नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

शुक्रवार, ५ जून, २०२०

जागतिक पर्यावरण दिन

जागतिक पर्यावरण दिन माहिती व पर्यावरण प्रतिज्ञा 
पर्यावरण माहिती वर आधारित ऑनलाईन चाचणी सोडवा आणि आकर्षक डिजिटल प्रमाणपत्र त्वरित अचूक ई-मेल आयडी वर मिळवा.
👇👇👇👇
👆👆👆👆

🎯 *जागतिक पर्यावरण दिन*
मानवाच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी आवश्यक असलेली सर्व संसाधने निसर्गाने योग्य प्रमाणात उपलब्ध करून दिली आहेत. परंतु या संसाधनांच्या व्यवस्थापनामध्ये आणि वापरामध्ये होणाऱ्या आपल्या अनियंत्रित हस्तक्षेपामुळे आणि कृतींमुळे पृथ्वीवरील सजीव सृष्टीच्या विविधतेची कधीही भरून न येणारी हानी होते आहे. जैवविविधतेचा ऱ्हास हा पर्यावरणासाठी आणि एकंदरीत मानवी आरोग्यासाठी हानीकारक ठरत आहे. अनेक प्राणी आणि वनस्पतींच्या प्रजातींची संख्या, त्यांचा भौगोलिक प्रसार कमी होतो आहे. या पार्श्वभूमीवर आज, ५ जून रोजी संयुक्त राष्ट्रांकडून साजऱ्या केल्या जाणाऱ्या जागतिक पर्यावरण दिनाचे यंदाचे संकल्पसूत्र *‘जैवविविधता’* हेच ठरवण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रांकडून यंदाचे पर्यावरण दिनाचे यजमानपद भूषविण्याचा मान अतिशय विपुल आणि समृद्ध जैवविविधता असलेल्या कोलंबिया (दक्षिण अमेरिकेतील एक राष्ट्र) आणि जर्मनी या देशांना मिळाला आहे. पृथ्वीवरील एकूण जैवविविधतेच्या तब्बल दहा टक्के जैवविविधता कोलंबिया देशात आढळते. पक्ष्यांची आणि ऑर्किड या पुष्पवनस्पती प्रजातींतील विविधता या देशात सर्वाधिक आहे. तसेच इतर वनस्पती, फुलपाखरे, गोडय़ा पाण्यातील मासे, उभयचर प्राणी यांचीही विविधता येथे विपुल आहे.
जगात साधारणपणे १९६०-७० च्या दशकांत ढासळत्या जैविक संसाधनांबद्दल जनमानसात संवेदनशीलता आणि जागरूकता निर्माण व्हायला सुरुवात झाली. १९७२ साली संयुक्त राष्ट्रांच्या वतीने स्वीडनमधील स्टॉकहोम शहरात मानव आणि पर्यावरण यांच्यातील संबंधांचा आढावा घेण्यासाठी ५ ते १६ जून या काळात एका जागतिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. निसर्गातील सर्व घटकांचे आणि पर्यावरणाचे संवर्धन आणि संरक्षण करण्याच्या दृष्टीने सर्व राष्ट्रांच्या सहभागाने एक ठोस कृती आराखडा आखण्यासाठी आयोजित केलेली ही पहिलीच परिषद होती. या ऐतिहासिक घटनेचे स्मरण राहावे म्हणून दरवर्षी ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून पाळण्यात यावा, असा ठराव या परिषदेत करण्यात आला. आता जगभरातील १५० हून अधिक देश हा दिवस साजरा करतात.
गेल्या काही वर्षांत पर्यावरणीय आव्हानांनी अधिकच गंभीर स्वरूप धारण केले आहे. तापमानवाढ, हवामान बदल यांसारख्या समस्या तर सर्वस्पर्शी झाल्या आहेत. या समस्यांची तीव्रता कमी करायची, तर जैवविविधतेच्या संवर्धनाशिवाय पर्याय नाही, याविषयी जगभरात एकमत झाले आहे. याबद्दल धोरणात्मक पावले उचलली जातीलच/ जायला हवीत; त्यासाठी आपणही जागरूक राहिले पाहिजेच; पण या दृष्टीने वैयक्तिक पातळीवर काय करता येईल? तर, घरगुती कचऱ्याचे व्यवस्थापन करणे, परिसरातील जैवविविधतेची, झाडाझुडपांची काळजी घेणे, तसेच प्लास्टिकचा कचरा होणार नाही याची दक्षता घेणे हे आपणास सहज करता येईल.
👉👉पर्यावरण प्रतिज्ञा👈👈
🌴पर्यावरण प्रतिज्ञा🌴
भारत माझा देश आहे.ही भारतभूमी वैविध्यपूर्ण वनसंपदेने समृद्ध आहे.या भारतभूमीत वसलेले हिमालय,जंगले,पर्वत,नद्या तळी,सरोवरे,धरणे,ही आधुनिक भारताची तीर्थस्थाने आहेत.या भारतभूमीतील समृद्ध आणि सुंदर निसर्गाचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे.त्यासाठी मी प्रयत्न करीन.मी एकही झाड तोडणार नाही,या उलट मी माझ्या वाढदिवसाला नवीन झाड लावीन.मी माझ्या घरात छपरावर पडणाऱ्या प्रत्येक थेंब माझ्या अंगणातच जिरवीन.पाणी ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे.मी पाण्याचा जपून आणि काटकसरीने वापर करीन. वीजबचतीसाठी मी कटिबद्ध आहे.आवश्यक नसतांना मी पंखे,लाईट लावणार नाही.मी घरातला कचरा कचराकुंडीतच टाकेन.मी प्लॅस्टिक ची पिशवी न वापरता कागदी किंवा कापडी पिशवी वापरेण.मी माझ्या घरातील टी.व्ही.चा आवाज कमी ठेवीन.मी तंबाखू, गुटखा,जर्दा,धूम्रपान आदी व्यसन करणार नाही,व दुसऱ्याला देखील व्यसन करू देणार नाही.मी माझ्या वागणुकीने जल,वायू,ध्वनी,प्रदूषण होऊ देणार नाही.मी भारताचा जबाबदार नागरिक असल्याने कोरोना या रोगाचा प्रसार होणार नाही याची काळजी घेऊन मास्क,विशिष्ट अंतर ठेवीन.तसेच दररोज योगा,व्यायाम करून मी माझे आरोग्य चांगले ठेवीन.आणि दुसऱ्यांना चांगल्या आरोग्याच्या सवयी विषयी जनजागृती करेन.मी माझ्या पर्यावरणाचे सदैव रक्षण करीन.
जय हिंद,जय भारत.

*जागतिक पर्यावरण दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा*
५ जून आज जागतिक पर्यावरण दिन.....
सगळ्या नैसर्गिक साधन संपत्तीचे रक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. झाडे लावून व पाणी वाचवून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा संकल्प सर्वांनी एकत्र येऊन करूया.
निसर्गासारखा नाही सोयरा, गुरु, सखा, माय बाप.....
त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापताप, मिटतो क्षणात आपोआप.....
*जागतिक पर्यावरण दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा.....!*

आंतरराष्ट्रीय संस्था
पर्यावरण पूरक संशोधन आणि तंत्रज्ञान विकासासाठी जागतिक समुदायामध्ये सहकार्य निर्माण करण्यसाठी राष्ट्रीय कृती योजनांच्या माध्यमातून प्रयत्न करणे. तंत्रज्ञान विकासामध्ये खासगी क्षेत्राचा सहभाग वाढविणे हा या संस्थाचा एक उद्देश असतो. काही महत्त्वाच्या संस्थाचा आढावा घेऊ. •निसर्ग आणि नैसर्गिक संसाधनांची आंतरराष्ट्रीय संवर्धनसंस्था (IUCN)
मुख्यालय - ग्लँड (स्विर्त्झलंड)


स्थापना - १९४८ मध्ये फाऊंटेनब्लू (फ्रान्स ) बैठकमध्ये या संस्थेची स्थापना झाली.
उद्देश - संकटग्रस्त प्रजातींची ‘रेड लिस्ट’ प्रसिद्ध केली जाते. IUCN ही शासकीय आणि बिगर शासकीय संस्थांची निसर्ग संवर्धनासाठी कार्य करणारी एक संघटना आहे. या संस्थेला संयुक्त राष्ट्रसंस्थेत निरीक्षण दर्जा प्राप्त आहे. भारताने दोनदा या अध्यक्षपद भूषवले आहे. १९८४-९० या काळात एम. एस. स्वामीनाथन तर २००८-१२ या काळात अशोक खोसला अध्यक्ष होते.•इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज (IPCC)
मुख्यालय - जिनिव्हा


स्थापना - १९८८मध्ये संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम आणि जागतिक हवामानशास्त्रीय संघटना यांनी केली. ही संघटना केवळ WMO आणि UNEP च सदस्यांसाठी खुली आहे.
उद्देश - हवामानबदल आणि त्यांचे विविध परिणाम या विषायावर संपूर्ण जगाला स्पष्ट आणि शास्त्रीय दृष्टिकोन व माहिती देणारी ही आंतराष्ट्रीय संस्था आहे. ही संस्था स्वतः संशोधन करत नाही. हीने २००७ सालचे शांततेचे नोबेलही मिळवले आहे. •संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP)
मुख्यालय - नैरोबी (केनिया)


स्थापना - १९७२ मध्ये स्टॉकहोम परिषदेत या संस्थेची स्थापना केली.
उद्देश - जागतिक आणि प्रादेशिक पातळीवरील पर्यावरणीय विषयासंदर्भात यूनोची ही अधिकृत संस्था आहे. जागतिक पर्यावरण सुविधांच्या अंमलबजावणी संस्थांपैकी ही एक संस्था आहे. यांनी भारतात सौर ऊर्जा प्रकल्पाना मदत पुरवली आहे. •वर्ल्ड वाइल्डलाइफ फंड (WWF)
मुख्यालय - न्यूयॉर्क


स्थापना - १९६१मध्ये या संस्थेची स्थापना झाली जायंट पांडा हे या संस्थेचे बोधचिन्ह आहे.
उद्देश - जगभरातील विविध पर्यावरण संवर्धन कार्यक्रम ही संस्था पाठबळ देते. पर्यावरणाच्या संवर्धन, संशोधनावर कार्य करणारी ही आंतराष्ट्रीय बिगर सरकारी संस्था आहे.•बर्ड लाइफ इंटरनॅशनल
मुख्यालय - केंब्रिज


स्थापना - १९२२मध्ये या संस्थेची स्थापना झाली.
उद्देश - जगातील निसर्ग संवर्धनासाठी असणारी सर्वांत मोठी भागीदारी असणारी ही संस्था आहे. पक्षी संवर्धनात अग्रेसर असणारी संस्था आहे. प्रजातीचा बचाव आणि अधिवास व प्रदेशांचे संवर्धन यासारखी कामे ही संस्था करते.•हरित हवामान निधी
मुख्यालय - सोंग्डो (दक्षिण कोरिया)


स्थापना - २००९ मध्ये या कोपेन हेगेन येथे झालेल्या कोप-१५ मध्ये स्वीकारण्यात आलेल्या कोपेनहेगेन करारात कोपेनहेगेन हरित हवामान निधीचा उल्लेख सर्वप्रथम करण्यात आला. २०१०मध्ये कॅन्कुन येथील कोप - १६ मध्ये निधीची स्थापना करण्यात आली.

उद्देश - हवामान बदलाशी अनुकूलन आणि उपशमन घडवून आणण्यासाठी विकसनशील राष्ट्रांना मदत व्हावी या हेतूने UNFCCC अंतर्गत या निधीची स्थापना केली. हा निधी विकसनशील सदस्य राष्ट्रांमधील विविध प्रकल्प, कार्यक्रम, धोरणे व इतर कृतींना आर्थिक सहाय्य करतो. जागतिक बँक ही या निधीची तात्पुरती विश्वस्थ म्हणून कार्य करते आहे.



संकलित माहिती

नारायण मल्हार जोशी (ना. म. जोशी)


नारायण मल्हार जोशी (ना. म. जोशी) हे भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक होते. ते मराठी लेखक वामन मल्हार जोशी आणि संस्कृत पंडित महादेव मल्हार जोशी यांचे बंधू होते. ना.म. जोशी यांचे वडील वेदविद्यासंपन्न असून प्रसिद्ध फलज्योतिषी होते. नारायणरावांचे गोरेगाव या जन्मगावीच वेदाध्ययन व प्राथमिक शिक्षण पार पडले.
जन्मतारीख: ५ जून, १८७९
जन्मस्थळ: कुलाबा
मृत्यूची तारीख: ३० मे, १९५५
मृत्यूस्थळ: मुंबई
संस्थेची स्थापना: ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस
वडील भाऊ महादेवराव यांच्या आग्रहावरून ते १८९३ मध्ये इंग्रजी शिक्षणाकरिता पुण्याला गेले. १९०० साली त्यांचा विवाह झाला तथापि त्यांची पत्नी रमाबाई १९२७ साली निधन पावली त्यांच्या दोन मुलींपैकी ज्येष्ठ मुलगीही १९३४ मध्ये मरण पावली. त्यांचे दोन पुत्र सुविद्य व सुस्थितीत आहेत. नारायणरावांचे दोन बंधू महादेवराव व वामनराव हे अनुक्रमे संस्कृत पंडित आणि मराठी लेखक म्हणून पुढे प्रसिद्धीस आले. न्यू इंग्‍लिश स्कूलमधून मॅट्रिक व १९०१ मध्ये डेक्कन कॉलेजातून बी. ए. उत्तीर्ण. पदवी मिळविल्यानंतर जोशींनी सहा महिने अहमदनगर येथे दुष्काळपीडितांसाठी काढलेल्या सरकारी अन्नसत्रात काम केले. १९०१–१० या काळात अहमदनगर व पुणे येथे खाजगी शाळांमधून, तर मुंबई व रत्नागिरी येथील शासकीय विद्यालयांमधून अध्यापन. हा अध्यापनाचा अनुभव जोशींना १९२२–४७ या काळात मुंबईमध्ये प्रौढांसाठी व औद्योगिक कामगारांकरिता प्रशिक्षणवर्ग चालविण्यास फार उपयोगी पडला.
नारायण मल्हार जोशी
समाजसेवेच्या इच्छेने १९०९ मध्ये जोशी ‘भारतसेवक समाज’ या संस्थेचे सदस्य झाले.  संस्थेच्या ज्ञानप्रकाश  या मराठी दैनिकाच्या व्यवस्थापकीय कार्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. १९११ मध्ये ज्ञानप्रकाशाची मुंबई आवृत्ती काढावयाचे ठरल्यामुळे जोशींना मुंबईत राहणे भाग पडले. तेव्हापासून अखेरपर्यंत ते मुंबईतच राहिले. १९११ मध्येच त्यांनी ‘सामाजिक सेवा संघ’ (सोशल सर्व्हिस लीग) ही संस्था स्थापिली. या संस्थेच्या कार्याशी विविध नात्यांनी ते १९५५ पर्यंत निगडीत होते. १९११–१३ या काळात त्यांनी अहमदनगर, गुजरात व तत्कालीन संयुक्त प्रांत येथील दुष्काळपीडीतांसाठी साहाय्यनिधी गोळा केला. हळूहळू जोशींनी आपले सर्व लक्ष कामगार समस्यांवरच केंद्रित केले आणि तत्संबंधीच्या सर्व उपलब्ध साहित्याचा अभ्यास केला. त्यांनी मुंबईतील कामगारवस्त्यांमध्ये अनेक कल्याणकेंद्रे, रात्रशाळा, मोफत वाचनालये, वैद्यकीय केंद्रे, औद्योगिक प्रशिक्षणवर्ग इ. चालविले लंडनमधील टॉयन्बी हॉलच्या धर्तीवर कामगारांसाठी दोन मोठी सभागृहे बांधली. १९१७ साली भारत सरकारतर्फे मेसोपोटेमियाला भेट देणाऱ्या पत्रकार प्रतिनिधीमंडळाचे ते एक सदस्य होते. १९२१ साली त्यांनी कामगार समाचारनामक एक मराठी साप्ताहिक सुरू केले.
 जोशींनी ३१ ऑक्टोबर १९२० साली ‘आखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस’ (आयटक) ही भारतातील पहिली कामगार संघटना स्थापन करण्यास मदत केली १९२९ पर्यंत ते तिचे कार्यवाहही होते. या संघटनेमधील कम्युनिस्ट मतप्रणालीच्या कार्यकर्त्यांनी तिच्यावर आपले वर्चस्व बसविण्याचा प्रयत्न केला, तेव्हा १९२९ साली नागपूर येथील अधिवेशनात आयटकमध्ये फूट पडली आणि जोशींना आयटक सोडावी लागली. त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यानी नंतर ‘इंडियन फेडरेशन ऑफ ट्रेड युनियन्स’ अशी निराळी संघटना काढली. पुढे १९३३ मध्ये ही संघटना ‘नॅशनल फेडरेशन ऑफ लेबर’ ह्या संघटनेत सामावण्यात येऊन नवीन संघटनेचे ‘नॅशनल ट्रेड्‌स युनियन फेडरेशन’ असे नाव ठेवण्यात आले. याशिवाय जोशी अनेक कामगार संघटनांशी निगडीत होते. १९२६ मध्ये त्यांनी ‘टेक्स्टाइल लेबर युनियन’ ही कापडगिरणी कामगारांची संघटना स्थापिली तिचे ते अध्यक्षही होते. ‘नॅशनल सीमेन्स युनियन’ या संघटनेचेही ते बरीच वर्षे अध्यक्ष होते. भारतीय खलाशांच्या कामाच्या स्थितीबाबत जोशींनी मोठी कळकळ व आस्था दाखवून तीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी बरेच प्रयत्न केले. भारत सेवक सामाजामध्ये युद्धविषयक व इतर धोरणांबद्दल मतभेद झाल्यामुळे १९४० मध्ये जोशींनी समाजाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. गव्हर्नर जनरलच्या वटहुकुमांना विरोध करण्याकरिता त्यांनी १९३७–३८ मध्ये ‘मुंबई नागरी स्वातंत्र्य संघटना’ (बाँबे सिव्हिल लिबर्टीज युनियन) स्थापन केली. या संघटनेस पंडित नेहरूंचाही पाठिंबा मिळाला.
वॉशिंग्टन येथे १९१९ मध्ये भरलेल्या आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेच्या पहिल्या परिषदेस उपस्थित राहण्यासाठी भारतीय कामगारवर्गाचे प्रतिनिधी म्हणून जोशींची भारत सरकारने नियुक्ती केली. अशा परिषदांच्या निमित्ताने १९२२–४८ या काळात जोशींनी सोळा वेळा यूरोपीय देशांना भेटी दिल्या व भारतीय कामगारांच्या दुःस्थितीकडे जगाचे लक्ष वेधले. त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय ख्याती लाभली. लंडन येथे १९३०–३२ या कालावधीत भरलेल्या तीन गोलमेज परिषदांवर, तसेच संयुक्त संसदीय समितीवर जोशींना सरकारने नेमले होते. १९२९–३० मध्ये भारतीय कामगारांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी सरकारने नेमलेल्या शाही आयोगाचे जोशी एक सभासद होते. पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखालील भारतीय राष्ट्रीय नियोजन आयोगाच्या (१९३७) ‘कामगार उपसमिती’चे ते अध्यक्ष होते. ‘मुंबई सामाजिक सुधारणासंस्थे’चे सचिव (१९१५–३०), मुंबई महानगरपालिकेचे सदस्य (१९१९–२२) व रेल्वे कामगार महासंघाचे अध्यक्ष (१९२९) अशा विविध पदांवर त्यांनी कार्य केले.

 जोशी १९२१–४७ एवढा प्रदीर्घ काळ दिल्लीच्या मध्यवर्ती विधानसभेचे नामनिर्देशित सदस्य होते. कामगारांच्या हितसंबंधांचे रक्षण आणि संवर्धन करण्याचा या काळात त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. जेष्ठत्वाच्या नात्याने त्यांना ‘विधानसभेचे पिता’ अशी सन्मान्य पदवी मिळाली. अनेक कामगारकल्याणविषयक कायद्यांना मूर्त रूप देण्याचे श्रेय जोशींनाच आहे. कारखाना अधिनियम (१८८१), कामगार हानिपूर्ती अधिनियम (१९२४), भारतीय कामगार संघटना अधिनियम (१९२६), वेतन प्रदान अधिनियम (१९३६), बालकामगार रोजगारी अधिनियम (१९३८) इ. अधिनियमांमध्ये जोशींच्या सतत प्रयत्नांमुळे कामगारानुकूल अशा अनेक दुरुस्त्या करण्यात आल्या. कामगारांच्या हितसंबंधांना बाध येत असेल, तर जोशी हे सरकारलाही विरोध करीत. त्याचप्रमाणे काँग्रेसमधील अथवा कामगार संघटनांमधील हिंसक प्रवृत्ती त्यांना मान्य नव्हत्या. काँग्रेसने ‘शाही कामगार आयोगा’वर बहिष्कार घातला, तेव्हा जोशींनीही काँग्रेसच्या ‘मजूर समिती’ च्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

जोशी १९४८ मध्ये कामगार संघटना क्षेत्रातून निवृत्त झाले. १९५१ मध्ये कराची येथे भरलेल्या पहिल्या ‘आशियाई कामगार संघटना परिषदे’ने कामगार संघटनांचा ज्येष्ठ नेता या नात्याने त्यांना अध्यक्षपद देऊन गौरविले. जोशींनी आपल्या उर्वरीत आयुष्यात अनेक कामगार संघटनांना उपयुक्त सल्ला दिला व मार्गदर्शन केले. त्यांमध्ये मुंबईची ‘ट्रॅन्स्‌पोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियन’ (वाहतूक बंदर कामगार संघटना) हि विशेषेकरून होती. या संघटनेला त्यांनी शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सहकारी कार्यक्रमांचे संवर्धन करण्यात विशेष साहाय्य केले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या संघटनेतर्फे दरवर्षी एक व्याखानसत्र आयोजित केले जाते.
 जोशींना कामगार संघटनांमधील दुफळीबाबत अतिशय खेद वाटत असे. सर्व क्षेत्रांतील कामगारांनी एकत्र येऊन, राजकीय मतमतांतरे बाजूला ठेवून एकच बळकट अशी कामगार संघटना उभारावी असे त्यांचे ठाम मत होते. सहकारतत्त्वांवर त्यांची मोठी श्रद्धा होती. कामगारांमध्ये शिक्षणाचा वेगाने प्रसार व्हावा अशी जोशींची उत्कट इच्छा होती. व्यावसायिक व तांत्रिक शिक्षणाचेही ते कट्टर पुरस्कर्ते होते. कामगार संघटनेची वाढ बाह्य घटकांपेक्षा अंतर्गत घटकांमार्फतच व्हावी, असे त्यांचे आग्रही मत होते.
भारतातील कामगार संघटनांच्या विकासाचे रोपटे प्रथम जोशींनी लावले आणि कामगारांची प्रगती व कल्याण साधणारे अनेक कामगार कायदे संमत करण्यात मोठाच हातभार लावला परंतु समाजकल्याण व सुधारणा या क्षेत्रांतील जोशींची कामगिरी तितकीच मोलाची आहे. त्याकाळातही प्रौढ मताधिकाराचे ते खंदे पुरस्कर्ते होते. फेबियन सोसायटीचे ते सभासद होते. समाजवादी वृत्तीचे असल्यामुळे उद्योगांचे राष्ट्रीयीकरण व्हावे ह्या मताचे ते होते. खाजगी व्यक्तींच्या मक्तेदारीपेक्षा त्यांना शासनाची मक्तेदारी अधिक मान्य होती. जोशींनी अनेक संपांत प्रत्यक्ष भाग घेतला असला, तरी कामगारांनी संपावर जावे असे प्रोत्साहन वा सल्ला त्यांनी कामगारांना केव्हाही दिला नाही. कामगारांचा संपाचा हक्क कायदेशीर रीत्या रोखणे यास त्यांचा विरोध होता. आपल्या मागण्यांच्या पुर्ततेकरिता संप हेच कामगारांच्या हातातील एकमेव हत्यार आहे, असे जोशी मानत.
जोशी हे मूलतः उदारमतवादी परंपरेतील होते. गोपाळ गणेश आगरकर, न्यायमूर्ती रानडे व गोपाळ कृष्ण गोखले यांच्या विचारसरणीचा त्यांच्या मनावर अधिक प्रभाव होता. नामदार गोखल्यांच्या सहवासामुळे त्यांचे बहुमोल मार्गदर्शन जोशींना लाभले. जात, धर्म, जन्म किंवा मालमत्ता यांवर अधिष्ठित अशा हक्कांना व भेदभावांना जोशींचा विरोध होता. आर्थिक व सामजिक समानता आणि व्यक्तिस्वातंत्र्य यांवरील प्रतिस्थापित समाजरचना हे त्यांचे स्वप्‍न व ध्येय होते. हे ध्येय लोकशाहीवादी मार्गांनी प्राप्त करण्यावर त्यांचा अटळ विश्वास होता.
जोशी हे सडेतोड वक्ते व लेखक होते. त्यांनी मध्यवर्ती विधानसभेत केलेली अनेक भाषणे गाजलेली आहेत. त्यांना निकोप शरीरयष्टी लाभली होती. १९५२ साली मुंबई येथे जोशींनी कामगारक्षेत्रात, तसेच सामाजिक क्षेत्रात केलेल्या अखंड कार्याप्रीत्यर्थ त्यांच्या जन्मदिनी (५ जून) त्या वेळचे भारत सरकारचे मजूरमंत्री व्ही. व्ही. गिरी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. मुंबई येथे त्यांचे हृदयविकाराने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कामगारवस्तीमधील ‘डिलाइल रोड’ चे ‘ना. म. जोशी मार्ग’ असे नामंतरण करण्यात आले.
संकलित माहिती 

आगामी झालेले