नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

गुरुवार, ११ एप्रिल, २०१९

महात्मा फुले जयंती ११ एप्रिल



जोतीराव गोविंदराव फुले, महात्मा फुले नावाने प्रसिद्ध, हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली; शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.
1869 – स्वतः कुळवाडी भूषण ही उपाधी लावली.
1852 – पुणे, विश्रामबाग वाड्यात मेजर कॅँडीच्या हस्ते सत्कार.
21 मे 1888 – वयाची 60 वर्ष पूर्ण केल्याबद्दल रावबहादूर बेडेकर यांच्या हस्ते महात्मा ही पदवी.
युक्ती आणि कृतीत एकवाक्यता असणारा जहाल समाजसुधारक.
‘गुलामगिरी’ ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णियांना समर्पित केला. ‘अस्पृश्यांची कैफियत’ हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. मूळ गाव – कटगुण (सातारा) गोर्‍हे हे मूळ आडनाव. ज्योतीबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. सावित्रीबाईंना शिक्षित करून शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. सावित्रीबाई देशाच्या पहिल्या मुख्याध्यापिका आहेत. स्वतंत्रपणे मुलींसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत. १८८० – नारायण मेधाजी लोखंडे यांना ‘मिलहॅण्ड असोसिएशन’ या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले.
सप्टेंबर २३, इ.स. १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली पुरोहितांकडून होणार्‍या अन्याय, अत्याचारापासून , गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. ‘दीनबंधू’ साप्ताहिक मुखपत्र म्हणून चालविले जात असे. ‘सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥’ हे समाजाचे घोष वाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरवात केली. मराठीत मंगलाष्टकं रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.
सत्यशोधक समाजा’चे संस्थापक, आपल्या पुरोगामी विचारांचे निर्भयपणे आचरण करणारे समाजसुधारक, एकंदरच सुधारणेसंबंधी क्रांतीकारक भूमिका घेणारे आधुनिक महाराष्ट्राचे विचारवंत म्हणजे महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले.
महात्मा फुल्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी २० फेब्रुवारी १८२७ झाली झाला. त्यांच मूळ आडनाव गोर्हे. वडिलांचा फुलं विक्रीचा व्यवसाय त्यामुळे फुले म्हणून ते ओळखण्यात येऊ लागले. व तेच नाव पुढे रूढ झाले. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. १८४२ ला माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. वाचनाची अतिशय आवड असल्यामुळे शिवाजी महाराजांचे चरित्र व थॉमस पेन या बंडखोर विचारवंताच्या ‘राईटस् ऑफ मॅन’ या ग्रंथाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून ते अतिशय अस्वस्थ होत असत. ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा त्यांनी निश्चय केला. त्याप्रमाणे आपल्या पत्नी सावित्रीबाईंना त्यांनी साक्षर केले. १८४८ साली पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी पुण्याच्या वेताळपेठेत १८५२ मध्ये त्यांनी शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण ज्योतिबा आपल्या भूमिकेवर ठाम असत. समाज सुधारण्याच्या कार्याला गती देण्यासाठी व व्यापक करण्यासाठी १८७३ साली त्यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. ‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शत्त*ी आहे अशी त्यांची (अस्तिक्यवादी) विचारसरणी होती. मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या ‘शेतकर्याच ा आसूड’ या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकर्यांची विदारक दर्दशा आणि दारिद्रयाची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतीकारक म्हणून ही ज्योतिबांचे दर्शन होते. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे ज्योतीराव एक तत्वचितक व्यत्ति*मत्त्व म्हणूनही आपल्यासमोर येतात.
अशा समाजसुधारकाचे २८ नोव्हेंबर १८९० ला निधन झाले.
*"स्त्री शिक्षणाचे" जनक महात्मा जोतिराव फुले यांच्या१९२ व्या जयंती निमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन...*

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

* महात्मा फुले नावाने प्रसिद्ध हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते.
त्यांनी *सत्यशोधक समाज* नावाची संस्था स्थापन केली; शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची प्रथा रोवली. जनतेने त्यांना *महात्मा* ही उपाधी बहाल केली होती. ही पदवी त्यांना इ.स.१८८८ या साली मिळाली. 'शेतकऱ्यांचे आसूड' हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला होता

जोतीराव गोविंदराव फुले
टोपणनाव: जोतीबा, महात्मा
जन्म: ११ एप्रिल १८२७ खानवडी, पुणे,महाराष्ट्र
मृत्यू: नोव्हेंबर २८, इ.स. १८९०
पुणे, महाराष्ट्र
संघटना: सत्यशोधक समाज
प्रमुख स्मारके: भिडे वाडा, गंज पेठ ,पुणे
प्रभाव: थॉमस पेन
प्रभावित: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
वडील: गोविंदराव फुले
आई: चिमणाबाई फुले
पत्नी: सावित्रीबाई फुले
अपत्ये: यशवंत

*#बालपण_आणि_शिक्षण-*
जोतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. त्याच गावी महात्मा फुल्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते, त्यामुळे गोऱ्हे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले. कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला. तेथे त्यांचे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत.

जोतीराव केवळ नऊ महिन्यांचे होते, तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी सावित्रीबाई यांच्याशी झाला. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. इ.स. १८४२ मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख, त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला.

*#शैक्षणिक_कार्य-*

महात्मा फुले यांच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत:

*विद्येविना मती गेली ।*
*मतीविना नीती गेली ।*
*नीतीविना गती गेली ।*
*गतीविना वित्त गेले ।*
*वित्ताविना शूद्र खचले ।*
*इतके अनर्थ एका अविद्येने केले ।*

बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. त्यांनी इ.स. १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाडयात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळ पेठेत इ.स.१८५२ मध्ये शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. जोतीरावांनी पत्‍नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय होते.

महात्मा ज्योतिबा फुले यांचे शिक्षण व अभ्यासक्रमातून प्रकट होणारे विचार - स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या त्रयीवर नितांत भरवसा ठेवणारे आणि सामाजिक विषमतेच्या विरोधात आवाज उठविणारे म. फुले हे महापुरुष होते. त्यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर म्हणून ओळखले जाते. ते मानवतावादी विचाराचे होते. त्यांनी मेकॉलेच्या खलित्यास कडाडून विरोध 'शिक्षण हे वरच्या वर्गापासून खालच्या वर्गापर्यंत पाझरत आले पाहिजे' या विचारास फुलेंचा विरोध होता कारण इंग्रजाचा भर प्रथम वरचा वर्ग शिकला पाहिजे व नंतर खालचा वर्ग शिकावा यावर होता. 'प्रथम खालच्या वर्गातील लोकांना शिक्षण देऊन नंतर वरच्या वर्गातील लोकांना शिक्षण दयावे 'आधी कळस मग पाया असे न होता, आधी पाया मग कळस’ अशा पद्धतीने शिक्षणप्रणाली असण्यावर म. फुलेंचा आग्रह होता. प्रथम उपेक्षितांना शिक्षण नंतर अपेक्षितांना शिक्षण’ हे सूत्र अंमलात आणावे, यावर भर देण्यात आला.
महात्मा फुलेंचे शिक्षण विषयक विचार,

→ स्त्री शिक्षणाचा पाठपुरावा
→ प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत
→ प्रशिक्षित शिक्षकाची तरतूद करणे
→ प्राथमिक शिक्षणाकडे लक्ष देणे
→ ग्रामीण भागातील मुलामुलींचे शिक्षण
→ राष्ट्रनिर्माणासाठी शुद्रांना शिक्षण
→ शिक्षण प्रणालीत आमूलाग्र बदल विचार
→ व्यावसायिक व तांत्रिक शिक्षण
→ त्रिभाषा सूत्राचा अवलंब
→ शिष्यवृत्ती व वसतिगृहाची सुविधा
→ शिक्षणविषयक ज्ञान व विचार

#स्त्री_शिक्षणाचा_पाठपुरावा-

पूर्वीच्या काळामध्ये या परिस्थितीत स्त्रियांनी शिक्षण घेणे. म्हणजे अधर्मच करणे होय. त्यामुळे स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे कायमची उघडली जावी, म्हणून म. फुलेंनी स्त्री-शिक्षण मोहीम सर्वप्रथम हाती घेतली. शिक्षण हे समर्थ स्त्री म्हणून जगण्यासाठी दिले जावे. स्त्रियांचा खरा धर्म त्यांना शिक्षण देणे होय. स्त्रियांच्या मानसिकतेसाठी व सक्षम स्त्री घडवण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. हे ओळखून म. फुलेंनी आपल्या पत्नीस शिक्षण देऊन आदय शिक्षिका म्हणून कार्यास सुरुवात केली आणि स्त्री-शिक्षण मोहमेस सुरुवात केली.
प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत - प्राथमिक शिक्षण हा प्रत्येक बालकाचा हक्क आहे आणि त्यामुळे हे शिक्षण मिळणे आवश्यक आहे. तसेच म. फुले प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत असावे या विचारांचा पुरस्कार करणारे प्रथम भारतीय नागरिक होते. ही मागणी त्यांनी १९ ऑक्टोबर १८८२ मध्ये हंटर शिक्षण आयोगापुढे एका शिक्षणावर अधिक भर देईल तर नीतीच्या आणि सद्वर्तनाच्या दृष्टीने कितीतरी चांगले लोक शिकून तयार होताना मुळीच अडचण पडणार नाही. या विचारातून त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करण्यावर भर दिला. प्राथमिक शिक्षकांची तरतूद करणे - प्राथमिक शिक्षणास मोफत व सक्तीचे केल्यास विदयार्थ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता होती आणि त्याकरिता दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रशिक्षित शिक्षक असणे देखील आवश्यक आहे आणि त्याकरिता प्रथम आवाज उठविणारे म. फुले हे एकमेव व्यक्ती होते. प्राथमिक शिक्षण हा जीवनाचा पाया आहे. त्यामुळे या स्तरावरील शिक्षण उत्तम दर्जाचे असावे. यावर अधिक भर देण्यात आला.
प्राथमिक शिक्षणाकडे लक्ष देणे - सरकारी नोक-यांमध्ये सर्व वरिष्ठ वर्गाची मक्तेदारी आहे, असे दिसून आल्यावर शिक्षण खालच्या वर्गातील तळागाळातील लोकांना मिळावे. यासाठी म.फुले यांनी प्राथमिक शिक्षण खालच्या वर्गास देण्यावर अधिक भर दिला. उच्च शिक्षणाकडे कमी व ग्रामीण जनतेच्या प्राथमिक शिक्षणाकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. प्राथमिक शिक्षणातून उद्याची भावी पिढी घडत असते आणि आज जे प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्यात आले आहे. त्यामागे म. फुलेंचे विचार, असलेले दिसून येतात. आपल्या देशामध्ये आजची परिस्थिती लक्षात घेता कमी शिकलेले अध्यापक व अनुभव कमी असलेले शिक्षक प्राथमिक स्तरावर अध्यापन करताना दिसतात आणि अधिक अनुभवी व विषयतज्ज्ञ अध्यापक वर्ग वरच्या वर्गास अर्थात उच्च स्तर अध्यापन करतात. तेव्हा वेळोवेळी प्राथमिक शिक्षण अधिक दर्जेदार व गुणवत्तापूर्ण देणे ही काळाजी गरज बनली आहे आणि त्या दृष्टीकोनातून विचार म. फुलेंनी व्यक्त केले.
ग्रामीण भागातील मुलामुलींचे शिक्षण - बहुजन समाज ग्रामीण भागामध्ये राहत असल्याने, त्यांच्या शिक्षणाची म. फुले यांना अधिक काळजी वाटत असे. २ मार्च १८८८ मध्ये म. फुले म्हणाले होते की आपली बहुतांश जनता खेड्यात निवास करते. तेव्हा शासनाने ग्रामीण लोकांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष पुरवावे. राष्ट्रनिर्माणासाठी शुद्रांना शिक्षण - आपल्या देशात बहुजन समाज अजाण व अडाणी आहे. त्यांच्या उद्धारासाठी. शिक्षण हा एकमेव उपाय आहे. शुद्रांना शिक्षण देऊन सुशिक्षित केल्याशिवाय राष्ट्र बनू शकत नाही. ज्या देशात सामाजिक आणि आर्थिक गुलामी असते तेथे राष्ट्रवाद निर्माण होऊ शकत नाही. शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली झाली पाहिजे. यावर अधिक भर होता.
शिक्षण प्रणालीत आमूलाग्र बदल - म. फुले यांच्या मते आजची शिक्षण पद्धती ही बहुजन समाजाला शिक्षणपासून वंचित करणारी होती. तेव्हा शिक्षणप्रणाली बदलली पाहिजे यावर अधिक भर दिला गेला. केवळ कारकून वर्ग तयार करणा-या वर्गाची निर्मिती शिक्षणातून होऊ नये, तर मानवी जीवन जगण्यास सक्षम बनवणारे, उदद्योगी, जीवनोपयोगी शिक्षण देण्यात यावे.

*#त्रिभाषा_सूत्राचा_अवलंब-*

(१९६४-६६) च्या कोठारी आयोगाने त्रिभाषा सूत्रास जरी आजच्या कालावधीत मान्यता दिलेली असली तरी या अगोदर ७७ वर्षांपूर्वी म. फुले यांनी त्रिभाषा सूत्राचा अवलंब शिक्षणात करावा यावर भर दिला होता.
शिष्यवृत्ती व वसतिगृहाची सुविधा - जनसामान्यामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा ह्यासाठी खेड्यापाड्यातील जनतेला शिक्षण घेता यावे म्हणून वसतिगृहाची व्यवस्था करण्याची कल्पना म. फुले यांनी मांडली आणि गरीब, होतकरू मुलांसाठी शिष्यवृत्ती व वसतिगृहाची सुविधा देण्यावर भर दिला.
शिक्षणाविषयक ज्ञान व विचार - शिक्षण हा तिसरा डोळाच मानले जाते आणि त्यामुळेच म. फुले यांनी शिक्षणावर अधिक प्रकाश टाकला आहे आणि शिक्षण कोणत्याही एका व्यक्तीची मक्तेदारी न बनता, सर्वांना शिक्षण मिळावे, शिक्षणाचा प्रसार होऊन, ज्ञान व विचारांची वृद्धी व्हावी यासाठी म. फुलेंनी योगदान दिले. म. फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून स्त्रियांसाठी तसेच मागासलेल्या अनाथाच्या शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या. तसेच बालगृहाची स्थापना देखील केली. अशाप्रकारे म. फुले यांनी समाज परिवर्तनाचे कार्य करताना स्वत:च्या घरदाराचाही विचार न करता काम केले आणि म्हणून आज आपला समाज मानाने सर्व प्रकारचे शिक्षण घेत आहे. अशा शिक्षणतज्ज्ञाला, शिक्षणमहर्षीच्या कार्याला कोटी-कोटी वंदन.
शिक्षण व अभ्‍यासक्रमातून प्रकट होणारा फूले शाहू आंबेडकरी विचार प्रा. वैशाली शा कंकाळे, अकोला
आपल्या शिक्षणातून आणि तसेच्या अभ्यासक्रमातून महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रचारित व प्रसारित होत असतात. या थोर महापुरुषांचे सामजिक, राजकीय आणि सांस्कृतिक स्वरूपातील विचार आपल्याला प्रेरित व प्रोत्साहित करीत असतात. त्याचे विचार २१ व्या शतकात आपल्या विदयार्थी वर्गाला नव्याने देणे आवश्यक आहे.
शिक्षण हा जीवनाचा आधार आहे. शिक्षणापासून आपण आपणास वेगळे करू शकत नाही. प्रत्येक व्यक्ती हा शिक्षण देणारा एक महत्वपूर्ण ग्रंथ आहे. केवळ त्याच्याकडून आपण काय घ्यावे हे आपणास कळायला पाहिजे. शिक्षण ही जीवन जगण्याची गुरुकिल्ली आहे. जीवन म्हणजे काय? जीवन का जगावे, जीवन कसे जगावे, जीवनाची सार्थकता कशामध्ये आहे, जीवन पूर्ण कसे करावे. आपण जीवनातून काय घ्यावे व इतरांना काय दयावे. या सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजे शिक्षण होय. म्हणूनच'शिक्षणानेच सर्व काही होत आहे, त्याकरिता आधी शिक्षण घेतलेच पाहिजे'
जीवन शिक्षण ही काळाची गरज बनली आहे आणि आपल्या सर्व थोर शिक्षणतज्ज्ञांनी, विचारवंतांनी, समाजसुधारकांनी जीवन शिक्षणाची धुरा सांभाळली आहे आणि सर्वांना जगण्याची एक दशा आणि दिशा देण्याची महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. २१व्या शतकामध्ये शिक्षण घेणारा समुदाय मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पण त्यातून जीवनविषयक शिक्षण मिळत आहे काय? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. तेव्हा आपल्या शिक्षणतज्ज्ञांचे आजच्याशिक्षणातून व अभ्यासक्रमातून प्रकट होणारे विचार निश्चितच येणा-या भविष्यकालीन समस्यांचे निराकरण व उत्तम जीवन जगण्यासाठी दिशादर्शक ठरतील. यामध्ये प्रामुख्याने महात्मा फुले, राजर्षी शाहू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मार्गदर्शनपर आहेत. शिक्षण आणि अभ्यासक्रमामध्ये जे विचार आहेत. ते याच थोरांचे आहेत.
महात्मा ज्योतिबा फुले यांचे शिक्षण व अभ्यासक्रमातून प्रकट होणारे विचार - स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या त्रयीवर नितांत भरवसा ठेवणारे आणि सामाजिक विषमतेच्या विरोधात आवाज उठविणारे म. फुले हे महापुरुष होते. त्यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर म्हणून ओळखले जाते. ते मानवतावादी विचाराचे होते. त्यांनी मेकॉलेच्या खलित्यास कडाडून विरोध 'शिक्षण हे वरच्या वर्गापासून खालच्या वर्गापर्यंत पाझरत आले पाहिजे' या विचारास फुलेंचा विरोध होता कारण इंग्रजाचा भर प्रथम वरचा वर्ग शिकला पाहिजे व नंतर खालचा वर्ग शिकावा यावर होता. 'प्रथम खालच्या वर्गातील लोकांना शिक्षण देऊन नंतर वरच्या वर्गातील लोकांना शिक्षण दयावे 'आधी कळस मग पाया असे न होता, आधी पाया मग कळस’ अशा पद्धतीने शिक्षणप्रणाली असण्यावर म. फुलेंचा आग्रह होता. प्रथम उपेक्षितांना शिक्षण नंतर अपेक्षितांना शिक्षण’ हे सूत्र अंमलात आणावे, यावर भर देण्यात आला.
महात्मा फुलेंचे शिक्षण विषयक विचार
→ स्त्री शिक्षणाचा पाठपुरावा
→ प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत
→ प्रशिक्षित शिक्षकाची तरतूद करणे
→ प्राथमिक शिक्षणाकडे लक्ष देणे
→ ग्रामीण भागातील मुलामुलींचे शिक्षण
→ राष्ट्रनिर्माणासाठी शुद्रांना शिक्षण
→ शिक्षण प्रणालीत आमूलाग्र बदल विचार → व्यावसायिक व तांत्रिक शिक्षण
→ त्रिभाषा सूत्राचा अवलंब
→ शिष्यवृत्ती व वसतिगृहाची सुविधा
→ शिक्षणविषयक ज्ञान व विचार

*#स्त्री_शिक्षणाचा_पाठपुरावा-*

पूर्वीच्या काळामध्ये या परिस्थितीत स्त्रियांनी शिक्षण घेणे. म्हणजे अधर्मच करणे होय. त्यामुळे स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे कायमची उघडली जावी, म्हणून म. फुलेंनी स्त्री-शिक्षण मोहीम सर्वप्रथम हाती घेतली. शिक्षण हे समर्थ स्त्री म्हणून जगण्यासाठी दिले जावे. स्त्रियांचा खरा धर्म त्यांना शिक्षण देणे होय. स्त्रियांच्या मानसिकतेसाठी व सक्षम स्त्री घडवण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. हे ओळखून म. फुलेंनी आपल्या पत्नीस शिक्षण देऊन आदय शिक्षिका म्हणून कार्यास सुरुवात केली आणि स्त्री-शिक्षण मोहमेस सुरुवात केली.
प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत - प्राथमिक शिक्षण हा प्रत्येक बालकाचा हक्क आहे आणि त्यामुळे हे शिक्षण मिळणे आवश्यक आहे. तसेच म. फुले प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत असावे या विचारांचा पुरस्कार करणारे प्रथम भारतीय नागरिक होते. ही मागणी त्यांनी १९ ऑक्टोबर १८८२ मध्ये हंटर शिक्षण आयोगापुढे एका शिक्षणावर अधिक भर देईल तर नीतीच्या आणि सद्वर्तनाच्या दृष्टीने कितीतरी चांगले लोक शिकून तयार होताना मुळीच अडचण पडणार नाही. या विचारातून त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करण्यावर भर दिला.

*#प्राथमिक_शिक्षकांची_तरतूद_करणे-*

प्राथमिक शिक्षणास मोफत व सक्तीचे केल्यास विदयार्थ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता होती आणि त्याकरिता दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रशिक्षित शिक्षक असणे देखील आवश्यक आहे आणि त्याकरिता प्रथम आवाज उठविणारे म. फुले हे एकमेव व्यक्ती होते. प्राथमिक शिक्षण हा जीवनाचा पाया आहे. त्यामुळे या स्तरावरील शिक्षण उत्तम दर्जाचे असावे. यावर अधिक भर देण्यात आला.

*#प्राथमिक_शिक्षणाकडे_लक्ष_देणे-*

सरकारी नोक-यांमध्ये सर्व वरिष्ठ वर्गाची मक्तेदारी आहे, असे दिसून आल्यावर शिक्षण खालच्या वर्गातील तळागाळातील लोकांना मिळावे. यासाठी म.फुले यांनी प्राथमिक शिक्षण खालच्या वर्गास देण्यावर अधिक भर दिला. उच्च शिक्षणाकडे कमी व ग्रामीण जनतेच्या प्राथमिक शिक्षणाकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. प्राथमिक शिक्षणातून उद्याची भावी पिढी घडत असते आणि आज जे प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्यात आले आहे. त्यामागे म. फुलेंचे विचार, असलेले दिसून येतात. आपल्या देशामध्ये आजची परिस्थिती लक्षात घेता कमी शिकलेले अध्यापक व अनुभव कमी असलेले शिक्षक प्राथमिक स्तरावर अध्यापन करताना दिसतात आणि अधिक अनुभवी व विषयतज्ज्ञ अध्यापक वर्ग वरच्या वर्गास अर्थात उच्च स्तर अध्यापन करतात. तेव्हा वेळोवेळी प्राथमिक शिक्षण अधिक दर्जेदार व गुणवत्तापूर्ण देणे ही काळाजी गरज बनली आहे आणि त्या दृष्टीकोनातून विचार म. फुलेंनी व्यक्त केले.
ग्रामीण भागातील मुलामुलींचे शिक्षण - बहुजन समाज ग्रामीण भागामध्ये राहत असल्याने, त्यांच्या शिक्षणाची म. फुले यांना अधिक काळजी वाटत असे.
२ मार्च १८८८ मध्ये म. फुले म्हणाले होते की आपली बहुतांश जनता खेड्यात निवास करते. तेव्हा शासनाने ग्रामीण लोकांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष पुरवावे.

*#राष्ट्रनिर्माणासाठी_शुद्रांना_शिक्षण-*

आपल्या देशात बहुजन समाज अजाण व अडाणी आहे. त्यांच्या उद्धारासाठी. शिक्षण हा एकमेव उपाय आहे. शुद्रांना शिक्षण देऊन सुशिक्षित केल्याशिवाय राष्ट्र बनू शकत नाही. ज्या देशात सामाजिक आणि आर्थिक गुलामी असते तेथे राष्ट्रवाद निर्माण होऊ शकत नाही. शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली झाली पाहिजे. यावर अधिक भर होता.

*#शिक्षण_प्रणालीत_आमूलाग्र_बदल-*

म. फुले यांच्या मते आजची शिक्षण पद्धती ही बहुजन समाजाला शिक्षणपासून वंचित करणारी होती. तेव्हा शिक्षणप्रणाली बदलली पाहिजे यावर अधिक भर दिला गेला. केवळ कारकून वर्ग तयार करणा-या वर्गाची निर्मिती शिक्षणातून होऊ नये, तर मानवी जीवन जगण्यास सक्षम बनवणारे, उदद्योगी, जीवनोपयोगी शिक्षण देण्यात यावे.

*#त्रिभाषा_सूत्राचा_अवलंब-*

(१९६४-६६) च्या कोठारी आयोगाने त्रिभाषा सूत्रास जरी आजच्या कालावधीत मान्यता दिलेली असली तरी या अगोदर ७७ वर्षांपूर्वी म. फुले यांनी त्रिभाषा सूत्राचा अवलंब शिक्षणात करावा यावर भर दिला होता. शिष्यवृत्ती व वसतिगृहाची सुविधा - जनसामान्यामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा ह्यासाठी खेड्यापाड्यातील जनतेला शिक्षण घेता यावे म्हणून वसतिगृहाची व्यवस्था करण्याची कल्पना म. फुले यांनी मांडली आणि गरीब, होतकरू मुलांसाठी शिष्यवृत्ती व वसतिगृहाची सुविधा देण्यावर भर दिला.
शिक्षणाविषयक ज्ञान व विचार - शिक्षण हा तिसरा डोळाच मानले जाते आणि त्यामुळेच म. फुले यांनी शिक्षणावर अधिक प्रकाश टाकला आहे आणि शिक्षण कोणत्याही एका व्यक्तीची मक्तेदारी न बनता, सर्वांना शिक्षण मिळावे, शिक्षणाचा प्रसार होऊन, ज्ञान व विचारांची वृद्धी व्हावी यासाठी म. फुलेंनी योगदान दिले. म. फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून स्त्रियांसाठी तसेच मागासलेल्या अनाथाच्या शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या. तसेच बालगृहाची स्थापना देखील केली. अशाप्रकारे म. फुले यांनी समाज परिवर्तनाचे कार्य करताना स्वत:च्या घरदाराचाही विचार न करता काम केले आणि म्हणून आज आपला समाज मानाने सर्व प्रकारचे शिक्षण घेत आहे. अशा शिक्षणतज्ज्ञाला,शिक्षणमहर्षीच्या कार्याला कोटी-कोटी वंदन.

*#सामाजिक_कार्य-*

मानवी हक्कावर इ.स.१७९१ मध्ये थॉमस पेन यांनी लिहिलेले पुस्तक त्यांच्या वाचनात आले. त्याचा प्रभाव त्यांच्या मनावर झाला. सामाजिक न्यायाबाबत त्यांच्या मनात विचार येऊ लागले. त्यामुळेच विषमता दूर करण्यासाठी स्त्रीशिक्षण आणि मागासलेल्या जातीतील मुलामुलींचे शिक्षण यावर त्यांनी भर देण्याचे ठरवले. सामाजिक भेदभाव त्यामुळे कमी होईल असे त्यांचे निश्‍चित मत आणि अनुमान होते.

‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची (अस्तिक्यवादी) विचारसरणी होती. मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या ‘शेतकऱ्याचा असूड’ या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणूनही जोतीरावांचे दर्शन होते. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे जोतीराव एक तत्त्वचिंंतक व्यक्तिमत्त्व होते. महात्मा फुलेंनी सामाजिक प्रबोधन करण्यासाठी शेतकऱ्यांचा आसूड इ. ग्रंथ लिहून सामाजिक प्रबोधन केले. मूलभूत मानवी हक्कांच्या आधारावरून विश्वकुटुंब कसे निर्माण होईल व त्याकरिता कशा प्रकारचे वर्तनक्रम व वैचारिक भूमिका स्वीकारली पाहिजे हे ज्योतीराव फुलेंनी आपल्या ' सार्वजनिक सत्यधर्म ' संहितेत अनेक वचनांच्या आधारे मांडली आहे.त्यातील काही महत्वाची वचने लीहिली

स्त्री अथवा पुरुष एकंदर सर्व गावाचे , प्रांताचे , देशाचे , खंडाचे संबंधात अथवा कोणत्याही धर्मातील स्वताच्या संबंधात , स्त्री आणि पुरुष या उभयतांनी अथवा सर्व स्त्रियांनी अथवा एकमेकात एकमेकांनी कोणत्याही प्रकारची आवडनिवड (भेदभाव) न करता या भूखंडावर आपले एक कुटंब समजून एकमताने सत्यवर्तन करून राहावे .
आपणा सर्वांच्या निर्माणकर्त्याने एकंदर सर्व प्राणीमात्रांना उत्पन्न करतेवेळी मनुष्यास जन्मतःच स्वतंत्र प्राणी म्हणून निर्माण केले आहे आणि त्यास आपापसात साऱ्या हक्कांचा उपभोग घेण्यास समर्थ केले आहे .
आपणा सर्वांच्या निर्माणकर्त्याने सर्व मानवी स्त्री - पुरुषांस धर्म व राजकीय स्वतंत्रता दिली आहे . जो आपल्यापासून दुसऱ्या एखाद्या व्यक्तीस कोणत्याही तऱ्हेचे नुकसान देत नाही , अथवा जो कोणी आपल्यावरून दुसऱ्या मानवांचे हक्क समजून इतरांना पीडा देत नाही त्याला 'सत्यवर्तन ' करणारा म्हणावे .

आपल्या सर्वांच्या निर्मिकाने एकंदर सर्व स्त्री - पुरुषांस एकंदर सर्व मानवी अधिकारांचे मुख्य धनी केले आहे . त्यातून एखादा मानव अथवा काही मानवांची टोळी एखाद्या व्यक्तिवर जबरी करू शकत नाही, त्याप्रमाणे जबरी न करणारास सत्यवर्तन करणारे म्हणावे.
स्त्री अथवा पुरुष जे आपल्या कुटुंबासह, आपल्या भाऊबंदास, आपल्या सोयऱ्याधायऱ्यास आणि आपल्या इष्टमित्र साथींना मोठ्या तोऱ्याने पिढीजात श्रेष्ठ मानून आपल्यास पवित्र मानीत नाहीत आणि एकंदर सर्व मानवी प्राण्यास पिढीजात कपटाने अपवित्र मानून त्यास नीच मानीत नाहीत, त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावे.
स्त्री अथवा पुरुष जे शेतकरी अथवा कलाकौशल्य करून पोटे भरण्यास श्रेष्ठ मानतात, परंतु शेतकरी वगैरे यांना मदत करणाऱ्यांंचा आदरसत्कार करतात त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावे .
महात्मा फुले यांनी मानवास सत्यधर्माचा जो बोध केला त्यातील ही काही वचने आपण वाचली की लक्षात येते, ज्योतीरावाचा आवाका किती मोठ्ठा होत.
त्यांना अखिल विश्वाला कवेत घेणाऱ्या माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठा देणारा धर्म साकार करायचा होता. त्यासाठी मानवी वर्तनात, म्हणजेच व्यवहारात आमूलाग्र बदल घडवून आणायचा होता. त्यासाठी मानवी स्वभाव आणि मानसिकता यात काय बदल केले पाहिजेत याबाबतही ज्योतीरावांनी विपुल लेखन केले आहे . 'अखंड' या काव्यप्रकारात त्यांनी 'मानवाचा धर्म', आत्मपरीक्षण, नीती, समाधान, सहिष्णूता, सदसदविवेक, उद्योग, स्वच्छता, गृहकार्यदक्षता, इत्यादी गोष्टींवरही भाष्य केले आहे.
ज्योतीरावांनी वेगवेगळ्या अखंडातून जे विचार मांडले, मानवी जीवनाला दिशा देणारा जो उपदेश केला, त्यातील काही निवडक भाग येथे विचारात घेतला पाहिजे. ज्योतीराव आपल्या अखंडात म्हणतात,

सर्वांचा निर्मिक आहे एक धनी ||
त्याचे भय मनी || धरा सर्व ||१||

न्यायाने वस्तूंचा उपयोग घ्यावा ||
आनंद करावा || भांडू नये ||२||

धर्म राज्य भेद मानवा नसावे ||
सत्याने वर्तावे || ईशासाटी ||३||

सर्व सुखी व्हावे भिक्षा जी मागतो ||
आर्यास सांगतो || जोती म्हणे ||४||

****
दरिद्री मुलांनी विद्येस शिकावे ||
भिक्षान्न मागावे || पोटापुरते ||१||

विद्वान वृद्धांनी विद्यादान द्यावे ||
भिक्षेकरी व्हावे || गावांमध्ये ||२||

स्त्री-पुरुषांसाठी शाळा त्या घालाव्या ||
विद्या शिकवाव्या ||भेद नाही || ३ ||

स्वतः हितासाठी खर्च जे करती ||
अधोगती जाती || जोती म्हणे || ४ ||

****
निर्मल निर्धोशी निव्वळ विचारी ||
सदा सत्याचारी || प्रपंचात ||१||

सूर्यापरी सत्यप्रकाश पेरिता ||
शांती सर्वा देतो || चंद्र जैसा |||२||

होईना भूदेव जाती मारवाडी ||
मानवा न पीडी || सर्ववत ||३||

अशा सज्जनास मानव म्हणावे ||
त्यांचे गुण घ्यावे || जोती म्हणे ||४||

****
क्रोधाचा विटाळ सत्यधर्म पाळी ||
तो खरा बळी || मानवात ||१||

सर्वांभूती द्या हृदयी कोमल ||
घालितो अगळ || इंद्रियांस ||२||

जगात वर्ततो सद्गुणी मवाळ ||
वासनेस मूळ || डाग नाही ||३||

सत्यशोध होता , धिक्कारी तो कवी ||
तोच सत्यवादी ||'जोती म्हणे ||४||

****
निर्मिले बांधव स्त्री पुरुष प्राणी ||
त्यात गोरे कोणी || रंगवर्ण ||१||

त्यांचे हितासाठी बुद्धिमान केले ||
स्वातंत्र्य ठेविले || ज्या त्या कामी ||२||

कोणास न पीडी कमावले खाई ||
सर्वा सुख देई || आनंदात ||३||

खरी हीच नीती मानवाचा धर्म ||
बाकीचे अधर्म || जोती म्हणे ||४||

****
सत्याविन नाही धर्म तो रोकडा ||
जनांशी वाकडा || मतभेद ||१||

सत्य सोडू जाता वादामध्ये पडे ||
बुद्धीस वाकडे || जन्मभर ||२||

सत्य तोच धर्म करावा कायम ||
मानवा आराम || सर्व ठायी ||३||

मानवांचा धर्म सत्य हीच नीती ||
बाकीची कुनीती || जोती म्हणे ||४||

****
सत्याचा जिव्हाळा मनाची स्वच्छता || 
चित्तास स्वस्थता ||''जेथे आहे ||१||

जेथे जागा धीर सदा हृदयात ||
सत्य वर्तनात | खर्ची द्यावा ||२||

पिडा दु:खे सोशी संकटे निवारी ||
गांजल्यास तारी || जगामागी ||३||

धीर धरूनिया सर्वा सुख देती ||
यशवंत होती || जोती म्हणे ||४||

*#सत्यशोधक_समाज*
सप्टेंबर २४, इ.स. १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली

पुरोहितांकडून होणाऱ्या अन्याय, अत्याचारापासून , गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. `निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कशासाठी’ हा विचार फुले यांनी मांडला. देवाविषयी किंवा निसर्गाविषयी निर्मिक हा शब्द वापरला, त्यावरुन सत्यशोधक समाज व अर्थातच महात्मा ज्योतीबा फुले आस्तिक होते, हे स्पष्ट होते.

'सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो.
सत्यशोधक समाजातर्फे 'दीनबंधू' नावाचे एक साप्ताहिक मुखपत्र म्हणून चालविले जात असे.
'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे या समाजाचे घोषवाक्य होते.
सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली.
सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली.
त्यासाठी मराठीत मंगलाष्टके रचली.
समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.

*#लेखन_साहित्य*

'सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून 'दीनबंधू' हे साप्ताहिक चालविले जात असे. तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक 'अखंड' रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते. आपला 'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला. 'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला.

रा.ना. चव्हाण यांनी ‘सारसंग्राहक’ या पुस्तकात सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकाचे सार एकत्र केले आहे. पहिल्या प्रकरणात सार दिले असून दुसऱ्या प्रकरणात फुले यांचे धर्मपर विचार दिले आहेत. एकेश्वर फुले, एकेश्वर समाजवाद, महात्मा फुले व ब्राह्मधर्म या प्रकरणांतून हे सर्व सार समजते.

जोतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांनी त्याना मुंबईतील सेभेत १८८८ मध्ये ‘महात्मा’ ही उपाधी दिली. त्यामुळे ज्योतिबा फुले हे महात्मा फुले या नावाने ओळखले जाऊ लागले.त्यांनी अनेक पुस्तके लिहिली,त्यांपैकी काही ही :-

लेखनकाळ साहित्य प्रकार नाव
इ.स.१८५५ नाटक तृतीय रत्‍न
जून, इ.स. १८६९ पवाडा छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पवाडा
जून इ.स. १८६९ पवाडा विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजी
इ.स.१८६९ पुस्तक ब्राह्मणांचे कसब
इ.स.१८७३ पुस्तक गुलामगिरी
सप्टेंबर २४ , इ.स. १८७६ अहवाल सत्यशोधक समाजाची तिसर्‍या वार्षिक समारंभाची हकीकत
मार्च २० इ.स. १८७७ अहवाल पुणे सत्यशोधक समाजाचा रिपोर्ट
एप्रिल १२ , इ.स. १८८९ निबंध पुणे सत्यशोधक समाजाचा निबंध व वक्तृत्व समारंभ
२४ मे इ.स. १८७७ पत्रक दुष्काळविषयक पत्रक
१९ ऑक्टोबर इ.स. १८८२ निवेदन हंटर शिक्षण आयोगापुढे सादर केलेले निवेदन
१८ जुलै इ.स. १८८३ पुस्तक शेतकऱ्याचा असूड
४ डिसेंबर इ.स. १८८४ निबंध महात्मा फुले यांचे मलबारींच्या दोन टिपणांविषयीचे मत
११ जून इ.स. १८८५ पत्र मराठी ग्रंथागार सभेस पत्र
१३ जून इ.स.१८८५ पुस्तक सत्सार अंक १
ऑक्टोंबर इ.स.१८८५ पुस्तक सत्सार अंक २
१ ऑक्टोंबर इ.स. १८८५ पुस्तक इशारा
२९ मार्च इ.स.१८८६ जाहीर प्रकटन ग्रामजोश्यांसंबंधी जाहीर खबर
२ जून इ.स. १८८६ पत्र मामा परमानंद यांस पत्र
जून इ.स. १८८७ पुस्तक सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टकासह सर्व पूजा-विधी
इ.स. १८८७ काव्यरचना अखंडादी काव्य रचना
१० जुलै इ.स. १८८७ मृत्युपत्र महात्मा फुले यांचे उईलपत्र
इ.स. १८९१ (प्रकाशन) पुस्तक सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक

*#जोतीराव_गोविंदराव_फुलेंचा_संपूर्ण_जीवनक्रम*

अ.क्र. दिनांक / महिना इ.स. घटना
१. एप्रिल ११ इ.स.१८२७ जन्म [पुणे].
२. इ.स. १८३४ ते १८३८ पंतोजींच्या शाळेत मराठी शिक्षण.
३. इ.स. १८४० नारगावच्या खंडोबा नेवसे पाटील यांच्या सावित्रीबाई नावाच्या कन्येशी विवाह.
४. इ.स. १८४१ ते १८४७ मिशनरी शाळेत माध्यमिक (इंग्रजी) शिक्षण.
५. इ.स. १८४७ लहुजी वस्ताद साळवे दांडपट्टा तालीम व इतर शारीरिक शिक्षण आणि क्रांतिकारक विचार.
६. इ.स. १८४७ टॉमस पेन कृत “राईट ऑफ मॅन” या ग्रंथाचे मनन.
७ इ.स. १८४८ उच्चवर्णीय मित्राच्या लग्नाच्या मिरवणुकीत झालेला अपमान .
८. इ.स.१८४८ शूद्रातिशूद्रांसाठी मुलींची शाळा.
९ इ.स. १८४९ शिक्षणदानाचे व्रत घेतल्याने पत्‍नी सावित्रीबाई फुले यांच्यासह करावा लागलेला गृहत्याग.
१० इ.स. १८४९ मराठी प्रकाशनांना अनुदान देण्याची मागणी करणार्‍या सुधारकांच्या सभेला दिलेले संरक्षण.
११ इ.स. १८५१ चिपळूणकरांच्या वाड्यातील व रास्ता पेठेतील मुलींच्या शाळांची स्थापना.
१२ नोव्हेंबर १६ इ.स.१८५२ मेजर कँडी यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण कार्याबद्दल सरकारी विद्याखात्याकडून सत्कार.
१३ इ.स. १८४७ थॉमस पेन यांच्या 'राईट ऑफ मॅन' या ग्रंथाचा अभ्यास.
१४ इ.स. १८४८ मित्राच्या विवाहप्रसंगी निघालेल्या मिरवणुकीत उच्चवर्णीयांकडून अपमान झाला.
१५ इ.स.१८४८ भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले.
१६ सप्टेंबर ७ इ.स.१८५१ भिडे वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात.
१७ इ.स.१८५२ पूना लायब्ररीची स्थापना.
१८ मार्च १५ इ.स.१८५२ वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.
१९ नोव्हेंबर १६ इ.स.१८५२ मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार.
२० इ.स.१८५३ 'दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग ॲन्ड अदर्स' स्थापन केली.
२१ इ.स.१८५४ स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी.
२२ इ.स.१८५५ रात्रशाळेची सुरुवात केली.
२३ इ.स.१८५६ जोतिबांवर मारेकरी घालून हत्येचा प्रयत्‍न झाला.
२४ इ.स.१८५८ शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली.
२५ इ.स.१८६० विधवाविवाहास साहाय्य केले.
२६ इ.स.१८६३ बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली.
२७ इ.स.१८६५ विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.
२८ इ.स.१८६४ गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला.
२९ इ.स.१८६८ दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.
३० २४ सप्टेंबर इ.स.१८७३ सत्यशोधक समाजची स्थापना केली.
३१ इ.स.१८७५ शेतकर्‍यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले ( अहमदनगर).
३२ इ.स. १८७५ स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य केले.
३३ इ.स. १८७६ ते १८८२ पुणे नगर पालिकेचे सदस्य होते.
३४ इ.स. १८८० दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला.
३५ इ.स.१८८० नारायण मेघाजी लोखंडे यांना 'मिलहॅण्ड असोसिएशन' या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले.
३६ इ.स.१८८२ 'विल्यम हंटर शिक्षण आयोगा' समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली.
३७ इ.स.१८८७ सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची व नवीन पूजाविधीची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली.
३८ इ.स.१८८८ ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार.
३९ ११ मे इ.स.१८८८ मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर विठ्ठलराव वंडेकर यांच्या हस्ते सत्कार करून 'महात्मा' ही पदवी प्रदान केली.
४० नोव्हेंबर २८ इ.स.१८९० पुणे येथे निधन.

*#पश्चात_प्रभाव (लीगसी)*

महात्मा फुले यांच्या निधनानंतर सत्यशोधक चळवळ महाराष्ट्रात रुजवण्यासाठी दिनकरराव जवळकर व केशवराव जेधे यांनी खूप मेहनत घेतली. राजर्षी शाहू महाराजांनी त्यांना समाजप्रबोधनासाठी मदत केली. ब्राम्हणेतर चळवळीसाठी जेधे-जवळकर जोडीने अवघा महाराष्ट्र ढवळून काढला.

*#तृतीय_रत्न*

तृतीय रत्‍न या नाटकाचा सारा इतिहास नाट्यपूर्ण आहे. जोतिबांनी २८ व्या वर्षी इ.स.१८५५ साली हे नाटक लिहिले. नाटक लिहिण्याचा हेतू जोतिबा लिहितात, ‘भट जोशी आपल्या मतलबी धर्माच्या थापा देऊन अज्ञानी शूद्रास कसकसे फसवून खातात व ख्रिस्ती उपदेशक आपल्या निःपक्षपाती धर्माच्या आधाराने अज्ञानी शूद्रास खरे ज्ञान सांगून त्यास कसकसे सत्यमार्गावर आणतात, या सर्व गोष्टीविषयी म्या एक लहानसे नाटक करून इ.स. १८५५ मध्ये दक्षिणा प्राइज कमिटीला अर्पण केले; परंतु तेथेही असल्या भिडस्त भट सभासदांच्या आग्रहामुळे युरोपियन सभासदांचे काही चालेना. तेव्हा त्या कमिटीने माझी चोपडी नापसंत केली. अखेर मी ते पुस्तक एकीकडेस टाकून काही वर्षे लोटल्यानंतर दुसरी लहानशी ब्राह्मणांच्या कसबाविषयी नवीन चोपडी तयार करून आपल्या स्वतःच्या खर्चाने छापून प्रसिद्ध केली."

या नाटकाचे प्रत्यक्ष किती खेळ झाले, त्याला प्रतिसाद कसा मिळाला, याविषयी ठोस पुरावा उपलब्ध नाही. प्रथम इ.स. १९७९ मध्ये ‘पुरोगामी सत्यशोधक’मधून एप्रिल-मे-जूनच्या अंकात नेमक्या प्रस्तावनेसह हे नाटक प्रकाशित झाले. प्रा. सीताराम रायकर यांना बुलढाणा येथील पंढरीनाथ सीताराम पाटील यांच्या संग्रही या नाटकाच्या तीन हस्तलिखित प्रती मिळाल्या. तीनपैकी एका प्रतीवर त्रितीय नेत्र असेही शीर्षक प्रा. रायकरांना आढळले. इ.स. १८५५ मध्ये लिहिलेल्या नाटकाच्या हस्तलिखित प्रती इ.स. १९७९ (१२५ वर्षांचा कालखंड उलटल्यानंतर) मिळतात ही एक नाट्यपूर्ण घटनाच आहे. मराठी रंगभूमीचा प्रारंभ इ.स. १८४३ साली विष्णुदास भावे यांनी केला. पण मराठी नाट्यलेखन १८५६ साली प्रथम झाले आणि तेही गो.म. माडगावकर यांच्या ‘व्यवहारोपयोगी नाटक’ या पाचप्रवेशी नाटकापासून असे मानले जाई पण तृतीय रत्‍न (तृतीय नेत्र) या इ.स. १८५५ साली लिहिलेल्या नाटकामुळे पहिले लिखित मराठी नाटक असून, जोतिराव फुले हे पहिले मराठी नाटककार आहेत.

आपली परिवर्तनवादी चळवळ सशक्त आणि परिणामकारक करण्यासाठी ‘नाटक’ या हत्याराचा वापर करण्याचा त्यांचा हेतू होता.

*नाटकाचे_स्वरूप*

या नाटकाला रूढ कथानक नाही. त्यात एक शोषकाचा, एक शोषिताचा असे दोन पक्ष आहेत. अशिक्षित कुणबी, त्याची बायको, भिक्षुक जोशी, त्याचा भाऊ, त्याची पत्‍नी, एक ख्रिस्ती धर्मोपदेशक, एक मुसलमान आणि विदूषक अशी एकूण आठ पात्रे आहेत. या सर्वच पात्रांना स्वत:चे असे चेहरे नाहीत. नाटकाची संकल्पना प्रातिनिधिक पातळीवर आहे. समाजातील एक विशिष्ट वर्ग जन्माने उच्च असल्याच्या एकमेव भांडवलावर समाजातील दुसर्‍या एका अंधश्रद्ध, अडाणी, गरीब वर्गाला कसा लुबाडत असतो, नागवित असतो याचेच प्रातिनिधिक चित्रण या नाटकात आहे.

नाटक म्हणून तृतीय रत्‍नचे लेखन सलग झालेले असून ती अनेक प्रवेशांची मालिका आहे. त्यात लेखकाने पात्रे, स्थळ, काळ, प्रसंग आणि संवाद यात मुक्त संचार पद्धतीचाच वापर केला आहे. त्या दृष्टीने या नाटकाला मुक्तनाट्य किंवा वगनाट्य (वग म्हणजे ओघ. कथानकामधे खंड पाडू न देता ओघाओघाने सांगणे.) म्हणता येईल. दोन फेर्‍या मारल्या की, राजवाडा, आणखी दोन चकरा मारल्या की, घनदाट जंगल ही जशी लोकनाट्यात भरपूर सोय असते तशीच रचना तृतीय रत्‍नची आहे. ठरावीक नाट्यगृह, रंगमंच, प्रकाशयोजना यांचीही गरज नाही. लोक जमताच कोठेही नाटक सादर केले जावे अशीच याची अत्यंत लवचीक रचना आहे. ‘पथनाट्य’ म्हणूनसुद्धा या नाटकाला विशेष महत्त्व आहे.

या नाटकातील ‘विदूषक’ हे पात्र अतिशय महत्त्वाचे आहे. विदूषक या संस्कृत कलोत्पन्न पात्रासह संस्कृत कुलोत्पन्न अशाच त्रितीय रत्‍न (किंवा त्रितीय नेत्र) या शीर्षकाखाली जोतिबांनी मराठी नाट्यरचना सुरू केलेली आहे. पण त्यांनी परंपरागत रचना नाकारलेली आहे. या विदूषकाचे सांकेतिक रूप, त्याचा खादाडपणा, आचरट बोलणे याला पूर्णपणे फाटा दिलेला आहे आणि अत्यंत वेगळाच विदूषक रंगभूमीवर साकारण्याचा प्रयत्‍न जोतिबांनी केलेला आहे आणि तो यशस्वीही झालेला आहे.

हा ‘विदूषक’ एकाच नाटकात अनेक भूमिका वठविणारा आहे. काही प्रसंगी तो निवेदक आहे. काही प्रसंगी तो भाष्यकार आहे. काही ठिकाणी तर त्याची भाषा जहाल आणि तिखट झालेली जाणवते. उपहास, नेमके वर्मावर बोट ठेवणे, बिंग फोडणे आणि रहस्य उलगडून दाखविणे आणि ज्ञानाचा मार्ग धरा हा उपदेश करणे ही कामेही तो अत्यंत चोखपणे करीत असतो. एकाच वेळी नाटकातील पात्रांच्या कृतीमधून प्रेक्षकांशी संवाद साधण्याचे अजब कसब व्यक्त होते.

आगामी झालेले