नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

मंगळवार, २४ मार्च, २०२०

विश्व् क्षयरोग दिवस - 24 मार्च


क्षयरोग : हा रोग प्राचीन काळापासून जगातील अनेक देशांमध्ये अस्तित्वात आहे. भारतीय वैद्यकात त्याचा उल्लेख राजयक्ष्मा किंवा क्षय असा आढळतो. क्षय हा शब्द झीज या अर्थाने वापरला जात असल्यानेव इतर दीर्घकालिक आजारांमध्येही शरीराची झीज होत असल्यानेत्याची व्याप्ती आजच्यापेक्षा अधिक असावी. तरीही फुप्फुसाच्या क्षय-रोगास कफक्षय या नावाने ओळखले जात असावे. ग्रीक वैद्यकातही ॲरिस्टॉटलच्या काळापासून हा रोग एका व्यक्तीपासून दुसऱ्यास होत असल्याचे माहीत होते. इंग्रजीत कन्झम्पशन हा शब्द क्षय या अर्थाने वापरला जातो.क्षय रोग हा एक जिवाणुजन्य आजार आहे. क्षयरोग हा आजकाल बहुधा पूर्ण बरा होणारा आजार आहे. एके काळी हा रोग दुर्धर समजला जाई. सामान्यतः या आजाराला टीबी (ट्युुबरक्युलॉसिस) म्हणून ओळखले जाते. हा आजार 'मायकोबॅक्टेरिया' या प्रकारच्या जिवाणूंमुळे होत असतो. त्यातील मुख्यत्वे 'मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस' या प्रकारामुळे माणसाला क्षयरोग होतो. यात मुख्यतः ७५% रुग्णांमध्ये फुफ्फुसांना बाधा होत असते. काही रुग्णांमध्ये फुफ्फुसेतर अवयवांना ही बाधा होत असते. साधारण ३५ टक्के वा जास्त लोकांच्या शरीरात क्षयरोगाचे जंतू वास्तव्य करून असतात. पण या सर्वानाच क्षय रोग होत नाही कारण हे जंतू निद्रिस्त अवस्थेत असतात. पण शरीरातील प्रतिकारशक्ती कमी झाल्यास हे झोपी गेलेले जंतू जागे होतात. क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसीस नावाच्या जंतूमुळे होणारा अत्यंत संसर्गजन्य असा रोग आहे. इ.स.१८८२ साली डॉ.रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला.त्यांचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत मांडला व त्यास दिनांक २४ मार्च रोजी मान्यता मिळाली.म्हणून दरवर्षी २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.ज्या व्यक्तीला क्षयरोग (टि.बी.) असेल तो माणूस बोलला, थुंकला किंवा शिंकला तरी त्याच्या शरीरातील क्षयाचे जंतू बाहेर पडतात आणि हवेद्वारे जवळ असलेल्या निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात व त्या निरोगी व्यक्तीला क्षय जंतूचा संसर्ग होतो. संसर्ग झालेल्या व्यक्तीची रोग प्रतिकार शक्ती कमी झाल्यास अशा व्यक्तींना क्षयरोगाची लागण होते.एखाद्या व्यक्तीला सतत दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला असणे, वजन कमी होणे, भूक मंदावणे, हलकासा परंतु संध्याकाळी वाढणारा ताप, छातीत दुखणे, रात्री घाम येणे इत्यादी पाठवून देऊन त्याची दोन बेडक्याची तपासणी करून घेणे आवश्यक आहे.फुफ्फुसांशिवाय इतर अवयवांमध्ये क्षयरोग होतो. उदा. हाडे सांध्याचा क्षयरोग,लसिकाग्रंथीचा क्षयरोग, मज्जासंस्थेचा क्षयरोग,आतड्यांचा क्षयरोग इत्यादी. हा रोग पूर्णपणे बरा होण्यासाठी ६ महिने अथवा अधिक काळ उपचार घेणे गरजेचे असून जर उपचार मधेच बंद केले तर क्षयरोग परत उलटण्याची शक्यता असते. रुग्णांचा compliance (औषधांना चिकटून रहाणे) ही गोष्ट क्षयरोगाच्या उपचारांत अतिशय आवश्यक आहे.
आधुनिक पाश्चात्त्य वैद्यक (ॲलोपॅथी)
एकोणिसाव्या शतकात लूई (ल्वी) पाश्चर यांचा सूक्ष्मजंतुवाद रोगनिर्मितीच्या कारणांमध्ये अंतर्भूत होऊ लागला. त्याच सुमारास १८६२ मध्ये ए. जे. विलेमिन या फ्रेंच लष्करी वैद्यांनी कफक्षयामुळे मेलेल्या एका माणसाचे शवविच्छेदन केले. त्यात आढळलेल्या ऊतकाचे (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिका समूहाचे) अंतःक्षेपण (इंजेक्शन) एका सशाला दिल्यानंतर साडेतीन महिन्यांनी त्याच्या फुप्फुसात कफक्षय झाल्याचे विलेमिन यांना आढळले. लवकरच १८८२ मध्ये ⇨ रॉबर्ट (रोबेर्ट) कॉख या जर्मन शास्त्रज्ञांनी क्षयरोगाचे सूक्ष्मजंतू शोधून काढले. त्या शोधामुळे क्षयरोगाचे कारण निश्चित झाले. अनेक वर्षे हा विकार ‘कॉख विकार’ या नावाने ओळखला जात असे.
क्षयरोगाच्या निर्मितीस मायकोबॅक्टिरियम ट्युबरक्युलॉसिस हे सूक्ष्मजंतू कारणीभूत असतात. त्यांचा प्रसार रुग्णाच्या खोकल्यातून बाहेर पडणाऱ्या द्रवाच्या सूक्ष्म थेंबांमुळे होतो. एका शिंकेमध्ये सु. ४०,००० सूक्ष्मथेंब बाहेर पडतात व प्रत्येक सूक्ष्म थेंब क्षयरोग पसरवू शकतो. हवेत पसरलेल्या या थेंबात हे सूक्ष्मजंतू अनेक तास जिवंत राहू शकतात. निरोगी व्यक्तीचा अशा सूक्ष्मजंतूंशी श्वसन मार्गे वारंवार संपर्क आल्यामुळेरोगसंसर्ग होतो. संसर्ग झालेल्या जवळपास ९०% रुग्णांमध्ये लक्षणेदिसत नाहीत. क्षयग्रस्त मातेकडून तिच्या भ्रूणास किंवा जन्म झाल्यानंतर अर्भकास संसर्ग होण्याची शक्यता असते. या सूक्ष्मजंतूंची दुसरी एक प्रजातीमा. बोव्हीस या नावाने ओळखली जाते. तिचा संसर्ग दुभत्या जनावरांकडून पाश्चरीकरण न केलेल्या दुधामुळे माणसास होऊ शकतो.
क्षयरोगाच्या सूक्ष्मजंतूंचा श्वसन मार्गावाटे फुप्फुसांत शिरकाव झाल्यावर शरीराची प्रतिकार यंत्रणा त्यांचा नाश करते परंतु तसे न झाल्यास, म्हणजे प्रतिकार कमी पडल्यास किंवा संसर्ग मोठा असल्यास, संसर्गाच्या ठिकाणी म्हणजे फुप्फुसाच्या एखाद्या भागात श्वेत कोशिका आणि तंतुमय ऊतक यांच्या मदतीने तो बंदिस्त केला जातो. अशा बंदिस्त स्थितीत हे सूक्ष्मजंतू दीर्घ काळ सुप्तावस्थेत राहू शकतात. शरीराची प्रतिकारक्षमता कमी झाल्यास [उदा., उतारवय, रोगप्रतिकारक्षमतान्यूनताजन्य रोग (एड्स), कुपोषण, दीर्घ काळ स्टेरॉइड औषधांचा मोठ्या प्रमाणात वापर] ते परत सक्रिय होतात व आसपासच्या ऊतकांचा नाश करू लागतात किंवा रक्तातून शरीरभर पसरून अनेक ठिकाणी वाढू लागतात.
लक्षणे : फुप्फुसाच्या क्षयरोगात अशक्तपणा, वजन घटणे व खोकला या लक्षणांपासून प्रारंभ होतो. तसेच रात्रीच्या वेळी अतिशय घामयेतो. रोगाची तीव्रता वाढू लागल्यावर प्रामुख्याने सकाळी उठल्यावर खोकल्याबरोबर कफ पडू लागतो. कधीकधी त्यात रक्ताचा अंश आढळू लागतो. बारीक ताप येतो. फुप्फुसावरणाचा शोथ होऊन वक्षपोकळीमध्ये पाणी साठल्यास [→ परिफुप्फुसशोथ] किंवा हवेचा शिरकाव झाल्यास फुप्फुसावर दडपण येऊन धाप लागते. लहान मुलांत नवीनच रोग संसर्ग झाला असल्यास मानेतील लसीका ग्रंथींना सूज येते आणि एक विशिष्ट प्रकारचा आवाज करणारा खोकला येऊ लागतो [→ गंडमाळा].
क्षय रोगाची लक्षणे
कमी होणारे वजन
थकवा
श्वास घॆण्यास त्रास होणॆ
ताप
रात्री येणारा घाम
भूक न लागणे
आजार टाळण्याचे उपाय "
क्षय रोगासाठी बी.सी.जी नावाची लस वापरली जाते.हि लस लहान मुलांना या रोगापासून वाचवते.पण मोठ्यांना लस टोचून घेतल्यावरहि हा रोग होण्याची शक्यता आहे.
क्षय रोगासाठी एक लस उपलब्ध आहे .ती म्हणजे बी. सी.जी. ही लस लहान मुलांना या रोगापासून वाचवते, पण मोठ्या माणसांना मात्र लस टोचल्यावरही हा रोग होऊ शकतो.
क्षय रोग टाळण्यासाठीच्या चांगल्या पद्धती म्हणजे
पौष्टिक आहार घेऊन रोगप्रतिकारकशक्ती वाढवणे.
क्षय रोग तपासण्या करून घेणे
क्षय रोग झाला असेल तर इतरांपासून दूर राहणे
तोंड झाकणे. 

बसंती देवी

बसंती देवी (२३ मार्च, इ.स. १८८० - इ.स. १९७४) भारतात ब्रिटिश काळात एक भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्त्या होत्या. त्या देशबंधू चित्तरंजन दास यांच्या पत्नी होत्या. १९२१ साली दासाना अटक केल्यानंतर व १९२५ साली त्यांच्या मृत्यूनंतर, बसंती देवींनी विविध हालचालीं मधे सक्रिय भाग घेतला तसेच स्वातंत्र्योत्तर सामाजिक कार्य चालू ठेवले. १९७३ मध्ये त्यांना पद्मविभूषण प्रदान केले गेले.
बसंती देवींचा जन्म २३ मार्च १८८० रोजी झाला. त्यांचे वडील बद्रीनाथ हलदर ब्रिटिश राजवटीच्या अंतर्गत आसाम राज्याचे दिवाण (आर्थिक मंत्री) होते. त्यानी लॉरेटो हाऊस, कोलकाता येथे अभ्यास केला व सतरा वयाच्या असताना चित्तरंजन दास यांच्याशी विवाह केला.१८९८ ते १९०१ दरम्यान दामपत्याना तीन मुले झाली.
जन्मतारीख: २३ मार्च, १८८०
जन्मस्थळ: आसाम
मृत्यूची तारीख: ७ मे, १९७४
शिक्षण: लोरेटो हाउस
पती/पत्नी: चित्तरंजन दास
पुरस्कार: पद्म विभूषण (१९७३)
  १९१७ मध्ये चितरंजन दास जेव्हा राजकारणात उतरले तेव्हा बसंती देवीनेही त्यांचे पूर्ण समर्थन केले.गांधीजींनी सुरू केलेल्या 'असहयोग चळवळी'मध्ये ती सामील झाल्या. लोकांमध्ये खादीचा प्रचार केल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली होती आणि फक्त  १९२१ मध्ये त्यांचे पती व मुले अटक केली गेली होती.खादी प्रचाराच्या प्रसिद्धीप्रकरणी लोकांनी बसंती देवीच्या अटकेचा निषेध केला.देशातील अनेक नामांकित बॅरिस्टर्सनीही यास विरोध दर्शविला आणि हे प्रकरण व्हायसरॉयकडे नेले. यानंतर सरकारने त्यांना सोडले.तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही, बसंती देवीने परकीय सत्तेला विरोध केला.तिने देशातील विविध ठिकाणी जाऊन चित्तरंजन दास यांच्या राजकीय दृष्टिकोनाची ओळख लोकांना दिली. १९२२ मध्ये चितरंजन दास, मौलाना अबुल कलाम आझाद, सुभाषचंद्र बोस इ. यांना अटक  करण्यात आली.
 चितरंजन दास हे चटगांव राजकीय परिषदेचे अध्यक्ष होते. परंतु त्यांच्या अटकेनंतर स्वत: बसंती देवी या परिषदेचे अध्यक्ष होते.

आगामी झालेले