारण तीन तीन वर्षांनी माई (नंतरच्या माई काळे) आणि नारायण उर्फ बाळ सावरकर यांचा जन्म झाला.
💁🏻‍♂️ *बालपण*
बाबारावांचे बालपण भगूर गावात गेले. लहानपणापासून बाबाराव हुशार, अभ्यासू, संघटनकुशल, सततोद्योगी होते. तसेच बुद्धिबळ, आट्यापाट्या, विटी-दांडू, धनुष्य-बाण चालविणे वगैरे विविध खेळातही ते पटाईत होते. लहानपणी बाबांना विविध प्रकारच्या रोगांनी सताविले. त्यात २०-२१ दिवस मुदतीचा ताप (विषमज्वर) हा नित्याचाच असे आणि बाबांना विंचू दंशही खूपदा (सुमारे २०० वेळा) झाला. थोडे मोठे झाल्यावर वडील दामोदरपंतांच्या देखरेखीखाली बाबाराव तलवार आणि बंदूकही उत्तम प्रकारे चालवायला शिकले. वडील, मामा आणि तात्याराव कविता करीत असत पण बाबांना कवितेची आवड नव्हती. वडिलांना आवड असल्याने त्यांनी घरी गाय-बैल, कुत्रा पाळलेले होते. तसेच घरी फुलझाडेही खूप लावली होती. बाबारावांनी वडिलांकडून टापटीप, अभ्यास, सगळ्यांशी मिळून राहणे, हे गुण घेतले. तर आईकडून स्वयंपाक करायला ते शिकले. आईच्या अकाली निधनानंतर बाबाराव काही काळ आपल्या घरी स्वतःच स्वयंपाक करीत असत.
📖🖊️ *शिक्षण / व्यासंग*
घरच्या परिस्थितीमुळे आणि कुटुंबाच्या जबाबदारीमुळे बाबारावांचे शालेय शिक्षण मॅट्रिकच्या आतच उरकले पण योगविद्या, वैद्यकाचा नाद असल्याने त्या अनुषंगाने त्यांनी अनेक पुस्तकांचे वाचन केले. ते स्वतः अनेक प्रकारची औषधेही तयार करीत असत. फलज्योतिष्य, शरीर सामुद्रिक, हस्त सामुद्रिक, मंत्रशास्त्र, योग, वेदान्त अशा शास्त्रांचा सखोल अभ्यास त्यांनी केला. ते स्वतः चांगले गात असत तसेच तबला आणि सतार वाजवू शकत असत. त्यांच्या संग्रहात इतिहास, राजकारण, राज्यशासन, भाषा, सैन्यव्यवहार, धर्म, तत्त्वज्ञान, चरित्रे, संघटनशास्त्र, कला, इ. अनेक विषयांची हजारो पुस्तके होती, त्यांचा सखोल अभ्यास बाबारावांनी केला होता.
       ✍️ *लेखन* ✍️
राष्ट्रमीमांसा व हिंदुस्थानचे राष्ट्रस्वरूप, दुर्गातनय या टोपणनावाने काशी येथे लिहिले, १९३४ साली प्रकाशन.
हिंदुराष्ट्र - पूर्वी-आता-पुढे
शिवरायांची आग्र्‍यावरील गरुडझेप
वीरा-रत्‍न-मंजुषा
ख्रिस्तपरिचय अर्थात ख्रिस्ताचे हिंदुत्व
धर्म कशाला हवा ?
मोपल्यांचे बंड
वीर बैरागी, मूळ हिंदी भाषेतील पुस्तकावरून भाषांतरित केलेले पुस्तक
पत्रलेखन
१८५७चा स्वतंत्र्यसंग्राम
*प्रकाशन*
नेपाळी आंदोलनाचा उपक्रम
संघटन संजीवनी
भयसूचक घंटा
✍️ *स्फुट लेख*
केसरी (पुणे), लोकमान्य (मुंबई), महाराष्ट्र (नागपूर), सकाळ (मुंबई), आदेश (नागपूर), वंदे भारतम्‌ (मुंबई), मराठा (इंग्रजी, पुणे), श्रद्धानंद (पुणे), प्रजापक्ष (अकोला), विक्रम (सांगली) इ. वृत्तपत्रात बाबारावांनी वेळोवेळी, विविध विषयांवर लेख लिहिले.
🚹📒 *बाबाराव सावरकरांचे गाजलेले पुस्तक - ख्रिस्त परिचय अर्थात ख्रिस्ताचे हिंदुत्व*
‘येशू ख्रिस्त हे तामिळी हिंदू होते. तसेच ते जन्माने विश्‍वकर्मा ब्राह्मण होते. ख्रिश्‍चन धर्म हा हिंदू धर्माचाच एक भाग आहे‘, असे विचार स्वातंत्र्यवीर विनायक दामोर सावरकर यांचे बंधू गणेश दामोदर (बाबाराव) सावरकर यांनी "ख्रिस्त परिचय‘ नावाच्या १९४६ साली प्रकाशित झालेल्या एका पुस्तकात मांडले होते. हे पुस्तक २६-२-२०१६ रोजी पुन:प्रकाशित करण्यात आले. ‘ओल इंडिया ट्रू ख्रिश्चन काउ या संस्थेने या पुस्तकाविरुद्ध मुंबई हायकोर्टात धाव घेऊन पुस्तकाची प्रत्येक प्रत जप्त करण्याची मागणी केली आहे.
येशू यांच्याबद्दल या पुस्तकात दिलेली माहिती -
येशू ख्रिस्त हे तमिळ हिंदू होते.
त्यांचे खरे नाव केशवराव कृष्ण असे होते.
तमिळ ही त्यांची मातृभाषा होती.
येशू हे कृष्णवर्णीय होते. त्यांनी योगविद्येचे प्रशिक्षण घेतले होते.
येशू यांचे कुटुंबीय भारतीय वेशभूषा वापरत होते.
येशू ४९ वर्षांचे असताना त्यांनी देह त्यागण्याचा निर्णय घेतला.
येशू योगावस्थेत गेले आणि त्यांनी समाधी घेतली.
ख्रिस्ती धर्म हा हिंदू धर्मातील एक पंथ होता.
👫🏻 *लग्न*
आईच्या अकाली निधनानंतर १८९६ साली बाबारावांचे लग्न झाले. लग्नानंतर त्यांनी पत्‍नीचे नाव यशोदा ठेवले. तात्यारावांसह अनेकजण त्यांना येसू वहिनी म्हणत. येसूवहिनी तात्यारावांच्या आणि नारायणरावांच्या प्रेरणास्थान होत्या. बाबारावांना दोन मुले झाली पण दोघेही फार काळ राहू शकली नाही.
💥 *क्रांतिकार्य*
तात्याराव आणि मित्रांनी १८९९ च्या नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रभक्तसमूह नावाची एक गुप्त संस्था स्थापन केली. सुरुवातीला बाबारावांना या संस्थेबद्दल काहीच माहिती नव्हती. मात्र नंतर त्यांना माहिती मिळाल्यावर बाबांनी या संस्थेसाठी काम सुरू केले. गुप्त संस्थेत तरुणांना प्रवेश देण्यापूर्वी त्यांची मानसिक तयारी पाहण्यासाठी दि. १-जानेवारी-१९०० या दिवशी मित्रमेळा नावाची संस्था उघडपणे सुरू करण्यात आली. बाबाराव मित्रमेळा संस्थेचे कार्यवाह होते. मित्रमेळा संस्थेतर्फे गणेश उत्सव, शिवजयंतीसह इतर थोरांच्या जयंत्या साजर्‍या करणे, सार्वजनिक (प्रकट) भाषणांचे आयोजन करणे, कविता, पोवाडे म्हणणे आदी प्रकारे तरुणांना प्रोत्साहन देण्याचे काम हाती घेण्यात आले. बाबारावांनी संस्थेतील तरुणांना मार्गदर्शन मिळावे म्हणून लोकमान्य टिळकांसह अनेकांना वेळोवेळी नाशिक येथे आमंत्रण दिले.
बाबांच्या प्रयत्‍नांनी राष्ट्रीय चळवळीचे केंद्र म्हणून नाशिक ओळखले जाऊ लागले. १९०४ साली मित्रमेळाची गुप्त संस्था म्हणून अभिनव भारत संस्था स्थापन करण्यातही बाबांचा पुढाकार होता. अभिनव भारत ही जहालवाद्यांची संस्था होती. त्यातील लोकांचा पूर्ण स्वातंत्र्य हाच ध्यास होता आणि त्यासाठी काहीही करण्याची तयारी असलेल्या तरुणांनाच त्यात प्रवेश दिला जात असे. या दोन संस्थांशिवाय बाबारावांच्या पुढाकारानेच १९०३ साली मित्रसमाज नावाची विद्यार्थ्यांची संस्था आणि १९०५ साली आत्मनिष्ठ युवतीसंघ नावाची स्त्रियांची संघटना स्थापन करण्यात आली. या सर्व संस्था आपापल्या कार्यक्षेत्रात स्वदेशीचा पुरस्कार करणार्‍या होत्या आणि यातील निवडक मंडळींना अभिनव भारतशी जोडले जात असे.
२०-जुलै-१९०५ रोजी वंगभंगची अधिकृत घोषणा झाली. त्यानंतर याचा विरोध म्हणून सर्वत्र विदेशीचा बहिष्कार - होळी, स्वदेशीचा पुरस्कार सुरू झाला. बाबाराव नाशिक येथून आणि तात्याराव पुणे येथून ही चळवळ चालवीत. सशस्त्र क्रांतीचा प्रचारही गुप्तपणे सुरू करण्यात आला.
⚖️ *अभियोग*
सरकारी यंत्रणा बाबारावांच्या पाळतीवर होतीच. त्यातच बाबाराव मुंबईला गेले आणि क्षुल्लक वादात सापडले. त्यावरून चौकशी करून बाबांना दि. २८-फेब्रुवारी-१९०९ रोजी मुंबईत अटक करण्यात आली. नंतर त्यांना नाशिकला नेण्यात आले. सखोल चौकशीअंती बाबांच्या घरी आक्षेपार्ह बर्‍याच गोष्टी आढळल्याने त्यांच्यावर तत्कालीन दंडविधानाच्या कलम १२१ आणि १२४ अ अंतर्गत खटला दाखल करण्यात आला. दि.०८ जून इ.स. १९०९ रोजी बाबारावांना जन्मठेपेची - काळ्यापाण्याची शिक्षा आणि सर्व मिळकतीच्या जप्तीची शिक्षा तसेच सश्रम कारावासाची शिक्षा ठोठाविण्यात आली. काळ्यापाण्याची शिक्षा अंदमान येथे भोगावयाची होती. ही शिक्षा सुनाविल्यावर थोड्याच काळात बाबारावांनी उच्च न्यायालयात फेर निर्णयासाठी याचिका दाखल केली. पण यथावकाश त्याचाही निकाल बाबांच्या विरुद्धच लागला आणि जुनी शिक्षा कायम करण्यात आली.

🌀 *परिणाम*
बाबारावांना जन्मठेपेची शिक्षा झाल्याचे लंडन मध्ये असलेल्या भारतीयांना समजले. तात्याराव आणि सहकारी ब्रिटिश सरकारला कशी अद्दल घडवावी यावर विचार करीत होते. तोच एकीकडे मदनलाल धिंग्रा याने वंगभंगसाठी जबाबदार असलेल्या कर्झन वायलीवर दि. ०१ जुलै इ.स. १९०९ रोजी गोळ्या झाडून त्याचा वध केला. तर दुसरीकडे नाशिकमधील अभिनव भारतचे सदस्य गुप्तपणे एकत्र आले आणि अनंत कान्हेरे, अण्णा कर्वे आणि विनायक देशपांडे यांनी बाबारावांना शिक्षा होण्यास जबाबदार असलेला मुख्य अधिकारी म्हणून जॅक्सनचा वध दि. २१ डिसेंबर इ.स. १९०९ रोजी केला. याशिवाय देशभर हरेक मार्गाने निषेध झाले.

⛓️ *अंदमान - काळ्या पाण्याची शिक्षा*                                             भोगण्यासाठी इ.स. १९११ साली अंदमानला पाठविण्यात आले. अंदमान येथील शिक्षा अतिशय कठोर स्वरूपाची होती. बाबाराव रोज मरण यातना भोगत. त्यातच तात्यारावांनाही काळ्या पाण्याची शिक्षा झाली आणि त्यांचीही रवानगी अंदमानला करण्यात आली. बाबारावांचे धाकटे बंधू नारायणराव यांनी आपल्या दोन्ही वडील बंधूंची सुटका व्हावी म्हणून अनेकांना भेटून, निवेदने देऊन प्रयत्‍न चालविले. अखेर इ.स. १९२१ साली दोन्ही सावरकर बंधूंची अंदमान मधून सुटका झाली पण एकूण शिक्षेचा काळ संपला नसल्याने त्यांना भारतातील विविध ठिकाणच्या तुरुंगात पाठविण्यात आले. बाबारावांची तब्येत साथ देत नाही असे पाहून इ.स. १९२२ साली त्यांची शिक्षा संपल्याचे घाईने कळविण्यात आले.

🪔 *निधन*
शिक्षा संपल्यानंतर बाबांची प्रकृती साथ देत नसतांनाही त्यांनी आपले पूर्वीचे कार्य नव्या जोमाने सुरू केले. त्यांचे लिखाण, वाचन, प्रकाशनाचे कामही वाढले. अनेक तरुणांना प्रोत्साहन देऊन सशस्त्र क्रांतीशिवाय पर्याय नसल्याचे त्यांना पटवून दिले. क्रांतिकार्य अव्याहतपणे सुरू असतांनाच दि. १६-मार्च-१९४५ रोजी बाबाराव सावरकर यांचे निधन झाले.

🏛️ *स्मारक*
सांगली शहरातील एका इमारतीत बाबाराव सावरकर यांचे एक स्मारक होते. त्या स्मारकात काही दुर्मिळ ग्रंथ, पुस्तके, पत्रव्यवहार, छायाचित्रे अशी संपदा होत्यी. काही अज्ञात व्यक्तींनी हे स्मारक जाळून टाकले. (११ जून २०१४).

📚 *बाबाराव सावरकरांसंबंधी पुस्तके*
क्रांतिकारक बाबाराव सावरकर (लेखक दुर्गेश परुळकर)
क्रांतिवीर बाबाराव सावरकर, लेखक द. न. गोखले
त्या तिघी (सावरकर बंधूंच्या पत्‍नी येसूवहिनी (बाई), यमुना(माई) आणि शांता(ताई) यांच्यावरील कादंबरी (लेखिका डॉ. शुभा साठे)                                                                         🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳

🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌹🙏



संकलित माहिती 

शुक्रवार, १२ जून, २०२०

331 इंग्लिश वाक्य

300 इंग्लिश वाक्य

331 Basic English Sentences

Five “w”: what, who, which, why, where, and one “How”

  This is, That is, These are, Those are,

1) This is a book.

2) This is not a book.

3) Is this a book?

4) What is it?

5) That is a pencil.

6) That is not a pencil.

7) Is that a pencil?

8) What is that?

9) These are books.

10) These are not books.

11) Are these books?

12) What are these?

13) Those are pencils.

14) Those are not pencils.

15) Are those pencils?

16) What are those?

17) What is your address?

18) What’s your name?

19) What color is this?

20) What size is that?

21) What day is today?

22) Milk is good to eat.

23) Milk is good for you to eat.

24) This yard is full of children.

25) What is this in the picture?

26) One is strong. The other is weak.

27) That’s a good idea.

28) That’s very kind of you.

29) What he said is something.

30) All you have to do is add the letters.

31) This is my girl going into the door.

32) To do as you suggest would be out of the question.

33) That is exactly what we want to learn.

34) I am a girl.

35) I am not a girl.

36) Are you a girl?

37) Who are you?

38) How old are you?

39) How are you?

40) Where are you?

41) My father is in his office.

42) Who’s that man over there?

43) I’m eight.

44) It is seven. It must be seven.

45) It’s very cold.

46) It is difficult.

47) It is wonderful.

48) It’s ten o’clock.

49) It is time for you to get up.

50) I’m interested in this book.

51) I’m very fond to you as a friend.

52) I’m thirsty.

53) I’m busy just now.

54) I’m afraid. I’m sure. I’m sorry.

55) I’m glad you like it. (I’m glad to hear your good news.)

56) I’m ready for breakfast.

57) I’m good at tennis.

58) What time is it?

59) It’s two minutes past six.

60) How many are they?

61) How many flowers are they?

62) How much rice are they?

63) What is your father?

64) Are you sure?

65) What are you afraid of?

66) It’s in the sky.

67) The car is near the tree. 

68) Your hat looks very nice. 

69) I have a pencil and two books.

70) I have not (=haven’t) a red pencil. 

71) Do you have any pencils?

72) What do you have?

73) How many sisters do you have? 

74) Do you have anything to eat? 

75) He has some letters for your father? 

76) My sister has a cup. 

77) I have a lot of thing to eat. 

78) I have toothache.

79) I have no time to see you. 

80) We have a car waiting outside. 

81) I’ll have some soup. 

82) There is book on the table. 

83) There is not any book on the table. 

84) Is there any book on the table? 

85) What is there on the table? 

86) There are two pencils in my box. 

87) There are not any pencils in my box. 

88) Are there any pencils in your box? 

89) What are there in your box 

90) There are seven days in a week. 

91) How much rice is there? 

92) Here is a few letters for you to learn. 

93) There’s a telephone call for you. 

94) Is there a Miss Lee staying here? 

95) There won’t be many teachers going to the party. 

96) Will there be a birthday party in the home? 

97) I open the door. 

98) I don’t open the door. 

99) Do you open the door? 

100) When do you open the door? 

101) He opens the door. 

102) He doesn’t open the door. 

103) Does he open the door? 

104) When does he open the door? 

105) I opened the door. 

106) I didn’t open the door? 

107 Did you open the door? 

108 When did you open the door? 

109 I will open the door. I shall open the door. 

110 I will not (won’t) open the door. 

111 Will you open the door? 

112 When will you open the door? 

113 I’m opening the door.

114 You are opening the door.

115 He is opening the door... 

116 I’m not opening the door? 

117 Are you opening the door? 

118 When are you opening the door? 

119 The door is opened. 

120 The door is not opened. 

121 Is the door opened? 

122 I have opened the door. (He has opened the door) 

123 I have not (=haven’t) opened the door. 

124 Have you opened the door? 

125 When have you opened the door? 

126 The door has been opened. 

127 The door has been opening. 

128 What are you listening to? 

129 What are you writing to? 

130 What are you talking about? 

131 What are you thinking about? 

132 What do you need it for? 

133 What are you looking for? 

134 Where do you come from? 

135 Has he come? 

136 When did you come? 

137 Have you seen him? 

138 Where did you see him? 

139 Have you spoken to him? 

140 What did he tell you? 

141 I have lived in Shanghai for a long time. 

142 I have bought the car. 

143 Has your brother come from Paris? 

6. The verb to get: 

144 I must get myself a new pair of glasses? 

145 Get me two pounds of tomatoes. 

146 I get here at 11. 

147 Get the layer to explain it to you. 

148 I can’t get this lift to work. 

149 It’s getting dark. 

150 You’re getting fat. 

151 Don’t get excited! 

152 You’ll get weed to it. 

153 Did you get that? 

154 I don’t get you. 

155 Get in! Get on! 

156 I’ve got to go now. 

157 Have you got a match? 

158 He said he always carried a gun. 

159 He said the telegram had arrived at noon 

160 She promised she would reserve a room for me. 

161 He said he didn’t want to lire a car. 

162 He assured me he would keep his promise. 

163 This vase is made of glass. 

164 Is this bridge made of wood? 

165 What are these things mad of? 

166 Do you like to have some coffee? 

167 Would you like to have some coffee? 

168 I work for bank. 

169 I put on my slippers. 

170 I go to the bathroom. 

171 I take a slower. 

172 I brush my teeth. 

173 I comb my hair. 

174 I go back to bedroom. 

175 I begin to dress. 

176 I put on my underclothes, shirt and trouser. 

177 I take off my slippers and put on my socks and shoes. 

178 I close the window. 

179 I turn off the light. 

180 I leave my house to go to the school. 

181 I get on (off) the bus. 

182 Do you understand? 

183 Could you come to dinner? 

184 What time do you get up every day? 

185 Where were you born? 

186 Would you say slowly, please? 

187 What do you call in English? 

188 How do you say in English? 

189 How do you like it? 

190 What are you doing? 

191 Where are you going to? 

192 Could you tell me what time it is? 

193 How long did it take? 

194 What do you see with (hear, smell, eat)? 

195 Do you mind if I smoke? 

196 I don’t think he will win his game. 

197 I pick you up in front of the hotel. 

198 It takes place in a school. 

199 Perhaps you’ve heard of him. 

200 The sooner I get to bed the better. 

201 I want to eat. 

202 I want you to tell me this. 

203 You have to share it with other tenants. 

204 You don’t have to carry much cash. 

205 I’d like to be called at 7. 

206 You ought to do it 

207 You ‘d better wear a light jacket. 

208 We should be able to resolve our difference. 

209 All this is due to our change in teaching methods 

210 Most scientists tend to agree with me. 

211 It’s likely to rain. 

212 Today we are going to hear report. 

213 I need to look at your car. 

214 Would you like to go out and get something to eat? 

215 She hopes to get a job. 

216 You make me happy. 

217 It makes me forget all my problems. 

218 He is trying to imitate speaker’s pronunciation. 

219 This should help you to remember it. 

220 You ask somebody to tell you time 

221 I prefer to go school. 

222 She starts working at 7. 

223 Why don’t we go dancing? 

224 Have you finished cleaning hall? 

225 He continued talking. 

226 You find people expressing many different opinions. 

227 Why do you keep asking such obvious question? 

228 I must have my TV set checked. 

229 Open the door, please. Close the window, please 

230 Don’t open the door! 

231 Let’s go! 

232 Let me take you out for dinner. 

233 How beautiful she is! 

234 What a beautiful girl she is. 

235 Sit down, please! Stand up! 

236 Get off the bus! 

237 Get on the bus! 

238 Get in the taxi (car)! 

239 Get out of the car. 

240 Turn off (on) the light. 

241 Go downstairs! (Go upstairs!) 

242 Look at the blackboard! 

243 Look at me! 

244 Hurry up! 

245 Hold on! Wait a minute. 

246 Don’t be nervous! 

247 Don’t worry about it! 

248 Yes or no? 

249 Not at all. 

250 Never do that! 

251 Good heavens! 

Good gracious! 

Ridiculous! 

252 Thank you very much. 

Thank you for helping me. 

253 Excuse me 

Good morning! (noon, evening, night) 

See you tomorrow. (See you again) 

254 Damn 

Disgraceful! 

Shut up! 

Don’t be silly! 

255 Tell me in your own words. 

256 Listen to the recording. 

257 Help yourself 

Hand me the hammer. 

258 Give me a break! 

Never mind. 

259 That’s right! 

All right! 

OK Very good! 

That’s too bad! 

Is that it? 

That will do. 

260) Mind your own business! 

261) I beg you pardon. (pardon?) 

262) Why not? 

Why me? 

Why not me? 

263) Have a cigarette, won’t you? 

Have a nice weekend (have a trip, have a good day) 

264) Pleased to meet you ( Nice to meet you) 

265) Same to you. ( You too) 

Just so so 

So am I 

So can I 

So do I 

So did I 

Neither am I 

Neither can I 

266) I can open the door. (I can’t open the door.) 

267) Can I open the door? (What can I open?) 

268) Could I open the door? 

269) Can’t you open the door? 

270) Why can you open the door? 

271) Could you tell me the way to the station?  

272) Could you tell me what time it is? 

273) Could you spell it? 

274) What can’t a deaf man do? 

275) Can you help me? 

276) What can I do for you? 

277) We can’t get there on time. 

278) They can be divided into three groups. 

279) I can do what you said. 

280) May I come in? 

May I sit down? 

May I offer a suggestion? 

May I use your pencil? 

May I take this chair? 

May I have some water? 

They may come in handy one day 

281) You must know the sound of each letter in the English 

alphabet. 

282) We may have good reason to be proud of ourselves. 

283) He is younger than I. 

284) He has more brothers than I. 

285) I have fewer brothers than you. 

286) He drinks more water than I. 

287) I drink less water than him. 

288) He is as well as you. 

289) Your car is as fast as mine. 

290) It was the most exciting match I’ve ever seen. 

291) Which is deeper a lake or an ocean? 

292) Which is faster a train or a bus? 

293) He is not so tall as I. 

294) I prefer to go rather than to stay. 

295) It is very useful to listen to Lesson One again. 

296) It’s time to watch TV. 

297) It would be quite impossible to enumerate all the things. 

298) It is necessary that he should be sent there at once. 

299) If you go there, you will find him. 

300) If you went there, you would find him. 

301) If you had gone there, you would have found him. 

302) I won’t believe it unless I see it with my own eyes. 

303) I wish I were a bird. 

304) I wish I had met my uncle yesterday. 

305) I wish I could go and visit my aunt tomorrow. 

306) I’m sorry to interrupt you.  

307) I gave the students a chance to say a few words too. 

308) You remember the sound [i] appearing in words like six, 

difficult. 

309) I’ve got a taxi waiting outside. 

310) I hope you won’t find it all too difficult to understand and to 

remember. 

311) I wish I could talk to you about art. 

312) To form the present perfect you use the present tense to 

the verb ‘to have’. 

313) To give you now an example of another American voice, 

here is a young lady from Iowa who will teach you. 

314) Who wrote the famous book entitled “Treasure Island”? 

315) To save you such embarrassment, here are a few simple 

rules about writing. 

316) You would somehow manage to make yourself understood 

what other people said to you. 

To do as you suggest would be out of the question. 

317) I think we’ve just enough time to learn a few more irregular 

verbs. 

318) We shall devote today’s lesson to the study of ONE 

English verb ‘to get’. 

319) Looking at the last few lessons, I see we have taken a big 18  step. 

320) Keeping one’s promise is something we should all do. 

321) I take ten minutes to get there. 

322) After he arrives, we’ll all come out. 

323) When he comes, I’ll bring him there. 

324) I won’t say anything until you tell him. 

325) I won’t phone my friend till Bob arrived. 

326) I haven’t heard anything about him since you wrote to me last month. 

327) As soon as we got there, we start working. 

328) I’ll stay here until you come back. 

329) I have only a few seconds left in which to remind you that 

your work on these lessons is by no means over. 

330 Read as many English books as you possibly can. 

331) What you call a ‘vest’ is an ‘undershirt’ to us. 



आगामी झालेले