नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

बोधकथा भाग - 1 (1 ते 100)


1) 👑🎤
*बोधकथा - निर्णय क्षमता*
     अर्थशास्त्रात एक कथा सांगितली जाते. बुर्बेन्स नावाच्या गृहस्थांचे एक गाढव होते. त्यांचे एक भले मोठे शेत होते. दोन्ही बाजुंना भरपूर गवत असणारी एक पायवाट त्या शेतातून बाहेर पडत होती. सारे कसे सुखात चालले होते. एकदा हा बुर्बेन्स काही कामानिमित्त महिनाभर परगावी जाणार होता. त्याने विचार केला की, गाढवाच्या खाण्याची व्यवस्था करण्याची गरज काय? गड्याने जरी त्याच्याकडे दुर्लक्ष केले तरी ते गाढव रस्त्याच्या दुतर्फा असणारे हिरवेगार गवत खाऊन सहज जगेल. बुर्बेन्स गावी गेला. महिनाभरानंतर परतला. पाहतो तर काय? गाढव मरून पडलेले होते. असे कसे झाले? याचा विचार त्याच्या मनात सुरू झाला. एवढे गवत असताना ते गाढव उपाशीपोटी का राहिला असावे? त्याला कळेना. झाले होते असे, की गाढवाचा निश्चय होत नव्हता, की कोणत्या बाजूचे गवत प्रथम खावे? या बाजूचे की त्या बाजूचे? असे करता करता गाढवाने कुठलेच गवत खाल्ले नाही आणि त्याचा भूकबळी पडला!
      *तात्पर्य :* निर्णय क्षमतेअभावी नुकसान ठरलेले असते.
2) 👑🎤*बोधकथा- विचार !*
     माणसाच्या अंगी नम्रता असावी. तसेच शब्दांचा जपून वापर करण्याचे तारतम्यही असावे. या साऱ्यांचा संगम ज्याच्या ठिकाणी असतो, त्याच्याच हातून मोठे कार्य घडते. ग्रामोफोनचा शोध लावणाऱ्या थॉमस अल्वा एडिसन या महान शास्त्रज्ञाच्या जीवनातील हा प्रसंग. त्याने ग्रामोफोनचा शोध लावला. यंत्राच्या मुखातून प्रथम शब्द बाहेर पडला. त्या काळाच्या दृष्टीने तो एक अदभूत  चमत्कारच होता. एका समारंभात कोणीतरी त्यांची ओळख करून देताना म्हटले, "हे थॉमस अल्वा एडिसन. त्यांनी बोलणारे यंत्र शोधून काढले." त्यावर एडिसनने नम्रपणे सांगितले की, "शब्द बोलणारे यंत्र परमेश्वराने शोधून काढले आहे. मी जे यंत्र शोधून काढलंय ते बोललेले शब्द थांबविण्याचं यंत्र आहे." अनेक शोध लावलेल्या त्या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञाने वरील उद् गार काढले. कारण, त्याला शब्दांचे सामर्थ्य माहिती होते. ते जपून वापरले पाहिजेत. हे त्याला कळत होते आणि नम्रता तर त्याच्या नसानसांत होती.
     *तात्पर्य :* बोलून विचार करण्यापेक्षा विचारांती नम्रपणे बोलावे.
3) 👑🎤*बोधकथा- अतिथी धर्म*
     शिवराज एका चोराचा पाठलाग करत होता. गावाच्या बोलबोळांतून पळणारा चोर अखेर शिवराजच्या नजरे आड झाला. तो चोर एका घरात घुसला होता. त्या घरातील माणसाने त्या गावच्या रिवाजाप्रमाणे अतिथी धर्म पाळला. त्या घरात घुसलेल्या चोराला आतल्या खोलीत लपविले. इतक्यात पाठलाग करणारा शिवराज तिथे आला. त्याने पळणाऱ्या व्यतीचे म्हणजे चोराचे  वर्णन करून 'असा मनुष्य इथे आला होता का? त्याला आपण पाहिलेत का' असे विचारले. गावच्या रिवाजाप्रमाणे अतिथी धर्म पाळण्याकरिता तो कुटुंबप्रमुख खोटे बोलला व असा माणूस पाहिला नसल्याचे सांगितले. पण, त्या गृहस्थाच्या मुलाने मात्र शिवराजकडे पाहून आतल्या खोलीकडे खून केली. शिवराज काय ते समजला आणि त्याने आतल्या खोलीत घुसून त्या चोराला पकडले व तो त्या चोराला घेऊन गेला. त्या गृहस्थाला मुलाचा राग आला. कारण, त्याच्या मुलाने गावच्या रिवाजाप्रमाणे अतिथी धर्म पाळला नव्हता. त्या कथेपुरते त्या मुलाचे म्हणजे बरोबर होते.
 *तात्पर्य :* सत्याचा अर्थ, महत्व परिस्थितीनुसार बदलत असते.
4) 👑🎤*बोधकथा- व्यंग*
     चेष्टा कसलीही करावी. पण, ती केवळ गंमत किंवा मस्करी म्हणूनच. एखाद्याच्या व्यंगावर चेष्टा करणे अथवा त्या व्यंगाचा उल्लेख करून चारचौघांत त्याचा अपमान करणे हे गैरच. ते सभ्यतेचे लक्षण नव्हे, पण एखाद्याने असे केलेच तर ती चेष्टा आपल्यावर उलटूही शकते, याचे भान ठेवावे. आपला पांडुरंग एकदा रस्त्यावरून ऐटीत चालला होता, तेवढ्यात समोरून किरण येताना दिसली. ती थोडीशी तिरळी होती. पांडुरंगचा स्वभाव मुळातच खवचट, त्यात तिरळे बघणारी किरण समोरून आलेली. पांडुरंग म्हणाला, "काय किरण! कसं काय ठीक आहे ना? कुठं चाललीस? आणि तुला म्हणे एका वस्तूच्या दोन वस्तू दिसतात. खरं का?" किरणच्या लक्षात आले की, हा आपली चेष्टा करतोय, आपणाला हिणवतोय. म्हणून ती म्हणाली, "खरं आहे हे ! आता हेच बघ ना, तुला दोन पाय आहेत ना? पण मला तुला चार पाय असल्याचं दिसत आहे !"
     *तात्पर्य :* दुसऱ्याच्या व्यंगाला हसू नये. त्याचा उपहास करू नये.
5) 🎤👑*बोधकथा- मोठेपण*
     मॅक्समुल्लर हा जगप्रसिद्ध विद्वान, तत्त्ववेत्ता म्हणून ओळखला जातो. त्यांच्या आयुष्यातील ही कथा. मॅक्समुल्लर ज्या महाविद्यालयात शिकले, त्याच महाविद्यालयात पुढे त्यांची प्राचार्य म्हणून नियुक्ती झाली. आपण ज्या ठिकाणी महाविद्यालयीन शिक्षण घेतले तेथेच अध्यापनाचे पवित्र कार्य करायला मिळणार याचा साहजिकच त्यांना खूप आनंद झाला होता. त्या आनंदाच्या भरातच त्या दिवशी ते आपले पद स्वीकारायला गेले. ते महाविद्यालयात आले आणि ज्या खुर्चीसमोर येऊन उभे राहिले. क्षणभर त्या खुर्चीकडे पाहिले आणि शिपायांकडून दुसरी खुर्ची मागवून त्या  खुर्चीशेजारी ठेवली व त्या दुसऱ्या खर्चीवर ते विराजमान झाले. त्यांनी विचार केला की, 'या खुर्चीवर आपले प्राचार्य बसत होते. अद्याप आपण तितके मोठे झालो नाही. अजून आपणाला खूप शिकायचे आहे.
     *तात्पर्य :* कितीही मोठे झालात तरी तुमचे पाय जमिनीवर असू द्या. त्यामुळे तुमची विद्वत्ता, यश अधिक खुलते.
6) 👑🎤*बोधकथा - भांडण*!
     भांडणासाठी भांडण आणि टिकेसाठी टीका हा अहंकारी लोकांचा स्वभाव असतो. प्रताप आणि सुमन या जोडप्याला अशीच भांडणाची सवय होती. एकदा असेच त्यांचे कडाक्याचे भांडण जुंपले होते. हे पाहून शेजारीच राहणारे वसंतराव ते भांडण सोडविण्यासाठी गेले. ते म्हणाले, "प्रताप, का भांडता आहात? मी काही मदत करू शकतो का भांडण सोडविण्यास?" या भांडखोर जोडप्यातील पत्नी-सुमन खूपच कजाग होती. ती तावातावाने वसंतरावांशीच भांडायला उठली. म्हणाली, "का हो? आम्ही का भांडतो ते समजून घेऊन तुम्हाला काय करायचं आहे? आणि आम्ही केव्हापासून भांडतो आहोत, कशासाठी भांडतो आहोत, हे कसं लक्षात राहणार? खूप वेळ झाला भांडण सुरू होऊन. मोठे आलेत विचारायला..."
     *तात्पर्य :* हेतू नसलेले कोणतेच कार्य यशस्वी होत नाही. जसे विनाकारण... हेतू नसलेले भांडण!
7) 👑🎤*बोधकथा- स्वभाव आणि छंद*
     ' समानशीले व्यसनेषु सख्यम् ' हे सुभाषित आपण वारंवार ऐकतो आणि त्याचे प्रत्यंतर समाजात वावरताना आपणाला येते. याच सुभाषिताचा दाखला देणारी ही कथा. एका साध्या संवादातून हा बोध आपणाला मिळेल. एकदा प्रचंड महापुरात नदीच्या पात्रातून दोन भांडी वाहत होती. त्यापैकी एक होते पितळेचे, तर दुसरे होते मातीचे. त्या पुरातुन वाहत जातानाच त्यांच्यात संवाद चालला होता. पितळीचे भांडे मातीच्या भांड्याला म्हणत होते, "अरे, इतका दुरून का चालला आहेस? ये ना माझ्याजवळ. दोघेजण हातात हात घालून जाऊ. कशी मजा येईल बघ तरी. मला डोळे भरून पाहता येईल आणि या प्रचंड वेग असलेल्या पाण्यापासून तुझं संरक्षणही करता येईल." मातीच्या भांड्याने पितळेच्या भांड्याचे आभार मानून म्हटले, "कृपा करून कोणत्याही स्थितीत तू माझ्याजवळ येऊ नकोस. तुझीच मला सर्वात जास्त भीती आहे. तुझा थोडासा जरी धक्का मला लागला, तरी माझ्या ठिकऱ्या उडतील. तुझा माझा देहभाव भिन्न आहे."
     *तात्पर्य :* भिन्न स्वभावाचे, छंदाचे लोक एकत्र कसे येणार ?
8) 👑🎤*बोधकथा- एकोपा*
     एक तळ्यात एक दोन तोंडाचा पक्षी राहत होता. एकदा त्याच्या तोंडाला रामफळासारखे गोड फळ मिळाले. तेव्हा दुसऱ्या तोंडाला त्याचा हेवा वाटला. त्याने पहिल्या तोंडाकडे अर्धे फळ मागितले. तेव्हा पाहिले तोंड त्याला म्हणाले, "तू खाल्लेस काय आणि मी खाल्ले काय... शेवटी पोट तर एकच! तेव्हा अर्ध फळ मी आपल्या बायकोला देतो." हे  ऐकून दुसऱ्या तोंडाला वाईट वाटले. त्या दिवसापासून ते निराश दिसे.
     एके दिवशी एक विषारी फळ दुसऱ्या तोंडाला मिळाले. ते पाहून पहिल्या तोंडाने ते न खाण्याचा सल्ला दिला. पण, मागच्या वेळच्या रागामुळे दुसऱ्या तोंडाने त्याचा सल्ला ऐकला नाही. त्याने ते फळ खाल्ले आणि अखेर व्हायचे तेच झाले. तो दोन तोंडी पक्षी मरण पावला.
     *तात्पर्य :* एकोप्याने राहण्यातच गोडी असते. त्यात बेबनाव होऊ देऊ नये.
9) 👑🎤*बोधकथा- बुद्धी*
     रामकृष्ण परामहंसांना एका योग्याने म्हटले, "महाराजा, मी पाण्यावरून चालण्याचा चमत्कार करू शकतो. समोरच्या नदीवरून चालत पलीकडे जाऊ शकतो."
     "हो का?"
     "हो तर. पण त्यासाठी मला चौदा वर्षे तप, साधना करावी लागली," योगी म्हणाला.
     त्याच्या या म्हणण्यावर रामकृष्ण म्हणाले, "हा चमत्कार तर आठ आण्यांत होऊ शकतो."
     "कोण करतो?" योग्याने विचारले."
     "आपल्या या नदीवर नाव चालविणारा नावाडी आहे. तो आठ  आण्यांत कोणालाही पाण्यावरून पोहोचवितो." रामकृष्ण उत्तरले.
 *तात्पर्य*: चमत्कारापेक्षा तारतम्य बुद्धी महत्वाची.
10)  👑🎤 *बोधकथा - असत्य !*
     एका प्रख्यात वकिलाकडे एक गरीब शेतकरी गेला. त्याची केस साधीच होती. त्यातून सुटायचे होते. पण साक्षी-पुरावे, उलट-तपासणीत त्याला बोलता आले नसते. गरीब, अशिक्षित शेतकरी होता तो. वकिलाने यावर तोडगा काढला. तो शेतकऱ्याला म्हणाला, "दादा ! घाबरू नका. मी सांगेन तसं करा. मी सोडवतो तुम्हाला यातून." शेतकरी खुश झाला. त्याला वकिलाने सांगितले की, 'कोणत्याही प्रश्नाला उत्तर देऊ नका. त्याऐवजी फक्त बें _S_ बे __S_ असं ओरडा.' साक्षीच्या वेळी शेतकऱ्याने तसे केले. तेव्हा वकील म्हणाला, "हा शेतकरी अशिक्षित आहे आणि थोडा वेडाही आहे." अशा प्रकारे युक्तिवाद करून त्याने ती केस जिंकली. शेतकरी खुश होऊन घरी घरी जाऊ लागला. तेव्हा वकील म्हणाला, "दादा ! तुमची केस जिंकली. नुकसंभारपाईसुद्धा मिळाली. आता माझी फी द्या." शेतकऱ्याने वकिलांकडे रोखून पाहत उत्तर दिले. "बें _S_ बें" वकिलाच्या खोटेपणाचा उपाय त्याच्यावरच उलटला.
     *तात्पर्य :*  असत्य असे माणसावर या ना त्या  रूपाने उलटले. म्हणून सत्याने वागावे.
11) 👑🎤 *बोधकथा - चांगुलपणा*
       एकदा एका गावात गुरुनानक गेले.   त्या गावातील लोकांनी त्यांना धक्के मारून हाकलून दिले. तरीही नानकजी म्हणाले, "आपल्या गावातील एकता कायम टिकून राहो." पुढच्या गावात नानक गेले. त्या गावातील प्रत्येक व्यक्तीने त्यांची प्रेमाने विचारपूस केली. त्यांचा मुक्काम असेतोवर त्यांची प्रेमाने देखभाल केली. आदरसत्कार केला. त्या गावात नाकजींनी एक पर्वचनही केले. प्रवचनाच्या शेवटी गुरुनानक म्हणाले, "तुमच्या गावाचा नाश होवो. तुमचं वाटोळं होवो. तुमच्यात भांडणं होवोत आणि तुमची फुटाफूट होवो." हे ऐकल्यावर त्यांचे शिष्य म्हणाले, "हा काय आशीर्वाद दिलात?" नानक म्हणाले, "पहिले लोक आणि दुसरे लोक यांतला फरक ध्यानी घ्या. या दुसऱ्या गावातला प्रत्येक माणूस सज्जन आहे. या साऱ्यांचं एकाच गावात काय काम? फुटाफूट झाली, तर हे लोक गावोगाव जातील. त्यामुळे ती सारी गावे सुधारतील. पहिल्या गावातील लोक त्याच गावात जेवढा काळ एकत्र राहतील, ते बरंच आहे ! गटारं एकाच ठिकाणी साठली तरी बरी. गंगा मात्र सगळीकडे पसरायला हवी."
   *तात्पर्य :* चांगल्याचा विस्तार हेच जग सुखी करण्याचे रहस्य.
12) 👑🎤*बोधकथा-  कर्तृत्वाचा गर्व*
     आपल्या शिवराजने एकदा सहदेव महाराजांना घरी आणले. शेतावरच्या बंगलीत त्यांची व्यवस्था केली. महाराजांची पूजाअर्चा, ध्यान-धारणा सारे कसे ठीक चालत होते. एके दिवशी सकाळी शिवराज सहदेव महाराजांसह शेताच्या बांधावरून फिरत होता. त्यांना आपली स्वकष्टार्जित शेती दाखवत होता. एवढा सारा व्याप मी एकट्यानेच कसा उभा केला, आता किती कौशल्याने हा सारा व्याप मी सांभाळतो, हे काहीशा गर्वाने महाराजांना दाखवत होता. तेव्हा महाराज म्हणाले, "गड्या, तुझा एवढा व्याप माझ्याने पाहणे शक्य नाही. ही सारी मालमत्ता मला नकाशावर दाखव ना." शिवराजने ते मान्य केले. घरी आल्यावर त्याने नकाशा काढून, त्यावर मापे टाकून सारी शेतवाडी दाखविली. सहदेव महाराजांनी हाती एक सुई धरीत म्हटले, "शिवराज, या विश्वाचा जो अफाट पसारा आहे, त्यात आपली पृथ्वी ह्या सुईच्या टोकाएवढी, त्यात आपला देश, त्यात राज्य, मग जिल्हा-तालुका आणि अखेर तुझं हे गाव. आता या गावातील तुझी शेतीवाडी दाखव बरं." ते बोलणे ऐकून शिवराज खजील झाला. क्षणार्धात त्याचा गर्व ओसरला.
     *तात्पर्य :* कर्तृत्वाचा गर्व बाळगला तर विनाश ठरलेलाच. नम्रता  बाळगली, तर उन्नती निश्चितच !
13) 👑🎤*बोधकथा- मातृभाषा आणि संस्कार*
     मातृभाषेतूनच शिक्षण द्या. अखेरपर्यंत टिकतील, असे अनेक विचारवंतांनी सांगितले तरी आपल्या अहंकारापायी आपण आपल्या मुलांना प्रभाषेतूनच शिक्षण देतो. नाना फडणवीस यांच्याकडे एक बहुभाषिक गेला. म्हणाला, "मला सोळा भाषा उत्तम येतात. माझी मातृभाषा कोणती हे आपण ओळखून दाखवाल काय?" नाना फडणवीस म्हणाले, "अवश्य ओळखेन. पण आता दरबाराच्या कामामुळे मला अजिबात वेळ नाही. उद्या सांगतो. मी तुमचं आव्हान स्वीकारलं आहे." रात्री नानांनी त्याला भरपूर जेवायला घातलं. तो मनुष्य गाढ झोपी गेला. मध्यरात्री नाना याच्याजवळ गेले, घडाभर पाणी घेऊन त्याच्या तोंडावर मारले. तेव्हा तो मनुष्य कानडीत ओरडत उठला, "अहो, हे काय करता?" नाना फडणवीस त्याला म्हणाले, "आपली मातृभाषा कानडी." तो प्रवासी अचंबित झाला.
     *तात्पर्य -* मातृभाषा आणि तिचे संस्कार आपणाला अखेरपर्यंत सोबत करतात.
14) 👑🎤*बोधकथा- वृथा अभिमान नको*
     एक म्हातारीला वाटे आपला कोंबडा आरावतो म्हणून या गावात सूर्य उगवतो. हे सारे ती गावभर सांगत फिरायची. लोक तिला वेडी म्हातारी म्हणायचे. गाव जेव्हा जास्तच त्रास द्यायला लागले तेव्हा ते गाव सोडायचा निश्चय त्या म्हातारीने केला. जाताना तिने आपला कोंबडा बरोबर घेतला आणि ती दुसऱ्या गावी निघून गेली जाताना म्हणाली "आता बसा रडत ! या गावात सूर्याच उगवणार नाही. मग रडाल. पश्चाताप कराल. मला शोधत फिराल. ती दुसऱ्या गावी गेली. दुसरा दिवस उजाडला, तिचा कोंबडा आरवला. त्या गावात सूर्य उगवला होता. तो सूर्य पाहून ती म्हातारी म्हणाली 'हा इथं सूर्य उगवलाय. आता माझ्या पूर्वीच्या गावात कुठला सूर्य उगवणार? सारे बसले असतील रडत. मला छळताय काय? भोगा म्हणावं आता केल्या कर्माची फळं! आणि ती हसू लागली. आपल्या पूर्वीच्या गावाची आपण कशी जीरवली याचा तिला गर्व वाटू लागला. पण तिला माहीत नव्हते त्याही गावात आज सूर्य उगवला होता. 
     *तात्पर्य :* आपल्यामुळेच जग चालते, असा वृथा अभिमान बाळगू नये.
15) 👑🎤*बोधकथा- मन*
     आचार्य विनोबांनी 'देव कसा आहे?' याचे फार सुंदर वर्णन केले आहे. ते म्हणतात, 'देव हा प्रतिष्ठित पाहुण्यासारखा आहे. एखादा पाहुणा दारात उभा राहतो. दारावर टकटक करतो. पण यजमानाने दार उघडून 'आत या' म्हटल्याशिवाय घरात शिरत नाही. तसेच देव सर्वत्र आहे. केवळ तुमच्याच दारी आहे, असे नव्हे. जशी सूर्याची किरणे सर्वत्र आहेत. केवळ तुमच्याच दारी आहे, असे नव्हे. जशी सूर्याची किरणे सर्वत्र पसरलेली असतात. पण बंद दारातून आत येऊ शकत नाहीत. मात्र दाराला किंचितही का होईना फट असेल, दार थोडे किलकिले केले असेल तरी प्रकाशाचे दूत त्यातून घरात प्रवेश करतात. तसेच निष्ठापूर्वक संकल्प करून प्रार्थना करणे म्हणजे मनाचे दार किलकिले करणेच आहे. त्या सर्वशक्तीला आव्हान करून बोलवण्यासारखेच आहे. देव, गुरु, प्रेरणादायी स्फूर्तीस्थान ह्यांत एवढी शक्ती असतेच आणि इतरांना ती शक्ती देण्याचा संकल्प असतोच. पण देव अनाहूत पाहुण्यासारखा दारी उभा असतोच. असे स्वरूप विशद करून विनोबांनी प्रार्थनेचे महत्व विशद केले आहे.
*तात्पर्य :* सृष्टीतील दिव्या शक्तीसाठी मनाची कवाडे खुली ठेवल्याखेरीज ईश्वरी स्पर्धांचा अनुभव घेणे कठीण आहे.
16) 👑🎤*बोधकथा- देखावा !* 
     'लबाड बांधतो इमले माड्या, गुणवंताला मात्र झोपडी' या ग. दि. माडगूळकरांच्या गीताचा अनुभव आपणाला पदोपदी येत असतो. गुणवत्ता असणाऱ्यांना किंमत नाही आणि अर्धवट ज्ञानी व्यक्ती मोक्याच्या जागेवर, हा आजचा सार्वत्रिक अनुभव ! एक नकलाकार एका गावात प्रयोगासाठी आला होता. त्याच्या कार्यक्रमाची खूपच जाहिरात झाल्याने गर्दीही बऱ्यापैकी होती. अनेक नेत्यांचे, प्राण्यांचे त्याने हुबेहूब आवाज काढले. प्रेक्षक खूष झाले. त्यांनी त्याला डुकराचा आवाज काढण्यास सांगितले. त्याने तो काढलाही. पण त्या गर्दीतील एक गृहस्थ म्हणाला, "ही नक्कल बरोबर साधली नाही." तेव्हा नकलाकाराने त्याला स्टेजवर येऊन डुकराचा आवाज काढून दाखविण्यास सांगितले. त्या गृहस्थाने ते आव्हान स्वीकारले. तो आपल्या पोत्यासह स्टेजवर गेला. त्याने पोत्यात डोके घातले आणि साऱ्या प्रेक्षकांना डुकराचा आवाज आला. पण लोकांनी त्याची कुचेष्टा सुरू केली. तेव्हा त्याने पोत्यातून डुकराचे पिल्लू बाहेर काढले व तो म्हणाला, "या खऱ्या डुकराचा आवाज तुम्हाला पटला नाही आणि याने खोटा आवाज काढला तर त्याचं तुम्हाला कौतुक !" 
     *तात्पर्य :* आपणही आज असेच गुवत्तेपेक्षा, दर्जापेक्षा देखाव्याला भुलतो.
17) 👑🎤*बोधकथा- बढाईखोर माणूस
एक माणूस फार वर्षे प्रवास करून आपल्या घरी आला व आपण परदेशात असताना काय मौजा पाहिल्या हे त्याने आपल्या शेजार्‍यापाजार्‍यांना तिखट मीठ लावून सांगितले. आणि अगदी शेवटी एक थाप ठोकून दिली की, ‘मी अलकावतीला गेलो असता तेथील लोक पंधरा पंधरा हात उंच उड्या मारतात पण त्यांनी माझ्याशी पैज लावली असता माझ्याइतकी उंच उडी एकालाही मारता आली नाही.’ ऐकणार्‍या कोणालाही ही गोष्ट खरी वाटली नाही. तेव्हा त्यांची खात्री करण्यासाठी तो नाना प्रकारच्या शपथा घेऊन लागला. त्या वेळी त्या लोकातील एक माणूस त्याला म्हणाला, ‘अहो, अशा शपथा कशाला घेता. हातच्या कंकणाला आरसा कशाला ? या वेळी तुम्ही अलकावतीला आहात असं समजून तिथे जशी उडी मारली तशी इथंही मारून दाखवा म्हणजे झालं.’ हे ऐकताच त्या बढाईखोर माणसाचे तोंड ताबडतोब बंद झाले.
तात्पर्य – आपण प्रवासात पाहिलेल्या गोष्टी फुगवून सांगण्याची काही लोकांना सवय असते, पण एखादेवेळी त्यांचेच बोलणे त्यांच्या गळ्यात येऊन त्यांची फजिती झाल्याशिवाय राहात नाही.
18) 👑🎤*बोधकथा- वेळेचे महत्त्व
एक स्वार आपल्या घोड्याला खरारा करून त्याच्यावर खोगीर घालत असता घोड्याच्या एका पायाच्या नालाचा एक खिळा सुटून पडला आहे असे त्याला दिसले. पण तेथे दुसरा खिळा बसविण्याचे काम त्याने मागे टाकले. काही वेळाने लढाईवर जाण्याचे इशारे देण्याचे शिंग वाजू लागताच तो स्वार आपल्या घोड्यावर बसून लढाईच्या जागेकडे निघाला. त्या फौजेच्या सेनापतीने हुकूम सोडला की, ‘सर्वांनी आपले घोडे भरधाव सोडून शत्रूंवर तुटून पडावे व त्यांचा पाठलाग करावा.’ हुकमाप्रमाणे तो स्वार आपला घोडा उडवीत चालला असता खिळा पडल्यामुळे सैल झालेला घोड्याचा नाल गळून पडला व त्यामुळे घोडा लंगडत लंगडत चालू लागला. लंगडताना एका दगडावर त्याचा पाय आपटल्यामुळे स्वार घोड्यावरून खाली पडला व तो शत्रूच्या हाती सापडताच शत्रूने लगेचच त्याला मारले.
तात्पर्य– जेव्हाचं काम तेव्हा न करता ते आळसाने पुढे ढकलणे ही सवय वाईट व घातक आहे.
19) 👑🎤*बोधकथा : कुणाला कमी समजू नये
प्रयाग (गया) येथे एक खूप चांगले पंडित राहत होते. एकदा नेपाळचे राजे सामान्य वेशात पंडितांमागे फिरू लागले, माझ्या आजोबांचे पिंडदान करून द्या, माझ्याजवळ काहीच पैसे नाहीत. थोडेसे लाडू भरून आणलेत तेच दक्षिणा म्हणून स्वीकार करून घ्या. जे लोभी पंडित होते त्यांना पैशाची हाव होती त्यांनी या सामान्य वेशातील राजांना नकार दिला. अशा वेळेस राजांना तेथील एक पंडित गाठ पडला. त्याला महाराजांनी पिंडदान करण्याची विनंती केली. त्याने ती कबूल केली. तो म्हणाला, भाऊ! पैशाची काही बाब नाही. मी पिंडदान करून देतो. 
त्या पंडिताने फाटक्या तुटक्या कपडय़ात आलेल्या राजांचे पिंडदान पूर्ण करून दिले. यावर महाराज खूश झाले. त्या वेळेस ते त्याला म्हणाले, पंडितजी! या कार्यानंतर काही न काही दक्षिणा मी तुम्हास देणे लागतो. मी घरून काही लाडू आणले आहेत त्याचा तुम्ही स्वीकार करावा. मात्र या लाडूचे गाठोडे तुम्ही घरी जाऊन उघडावे. पंडित म्हणाले, बरं भाऊ, तुम्ही गरीब दिसता पण तुम्ही प्रेमाने दिलेल्या लाडूचा मी स्वीकार करतो. या नंतर पंडितास ते गाठोडे देऊन राजे निघून गेले. पंडिताने घरी जाऊन जेवायला बसायची तयारी केली. अचानक त्याला लाडूची आठवण झाली त्यावर त्याने ते गाठोडे सोडून पाहिले असता तो चकित झाला. कारण त्या गाठोडय़ात वीस सोन्याचे लाडू होते. 
तात्पर्य-कधीही कुणाला कमी समजू नये कारण कोणत्या रुपात कोण असेल याचा भरवसा नाही*बोधकथा - वृथा अभिमान नको.
   20) 👑🎤*बोधकथा-  जे असेल  त्यात समाधानी असावे
एकदा एक भुंगा गुंजारव करत फिरत होता. तेव्हा त्याला एक चिमणी म्हणाली, 'मूर्खा, तू जो एकसारखा एकच आवाज काढत बसतो तो कशासाठी? वसंतऋतूत गाणारी कोकिळा, हिरव्यागार झाडाच्या फांदीवर बसून गाणारा बुलबुल यांची बरोबरी तुला कधीतरी करता येईल का? 
तसे जमत नाही तर भिकार सूर एकसारखा काढून तू लोकांना कंटाळा का आणतोस?' भुंगा म्हणाला, 'अगं चिमणे, परमेश्‍वराने या जगात प्रत्येक व्यक्तीत निराळेपणा ठेवला आहे. वैचित्र्य असणे हा जगाचा नियम आहे, दुसर्‍याचा हेवा न करता ज्याने त्याने आपापल्या शक्तीचा उपयोग केला तर त्यात वाईट काय? जेव्हा कोकिळेचे गाणे बंद पडते किंवा बुलबुल मुका होतो तेव्हा एखाद्या सुंदर बागेत निर्जनता भासू न देण्यात माझ्या गरीबाचा उपयोग होतो.'
तात्पर्य:- सर्व मनासारखे होत नाही, तर जे असेल त्यात समाधानी असावे.
21) 👑🎤*बोधकथा- संत आणि राजा
एक दानशूर राजा होता. राजाची ख्याती ऐकून एक संत त्याच्या दरबारात आला. तो राजाला भेटायला राजमहालात गेला आणि याचकांच्या रांगेत बसला. राजाने दान देण्यासाठी दोन सेवक ठेवले होते. जेंव्हा संताची वेळ आली तेंव्हा तो सेवकाला म्हणाला,''मित्रा! मी तुझ्या हाताने नाही तर राजाच्या हाताने दान घेईन. नाहीतर मला दान नको." राजाचा सक्त आदेश होता कि कोणीही रिक्त हस्ते जाता कामा नये. शेवटी सेवकांनी राजाची व संताची गाठ घालून दिली. राजाने संतांच्या पायाचे दर्शन घेतले व म्हणाला,"महाराज ! बोला आपली काय इच्छा आहे?" संत म्हणाले," मला इतके धन पाहिजे कि मी त्याद्वारे स्वर्गात जावू शकेन." राजा या उत्तराने हैराण झाला. त्याने विचारले," महाराज, धनाद्वारे आपण कसे काय स्वर्गात जावू शकता?, कृपया स्पष्ट करा!" तेंव्हा संताने सांगितले," राजन! मी आपल्याला हे सांगू इच्छितो कि, केवळ दान देण्याने आपण सुखी व्हाल आणि भिक्षा मागणारयांच्या जीवनात परिवर्तन येईल पण आपण असेच जर दान करीत राहिलात तर मात्र एक दिवस राज्याची तिजोरी मात्र खाली होवून जाईल." त्या क्षणी राजाचे डोळे उघडले, त्याने संताना यावरील उपाय विचारला असता ते म्हणाले, " आपण जे धन दान म्हणून देत आहात तेच रोजगाराच्या स्वरुपात द्या. यातून लोकांना काम मिळेल आणि फुकट खायची यांची सवय कमी होईल. आपल्या या सेवा वृत्तीने ते माजखोर आणि आळशी झाले आहेत. त्यांना परिश्रम करायला शिकवा तेच खरे पुण्याचे आणि सत्पात्री दान ठरेल. 
तात्पर्य- स्वावलंबन आत्मविश्वासाची अनिवार्य अट आहे. त्यावरच राष्ट्राचा विकास अवलंबून असतो
22) 👑🎤*बोधकथा- खोटा पैसा
एकदा दिनदयालजी बाजारात भाजी आणण्यासाठी गेले असता एका वृद्ध बाईकडून त्यांनी भाजी विकत घेतली. नंतर हिशोब लिहिताना त्यांच्या लक्षात आले कि आपल्या खिशातील एक खोटा पैसा त्या म्हाताऱ्या बाईला भाजीचे पैसे देताना चुकून दिला गेला. आपण नकळत का होईना त्या बाईला फसविले. याचे त्यांना अपार दु:ख झाले. ते पुन्हा बाजारात गेले व त्या बाईसमोर जावून उभे राहिले व म्हणाले," बाई, मी नकळत का होईना तुम्हाला फसविले आहे. मी तुम्हाला खोटा पैसा दिला आहे." त्या बाईला त्यांच्याशी बोलायला वेळ नव्हता, ती त्यांना म्हणाली," अहो, राहू दे एका पैशाचे काय? मला इथे भाजी विकू दे" पण दिनदयालजी म्हणाले ," नाही बाई ! मी तुम्हाला फसविले हि गोष्ट माझ्या मनाला लागून राहिली आहे. माझी चूक मला सुधारू द्या." त्या बाईने पण त्यांच्या चेहऱ्यावरील निरागस भाव पाहिले व आपला गल्ला असलेली पेटी त्यांच्या समोर ठेवली. बाह्य जग विसरून दिनदयालजिनी एकाग्रपणे तो गल्ला तपासला व त्यातील खोटा पैसा त्या बाईला सांगून परत घेतला व त्या जागी खरा पैसा त्या गल्ल्यात टाकला. त्या वृद्ध बाईने त्यांना तोंड भरून आशीर्वाद दिला. पुढे याच दिनदयालजिनी 'एकात्म मानवतावाद' मांडला.
तात्पर्य- आदर्श आचरणाची सुरुवात आपल्यापासून करणे गरजेचे आहे.
23)👑🎤*बोधकथा- पैलू*
     एका देवळात तीन सारखाय मूर्ती होत्या, पण त्यांचे गुण भिन्न होते. एक देव नेहमी सत्य बोले, तो होता सत्यदेव, दुसरा असत्यदेव आणि तिसरा वेळ पाहून सत्य बोले, तो होता संधीसाधू. पण त्या तिन्ही  देवांचे रूप व आवाज सारखेच असल्यामुळे कोणता देव बोलला हे कळत नसे. एकदा एक गबाळ्या माणसाने मंदिरातल्या साधूला विचारले, "सत्यदेव कोणता? असत्यदेव कोणता? आणि संधीसाधू कोण? साधुलाही या प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत. तो गबाळा माणूस स्वतः गाभाऱ्यात गेला आणि डावीकडच्या देवाला त्याने विचारले, "तुझ्याशेजारी कोणता देव आहे?" देव उत्तरला, "सत्यदेव." त्या माणसाने मधल्या देवाला विचारले, "तू कोणता देव आहेस?" तो म्हणाला संधीसाधू." त्या गबाळ्या माणसाने साधूला सांगितले,"मला सत्यदेव सापडला आणि मी शोधला." 
     *तात्पर्य :* प्रत्येकाच्या मनातील व्यक्तीत्वात सत्य, असच असत्य आणि संधीसाधुपणा हे पैलू असतात. ते एकमेकांत मिसळुन गेलेले असतात. ज्याचे त्यालाही ते ओळखता येत नाहीत. पण शोधणे आवश्यक असते.
24)👑🎤 बोधकथा - महिलेचा निर्भीडपणा
एकदा खलिफा उमरला जनतेस मार्गदर्शन करण्‍यासाठी निमंत्रित करण्‍यात आले होते. त्‍यांचे भाषणही प्रभावी झाले. अधूनमधून लोकांनी खलिफांना प्रश्‍नही विचारले. त्‍यांची खलिफानी समाधानकारक उत्तरेही दिली. खलिफाकडून धर्म आणि नीतीबाबत औत्‍स्‍युक्‍य असणा-या लोकांच्‍याही प्रश्‍नांची उत्‍तरे दिली. याच क्रमाने खलिफाने लोकांना प्रश्‍न केले. तो म्‍हणाला,'' जर मी तुम्‍हाला लोकांना काही आदेश दिला तर तो पाळाल काय'' मोठ्या संख्‍येने लोकानी सहमती दर्शविली पण एक महिलेने म्‍हटले,'' नाही, आम्‍ही तुमचा आदेश पाळणार नाही.'' हे ऐकताच गर्दीतूनही राग व्‍यक्‍त झाला. खलिफाने सर्वांना शांत राहण्‍यास सुचविले. त्‍या महिलेला याचे कारण विचारले असताती म्‍हणाली,''तुम्‍ही तुमचा पायजमा खूपच लांब घातला आहे. माझ्या पतीचा पायजमा गुडघ्‍यापर्यंतही येत नाही यावरून असे स्‍पष्‍ट होते की तुमच्‍या शाही भांडारामध्‍ये तुम्‍ही तुमच्‍या हिश्‍श्‍यापेक्षा जास्‍त कपडा घेतला आहे.'' महिलेला यातून असे सुचवायचे होते की खलिफाचे बोलण्‍याप्रमाणे वर्तन नाही. यावर खलिफा म्हणाला,''मला याबाबत माहित नाही पण माझा मुलगा याबाबत उत्तर देईल.'' खलिफाचा मुलगा पुढे आला व त्याने सांगितले,''माझ्या वडिलांनी शाही भांडारातून कपडा घेतलेला नाही. माझ्या हिश्श्याचे कापड मी वडिलांना दिले. सगळ्याप्रमाणेच माझे वडीलही कापड घेत होते त्यात मी वाढ केली'' महिलेचे या उत्तराने समाधान झाले. यावर खलिफा नाराज न होता त्या महिलेला धन्यवाद देऊ लागले कारण खलिफाच्या मते जोपर्यंत जनतेत प्रामाणिक व निर्भीडपणे बोलणारे लोक असणार नाही तोपर्यंत राज्याला किंवा धर्माला धोका नसतो. 
25) 👑🎤*बोधकथा - रोगापेक्षा इलाज भयंकर*
     कधी-कधी एखाद्या संकटातून बाहेर पडण्यासाठी आपण असे उपाय योजतो की, 'आगीतून बाहेर पडून फुफाट्यात' अशी आपली अवस्था होते. तरीही पुढच्या वेळी आपण शहाणे होत नाही. हाच प्रकार आपल्या आयुष्यात वारंवार घडतो, मग प्राण्यांच्या दुनियेत न घडला तरच नवल! घार आणि गिधाडे यांची भीती वाटते म्हणून काही बुलबुलांनी आपल्या संरक्षणासाठी ससाण्याला विनंती केली. ससण्याला आयतीच शिकार सापडली. त्याने ही विनंती तात्काळ मान्य केली आणि त्या सर्व बुलबुलांना तात्काळ संरक्षण दिले. आता घारी-गिधाडे यांचा त्रास वाचला. बुलबुले सुखी झाली. पण, काही काळानंतर त्यांच्या लक्षात आले की, आपली संख्या एकएकने कमी होते आहे. ससाण्याने जितका काळ संरक्षण केले, तेवढ्या काळात घारी-गिधाडांनी खाऊनही एवढी संख्या कमी झाली नसती, हे त्यांना कळून चुकले. आपल्या संरक्षणाच्या बदल्यात ससाण्याने वसूल केलेली किंमत जबर आहे, हे त्यांना पटले.
     *तात्पर्य :* रोगापेक्षा इलाज भयंकर! आपल्या जीवनात अशी वेळ येऊ नये म्हणून वेळीच दक्षता घ्यायला हवी.
26) 👑🎤*बोधकथा - पोपट
एका श्रीमंत माणसाजवळ एक पोपट होता. त्या पोपटास त्याने एका मोठय़ा व सुंदर पिंजर्‍यात ठेवले होते. तो त्याला चांगली फळे खायला घालीत असे. त्या पोपटाला तेथे सर्व सुखे अनुकूल होती, तरी ही तो मनात नेहमी झुरत असे. 'माझे जातभाई जसे मोकळेपणे या जंगलातून त्या जंगलात जातात अन् या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारतात. तसे मला करायला मिळाले तर किती बरे होईल.' एके दिवशी चुकून पिंर्ज‍याचे दार उघडे राहिल्याने त्या पोपटाची इच्छा पूर्ण झाली. या पिंजर्‍यातून पोपट घाईने बाहेर पडून लांबच्या आंब्याच्या झाडावर जाऊन बसला. थोड्या वेळाने त्याला भूक लागली. तेव्हा इकडे तिकडे पाहू लागला. चमचमाट, ढगांचा आवाज होऊन पाऊस पडायला लागला. त्या बिचार्‍या पोपटाचे फारच हाल झाले. अशा गोष्टीची त्याला कधीच सवय नव्हती. शेवटी पावसात भिजून व थंडीने काकडून त्याचे तेथेच प्राण गेले. मरता मरता तो म्हणाला. 'मला जर पुन्हा त्या पिंजर्‍यात जाता आले, तर त्यातून बाहेर पडण्याची मी पुन्हा इच्छा कधीही करणार नाही.'
तात्पर्य : ठेविले अनंते तैसेची राहावे. चित्ती असो द्यावे समाधान.
27) 👑🎤*बोधकथा - स्वच्छतेचा वसा
गणपतचा खानावळीचा व्यवसाय अगदी जोरात सुरु होता पण काही दिवसांनी रमणने त्यांच्याच शेजारी नवी खानावळ सुरु केली आणि गणपतची खानावळ पार बसली. त्याला रोज ग्राहकांची वाट पाहावी लागे. एके दिवशी गणपतचा मित्र राम त्याच्याकडे आला तर गणपत एकदम निराश बसलेला दिसला. त्याने कारण विचारताच गणपतने त्याला सर्व हकीकत सांगितली. त्यावर राम त्याला म्हणाला, अरे, काही सांगतो त्यावरुन तू लक्षात घे, तुझे काय चुकले ते. माझ्या ओळखीच्या एका तरुणाने अगदी सुंदर सुशिक्षित मुलगी नाकारली केवळ तिने विटलेली साडी नेसली होती आणि केस बांधले नव्हते या कारणामुळे. तू पण तीच चूक करतो आहेस, त्या मुलगीसारखा. तुझ्या खानावळीत जो चवीचा स्वयंपाक होतो तो रमणच्या खानावळीत होत नसला तरी त्याच्या खानावळीची स्वच्छता आणि टापटीप ग्राहकाला खेचत आहे. तू देखील बदल केलास तर तुझी खानावळ पुन्हा जोरात चालेल, यात शंका नाही. गणपतला आपली चूक उमगली.
28) 👑🎤*बोधकथा - सत्य 
पांडुरंगरावांना तीन मुली होत्या. सुस्वरुप, गृहकर्तव्यदक्ष अशा त्या मुलीमध्ये एकच व्यंग होते. त्या तिघीही मुली बोबड्या होत्या. यांचे विवाह कसे होणार, या एकाच चिंतेने पांडुरंगला अस्वस्थ केले होते. एकदा या तिघींना पाहायला तीन मुले येणार होती. म्हणून पांडुरंगने त्या तिघींना ताकीद दिलेली होती की, पाहुण्यासमोर कुणीही बोलायचे नाही.
ठरल्याप्रमाणे पाहुणे आले. चहा - फराळाचे पदार्थ दिले गेले. त्यांचा आस्वाद घेत वधूपरीक्षा सुरु झाली. काहीतरी बोलायचे म्हणून त्या मुलांसोबत आलेले गृहस्थ म्हणाले, वा ! पदार्थ फारच छान झालेत. तुमच्यापैकी कोणी केलेत हे ? यावर थोरली मुलगी लाजत - लाजत म्हणाली, आईने केये नाईट, आमीट केये.
धाकटी मुलगी तिच्यावर रागावून म्हणाली, अगो बाबांनी काय शांगिटले ? बोलायचे नाही म्हणून. यावर मधली म्हणते कशी, ही बोबयी. तू पण बोबयी. पण मीच नाही बोबयी. तिघींच्या संभाषणावरुन त्यांना बघायला आलेल्या वरमंडळींना त्यांच्या व्यंगाबाबतचे गुपित आपोआपच समजले आणि त्यांनी ठरवलेले सर्वकाही उघडकीस आले. पांडुरंगाची तर त्रेधातिरपीट उडाली. वर पक्षाच्या मंडळींनी तर आपोआपच काढता पाय घेतला.
29) 👑🎤*बोधकथा - ऋषी अष्टावक्र
हिंदू धर्मशास्त्रामध्ये अष्टावक्र नावाचे एक विचारवंत होऊन गेले. असे म्हणतात की अष्टावक्र हे केवळ कुरुपच नव्हते तर त्‍यांचे शरीरही बेढब होते. त्यांचे शरीर आठ ठिकाणी वाकडे होते म्हणून त्यांना अष्टावक्र हे म्हटले जात होते. ही एक प्रसिद्ध कथा आहे. अष्टावक्र ऋषी एकदा राजा जनक यांच्या दरबारात गेले. दोन्ही बाजूंनी उंच आसनावर सभासद, ज्ञानी, पंडीत, ज्ञानकर्मी बसले आणि राजा जनकाचे सिंहासन होते. अष्टावक्र ऋषींना द्वारपालाने रोखले नाही. अष्टावक्र त्यावेळी किशोरवयीन होते. अष्टावक्राने जेव्हा राजा जनकाच्या मुख्य सभामंडपात प्रवेश केला तेव्हा त्याच्यावर नजर पडताच सर्वजण एकमेकांकडे पाहून हसू लागले होते. इतकेच नाही तर त्यांचे हसू थांबत नव्हते. हे पाहून अष्टावक्राला प्रथम काहीच समजले नाही, मात्र त्यानंतर त्याला आपल्यावर हे सर्वजण हसतात म्हणून लक्षात आले. हे पाहून तोही जोरजोरात हसू लागला. जनक राजाने सभेला शांत होण्याचे आवाहन केले, सभा शांत होताच राजा जनकाने अष्टावक्राला विचारले,'' हे साधू, हे लोक तुमच्यावर हसतात हे माझ्या लक्षात आले पण तुम्ही का हसता आहात हे समजले नाही'' अष्टवक्राने उत्तर दिले,'' महाराज, मला वाटले की राजा जनक जो ज्ञानी, विचारवंत आहे त्याच्या सभेत ज्ञानी, विचारवंत, हुशार लोक असतील पण इथे तर सर्वच जण कातडीकडे व बाह्य स्वरूपाकडे पाहणारे लोक आहेत. माझ्या रूपाकडे पाहून हे लोक मला हसत होते हे पाहून मला यांच्या बुद्धीची कीव आली व हसू फुटले.'' जनक राजासह सर्व सभा अष्टावक्र ऋषींच्या या उत्तराने शरमिंदी झाली. 
तात्पर्य- माणसाचे महत्व त्याच्या शरीरावर नाही तर त्याचे ज्ञान, परिश्रम आणि कर्मावर आहे.(ज्ञान)
30) 👑🎤*बोधकथा - प्रेम
एक तरुण बागेत काम करीत होता. सुर्य डोक्यावर आला तरी त्याचे बागकाम संपत नाहिसे पाहून त्याची आई घरातून ओरडली, ‘अरे गोविंदा ! ऊनं कोण रणरणतं आहे ! घरात ये ना ? वाटल्यास उरलेलं काम संध्याकाळी कर.’ दोन तीन वेळा सांगूनही आपला मुलगा आपल्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, असं पाहून त्या बाईने आपल्या चार-पाच वर्षांच्या नातवाला-म्हणजे उन्हात बागकाम करणाऱ्या मुलाच्या मुलाला उचललं आणि बागेत असलेल्या आपल्या मुलापाशी नेऊन ठेवलं.आपल्या मुलाला उन्हात आणून ठेवल्याचं पाहून त्याचा पिता आपल्या आईवर भडकून म्हणाला, ‘आई ! अगं ऊन कोण तापलयं ! आणि चंदूला तू इथे उन्हात आणून ठेवलसं ? त्याला उन्हाचा त्रास नाही का होणार?’ त्या तरुणाची आई मुद्दाम म्हणाली, ‘ऊन लागलं तर लागलं; त्यात विशेष काय आहे?’तो तरुण म्हणाला, ‘आई ! तो माझा मुलगा आहे. त्याल ऊन लागतयं म्हणून नुसता त्यालाचा त्रास होत नाही, तर त्याला होणाऱ्या त्रासामुळं माझ्याही जिवाची तगमग होऊ लागली आहे.’ यावर आई म्हणाली, ‘मग गोविंदा, तू अस विचार कर की, तुझ्या या मुलाला ऊन लागताच जशी तुझ्या जिवाची तगमग सुरु झाली, तशीच तगमग तू मघापासून उन्हात काम करीत असल्यामुळे माझ्याही जिवाची तगमग होत नसेल का ?’ वृध्द व प्रेमळ आईचा हा बिनतोड युक्तीवाद ऎकून गोविंदा निमूटपणे कुदळ, कोयती उचलून, बागेतून हसत हसत घरात गेला.
तात्पर्य- स्वत:पालकाच्या भूमिकेत गेल्याशिवाय आईवडिलांचे प्रेम, माया, काळजी कळत नाही.
31) 👑🎤*बोधकथा - ज्ञान
आद्यगुरु शंकराचार्य हिमालयाकडे यात्रेसाठी चालले होते. त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व शिष्य हि होते. प्रवास करता करता ते अलकनंदा नदीच्या पात्रापाशी येवून थांबले. तेंव्हा एका शिष्याने शंकराचार्यांची स्तुती करण्यास सुरुवात केली. शिष्य म्हणू लागला,"आचार्य ! आपण किती महान आहात, आपले ज्ञान किती मोठे आहे जणू या अलकनंदा नदीच्या पात्राप्रमाणे. हे पात्र जितके विस्तीर्ण आहे तितके तुमचे ज्ञान असावे असे मला वाटते. कदाचित यापेक्षा महासागराइतकेही तुमचे ज्ञान असू शकेल."त्याचवेळी शंकराचार्यांनी आपल्या हातातील दंड पाण्यात बुडवला आणि बाहेर काढला, शिष्य या कृतीकडे पाहत होता. पाण्यातून बाहेर काढलेला दंड शिष्याला दाखवून शंकराचार्य म्हणाले," बघ, किती पाणी आले या दंडावर? एक थेंब इतकेच ना! अरे! मला किती ज्ञान आहे ते सांगू का? जगातील ज्ञान म्हणजे अलकनंदा नदीचे पात्र आहे असे समज आणि दंड बुडवून बाहेर काढल्यावर त्यावर आलेला थेंब म्हणजे माझे ज्ञान." जगात प्रचंड ज्ञान आहे आणि त्यातील केवळ एक थेंब ज्ञान माझ्याकडे आहे असे आद्यगुरु शंकराचार्य म्हणतात.
32) 👑🎤*बोधकथा - खरे दुःख
एक सोनार होता. त्याच्या दुकानासमोरच एका लोहाराचे दुकान होते. सोनार जेव्हा काम करत असे तेंव्हा सोनाराच्या दुकानातून हळू आवाज होत असे पण जेंव्हा लोहार काम करत असे तेंव्हा मात्र लोखंडाचे काम होत असल्याने मोठा आवाज होत असे. तो आवाज मोठा कर्णकर्कश असे. एके दिवशी सोनाराच्या दुकानातील एक सोन्याचा कण कसा कोण जाणे पण लोहाराच्या दुकानात जावून पडला. त्या सोन्याच्या कणाची भेट एका लोखंडाच्या कणाशी झाली. खूप दिवसांची ओळख असल्यासारखे ते एकमेकांशी बोलू लागले. सोन्याच्या कणाने लोखंडाच्या कणाला म्हंटले,"दादा, आपले दुःख तर खरे एकसमान आहे. दोघानाही आगीत तापवले जाते आणि हातोड्याने ठोकले जाते. मी तर बाबा चुपचाप हे सहन करतो, पण तुझे काय?" लोखंडाचा कण सोन्याच्या कणाकडे पाहून दुःखी स्वरात म्हणाला,"अरे ! तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. दोघानाही तापवणारी आग एकच आहे आणि ठोकणारा हातोडाहि एकाच धातूचा आहे. पण खरे दुःख याचे आहे कि तुला ठोकणारा हातोडा हा तुझा कोणीच लागत नाही पण मला ठोकणारा लोखंडाचा हातोडा हा नात्याने माझा भाऊच लागतो. दुसऱ्याने दिलेल्या दुःखापेक्षा स्वकीयांनी दिलेला त्रास हा अगदी हृदयात वार करून जातो."
तात्पर्य- आपल्या माणसांकडून होणारा त्रास हा कायमच दुःखदायक वाटतो. 
33) 👑🎤*बोधकथा - निर्मळता 
गुरु शिष्य भ्रमंतीला निघाले होते. फिरता फिरता ते एका जंगलात येवून पोहोचले. जंगलात काही अंतरावर एक झरा वाहत होता. गुरुजींना तहान लागली होती. त्यांनी शिष्याच्या हाती कमंडलू दिले आणि त्याला पाणी घेवून येण्यास सांगितले. शिष्य झऱ्या पाशी गेला आणि त्याला असे दिसले कि तेथून नुकतेच बैल गाड्या गेल्या आहेत, बैल पाण्यातून गेल्याने पाणी खूप गढूळ झाले आहे. पाण्यात झाडाची पाने पडलेली आहेत. त्याने विचार केला असे घाण झालेले पाणी गुरूंसाठी नेणे योग्य नाही. तो तसाच परत गुरूंकडे गेला आणि म्हणाला,"गुरुजी, पाणी खूप गढूळ आहे, आपल्याला दुसरी काही तरी व्यवस्था पहावी लागेल." गुरुजी म्हणाले," अरे त्यापेक्षा तू असे कर पुन्हा त्या झऱ्यापाशी जा आणि पुन्हा पाणी आणण्याचा प्रयत्न कर." शिष्य गेला, त्याला पुन्हा पाणी गढूळ दिसले, तो परत आला, गुरुनी त्याला परत पाठवले, असे चार पाच वेळेला झाले. शेवटी शिष्य कंटाळला, त्याच्या चेहऱ्यावर नाराजीचे आणि कंटाळलेले भाव दिसू लागले पण शिष्य गुरुज्ञा मोडायला तयार नव्हता. गुरुनी त्याला परत पाणी आणायला पाठवले. आताच्या वेळी त्याला मात्र आश्चर्य वाटले कारण या वेळी पाणी अगदी नितळ, स्वछ नि निर्मळ होते. त्याने ते पाणी कमंडलू मध्ये भरले आणि गुरूंसाठी घेवून आला. गुरुनी पाणी प्राशन केले आणि शिष्याला म्हणाले,"वत्सा ! आपल्या मनात सुद्धा असेच कुविचारांचे बैल धिंगाणा घालत असतात. ते मनाची निर्मळता कमी करून मनाला मलिन करण्याचा प्रयत्न करतात. पण आपण त्यापासून सावध राहिले पाहिजे. कुविचारांचा प्रभाव आपल्या मनावर होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे. मनाच्या झरयातील पाणी शांत होण्याची प्रतीक्षा जर आपण केली तर मनात कायम स्वच्छ, चांगले विचार येतील. भावनेच्या भरात कधीही निर्णय घेवू नये."
तात्पर्य- भावनेच्या भरात कोणतेही निर्णय घेऊ नयेत. मनात कायम स्वच्छ, चांगले विचार कसे येतील हेच पाहावे.
34) 👑🎤*बोधकथा - चांगले आचरण
दोन तरुण साधू उंच डोंगरावर असणार्‍या आपल्या मठाकडे निघाले होते. रस्त्यामध्ये एक ओढा होता. त्या ओढय़ाच्या काठी एक तरुण युवती बसलेली होती. त्या तरुणीलाही तो ओढा पार करून गावात जायचे होते. पण ओढय़ाला असणार्‍या पाण्यामुळे ती तो ओढा पार करू शकत नव्हती. तरुणीला तर ओढा पार करून पलीकडे जाणे गरजेचे होते. दोन साधूंपैकी एका साधूने हे पाहिले व त्याने त्या तरुणीला विश्वासपूर्वक दोन गोष्टी सांगितल्या व त्या तरुणीला आपल्या खांद्यावर बसवले आणि त्या तिघांनी मिळून तो ओढा पार केला. तरुणीने तो ओढा पार होताच साधूचे आभार मानले व ती आपल्या गावात निघून गेली. दोन्ही साधू आपल्या आश्रमाकडे निघाले. ज्या साधूने तरुणीला खांद्यावर घेतले होते त्याच्याशी दुसरा साधू बराच वेळ काहीच बोलला नाही. 
त्या साधूने दुसऱ्या साधूच्या मनातील चलबिचल ओळखली व तो त्याला म्हणाला, मित्रा! बराच वेळ मी पाहतो आहे पण तुला काही तरी खुपते आहे. तेव्हा विना संकोच तू मनातील गोष्ट मला सांग. तो दुसरा साधू म्हणाला, हे मित्रा, आपल्या संप्रदायामध्ये स्त्रीस्पर्श सुद्धा वज्र्य आहे. तरी तू त्या स्त्रीला खांद्यावर बसवून ओढा पार केलास हे काही मला आवडले नाही. त्यावर तो मदत करणारा साधू म्हणाला, मित्रा, ती स्त्री जेव्हा माझ्या खांद्यावरून उतरली तेव्हाच मी तिला सोडले, मात्र तू अजूनही तिला मनात बाळगून आहेस. मी तिला मदत करण्याच्या दृष्टीने स्पर्श केला पण तू अजूनही मनातून तिला वारंवार स्पर्श करत आहेस. संन्यास याचा अर्थ कुणाचीही सेवा न करता अलिप्त राहणे असा न होता मनातील वासना आणि विकारांवर ताबा मिळवणे असा होतो. 
तात्पर्य- माणसाच्या मनातून चांगले आचरण असल्यास बाहेरील आचरण हे चांगलेच होते. मनात पाप ठेवून चांगले बनत नाही.
35) 👑🎤*बोधकथा -  घुबड आणि टोळ
एक म्हातारे घुबड झाडाच्या ढोलीत झोपले असता एका टोळाने झाडाखाली गाणे म्हणायला सुरुवात केली. त्याने गाणे म्हणू नये म्हणून घुबडाने त्याला विनंती केली, बाबा रे, तू येथून जा, मला विनाकारण त्रास देऊ नकोस. तुझ्या किरकीरीने माझी झोप मोडते.' यावर तो टोळ त्या घुबडाचा धिक्कार करून त्याला शिव्या देऊ लागला. तो म्हणाला, 'तू लबाड, चोर आहेस, रात्रीचा बाहेर जाऊन चोरी करून पोट भरतोस नि दिवसा झाडाच्या ढोलीत लपून बसतोस.' त्यावर घुबड म्हणाले, 'अरे तू आता आपलं तोंड सांभाळ, नाहीतर मग पस्तावशील.' तरीही टोळ ऐकून घेईना. घुबडाची निंदा करून तो पुन्हा गाऊ लागला, मग घुबडाने त्याची खोटी स्तुती करायला सुरुवात केली, 'बाबा रे, क्षमा कर. तुझं गायन अगदी गोड आहे. माझ्या इतका वेळ ते लक्षात आलं नाही. तुझ्यासारखा गाणारा तूच. तुझ्या गाण्यापुढे कोकीळाही लाजेल. तुझा स्वर सारंगीपेक्षा चांगला आहे. बरी आठवण झाली. माझ्याकडे एक अमृताची कुपी आहे. त्यातले थोडेसं मी तुला देतो. फार वेळ गात राहिल्याने तुझा गळा अगदी सुकून गेला असेल नाही का ?' टोळाला खरोखरच तहान लागली होती, तो घुबडाजवळचे अमृत घेण्यासाठी त्याच्याजवळ गेला. लगेच घुबडाने त्याला उचलून आपल्या तोंडात टाकले.
तात्पर्य - आपल्याला जे आवडते ते सर्वांनाच आवडेल असे नाही, हे लक्षात घेऊन दुसर्‍याच्या आवडीनिवडीचा जे विचार करीत नाहीत ते शेवटी आपला नाश करून घेतात.
36) 👑🎤*बोधकथा - भगवान
एका फकिराला एकदा स्वप्न पडले. स्वप्नात तो स्वर्गात गेला. तेथे रस्त्यावर मोठी गर्दी झालेली त्याला दिसली. त्या गर्दीतील एकाला त्याने विचारले, एवढे लोक का जमले आहेत ? त्या व्यक्तीने सांगितले, आज भगवानांचा जन्मदिन आहे. ते येथून जाणार आहेत. फकिराला आपल्या भाग्याचा हेवा वाटला. साक्षात भगवानाचे दर्शन घडणार. थोड्या वेळाने एका उमद्या घोड्यावरुन एक राजबिंडा तरुण आला. त्याच्यामागे हजारो लोक होते. त्याला पाहून फकिराने विचारले, हेच का ते भगवान ? ती व्यक्ती म्हणाली, नाही हे भगवान नाहीत. हे राम आहेत. त्यांना मानणारे लोक त्यांच्यामागून जात आहेत... याच पद्धतीने येशू, बुद्ध, महावीर... सर्वजण येऊन गेले. भगवानांची वाट पाहता पाहता मध्यरात्र झाली. सारे लोक कंटाळून निघून गेले. आणि त्या निर्मनुष्य रस्त्यावरुन एक म्हातारा एकटाच आला. फकिराने त्याला विचारले, आपणच भगवान ? म्हातारा म्हणाला, हो. फकिराने विचारले, मग आपल्यामागून कोणीच कसे येत नाही ? डोळ्यात अश्रू आणत तो म्हातारा म्हणाला, सारे राम, महावीर, बुद्ध, येशूबरोबर गेले. जो कोणाबरोबर जात नाही, तोच माझ्याबरोबर येऊ शकतो.
 37) 👑🎤*बोधकथा - अहंकारी राजाला धडा
एक अहंकारी राजा होता. त्याला आपल्या ऐश्वर्याचा आणि राज्याचा गर्व होता. तसेच आपली शक्ती आणि रूपावरही तो अहंगंड बाळगून असायचा. आपल्या बुद्धीचा टेंभा मिरवायचा. युद्धात जय मिळाला की त्याला गर्व चढायचा. आपल्यासमोर तो इतरांना तुच्छ लेखत असे. कोणाचा मुलाहिजा न बाळगता त्याचा तो अपमान करत असे. दुस-याला कमी लेखण्याचा त्याचा प्रयत्न असायचा. या कारणांमुळे लोक त्याच्यावर नाराज असायचे. त्याच राज्यात एका विद्वान पंडीताने त्याला वठणीवर आणण्याचे ठरविले. एके दिवशी तो पंडीत राजाच्या दरबारात गेला आणि राजाला प्रणाम केला. राजाने उद्दामपणे प्रतिनमस्‍कारही केला नाही उलट त्याने पंडीताला गर्वाने विचारले,’’बोला पंडीत महाराज, तुम्‍हाला काय मदत पाहिजे. काय मागायचे असेल ते मागून घ्या, दान पाहिजे असेल तर दान घ्या किंवा धन पाहिजे, सोनेनाणे, जमीन, धान्य जे काही मागायचे ते तुम्ही माझ्याकडून मागून घ्या’’ पंडीतजीने राजाकडे एकवार पाहिले व तो मोठमोठ्याने हसू लागला. राजाला व दरबारातील लोकांना पंडीताच्या हसण्याचे कारण काही कळेना, हसण्याचा भर ओसरल्यावर पंडीत म्हणाला,’’राजन, तुम्ही मला काय दान देणार कारण तुमच्याकडे मला देण्यासारखे काहीच नाही.’’ पंडीताचे हे बोलणे ऐकताच राजा संतापून लालबुंद झाला, राजाचे सैनिक पंडीताला मारायला धावून आले पण सेनापतीने सैनिकांना आवरले व पंडीताला पुढे काही बोलण्याची इच्छा आहे काय असे विचारले. त्यावर पंडीतजी म्हणाले,’’ महाराज, जरा थंड डोक्याने विचार करा, तुमचा जन्मच मुळी तुमच्या इच्छेने झाला नाही, मग रूप, सौंदर्य आणि पराक्रम हे गुण तुम्हाला कोठून मिळाले असते. आईवडीलांनी तुम्हाला जन्म दिला म्हणून तुम्ही जन्माला आलात. तुमचे धान्यभांडार हे धरतीमातेचे देणे आहे. तिने पिकवून तिच्या लेकरांसाठी अन्न पुरविले म्हणून तुम्ही ते सांभाळत आहात आणि खजिन्याचे म्हणाल तर धन हे करातून आलेले म्हणजेच प्रजेचे देणे आहे, राज्य हे तुम्हाला वाडवडीलांकडून मिळालेले वरदान आहे राहता राहिले शरीरातील प्राण पण तेही तुमचे नाहीत ते सुद्धा ईश्वराची कृपा आहे हे सगळेच जर तुम्हाला दुस-याने दिलेले असेल तर तुम्ही मला काय म्हणून देणार आणि दिलेल्या गोष्टीचा काय म्हणून गर्व बाळगणार.’’ एवढे बोलून पंडीताने राजदरबार सोडला व राजाने त्यादिवसापासून गर्व पण सोडून दिला,
तात्पर्यः- जे आपले नाही त्यावर गर्व बाळगणे व्यर्थपणाचे आहे.
38) 👑🎤*बोधकथा - मातृभक्ती
त्या काळात सर आशुतोष मुखर्जी कलकत्ता विद्यापीठाचे उपकुलपती तर होते शिवाय कलकत्त्याच्या उच्च न्यायालयात न्यायाधिशही होते. त्यांचा साधेपणा, हुशारी, रोखठोकपणा व आदर्श व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होऊन इंग्रज सरकारने त्यांना इंग्लंडला पाठवण्याचे ठरवले. त्यानुसार परदेशी जाण्याची सर्व तयारी त्यांनी केली पण शेवटच्या क्षणी त्यांच्या आईने काही कारणांमुळे त्यांना इंग्लंडला न जाण्यास सांगितले. आईची आज्ञा शिरसावंद्य मानून एवढ्या चांगल्या संधीकडे त्यांनी पाठ फिरवली व सरकारला कळविले की, माझ्या आईला मी परदेशी जावे, असे वाटत नाही. त्यामुळे मला माझा प्रवास नाईलाजाने रद्द करावा लागत आहे. त्यावेळचा व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन हे पत्र पाहून अतिशय संतापला व म्हणाला, एका सामान्य भारतीयाची सरकारचा आदेश डावलण्याची हिंमत कशी झाली ? त्याने सर आशुतोष मुखर्जी यांना बोलावले व म्हणाला, जा, आपल्या आईला जाऊन सांगा की भारताचा व्हाईसरॉय तुमच्या मुलाला परदेशी जाण्याची आज्ञा देत आहे. त्यावेळी व्हाईसरॉयची आज्ञा न मानणे म्हणजे स्वतःवर संकट ओढवून घेण्यासारखे होते, पण आईच्या आज्ञेपुढे त्यांना कर्झनच्या आज्ञेची किंमत शून्य होती. ते आपल्या निश्चयापासून जराही विचलीत झाले नाहीत व गंभीर चेहर्‍याने व धाडसाने म्हणाले, महाशय, मी माझ्या आईच्या आज्ञेचे उल्लंघन करु शकत नाही. जगात आईच्या आज्ञेशिवाय कोणाचीही आज्ञा श्रेष्ठ मानत नाही. आमची परंपरा व संस्कृती आईला देवता म्हणून मानते व अशा देवीची आज्ञा माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी मोडू शकत नाही. तेव्हा यासंबंधी कृपया आपण मला अधिक काहीही सांगू नका ! हा विषय माझ्या दृष्टीने संपला आहे. त्यांची मातृभक्ती पाहून कर्झन आश्चर्यचकित झाला व त्यांना प्रेमाने आलिंगन दिले.
 39) 👑🎤*बोधकथा - विश्वासाला तडा
एका लोककथेनुसार राम नावाच्या एका माणसाकडे एक उमदा आणि सुंदर घोडा होता. तो त्या घोड्याची काळजी घ्‍यायचा. त्यामुळे त्या दोघांचेही एकमेकावर प्रेम जडलेले होते. शाम नावाच्या एका घोड्याच्या व्यापा-याने तो घोडा पाहिला आणि त्याला तो घोडा फारच आवडला. शामने तो घोडा मिळविण्याचे कारस्थान रचले. शामने रामच्या रोजच्या येण्याजाण्याच्या रस्त्यावर भिका-याचे सोंग घेतले व आजारी असल्याचे नाटक करत बसला. दुसरीकडून राम घोड्यावर बसून येत होता तेव्हा शाम जोरजोराने विव्हळू लागला, गयावया करू लागला. रामने ते पाहिले व तो शामपाशी थांबला. शाम रामला म्हणाला,’’मी आजारी आहे मला तुझ्या घोड्यावरून पुढच्या गावापर्यंत नेशील का,’’ रामला त्याची दया आली, त्याने त्याला घोड्यावर बसविले, आणि स्वतः पायी चालू लागला. थोडे पुढे जाताच शाम त्याचा घोडा घेऊन पुढे गेला व त्याने पुढील गावी जाऊन तो घोडा विकून टाकला. दुस-या दिवशी शाम रामकडे आला व म्हणाला,’’ अरे मी तुझा घोडा जर विकत मागितला असता तर तू मला तो दिला नसतास म्हणून मला आजारी भिका-याचे सोंग घ्यावे लागले.’’ यावर राम शांतपणे शामला म्हणाला,’’ मित्रा, मी तुला मदत केली होती ही गोष्ट तू इथून पुढे कोणालाही सांगू नकोस कारण तुझी ही गोष्ट ऐकल्यावर जगात कोणीच गरीबांना, गरजूंना मदत करणार नाही. विश्वासघात करणे महापाप आहे’’
तात्पर्यः- गरजूला मदत करण्यापूर्वी तो खरेच गरजवंत आहे याची खात्री करणे सूज्ञपणाचे ठरते.
 40) 👑🎤*बोधकथा -महापुरुष 
आधुनिक संत म्हणून ज्यांना संबोधण्यात येते ते आचार्य विनोबा भावे यांच्या संदर्भातील एक गोष्ट अशी की, आपले म्हणणे दुसऱ्याला न दुखवता मोठ्या खुबीने आचरणाने पटवून देण्यात त्यांचा हातखंडा होता. एके दिवशी असाच एक माणूस त्यांच्याकडे आला व पश्चात्तापदग्ध होऊन म्हणाला, महाराज दारु काही मला सोडायलाच तयार नाही. मला माहिती आहे की ती सवय वाईट आहे. मला ती सवय सोडायची आहे पण काय करु ? आचार्य शांतपणे म्हणाले, असं कर, तू उद्या मला याचवेळी येऊन भेट व बाहेरुनच हाक मार. मी मग येऊन सांगेन काय ते ! दुसऱ्या  दिवशी तो माणूस ठरल्याप्रमाणे आला पण त्याला कळेना की बाहेरुनच का हाक मारायची ? पण आचार्यांची आज्ञा म्हणून अधिक विचार न करता त्याने बाहेरुनच हाक मारुन स्वतः आल्याचे सांगितले. तोच आतून आचार्यांचा आवाज आला, होय रे, मी बाहेर येऊ पाहतोय, पण हा खांबच मला सोडायला तयार नाही. तो माणूस चक्रावून गेला. ही काय भानगड आहे ? आचार्य माझी गंमत तर करत नाहीत ? असा विचार करुन त्यांनी आत कुतूहलाने डोकावून पाहिले. तो त्याला हसूच आवरेना. घरातील खांबाला विनोबाजी घट्ट पकडून बसले होते व तो खांब मला सोडत नाही म्हणून तक्रार करत होते. तो माणूस हात जोडून म्हणाला, विनोबाजी आपणच खांबावर चढून त्याला धरले आहे व तो खांब सोडत नाही, हे कसे ? हे ऐकूण स्मितहास्य करत खाली उतरले व त्याला समजावणीच्या स्वरात म्हणाले, ज्याप्रमाणे मी या खांबाला धरुन ठेवले होते तसेच तू ही दारुला पकडून ठेवले आहेस. दारुने तुला नाही पकडले. जेव्हा तू दारु सोडायचे ठरवशील तेव्हा आपोआप दारु पिच्छा सोडेल. हे ऐकून त्या माणसाचे डोळे उघडले व त्यांनी विनोबाजींच्या पायावर डोके ठेवून दारु सोडण्याचा निश्चय केला. 
41) 👑🎤*बोधकथा - राजा आणि संत
एका वनात दोन संत राहत होते. एकांतात आपल्या तपश्चर्येत लीन राहत होते. कधीतरी यात्रेकरूंचा जत्था जायचा तेव्हा ते संत त्यांच्याशी बोलत असत. त्याच यात्रेकरूकडून त्यांना तेथील राजास त्या संतांबाबत माहिती मिळाली. तो या दोघांना भेटण्यास निघाला. जेव्हा संतांना ही गोष्ट कळाली.तेव्हा त्या दोघांना वाटले की आता राजा येणार व त्याने आपला चांगूलपणा पाहिला तर तो आपणास सतत भेटण्यास येईल, त्याच्याबरोबर अनेक माणसे येतील, त्यां माणसांच्या संगतीने अजून काही माणसे येतील व अशाने या वनातील शांती भंग पावेल व एकांत मिळणार नाही व एकांत नसल्याने आपणास ध्यानसाधना करता येणार नाही. राजा आम्हाला दोघांना सामान्य माणूस समजेल असे काहीतरी केले पाहिजे. राजाचा लवाजमा तेथे पोहोचला तेव्हा राजाने पाहिले की ते दोघेही संत हातात लाठ्याकाठ्या घेऊन एकमेकांशी भांडत होते. पहिल्या संताने   दुस-याला म्हटले,'' तू स्वत:ला कोण समजतोस, मी इतके ज्ञान मिळविले आहे की ते तू सात जन्मातही मिळवू शकणार नाही.'' दुसरा संत त्यावर म्हणाला,'' अरे तू तर पक्का खोटारडा आहेस, तुझ्या ज्ञानाच्या गप्पा मारून तू लहान मुलाला फसवू शकशील पण मला नाहीस. तुझ्यापेक्षा जास्त ज्ञान मी माझ्या शिष्यांना दिले आहे.'' राजाने व त्याच्याबरोबरच्या लोकांनी हे भांडण पाहिले व विचार करू लागले हे साधू संत तर सामान्य माणसाप्रमाणेच भांडत आहेत व त्यांनी सर्वांनी असल्या साधूसंतांचा संग नको म्हणून वनातून जाणेच पसंत केले. राजा व लोक जाताच दोन्ही संतांनी एकमेकांकडे पाहून मंदस्मित केले व गळाभेट घेतली. दोन्हीही साधू आपल्या साधनेत रममाण झाले.
तात्पर्य : चांगली गोष्ट घडवून आणण्यासाठी कधीकधी चुकीच्या मार्गाचाही अवलंब करावा लागतो.
 42) 👑🎤*बोधकथा - खरं सत्य 
एका साधूला पितळेच्या धातूचे सोन्यात रूपांतर करण्याची कला अवगत होती. पण याचा उपयोग तो गरजुंना करण्यासाठीच करत होता. एकेदिवशी एक गरीब ब्राह्मण त्याच्याकडे आला. त्याला मुलीच्या लग्नासाठी पैशांची आवश्यकता होती. साधूने त्याची अडचण ओळखून त्याला एका पितळेच्या भांड्याचे रूपांतर सोन्यात करून दिले. ब्राह्मण सोनाराकडे गेला. सोनाराला त्याच्याकडे सोन्याचे भांडे पाहून मनात संशय आला. सोनार राजाकडे गेला.राजाने त्याची चौकशी केली केली तेव्हा ब्राह्मणाने खरी घटना सांगितली. राजाच्या मनात लोभाची भावना उत्पन्न झाली. त्याने साधूला ती विद्या शिकविण्याचे फर्मान काढले. साधूने राजाला ठामपणे नकार सांगितला. राजाने साधूला 15‍दिवसांची मुदत दिली अन्यथा फासावर लटकावेन अशी धमकी दिली. राजा त्याच्याकडून काय उत्तर येते यासाठी दूत पाठवित असे पण साधू काही होकार देईना. हे पाहून राजाने वेश पालटला व तो साधूच्या येथे राहून त्याची सेवा करू लागला. साधूने राजाच्या सेवेवर प्रसन्न होऊन त्याला पितळापासून सोने तयार करण्याची विद्या शिकविली. राजा महालात परतला. पंधराव्या दिवशी साधूला बोलावून त्याला विद्या शिकविण्याची आज्ञा केली. साधूने परत नकार दिला. तेव्हा राजा गर्वाने म्हणाला,’’ साधू तू मला कला शिकवली नसती हे मी जाणून होतोच पण मी ही हट्टी आहे. मी पण तुझ्याजवळ राहून ती कला शिकून तयार झालो आहे.’’साधू म्हणाला,’’महाराज तुम्ही माझी सेवा करून ती कला शिकला आहात, धमकी देऊन नाही. ज्ञानासाठी गुरुची मर्जी सांभाळावी लागते.’’
तात्पर्य :- ज्ञान सचोटीने प्राप्त होते, धमकावून नव्हे.
 43) 👑🎤*बोधकथा- मन*
     आचार्य विनोबांनी 'देव कसा आहे?' याचे फार सुंदर वर्णन केले आहे. ते म्हणतात, 'देव हा प्रतिष्ठित पाहुण्यासारखा आहे. एखादा पाहुणा दारात उभा राहतो. दारावर टकटक करतो. पण यजमानाने दार उघडून 'आत या' म्हटल्याशिवाय घरात शिरत नाही. तसेच देव सर्वत्र आहे. केवळ तुमच्याच दारी आहे, असे नव्हे. जशी सूर्याची किरणे सर्वत्र आहेत. केवळ तुमच्याच दारी आहे, असे नव्हे. जशी सूर्याची किरणे सर्वत्र पसरलेली असतात. पण बंद दारातून आत येऊ शकत नाहीत. मात्र दाराला किंचितही का होईना फट असेल, दार थोडे किलकिले केले असेल तरी प्रकाशाचे दूत त्यातून घरात प्रवेश करतात. तसेच निष्ठापूर्वक संकल्प करून प्रार्थना करणे म्हणजे मनाचे दार किलकिले करणेच आहे. त्या सर्वशक्तीला आव्हान करून बोलवण्यासारखेच आहे. देव, गुरु, प्रेरणादायी स्फूर्तीस्थान ह्यांत एवढी शक्ती असतेच आणि इतरांना ती शक्ती देण्याचा संकल्प असतोच. पण देव अनाहूत पाहुण्यासारखा दारी उभा असतोच. असे स्वरूप विशद करून विनोबांनी प्रार्थनेचे महत्व विशद केले आहे.
     *तात्पर्य :* सृष्टीतील दिव्या शक्तीसाठी मनाची कवाडे खुली ठेवल्याखेरीज ईश्वरी स्पर्धांचा अनुभव घेणे कठीण आहे.
 44) 👑🎤*बोधकथा - लालसेपायी जीव गेला
जय आणि विजय यांच्यात घनिष्ट मैत्री होती. दोघेही पट्टीचे पोहणारे होते. नदीच्या पाण्यात भरपूर मस्ती केली. तितक्यात स्थानिक प्रशासनाकडून बंधा-याकडून पाणी सोडण्यात येत असल्याची सूचना देण्यात आली. त्यामुळे दोघेही नदीच्या बाहेर आले. जेव्हा बंधा-यातील पाणी सोडण्यात आले तेव्हा नदीला पूर आल्यासारखी स्थिती निर्माण झाली. जय आणि विजय सुरक्षित स्थळी थांबले होते. नदीच्या पाण्याचा ओघ पाहत असतानाच नदीच्या प्रवाहात एक घोंगडी तरंगत येत असल्याचे दोघांच्याही दृष्टीस पडतील. विजयला ती घोंगडी ओढून आणावीशी वाटली. जयने त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु विजयने तोपर्यंत पाण्यात उडी मारली होती. तो घोंगडीजवळ गेला आणि तिला ओढत असतानाच त्याचे संतुलन बिघडले. विजय जितका जोम लावून किना-यावर येण्याचा प्रयत्न करत असतानाच पाण्यात उठणा-या लाटा त्याला दूर लोटत असत. मित्र असा संकटात सापडलेला पाहून जय ओरडला,''अरे मित्रा, घोंगडी सोड आणि परत निघून ये'' पण विजय म्हणाला,'' अरे जय मी घोंगडी सोडण्याचा खूप प्रयत्न करतो आहे पण घोंगडीनेच मला धरून ठेवले आहे.'' जयला कळून चुकले की विजयला त्या घोंगडीची लालसा निर्माण झाली आहे. विजयने घोंगडीसह किना-यावर येण्याचा खूप प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला. शेवटी तो पाण्यात  मृत्युमुखी म्हणतात.
तात्पर्य- कोणत्याही प्रकारची लालसा प्रसंगी आपल्या जीवाशी खेळू शकते.
45) 👑🎤*बोधकथा -  स्वभाव आणि छंद*
     ' समानशीले व्यसनेषु सख्यम् ' हे सुभाषित आपण वारंवार ऐकतो आणि त्याचे प्रत्यंतर समाजात वावरताना आपणाला येते. याच सुभाषिताचा दाखला देणारी ही कथा. एका साध्या संवादातून हा बोध आपणाला मिळेल. एकदा प्रचंड महापुरात नदीच्या पात्रातून दोन भांडी वाहत होती. त्यापैकी एक होते पितळेचे, तर दुसरे होते मातीचे. त्या पुरातुन वाहत जातानाच त्यांच्यात संवाद चालला होता. पितळीचे भांडे मातीच्या भांड्याला म्हणत होते, "अरे, इतका दुरून का चालला आहेस? ये ना माझ्याजवळ. दोघेजण हातात हात घालून जाऊ. कशी मजा येईल बघ तरी. मला डोळे भरून पाहता येईल आणि या प्रचंड वेग असलेल्या पाण्यापासून तुझं संरक्षणही करता येईल." मातीच्या भांड्याने पितळेच्या भांड्याचे आभार मानून म्हटले, "कृपा करून कोणत्याही स्थितीत तू माझ्याजवळ येऊ नकोस. तुझीच मला सर्वात जास्त भीती आहे. तुझा थोडासा जरी धक्का मला लागला, तरी माझ्या ठिकऱ्या उडतील. तुझा माझा देहभाव भिन्न आहे."
     *तात्पर्य :* भिन्न स्वभावाचे, छंदाचे लोक एकत्र कसे येणार ?
 46) 👑🎤*बोधकथा -  दानाचे महत्व
हजरत उमर आपल्या रयतेची खूप काळजी घेत असत. ते स्वत:ची व आपल्या परिवाराची चिंता नकरता जनतेचे दु:ख निवारणार्थ झोकून देत. एका प्रसंगाची गोष्ट आहे, काही कारणाने राजधानीत आग लागली, आग इतक्या वेगाने पसरली की तिने शहराचा अर्धा भाग व्यापून टाकला. लोकांनी खूप पाणी टाकले पण आग आटोक्यात येण्याची काही चिन्हे दिसेनात. हजारो लोकांची घरे, दारे, पिके सगळे जळून खाक झाले. मनुष्यहानीही मोठया प्रमाणावर झाली. लोकांचा आक्रोश वाढत होता. आगीचा वणवा पसरतच चालला. आगीचे लोळ भडकत चालले. शेकडो घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडत होती. जनतेला एकाच भयाने ग्रासले होते. आग आटोक्यात कशी आणायची कशी, आग विझत नसल्याने लोकांनी हजरत उमरला उपाय विचारले, तेसुद्धा आग विझविण्यात तनमनधनाने व्यग्र होते. उमरनी लोकांना सांगितले, ''ही आग म्हणजे खुदाचा कोप असावा, तुम्ही लोकांनी आता आग विझविण्यासाठी पाणी टाकण्याचे काम सोडा, गरिबांना अन्नदान करा. कदाचित खुदा यामुळे प्रसन्न होईल आणि आगीपासून आपली सुटका करेल.'' जनतेतील लोक म्हणाले,''हजरत साहेब आपण धर्मादाय संस्थेचे सर्व दरवाजे सगळ्यांसाठी आधीच उघडे ठेवलेले आहेत. कोणीही गरीब आमच्याकडे आला तर आम्ही त्याला दान करतोच. मग आमच्यावर तो नाराज कसा'' हजरत उमरने समजावले,''तुम्ही जे दान करता त्यामागे निष्काम भावना नाही. तुम्हाला वाटते दानाचे पुण्य म्हणून तुम्हाला सन्मान किंवा प्रशंसा हवी असते. या देखाव्याला पुण्यकर्म म्हणत नाहीत.'' हजरत उमरच्या खुलाशानंतर जनतेने आपली चूक सुधारली अन आश्चर्य म्हणजे आग पूर्णपणे विझून गेली. जनतेने खुदाचे व हजरत साहेबांचे आभार मानले.
तात्पर्य :- नि:स्वार्थ भावनेने केलेले दान कधीही लोकांच्या अंतरात्म्यापर्यंत पोहोचते.
 47) 👑🎤*बोधकथा - संस्कारीत मुलेच यशस्वी
नैतिक मूल्यांचे शिक्षण देणा-या एका शिक्षकाने मुलांसाठी चॉकलेटस मागवली होती. त्यांनी सगळ्या मुलांना रांगेत बसवले होते. शिक्षक चॉकलेटस वाटायला सुरुवात करणार इतक्यात शाळेचा शिपाई त्या वर्गात येऊन पोहोचला व म्हणाला,''सर तुम्हाला आताच्या आत्ता प्राचार्यांनी काही महत्वाचे सांगण्यासाठी त्यांच्या कार्यालयात बोलावले आहे.'' शिक्षकांनी चॉकलेटचा डबा हातातून खाली ठेवला व मुलांना म्हणाले,'' मुलांनो मला काही कामासाठी प्राचार्यांकडे जावे लागत आहे. खरेतर ही चॉकलेटस मला माझ्या स्वत:च्या हाताने तुम्हाला द्यायची खूप इच्छा होती. परंतु मला जावे लागणार आहे. पाहिजे तर तुम्ही हाताने चॉकलेटस घेऊ शकता. अन्यथा मी परत आल्यावर तुम्हाला देईन'' ही चांगली संधी आहे. असा काही विद्यार्थ्यांनी विचार केला व त्यांनी चॉकलेटस स्वत:च्या हाताने घेऊन खाल्ली तर काही विद्यार्थ्यांनी शिक्षकांची वाट बघण्यात वेळ घालविला. शिक्षक परत आले व त्यांनी मुलांना विचारले,'' मुलांनो ज्यांनी ज्यांनी स्वत:च्या हाताने चॉकलेटस खाल्ली त्यांनी आपले हात वर करा'' ज्यांनी चॉकलेटस खाल्ली होती त्यांनी हात वर केले. मग शिक्षकांनी उरलेल्या मुलांना प्रेमाने चॉकलेटस वाटली. काही वर्षानंतर त्या शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यांची माहिती मिळविली तेव्हा त्यांना असे दिसून आले की ज्या मुलांनी स्वत:च्या हाताने चॉकलेटस घेतले होते ती मुले सामान्य स्वरूपातील कामे करून उदरनिर्वाह करत होते तर ज्यांना शिक्षकांनी चॉकलेटस दिली ते सर्व विद्यार्थी उच्च पदावर काम करत होते. ही सर्व संस्कारांची देणगी होती.
तात्पर्य :- संस्काराने माणूस घडतो. मिळालेली संधी आणि तिचा योग्य वापर करणे हे मानवाच्या हाती आहे. चुकीच्या मार्गाने गेल्यास व संयम न पाळल्यास योग्य संधी मिळूनही तिचा वापर करता येत नाही.
 48) 👑🎤*बोधकथा - शिकण्याची वृत्ती*
     प्रसिद्ध हार्मोनियम वादक गोविंदराव टेंबे यांच्या बाबतीत घडलेली कथा. एकदा त्यांच्या घरासमोर एक भिकारी येऊन गाऊ लागला. गोविंदरावांना त्याचे गाणे भिडले. त्या भिकाऱ्याच्या आवाजातील दर्द आणि फिरत मोठी मजेदार व कौतुकास्पद वाटली. त्यांनी त्याला घरात बोलाविले. चांगले दोन तास गायला लावले. भिकार्यालाही दर्दी श्रोता मिळाला. त्याचे गाणे रंगतच गेले. जणू दोघांची मैफिल जमली होती. या काळात गोविंदरावांनी त्याच्या गाण्यातील हरकत जाणून घेतल्या. स्वतः त्या गाऊन पहिल्या. पेटीवर वाजवून पहिल्या. नंतर त्या भिकाऱ्याला पोटभर जेवायला घातले. चांगले कपडे दिले व पाच रुपये त्याच्या हातावर ठेवले. तो भिकारी गोविंरावांना दुवा देत निघून गेला. एवढे लौकीकवान गोविंदराव टेंबे, पण त्यांनी सामान्य भिकाऱ्याकडून काही शिकण्यात कमीपणा मानला नाही. मग ते कोणाकडूनही मिळो, ते घेण्याची वृत्ती हवी. 
 *तात्पर्य :* सावध चिते शोधावे । शोधोनी अचूक वाचावे । वेचोनी उपयोगावे । ज्ञान काही।
  49) 👑🎤*बोधकथा - गुरु केले कासवाला
कोणे एके काळी एका नगरात एक वृद्ध एकटाच राहत होता. छोट्याशा झोपडीत राहून तो आजूबाजूच्या शेतात छोटीमोठी कामे करून स्वत:ची गुजराण करत असे. आपल्या गरजा त्याने खूपच मर्यादित ठेवल्या असल्याने त्याला फारसा खर्च येत नसे. मात्र हे असताना त्याने एक कासव पाळले होते आणि त्या कासवावर त्याचा फार जीव होता. दुपारी आपले जेवण तयार करताना तो कासवासाठी हरभरे भिजवून त्याला देत असे. रिकामा वेळ असताना तो त्या कासवाशी संवाद साधत असे. आजूबाजूचे लोक त्याचे ते कासवप्रेम पाहून हसत असत. एके दिवशी एक परिचित मनुष्य त्याला भेटण्यासाठी आला. थोडा वेळ इकडचे तिकडचे बोलून झाल्यावर त्याने त्या कासवाला पाहिले व तो मनुष्य म्हणाला,'' तू इतका घाणेरडा प्राणी कशासाठी पाळला आहेस. सोडून दे त्या कासवाला.'' त्याच्या बोलण्याने वृद्धाला खूप वाईट वाटले. वृद्ध म्हणाला,''अरे मित्रा, तू असे बोलून माझ्या काळजाला हात घातला आहेस. इतके वाईट तर मी कधीच त्या कासवाबद्दल माझ्या मनात किंवा स्वप्नातसुद्धा विचारत आणत नाही. ते कासव माझ्या गुरुस्थानी आहे म्हणून माझ्या मनात त्याच्याबद्दल खूप आदर आहे.'' तो माणूस म्हणाला,''ते कासव तुझे गुरु कसे काय बरे ठरते'' वृद्ध म्हणाला,'' कासव हे मानवी मनाचे प्रतिक आहे. कासव आपल्याला हे शिकवते की त्याच्यावर जरा जरी संकटाची चाहूल लागली तरी ते जसे स्वत:चे अंग आक्रसून कवचाखाली जाते त्याप्रमाणेच मानवाने वाईट गोष्टींची जराशी चाहूल जरी लागली तरी त्यापासून लांब राहिले पाहिजे. कासवाप्रमाणे आपण आपल्या मनाला वाईट गोष्टींपासून अंग चोरण्याचा प्रयत्न केला तर मानवाचे त्यात भले आहे.''

 50) 👑🎤*बोधकथा - संस्कार
अनेक वर्षांपूर्वी बकुमार नावाचा कुख्यात दरोडेखार होऊन गेला. सिंधुराज राजाच्या राज्यात त्याने लोकांचे जगणे मुश्किल करून टाकले होते. तो श्रीमंतांना तर लुटत असेच, परंतु गरिबांनाही सोडत नसे. गोरगरीब शेतकरी, कामगारांनी आयुष्यभर कष्ट करून कमावलेले चार पैसे हडप करण्यास तो जराही संकोच बाळगत नसे. लोक त्याला हात जोडून विनवण्या करत असत. परंतु त्याला तो मुळीच भीक घालत नसे. अत्यंत निर्दयीपणे त्याचा लूटमारीचा धंदा सुरूच होता व त्याचे क्रौर्य दिवसेंदिवस वाढत होते. हजारो निरपराध लोकांच्या त्याने हत्या केल्या. जो कुणी त्याला विरोध करील, त्याला क्षमा करणे तर दूरच, त्यांना तो जिवंत सोडत नसे. सिंधुराज राजासमोर नागरिकांनी एकत्रितरीत्या बकुमारविरोधात तक्रार केली. त्यानंतर राजाने सगळी सेना त्या दरोडेखोराच्या मागावर सोडली. बकुमार अनेक महिने सैन्याला चकवा देऊन धुमाकूळ घालतच राहिला. परंतु त्याला पकडण्यात सैनिकांना एके दिवशी यश आलेच. त्याला राजासमोर हजर करण्यात आले. राजाने त्याला ताबडतोब फासावर लटकवण्याची आज्ञा दिली. बकुमारला झालेली शिक्षा ऐकून त्याचे अनेक नातेवाईकही त्याला येऊन भेटायला आले. त्याची आईदेखील त्याला भेटण्यास आली. परंतु आई सोडून तो सर्वांना भेटला. आईला मात्र त्याने भेट नाकारली. याचे कारण विचारले असता तो म्हणाला, ‘लहानपणी मी सर्वप्रथम एक सुवर्णमुद्रा चोरली होती. ही चोरलेली मुद्रा मी आईला नेऊन दिली. त्या वेळी तिने माझी प्रशंसा केली, माझ्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. जर तिने मला त्याच दिवशी फटकारले असते, चापट मारली असती तर हे दिवस पाहावे लागले नसते व मी दरोडेखोरही झालो नसतो.’
तात्पर्य - पाया मजबूत आहे की ठिसूळ यावरच इमारत किती मजबूत असेल हे ठरत असते. तशाच प्रकारे मुलांवर लहानपणीच चांगले संस्कार केले गेले तर त्याच्या चांगल्या चारित्र्याचा पाया रचला जातो. वाईट संस्कार माणसाला अधोगतीच्या मार्गावर घेऊन जाण्यास कारणीभूत ठरतो.
 51) 👑🎤*बोधकथा - कथेचे नाव चांगला राजा
एकदा एका तळ्यातला बेडकांना वाटले, की आपल्याला एक राजा हवा. म्हणून त्यांनी देवाकडे तशी मागणी केली. तेव्हा देवाला हसूच आले व त्याने 'हा घ्या राजा !' म्हणून एक लाकडी ओंडका तळ्यात टाकला. तो पाण्यावर पडताच पाणी उसळले. ते पाहून सगळे बेडूक घाबरले आणि बाजूला जाऊन बसले. थोड्या वेळाने पाणी शांत झाल्यावर तो ओंडका काही हालचाल करीत नाही असे पाहून त्याच्यावर चढले व उड्या मारू लागले. मग त्यांना वाटले की या राजापेक्षा दुसरा चांगला राजा हवा. तेव्हा त्यांनी देवाची प्रार्थना करून दुसरा चांगला राजा पाठवण्याची विनंती केली. देवाने एक बगळा पाठविला. त्याने बेडकांना मारून खायला सुरुवात केली. म्हणून बेडकांनी देवाकडे अजून चांगल्या राजाची मागणी केली. ते ऐकून देव म्हणाला, 'मी तुम्हांला पहिला राजा पाठवला होता तो तुम्हांला आवडला नाही. आता तुमचं कर्म तुम्हीच भोगा.'
तात्पर्य- देवाने ज्या स्थितीत ठेवले आहे त्यात समाधानी असावे
52) 👑🎤*बोधकथा - कोल्हा
एका कोल्ह्याचे शेपूट लोखंडी सापळ्यात सापडले असता ते तोडून तो पळाला. प्रथम त्याला आनंद झाला की प्राणांवरचे शेपटीवर निभावले. पण जेव्हा तो आपल्या मंडळीत जाऊ लागला, तेव्हा त्याला आपल्या लांडेपणाचे फार वाईट वाटून तो मनात म्हणाला, 'मी मेलो असतो तर बरं झालं असतं. पण ही अप्रतिष्ठा वाईट, पण जे झाले त्याला उपाय नाही. आता हेच कसं शोभवून नेलं म्हणजे झालं ! यासाठी काय बरं युक्ती करावी ?' याचा तो विचार करीत असता त्याला एक युक्ती सुचली ती अशी की आपण सर्व कोल्हे मंडळींना एकत्र जमवून सांगावे की, 'माझी शेपटी मी तोडून टाकून ही भूषणाची नवी पद्धत काढली आहे. ही चांगली आहे अन् तुम्हीसुद्धा अवश्य करावं.' मग त्याने सगळ्या कोल्ह्यांना आपल्या घरी बोलावले व आपल्या युक्तीप्रमाणे त्यांच्यापुढे भाषण दिले. तो म्हणाला, 'अहो, या शेपटीपासून काहीच फायदा नाही. आपल्याला शेपटी म्हणजे ओझंच. शेपटी तोडून टाकल्यानं एक प्रकारचं सौंदर्य येऊन शिवाय पळण्यातली अडचण दूर होते. मी ह्या गोष्टीचा अनुभव घेतला आहे नि शेपटी तोडल्यापासून सुखी आहे. हे सुख तुम्हाला प्राप्त व्हावं असं मला वाटलं.' इतके बोलून आपले कितीजण ऐकतात हे पाहण्यासाठी तो सगळ्यांकडे पाहू लागला. इतक्यात एक म्हातारा कोल्हा त्याची लबाडी ओळखून मान वाकडी करून म्हणाला, 'अहो, पंडित महाराज, आपली हुषारी पुरे. शेपटी काढल्यामुळे तुमचं कल्याण झालं असेल, यात शंका नाही. अन् आमच्यावर जेव्हा वेळ येईल तेव्हा आम्हीही आपली शेपटी कापून टाकू. तोपर्यंत तुम्ही आम्हाला आग्रह करू नये हेच बरं.'
तात्पर्य- आपली अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आपले दोष हे नसून गुण आहेत असे बरेचजण सांगतात पण शहाणे लोक त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाहीत.
 53) 👑🎤*बोधकथा - जगण्याचे भान
एक तरुण माणूस फार छान्दिष्ट व उधळ्या होत्या. त्याने आपली सगळी मिळकत दारू, जुगार सारख्या व्यसनात घालविली. मग तो दरिद्री होऊन भिकार्यासारखा अरण्यात फिरू लागला. हिवाळ्यात एके दिवशी चांगले कडक उन्ह पडले होते. अशा वेळी तो माणूस नदीकाठी फिरत असता जवळच्या एका आंब्याच्या झाडावर एक कोकिळा बसलेली त्याने पाहिली. कडक उन्ह व कोकिळा पाहून त्याला वाटले की, खरंच उन्हाळा आला व आता पांघरुणाची काही गरज नाही, असा विचार करून त्याने आपले काही कपडे गहाण ठेवले व पैसे काढून तो आपल्या मित्राबरोबर जुगाराचा डाव खेळायला गेला. तेथे त्याने सगळे पैसे जुगारात घालविले. संध्याकाळी थंडी पडली; तेव्हा त्याला थंडीमुळे आजारपण आले. उन्हाळा असून असे कसे झाले याचे आश्चर्य करीत तो पुनः नदीवर गेला तर तेथे तो कोकीळ पक्षी थंडीने गारठून झाडाखाली मरून पडलेला त्याला दिसला. तो प्रकार पाहून तो चांगलाच शुद्धीवर आला व मग त्या पक्ष्याला म्हणाला, 'अरे, मी तुझ्यावर विश्वास ठेवून आपले कपडे गहाण ठेवण्याचा मूर्खपणा केला, तू मला फसवलंस आणि स्वतःचाही नाश करून घेतलास.'
तात्पर्य- व्यसनी माणूस काही वेळा इतका बेसावध असतो की, त्याला सभोवतालच्या गोष्टीचेही भान रहात नाही.
 54) 👑🎤*बोधकथा - अविचार
एका शिकार्याने रानात एक कोल्हा पाहिला. तो इतका सुंदर दिसत होता की, त्याचे कातडे आपल्याजवळ असावे अशी त्या शिकार्याला इच्छा झाली. त्याने त्या कोल्ह्याचे बीळ शोधून काढले व त्या बिळाच्या तोंडापुढे एक खड्डा खणला. नंतर त्या खड्ड्यात काही वाळलेली झुडपे घातली व त्यावर मोठा मांसाचा तुकडा ठेवला. कोल्हा तो मांसाचा तुकडा पाहून तेथे येईल व खड्ड्यात पडेल असे त्याला वाटले. सर्व तयारीनंतर तो शिकारी एका झाडापाठीमागे लपून बसला. थोडया वेळाने कोल्हा बाहेर आला व समोरच असलेला मांसाचा तुकडा पाहून तो खावा असे त्याला वाटले; पण त्यात काहीतरी कट असावा असे वाटून तो पुन्हा आपल्या बिळात जाऊन बसला. इतक्यात एक वाघ तेथे आला. काही विचार न करता त्याने त्या मांसाच्या तुकड्यावर झडप घातली व तो खड्ड्यात पडला. त्याच्या पडण्याचा आवाज त्या शिकार्‍याने ऐकला व तो धावत तेथे गेला. खड्ड्यात कोल्हा पडला असे समजून त्याने खड्ड्यात उडी मारली, तेव्हा वाघाने त्याला फाडून खाल्ले.
तात्पर्य- अविचाराने नेहमी अनर्थ घडत असतात.
 55) 👑🎤*बोधकथा - अतिरेक नको
एकदा एक राजहंस एका बगळ्यास म्हणाला, 'काय रे तू आधाशी ! पाण्यातला कोणताही प्राणी खायला तू मागेपुढे पहात नाहीस. बरं-वाईट, नासकं हा फरकसुद्धा तुझ्या खादाड जिभेला समजत नाही. माझं पहा, मी फक्त पूर्ण उमललेल्या कमळातले तंतु तेवढे खाईन, दुसरा कसलाही पदार्थ माझ्या घशाखाली जाणार नाही.' त्यावर बगळा म्हणाला, 'माझ्या दृष्टीने असा चोखंदळपणा असणं बरं नव्हे. ज्या वेळी जे मिळेल ते खावं अन् सुखी राहावं. खाण्याचा पदार्थ दिसला की तो खावा हेच शहाणपणाचं. असे म्हणून बगळा उडाला व जवळच्या तलावाकाठी गेला. तेथे कडेला एक मासा दिसला. तेव्हा विचार न करता त्याने तो एकदम गिळला, पण आत असलेला गळ घशाला लागून तो जिवास मुकला. राजहंस आपले आवडते खाणे दुसर्‍या कमळे असलेल्या तळ्यात गेला, पण तेथे हंस धरण्यासाठी जाळे लावले होते, त्यात तो सापडला.
तात्पर्य- कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको.
 56) 👑🎤*बोधकथा - बाप आणि मुली
एका गृहस्थाला दोन विवाहित मुली होत्या व त्या दोघीही एकाच गावात राहत होत्या. एका मुलीचे लग्न व्यवसायाने कुंभारकाम करणा-या मुलाशी झाले होते तर दुसरीचे लग्न शेतकरी मुलाशी झाले होते. दोघींचेही संसार अगदी सुखात चालू होते.
एके दिवशी कोणत्यातरी कारणाने त्या दोघीही मुली आपल्या माहेरी परत आल्या तेव्हा वडिलांनी मुलींना विचारले,’’तुमचे दोघींचेही कसे काय सुरु आहे? आपल्या संसारात दोघीही सुखी आहात ना.’’ शेतक-याशी लग्न झालेली मुलगी म्हणाली,’’ बाबा मी सर्व दृष्टींनी सुखी आहे. तुम्ही देवभक्त आहात म्हणून तुम्हाला एक सांगते की, माझ्यासाठी एक विनंती देवाकडे करा की यंदा पाऊसकाळ जरा लवकर सुरु होऊ दे म्हणजे आमच्या शेतात भाजीपाला चांगला पिकेल व आम्हाला जरा चांगले उत्पन्न मिळेल.’’ हे ऐकताच कुंभाराकडे लग्न होऊन गेलेली मुलगी म्हणाली,’’ बाबा हिच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही देवाची मुळीच प्रार्थना करू नका. उलट तुम्ही देवाला अशी विनंती करा की निदान येता एक महिना तरी पाऊस पाडू नकोस म्हणून. कारण माझ्या धन्याला मडकी पक्की भाजण्यासाठी आवे लावता येतील आणि चांगली भाजलेल्या मडक्यांना बाजारात चांगला भाव मिळून आम्हाला चांगले उत्पन्न मिळेल.’’ दोन मुलींच्या या परस्परविरुद्ध मागण्या ऐकून ‘काय करावे’ हे कळेनासे होऊन तो गृहस्थ मुलींना म्हणाला,’’ मुलींनो मी तुमच्या दोघींचीही विनंती देवाकडे सांगतो पण यात निर्णय काय घ्यायचा तो देवालाच घेऊ दे.’’
तात्पर्य – जेव्हा आपल्याच माणसांकडून आपल्याला परस्परविरुद्ध गोष्टी करण्यासाठी गळ घातली जाते तेव्हा कुठलीच गोष्ट न करणे हे हितावह ठरते.
 57) 👑🎤*बोधकथा - सोन्याचा मुकुट आणि चांदीचे पाय
एका मोठ्या शहरात भगवान श्रीविष्णुचे मोठे मंदिर होते. रोज अनेक भक्त त्या मंदिरात दर्शनासाठी येत असत. हळूहळू मंदिराची ख्याती वाढू लागली, भक्तांची गर्दी होऊ लागली, मंदिराचा विस्तार होऊ लागला मग काही लोकांनी ठरविले. भगवान विष्णुला एक सोन्याचा मुकुट करावा. त्यासाठी निधी गोळा करण्याचे ठरविले. गावाच्या बाजूलाच एक अनाथ, अपंग मुलांचा आश्रम होता. त्या आश्रमालाही गावातील काही लोक दानधर्म करत. गावात भिकुशेठ नावाचे एक श्रीमंत सावकार राहात होते. भिकुशेट आपल्या पैशातून, नफ्यातून काही वाटा हा दानधर्मासाठी वापरत असत. भक्तमंडळींना वाटले की भिकुशेटसारखा दिलदार मनाचा माणूस आपल्याला मदत करेल. सगळे मिळून भिकुशेटकडे गेले. भक्तमंडळीना आपल्या पेढीवर आलेले पाहून भिकुशेटला मोठा आनंद झाला. त्यांनी भक्तांचा मोठा आदरसत्कार केला. लोकांनी भगवान श्रीविष्णुसाठी सोन्याचा मुकुट करण्याचे सांगितले व भिकुशेटकडून मदतीची मागणी केली. यावर भिकुशेट म्हणाले,''मंडळी मी तुमच्या कामात काही मदत करू शकत नाही कारण मी विष्णुला सोन्याचा मुकुट करण्यापेक्षा चांदीचे पाय करण्याचा विचार करत आहे.'' लोक म्हणाले आम्हाला निश्चितकाय ते खरे सांगा. भिकुशेट सर्वांना दोन दिवसांनी येण्यासाठी सांगितले. दोन दिवस निघुन गेले. लोक पुन्हा भिकुशेटच्या पेढीवर गेले असता भिकुशेटच्या शेजारी एक लहान मुलगा बसला होता.
भिकुशेटने त्या मुलाला उठायला सांगितले. त्या मुलाला दोन्ही पाय नव्हते. मग भिकुशेटच्या नोकराने एका पेटीतून दोन वस्तू काढल्या ते कृत्रिम पाय होते ते त्या नोकराने त्या अपंग मुलाला व्यवस्थितपणे बसविले. मुलगा हळूहळू चालू लागला. भिकुशेट म्हणाले,'' भक्तांनो, या मुलाचे नाव विष्णु, हा अपंग असून अनाथ आहे. याला पाय नव्‍हते म्हणून मी शहरातून हे पाय विकत आणले असून तो आता हिंडू फिरू शकतो. त्या विष्णुला सोन्याचा मुकुटाचा तसा फारसा उपयोग नव्हता पण या विष्णुला पायांची गरज होती. मी याला दिलेले कृत्रिम पाय याच्या दृष्टीने सोन्याचांदीपेक्षा जास्त महत्वाचे आहेत.''
तात्पर्य - मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा
58) 👑🎤*बोधकथा - वक्ता आणि श्रोते
एक विद्वान वक्ता एका अतिशय महत्वाच्या विषयावर तळमळीने भाषण देत होता. मात्र श्रोत्यांची चुळबुळ सुरु होती. काहीजण इकडे बघ तर काहीजण रस्त्यावर खेळणा-या लहानमुलांकडे बघत होते. तेव्हा श्रोत्यांचे आपल्या व्याख्यानाकडे अवधान खेचून आणण्यासाठी वक्त्याने एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. कथेची सुरुवात होताच जादूची कांडी फिरल्याप्रमाणे सर्व श्रोते अतिशय सावधपणे गोष्ट ऐकू लागले. वक्ता म्हणाला,'एकदा एक देव, एक पाणसर्प आणि एक चिमणी हे तिघे एकत्रितरित्या प्रवासाला निघाले. चालता चालता त्यांना वाटेत एक नदी लागली. चिमणीने उडून पैलतीर गाठला. पाणसर्प पाण्यातून पोहत पोहत पलीकडे पोहोचला.'' बस्स इतकेच असे सांगून वक्त्याने आपले अर्धवट राहिलेले भाषण चालू केले. श्रोते आता जोरजोराने ओरडू लागले,'' अहो वक्तेमहाशय, देवाचे पुढे काय झाले, त्याने कशी काय नदी पार केली. त्या तिघांचे पुढे काय झाले.'' वक्त्याने शांतपणे उत्तर दिले,''देवच तो; तेव्हा ती नदी पार करून जाण्याचे सामर्थ्य त्याच्याठायी असणे सहाजिकच आहे. तो पाण्यावरूनही चालत गेला असेल किंवा पाण्याला बाजूला सारून जाण्याचीही त्याच्यात होती पण तो अलिकडच्याच तीरावर थांबला.'' श्रोत्यांनी मोठ्या उत्कंठेने विचारले की देवाने असे अलिकडेच थांबण्याचे कारण काय. यावर वक्ता म्हणाला,'' ज्या मूर्खाना महत्वाच्या विषयावरचे असणारे व्याख्यान न आवडता मनोरंजक गोष्टी आवडतात त्या मुर्खांचा विचार करत देव नदीकिनारी बसून आहे. जर तुम्ही या महत्वाच्या विषयाबद्दल माझे विचार ऐकून त्यावर काही उपाय केले व आपल्या राज्याला वाचविले तर देव निश्र्चित पलीकडच्या तीरावर निघून जाईल'' वक्त्याचा चतुरपणा कामी आला व श्रोत्यांनी पुढील व्याख्यान शांतपणे ऐकून घेतले.
तात्पर्य :- काहीवेळेस आपल्या चांगल्या व देशहिताच्या योजना लोकांच्या गळी उतरविण्यासाठी युक्तीप्रयुक्तीचा वापर करावाच लागतो.
59) 👑🎤*बोधकथा - वेळ
लष्करातला एक घोडा रस्त्याने चालला होता. त्याच रस्त्याने पाठीवरून ओझे घेऊन जाणा-या एका गाढवाला घोड्याने पाहिले व म्हणाला,''अरे मूर्ख प्राण्या, पटकन बाजूला हो नाहीतर माझ्या पायाखाली फुकट तुडविला जाशील.'' त्याचे ते उर्मटपणाचे बोलणे ऐकून ते गाढव निमूटपणे बाजूला झालं पण त्या घोड्याचा उमदेपणा व त्याचा रूबाब, ऐट पाहून ते गाढव मनातल्या मनात म्हणालं,''देवा, हा जन्म मला ओझे वाहणा-या गाढवाचा दिला आहेस पण पुढचा जन्म मात्र मला अशा लष्करी, उमद्या जातीच्या घोड्याच्याच पोटी घाल मात्र याचा उर्मटपणा मला देऊ नकोस.''
थोड्याच दिवसांनी एका लढाईत तो घोडा जखमी झाला व लढाईच्या दृष्टीने निकामी झाला तेव्हा त्याच्या सरदार मालकाने त्याला एका कुंभाराला विकले. त्या घोड्याच्या दुर्दैवाने त्याचा मालक व त्या गाढवाचा मालक एकच होता. दोघांनाही आता कुंभाराचे साहित्य घेऊन बाजारात जाणे भाग असे. त्या उमद्या पण जखमी घोड्याला आपल्यासारखेच ओझे वाहताना, हमाली करताना पाहून आता गाढवाने पुन्हा प्रार्थना केली,'' हे देवा, या लष्करी घोड्याचा शेवटचा काळ किती कठीण आहे रे, प्रथम वैभव भोगून हा आता अत्यंत कठीण दिवस काढत आहे, याच्या चलतीच्या काळात हा उन्मत्तपणे वागल्यामुळे याच्या या परिस्थितीबद्दल कोणालाही याच्याबद्दल सहानुभूतीही राहिली नाही. देवा, असा उद्दाम व उर्मट घोडा बनण्यापेक्षा मी आहे तो गाढवच बरा आहे.''
तात्पर्य :- तुम्ही रसिक वाचक कथेतील मर्म जाणून घ्याल अशी अपेक्षा आहे.
60) 👑🎤*बोधकथा - सवय
एका माणसाने त्याच्या घरी एक पोपट पाळला होता. पिंज-यात ठेवलेल्या पोपटाला चांगले खायलाप्यायला मिळत असे व पोपट बोलका असल्याने घरातील लोकांकडून त्याचे फार कौतुकही केले जाई. पण पोपटाच्या मनात मात्र पारतंत्र्याचे शल्य दाटून येई. अखेर एकेदिवशी पोपटाला संधी चालून आली. त्या माणसाने पोपटाला खाणे देण्यासाठी पिंज-याचे दार उघडले होते व त्याच्याहातून ते तसेच उघडे राहिले होते. माणसाला अचानक काही काम आल्याने तो ते दार उघडे टाकून निघून गेला असता पोपट पिंज-याच्या बाहेर निघून गेला. पण लहानपणापासूनच पिंज-यात राहिला असल्याने त्याला फारसे नीट उडताच येत नव्हते. एका झाडावर गेला असता त्याला इतर पोपटांशी बोलता येईना कारण लहानपणापासूनच तो परकी भाषा शिकत असल्याने त्याला पोपटांची भाषा येत नव्हती म्हणून इतर पोपटही त्याला सहकारी मानत नव्हते. पिंज-यात आयते खायची सवय असल्याने त्याला अन्न मिळवणे अवघड जाऊ लागले व ऊन वारा पाऊस यांची कधीच सवय नसल्याने तो आजारी पडला व मरून गेला.
तात्पर्य : - जास्त काळ पारतंत्र्यात(गुलामगिरीत) राहिल्याने तशीच गुलामगिरीची सवय अंगात मुरुन राहते. मग परक्याची भाषा, संस्कृतीच आपली वाटू लागते आणि मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्यासाठीची जिद्द अंगी राहत नाही. परक्या संस्कृतीचे चांगले काही घेताना आपल्या संस्कृतीचे विस्मरण होऊ न देणे हाच खरा शहाणपणा.
61) 👑🎤*बोधकथा -  धनाचा विनियोग 
एकदा एक कोल्हा जमिनीत बीळ खणत असताना खूपच खोल खणत गेला. खूप खोल गेल्यावर त्याला तिथे एक धनाचा हंडा दिसला व त्यावर एक वृद्ध नाग त्या धनाचे रक्षण करत होता. कोल्ह्याने नागाला विचारले,''हे नागदेवता, तुम्ही इथे काय करता आहात.'' नाग म्हणाला,'' माझ्या पूर्वजांनी पुरून ठेवलेल्या धनाचे मी रक्षण करत आहे.'' मग कोल्हा पुन्हा म्हणाला,'' पण इथं इतकं मोठं धन असताना तुम्ही कधी त्याचा उपभोग घेतला आहे किंवा नाही. उपभोग सोडा थोडंफार धन दानापोटी तरी खर्च केलंत काय'' नाग म्हणाला,'' कसं शक्य आहे, हे धन कमी होऊ नये म्हणून तर मी स्वत: या धनाचे रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून रक्षण करत आहे. त्याचा उपभोग घेणे किंवा दुस-याला दान देणे ह्यापेक्षा या धनाचे रक्षण करण्यातच मला जास्त आनंद आहे.'' हे ऐकून कोल्हा नागाला म्हणाला,'' मग नागदेवा, तुमच्या असल्या या श्रीमंतीपेक्षा मी गरीब आहे तोच बरा. ज्या धनाचा उपभोग घेतला जात नाही व ज्यातून दान केले जात नाही अशा धनाचा काय उपयोग''
तात्पर्य - ज्या धनाचा योग्य विनियोग न होता केवळ संचय केला जातो त्या धनाचा मनुष्यमात्राला काहीच फायदा नाही.
62) 👑🎤*बोधकथा -  परोपकार
एका गावात एक निर्धन मनुष्य राहत होता. परिस्थिती गरीबीची असूनही तो मनाने उदार होता. आपल्या घासातील घास देण्‍यासही तो कमी पडत नसे. एकदा एका शेठजीकडे तो जेवावयास गेला असताना त्या शेठजीने त्याला पंचपक्वान्नाचे ताट वाढून दिले. ती भरगच्च पदार्थांनी भरलेली थाळी बघून त्या गरीबाला वाटले की यातून किमान तीन माणसांची भूक भागू शकेल. त्याने शेठजीची परवानगी मागितली व त्यातील अन्न त्याने बरोबर घेतले व घराकडे जाण्यास निघाला. रस्त्यात त्याला एक भिकारी भेटला त्याला त्याने खायला दिले. त्यातून उरलेले अन्न घेऊन तो घरी आला, तो जेवायला बसणार इतक्यात एक भिक्षुक या माणसाच्या घरी आला व त्याने त्याला अन्नदान करण्याची विनंती केली. गरीबाने त्याच्यासमोरील ताट त्या भिक्षुकाच्या स्वाधीन केले. त्यानंतर अजून एक अपंग व्यक्ती दाराशी आली त्यानेही या गरीबाकडे अन्न मागितले त्यालाही याने आपल्या थाळीतील अन्न खायला दिले. आता याच्याकडे देण्यासारखे काहीच शिल्लक राहिले नाही तेव्हा याने स्वत:ची भूक भागविण्यासाठी एक भांडेभर पाणी घेतले तर समोरून एक वृद्ध व्यक्ती आली व तिने ते पाणी पिण्यासाठी मागितले. याला आता खाण्यापिण्यासारखे काहीच उरले नाही तरीही ही व्यक्ती समाधानात होती आजचा दिवस आपल्यामुळे किमान चार लोकांना तरी खाण्यापिण्यास मिळाले. तो ह्याच विचारात असताना तेथे देव प्रगटले व म्हणाले,'मी तुझी परीक्षा घेण्यासाठीच भिकारी, भिक्षुक, अपंग आणि वृद्ध व्यक्तिचे रूप घेतले होते व तुझ्याकडून काही ना काही मिळते का नाही हे पाहिले आणि तु स्वत:चा विचार न करता दुस-याचा जीव जाणून घेतलास व देत राहिलास. आता या पुढे तुला काहीच कमी पडणार नाही असा मी तुला वर देतो.'' इतके बोलून देव अंतर्धान पावले.
तात्पर्य - देण्यातच खरे सुख लपलेले आहे. कुणाचाही घास हिरावून घेण्यापेक्षा कुणाला तरी एखादा घास देता कसा येईल याचा विचार करणे यातच खरे सुख लपलेले आहे.
63) 👑🎤*बोधकथा - दृष्टीकोन बदला
एक झाड सुंदर फळाफुलांनी बहरून गेले होते. सुंदरता आणि संपन्नतेमुळे पक्षी अधिक प्रमाणात त्या झाडावर राहत होते. झाडही आनंदाने आश्रय आणि भोजन देत होते. तसेच वाटसरूंना सावली देण्याचे कार्यही झाड प्रामाणिकपणे करत होते त्यामुळे वाटसरूंचे आशीर्वाद झाडाला मिळत असत. त्यामुळे झाडाजवळ सदैव प्रसन्नता असायची मात्र कालांतराने झाडाला या गोष्टीचा गर्व झाला आणि माझ्यासारखे दुसरे झाडच नाही, सगळ्या झाडात मीच श्रेष्ठ आहे असा भ्रम त्याला झाला. काही काळाने झाडाला फळे फुले येण्याचे बंद झाले, पानांची गळती सुरु झाली. सावली नसल्याने वाटसरू येईनात, फळे नसल्याने पक्षी राहिनात अशी अवस्था झाली. झाडाला वाईट वाटले त्याने तेथून जाणा-या एका सिद्धपुरुषाला विचारले की माझ्या आयुष्यभर मी सर्वांची सेवा केली पण माझ्या या वृद्धापकाळी माझी कोणी साधी विचारपूस सुद्धा का करीत नाहीत. काही लोक तर मला तोडण्याची भाषा करत आहेत. सिद्धपुरुष म्हणाले, अरे वृक्षराजा, तू विचार करण्याची पद्धत बदल, जीवनभर लोकांच्या कल्याणसाठी राबणारा हा तुझा डोलारा आता तुझ्या मृत्युनंतरही उपयोगी पडणार आहे. तुझ्या लाकडाचे अनेक उपयोग माणसाच्या कल्याणासाठी होणार आहेत. मरूनही तू चिरंतन माणसाच्या स्मरणात राहणार आहेस. तेव्हा तू तुझ्या मरणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदल. हे ऐकून वृक्षाला आनंद वाटला व त्याने दु:ख न मानण्याचे ठरवले.
तात्पर्य : कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास त्यातील चांगल्या बाबी लक्षात येतात. मात्र नकारात्मक विचारसरणीने नुकसान होण्याचीही शक्यता असते.
64) 👑🎤*बोधकथा - लोभापायी नुकसान
कोणे एके काळी बलवंतपूर हे चतुरसेन पहिलवानासाठी फार प्रसिद्ध शहर होते. चतुरसेन पहिलवान हा अत्यंत चतुर असल्याने त्याचे नाव चतुरसेन पडले होते. त्याच्या ताकदीचे व चातुर्याचे किस्से पंचक्रोशीत प्रसिद्ध होते त्यामुळे त्याच्या फारसे कोणी वाटेला जात नसे. एकेदिवशी दुस-या राज्यातुन रामशरण नावाचा एक पहिलवान त्या गावातून जात होता. गावात त्याने चतुरसेनची कीर्ति ऐकली. गावक-यांनी त्याला कुस्ती लढण्याचा आग्रह केला. दोघांमधील विजेत्यास हजार रुपयांच्‍या इनामाची घोषणा केली. कुस्तीस आरंभ झाला आणि पहिल्यापासूनच रामशरणने आघाडी घेतली. आपण लवकरच हरणार आहोत हे समजायला चतुरसेनला फारसा वेळ लागला नाही व त्याने पटकन रामशरणच्या कानात सांगितले की मित्रा जर तु जिंकलास तर तुला हजार रूपये मिळतील पण तू जर हरला तर मी तुला गुपचुपपणे दोन हजार रूपये देईन. यामुळे माझी गावातील इज्जतही टिकून राहिल आणि तुलाही दुप्पट पैसे मिळतील. रामशरणने सहजपणे चतुरसेनाच्या चतुर बोलण्याचा बळी ठरला व पैशांच्या लोभाने त्याच्यावर विश्वास ठेवून कुस्ती हारला. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाल्यावर सर्व निघून गेले व चतुरसेनाकडे रामशरण गेला व म्हणाला, मित्रा तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी कुस्ती हरलो आता माझे पैसे दे. यावर चतुरसेन म्हणाला, कसले पैसेबिसे घेऊन बसलास, कुस्तीत शारीरिक डावपेच तर लढवले जातात पण हा मानसिक डावपेच तुला माहित नव्हता यात रूपयापैशांचा विचार कुठे आला. तु लोभामुळे हरला आहेस जा तुझ्या गावाला.
तात्पर्य : लोभापायी सर्वस्वाची हानी होऊ शकते तेव्हा लोभापासून दूर असलेले बरे.
65) 👑🎤*बोधकथा -  वाईट सवयींचा त्याग
एक व्यापारी होता. तो जितका व्यवहारी, विनम्र आणि मनमिळाऊ होता तितकाच त्याचा मुलगा उद्धट आणि गर्विष्ठ होता. त्याला सुधारण्याचे अनेक प्रयत्न निष्फळ ठरले. एकदा ही गोष्ट त्याने एका मित्राला सांगितली. मित्र म्हणाला, त्याला माझ्याकडे काही दिवस राहण्यासाठी पाठवून दे. मी तुझ्या मुलाला ठिकाणावर आणून दाखवेन. त्या व्यापा-याचा मुलगा मित्राच्या घरी राहण्यास गेला. त्याच्या वडिलांच्या मित्रांनी त्याला अतिशय चांगली वागणूकदिली. एकदा ते त्याला बागेत फिरावयास घेऊन गेला असता, एक फूट उंचीचे रोप त्याला उपटण्यास सांगितले. मुलाने ते रोप सहजच उपटले, त्‍यानंतर त्याने मुलाला सहा फूट उंचीचे रोप उपटण्यास सांगितले, मुलाला ते उपटण्यास खूप ताकद लावावी लागली. शेवटी ते एका उंच वृक्षाजवळ आले व मित्रांनी मुलाला तो वृक्ष उपटून टाकण्यास सांगितला. मुलाने ते शक्य नसल्याचे सांगितले. त्यावेळी मित्रांनी मुलाला उपदेश केला तो म्हणजे असा की,' आपण एखादे वाईट कामाला सुरुवात करत असतो तेव्हा त्यापासून दूर जाणे शक्य असते पण मात्र त्‍या कामात जर आपण खोलवर गुंतून गेलो की आपल्याला त्यापासून सुटका करणे अशक्य असते. वाईट सवयी किंवा वाईट वर्तनाचे सुद्धा असेच आहे, जोपर्यंत सहज शक्य आहे तोपर्यंत वाईट वर्तन किंवा सवय सोडलेली चांगली असते.'' मुलाला त्याच्या मित्रकाकांचा उपदेश सहजपणे लक्षात आला व त्याने चांगले वागण्याचे ठरवले.
66) 👑🎤बोधकथा - गर्वहरण
नदीच्या काठावर एक नारळाचे झाड होते. या झाडावर लागलेल्या नारळांना एक प्रकारचा गर्व चढला होता. तो नेहमी येणा-या जाणा-या वस्तूंना चिडवायचा पण त्याचा स्वभाव सगळेजण ओळखून होते. त्यामुळे त्यालाच कोणीच प्रत्युतर देत नसत. नदीमध्ये पडलेल्या दगडांचा तर नारळ खूप अपमान करीत असे. एकदिवशी तो नदीतल्या दगडाला म्हणाला,'' तुझी किती केविलवाणी परिस्थिती आहे, पहा! इथेच पडल्या पडल्या झिजून झिजून जाशील पण नदीचे पाय काही तू सोडणार नाहीस. ही नदी तुला देते तरी काय रे, अपमानालाही काही परिसीमा असते की नाही, मला पहा कशा प्रकारे उंच जागेवर आणि उच्च पदावर बसविले आहे.'' दगडाने त्याची बडबड ऐकून घेतली पण तो काही बोलला नाही. दोघेही आपापल्या स्थानी निघून गेले नारळ आता पूजेच्या थाळीत गेला होता. मंदिरात गेल्यावर नारळाने पाहिले की नदीतला दगड आता पूजास्थानी पोहोचला होता व शाळीग्राम म्हणून लोक त्याला पूजत होते. नारळाचा खूप संताप झाला की एका य:कश्चित दगडाच्या पूजेसाठी आपल्याला आणले गेले आहे पण तो काहीच करू शकत नव्हता. दगडाने त्याची मनस्थिती ओळखली व म्हणाला,'' नारळा, पहा झिजल्याचा कोणता परिणाम होतो. तेव्हा कधीच गर्व बाळगू नकोस.''
तात्पर्य : वेळ सारखी राहत नसते. गर्वाने वागणा-यांवरही कधी ना कधी मान खाली घालण्याची परिस्थिती येऊ शकते.
67) 👑🎤*बोधकथा- व्यंग*
     चेष्टा कसलीही करावी. पण, ती केवळ गंमत किंवा मस्करी म्हणूनच. एखाद्याच्या व्यंगावर चेष्टा करणे अथवा त्या व्यंगाचा उल्लेख करून चारचौघांत त्याचा अपमान करणे हे गैरच. ते सभ्यतेचे लक्षण नव्हे, पण एखाद्याने असे केलेच तर ती चेष्टा आपल्यावर उलटूही शकते, याचे भान ठेवावे. आपला पांडुरंग एकदा रस्त्यावरून ऐटीत चालला होता, तेवढ्यात समोरून किरण येताना दिसली. ती थोडीशी तिरळी होती. पांडुरंगचा स्वभाव मुळातच खवचट, त्यात तिरळे बघणारी किरण समोरून आलेली. पांडुरंग म्हणाला, "काय किरण! कसं काय ठीक आहे ना? कुठं चाललीस? आणि तुला म्हणे एका वस्तूच्या दोन वस्तू दिसतात. खरं का?" किरणच्या लक्षात आले की, हा आपली चेष्टा करतोय, आपणाला हिणवतोय. म्हणून ती म्हणाली, "खरं आहे हे ! आता हेच बघ ना, तुला दोन पाय आहेत ना? पण मला तुला चार पाय असल्याचं दिसत आहे !"
*तात्पर्य :* दुसऱ्याच्या व्यंगाला हसू नये. त्याचा उपहास करू नये.
68) 👑🎤 बोधकथा - सुसंवाद
एका शहरात एक दांपत्य राहत होते. पतीचा मोठा व्यवसाय होता. गावात पतीला चांगली प्रतिष्ठा होती. कामाच्या व्यापात तो दिवसभर व्यग्र राहत असे. आपल्या व्यग्र जीवनशैलीमुळे तो पत्नीला वेळ देऊ शकत नसे यामुळे पत्नी एकाकी पडत चालली होती. एकाकीपणाने ती कायमच अस्वस्थ राहायची, आपल्या मनातील गोष्टी ती कोणाला सांगूही शकत नव्हती. पतीला काही सांगायला जावे, तर तो उद्या ऐकू, परवा ऐकू असे सांगून तिच्यासमोरून निघून जायचा. एकेदिवशी दोघांत मोठे भांडण झाले. पती चिडून म्हणाला, '' तू तर माझ्या व्यवसायात मला काडीचीही मदत करत नाहीस, त्यामुळे मी माझ्या मुलाला वकीलच बनविणार आहे. तो निदान मला कोर्टाच्या कामात तरी मदत करेल.'' त्याचे हे बोलणे ऐकताच बायको भडकली आणि म्हणाली,'' तुम्हाला तर स्वत:चेच पडले आहे, माझ्याकडे लक्ष द्यायला कुठे तुम्हाला वेळ आहे. मी माझ्या मुलाला डॉक्टरच बनविणार आहे. जेणेकरून मी आजारी पडल्यावर तरी तो माझी काळजी घेईल.'' दोघेही आपल्या मुलाला काय बनवायचे यावरून जोरजोरात भांडू लागले, एकमेकांची उणीदुणी काढू लागले, भांडणाचा शेवट अगदी हातापायीपर्यत येऊन पोहोचल्यावर आजूबाजूचे लोक जमा झाले व त्यांच्यातील एका सज्जन माणसाने मध्यस्थ म्हणून तेथे प्रवेश केला व म्हणाला,'' अहो तुमचे दोघांचेही ठीक आहे, पण मुलाचा कोणत्या शाखेकडे कल आहे ते तरी बघा. त्याला काय व्हायचे ते त्याला ठरवू द्या ना. तुम्ही काय उगीच ठरवून त्याच्यावर तुमची मते लादत आहात.'' हे बोलणे ऐकताच नवराबायको एकदम गप्पच झाले. कारण त्यांना अजून मुलबाळ काहीच नव्हते आणि भविष्यात होणा-या मुलाच्या भवितव्याविषयी ते भांडत बसले होते. लोकांना ही गोष्ट कळताच त्यांनी त्या दोघांना अक्षरश वेड्यात काढले व आपला वेळ फुकट गेला म्हणून निघून गेले.
तात्पर्य - व्यर्थ गोष्टींवर वाद घालून कोणतीही गोष्ट साध्य होत नाही./ भविष्यातील गोष्टींची चिंता करण्यापेक्षा वर्तमानातील गोष्टींचा विचार करणे चांगले असते.
69) 👑🎤 बोधकथा - इंद्रियांवर ताबा
एक महात्मा रस्त्यातून घरी चालले होते. वाटेत त्यांना एक लिंबू विक्रेता दिसला. लिंबे रसाळ आणि ताजी होती. महात्म्याच्या तोंडाला पाणी सुटले. लिंबे खरेदी केली पाहिजेत असे त्यांना वाटले. त्यांनी लिंबाना निरखून पाहिले, ती स्वादिष्ट आहेत काय याचीही चौकशी केली पण जिभेच्या या चोचल्याचा मनाने धिक्कार केला. लिंबू पाहून तोंडाला पाणी सुटणे हा एक प्रकारचा लोभ आहे आणि तो साधनेच्या कार्यात अडथळा निर्माण करतो. महात्मा पुढे गेले परंतु त्यांचा जिभेचा शौक हार मानत नव्हता. त्यांची जीभ लिंबांचा स्वाद घेण्यासाठी आसुसली होती. ते परत लिंबूवाल्याकडे आले. त्याच्याकडील लिंबे निरखून पाहू लागले. परत एकदा मनाने धिक्कार केला आणि हातातील लिंबू खाली टाकून महात्मा परतले. चार पावले पुढे गेल्यावर परत एकदा त्यांच्या मनाने उचल खाल्ली आणि ते परत लिंबूवाल्याकडे आले. लिंबूवाला त्यांचे हेलपाटे पाहून आश्चर्यचकित झाला. त्याला हे कळेना की हे महात्मा सारखे का हेलपाटे मारत आहेत. यांना खरेच लिंबू खरेदी करायचे आहे की नुसतेच पाहत आहेत. शेवटी न राहवून त्याने विचारले,''महाराज, तुम्हाला जर लिंबे खरेदी करायची असतील तर अवश्य करा ना पण नुसतेच हेलपाटे का मारत आहात.'' शेवटी महात्म्यांनी दोन लिंबे खरेदी केली आणि घरी आले. घरी येताच त्यांनी पत्नीला चाकू मागितला. लिंबांचे दोन तुकडे केले. जसा पहिला लिंबाचा तुकडा तोंडाजवळ आणला तसा मनाने टोमणा मारला,''वा रे वा महात्माजी, तू तर या जिभेचा गुलाम झाला. जीभ जशी नाचवेल तसा तू नाचायला लागला. ती जे खायला मागेल तसा तू तिला खायला द्यायला लागला. आता तुझी साधना ही विषयांकडे चालली आहे.'' तितक्यात त्यांची पत्नी तिथे आली व तिने पतीचा तोंडाजवळ थबकलेला हात पाहून विचारले,''अहो, लिंबाचा स्वाद घेता घेता का थांबलात.'' महात्म्यांनी ते कापलेले लिंबू आणि उरलेले अर्धे लिंबू दोन्हीही पत्नीच्या हातात देऊन तिला सांगितले,'' मी आता हे खाणार नाही कारण आता मी जीभेवर विजय मिळवला आहे. आता मला विश्वास पटला आहे की मी इंद्रियावर ताबा ठेवू शकतो.''
तात्पर्य – इंद्रियांवर ताबा ठेवता येणे ही फार मोठी साधना आहे.
70) 👑🎤 बोधकथा - एक हाताची टाळी
वनातील आश्रमात एक संत राहत होता. त्यांच्यासोबत एक अनाथ मुलगाही राहत होता. संतांना पाहून त्या मुलालाही ध्यानसाधना शिकण्याची इच्छा झाली. तो संतांजवळ जाऊन म्हणाला,''गुरुजी मला ध्यानसाधना शिकायची आहे.'' संतांनी त्याला समजावले की तुझे वय हे ध्यानसाधना करायचे नाही. आता तू भक्ती शिक. पण मुलगा आपल्या जिद्दीवर अडून राहिला. त्याचा हट्ट पाहून संतांनी दोन्ही हातांनी मिळून एक जोरात टाळी वाजवली आणि मुलाला म्हणाले,'' हा दोन हातांच्या टाळीचा आवाज आहे. आता तू बाहेर जा आणि एका हाताच्‍या टाळीचा शोध घे.'' मुलाने विचार केला की, एका हाताची टाळी म्हणजेच ध्यानसाधना असेल तेव्हा तो आवाज अत्‍यंत मधूर व अद्भूत असेल. मुलगा रात्रंदिवस एका हाताच्या टाळीचा आवाज शोधू लागला. एके दिवशी मुलगा जंगलात एकेठिकाणी बसला होता, तेथे मंद हवेमध्ये झाडांची पाने हलताना एकमेकांवर घासत होती. मुलाला वाटले की पानांच्या  ह्या आवाजात दिव्य प्रकारची शांती आहे. हाच एका हाताच्या टाळीचा आवाज आहे. तो मुलगा पळतच संतांकडे गेला आणि संतांना या आवाजाची माहिती दिली. संत म्हणाले,'' हा तर पानांचा आवाज आहे. एका टाळीचा आवाज नाही. आणखी शोध घे.'' मुलाचा शोध सुरुच राहिला. प्रत्येक वेळी मुलगा संतांना काहीतरी सांगायचा व प्रत्येक वेळी संत नकार देत गेले आणि मुलाला आणखी शोध घे असे सांगितले. मुलगा आता अठरा वर्षाचा झाला होता. एक दिवस तो गुरुजींकडे जाऊन बसला आणि डोळे बंद करून गहि-या मौनामध्ये डुंबला. जणूकाही त्याची समाधीच लागली होती. गुरुजी काहीच बोलले नाहीत. गुरुजींनी मंदस्मित केले आणि शांत राहिले कारण त्यांच्या शिष्याला आता कुठे एका हाताच्या टाळीचा आवाज ऐकू येऊ लागला होता.
तात्पर्य – ध्यान मनाच्या एकाग्रतेवर अवलंबून आहे आणि मनाची एकाग्रता, योग्य गुरुचे मार्गदर्शन यामुळे आपण आतूनबाहेरून पूर्णपणे बदलून जातो.
71) 👑🎤बोधकथा - जीवनाचे सार
एक विलासी बादशहा होता. तो सर्व प्रकारची व्यसने करीत असे आणि आपल्याबरोबरच तो प्रधानालाही म्हणायचा,'' मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नाही, त्यामुळे आता जो जन्म मिळाला आहे त्याचा उपयोग करा आणि सर्व प्रकारचे उपभोग करून घ्या.'' प्रधान हा सन्मार्गी माणूस होता. त्याला बादशहाच्या उपभोगी, चैनी आणि विलासी वृत्तीचे दु:ख व्हायचे पण वारंवार समजावूनही बादशहाचे वागणे काही बदलत नव्हते. बादशहा आपल्या मौजमजेच्या इतका आहारी गेला होता की त्याला आपल्या प्रजेची आठवण नसायची. प्रजेमध्ये बादशहाबाबत असंतोष होता मात्र बादशहा फारच कठोर व निर्दयी असल्याने कोणीही काही करू शकत नव्हते. एकेदिवशी प्रधानाने केलेल्या काही कामामुळे बादशहा फारच खुश झाला. त्याने दरबारामध्ये प्रधानाचा सत्कार केला व त्याला एक अत्यंत भरजरी व मौल्यवान अशी शाल भेट म्हणून दिली. पण प्रधानाने दरबाराच्या बाहेर येताच त्या भरजरी शालीला आपले नाक पुसले ही गोष्ट नेमकी प्रधानाच्या विरोधात असलेल्या एकाने राजाला जाऊन सांगितली. बादशहाला राग आला, त्याने प्रधानाला बोलावून एवढ्या मौल्यवान वस्तूचा अनादर करण्याचे कारण विचारले असता प्रधान म्हणाला,'' बादशहा, मी तेच करत आहे जे तुम्ही मला शिकवत आला आहात.'' बादशहा विचारात पडला की आपण असे काय शिकवले. प्रधान परत बोलू लागला,''महाराज, देवाने आपल्याला या शालीपेक्षा मौल्यवान असे शरीर दिले आहे पण आपण त्याचा गैरवापर करत आहात. व्यसने, भोग यामुळे या शरीराचा सन्मान न होता मोठा अपमानच आपण करत आला आहात. तो जेव्हा आपणाकडे पाहत असेल तेव्हा परमेश्वराला किती वाईट वाटत असेल की इतक्या मौल्यवान शरीराला आपण कशाप्रकारे वापरून त्याची घाण करत आहात. परमेश्वराचा प्रत्येक हृदयात वास असतो आणि त्याच शरीराला तुम्ही वाईट मार्गाने वापरत आहात.'' प्रधानाचे हे बोलणे ऐकताच राजाचे डोळे खाडकन उघडले. त्याने प्रधानाची क्षमा मागितली व पुन्हा कधीही त्याने गैरवर्तन केले नाही.
तात्पर्य – ईश्वराने दिलेल्या शरीरसंपदेचा योग्य मार्गाने वापर केला पाहिजे. मानवाला बुद्धी, विवेक आणि ज्ञान याचे वरदान ईश्वराकडून मिळाले आहे. त्याचा योग्य उपयोग करून तो आपले जीवन सार्थकी लावू शकतो.
72) 👑🎤बोधकथा - मन:शांतीचे रहस्य
एका गावात एक महात्मा राहत होते. ते अत्यंत शांत आणि संयमी स्वभावाचे म्हणून ओळखले जात. त्यांना कोणत्याही गोष्टीचा कधीच राग येत नसे. कुणी त्यांच्याशी कधी उद्धटपणे बोलला किंवा गैर वागला तरी त्यांच्या कपाळावर कधीच आठी उमटत नसे. ते सदैव हसतमुख व आनंदी राहत असत. ज्या लोकांना त्यांचे हे वागणे आवडत नसे ते लोक त्यांना जाणूनबुजून त्रास देण्याचा प्रयत्न करत असत. परंतु महात्म्याच्या तोंडून कधीही एखादा वेडावाकडा उदगार देखील बाहेर पडत नसे कि चेह-यावरही कधी त्रासिक भाव उमटत असे. अनेक लोकांनी जंग जंग पछाडले तरी महात्म्याला राग काही आलेला कुणीच पाहिला नव्हता शेवटी त्यांच्या या संयमशीलतेचे रहस्य काय असावे हे विचारण्यासाठी काही लोक महात्म्याकडे गेले. त्यांच्यातील एकाने विचारले,''महाराज, तुम्ही कधीच रागवत नाही, चिडत नाही, शांत कसे काय राहू शकता. तुमच्यात इतकी सहनशक्ती कोठून आली आहे.'' महात्म्यांनी उत्तर दिले,''मित्रांनो, ज्यांचे उद्दिष्ट अत्यंत उच्च पातळीवर जायचे असते त्यांना खालच्या पातळीवर जायची कधीच गरज पडत नाही. मी खालच्या पातळीवर कधीच उतरायला तयार नसतो. मला असे वाटते की, माझ्याबद्दल लोकांना काय वाटायचे ते वाटू दे पण आपले मन विरोधी विचारांनी कलुषित करून घ्यायचे नाही. मी जेव्हा जमिनीकडे नजर टाकतो तेव्हा क्षमाशीलतेचे मोठे प्रतिक दिसून येते. लोकांनी किती त्रास दिला जमिन क्षमा करते. आपल्या गरजा किती मर्यादित आहेत हे भान जर प्रत्येकाने ठेवले तर प्रत्येकजण माझ्याइतका शांत होऊ शकतो. ज्यांच्या मनात करूणा आणि सगळयांना सारखे लेखण्याची भावना असते तो निर्विकार वृत्तीनेच राहतो.''
73) 👑🎤बोधकथा - दुस-याबाबतचा दृष्टीकोन
स्टार्मवेल नावाचे एक इंग्रज पत्रकार होते. ते एखाद्याची मुलाखत घेणार असतील तर त्यांच्या खासगी आयुष्यातील गोष्टी ते उघडपणे बोलून दाखवत असत. एकदा स्टार्मवेल यांना श्रीकृष्ण मेनन यांची मुलाखत घ्यावयाची होती. स्टार्मवेल यांनी आक्रमकपणे पहिलाच प्रश्न मेनन यांना विचारला,'' मिस्टर मेनन, तुम्ही अत्यंत गरीबीतून वर आलेला आहात. तुम्ही शाळेत वॉच स्काऊट म्हणून काम करत होता. एका इंग्रज महिलेने तुम्हाला आधार दिला व त्यांनीच तुम्हाला लंडनला पाठविले. तेथे कायदा आणि अर्थशास्त्राचे शिक्षण घेऊन तुम्ही भारतात परत आला. येथे पुन्हा तुम्हाला संघर्ष करावा लागला. त्याचवेळी पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे तुमच्याकडे लक्ष गेले. त्यांनी तुम्हाला योग्य संधी दिली. आज तुम्ही त्यांच्या जवळचे आहात. नेहरूंच्या मंत्रिमंडळात तुमची वर्णी लागणार आहे असे बोलले जात आहे. म्हणजेच तुम्ही तळातून उठून आकाशात जाऊन ठेपणार आहात. पण मिस्टर मेनन तुम्ही मला खरेच सांगा की, तुम्ही कम्युनिस्ट आहात हे खरे आहे का.'' मेनन यांनी शांतपणे पण ठाम स्वरात म्हणाले,'' तुम्ही माझे जे कौतुक केले त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. मलाही तुमचे कौतुक करावेसे वाटते ते म्हणजे तुम्ही रस्तोरस्ती पेपर विकून तुमचे पोट भरत होता. तेथूनच तुम्ही मोठे झालात, आता तुम्हाला चांगला पगार मिळतो आहे. पण मलाही तुम्हाला एक प्रश्न विचारायला आवडेल की, खरेच सांगा की तुम्ही एक अनौरस संतान आहात काय.'' मेनन यांच्या सडेतोडपणामुळे स्टार्मवेल यांची बोबडी वळाली आणि त्यांनी तो विषय टाळून दुस-या प्रश्नाकडे वळाले.
तात्पर्य – दुस-याच्या खाजगी आयुष्यात डोकावताना त्याला दु:ख देणा-या गोष्टींबाबत चर्चा न केलेली बरी असते. कारण प्रत्येकाच्याच आयुष्यात काही ना काही गोष्टी या अतिखासगी या प्रकारात मोडतात त्यामुळे दुस-याच्या आयुष्यात ढवळाढवळ न केलेलीच चांगली.
74) 👑🎤*बोधकथा- मन करा रे प्रसन्न !*
     विश्वनाथरावांना तीन मुलगे होते, तर त्यांचा भाऊ जयंतरावांना तीन मुली होत्या. मुली म्हटल्या की, त्यांच्या लग्न कार्यासाठी खर्च येणार हे पूर्वीच्या काळी ठरलेले असे. त्यामुळे आपल्याला तीन मुलगे असल्याने विश्वनाथ राव खुश होते. मला तीन मुलगे आहेत. मला कशाचीही भीती नाही अशी शेकी ते मिरवायचे. दिवसामागून दिवस जात होते, वर्षे उलटत होती. मात्र विश्वनाथरावांचे पुत्र  स्वतःपुरते पाहू लागले. त्यांना कोणी विचारिना. उलट मुली असूनही जयंतरावांचे घर हसते खेळते होते. यामागचे कारण असे होते की, जयंतरावांना कशाचा अहंपणा नव्हता. सगळ्यांचा सांभाळ करणारा परमेश्वर आहे याची त्यांना खात्री होती. त्यामुळे ते परमेश्वराचरणी लीन होते. मुलींसाठी ते आणि त्यांची पत्नी अतोनात कष्ट घेत होते. त्याचा त्यांनी कधी स्वतःला त्रास करून घेतला नाही
*तात्पर्य :* मनाची प्रसन्नता हेच तर खरे सुख असते. त्याचा अहंकाराचा वारा लागला की ते दुःखाच्या सागरात बुडते.
 75)👑🎤 बोधकथा - बदलण्याची संधी
सरधोगा जिल्ह्यातील खुशाबनगर येथे दिवाण मदनगोपाल राहत असत. अनेक राजवाड्यांचे मालक असलेल्या मदनगोपाल यांना दारूचा मोठा शौक होता. विलायती दारूच्या अनेक पेट्या त्यांच्या घरी त्यांनी साठवून ठेवलेल्या होत्या. मदनगोपाल एकदा सुगंधित थंड खोलीत विश्रांती घेत पहुडले होते. रखरखत्या उन्हात एका तेजस्वी साधूने त्यांच्या खोलीत प्रवेश केला. दिवाणसाहेबांनी हात जोडून त्या साधूला स्थान ग्रहण करण्यास सांगितले. साधू महाराज म्हणाले,''दिवाणसाहेब, मी इथे आलो आहे ते तुमच्याकडून एक वचन घेण्यासाठी, बोला मला वचन देताल काय'' दिवाणजी म्हणाले,''तुम्ही जे मागताल ते जर माझ्याकडे उपलब्ध असेल तर निश्चित वचन देण्यास मी बांधिल असेन. साधू म्हणाले,'' तुमची सर्वात प्रिय वस्तू म्हणजे दारू तुम्ही सोडून द्याल एवढेच वचन मला द्या.'' मदनगोपाल पहिल्यांदा कचरले पण वचन पूर्ण करण्यासाठी ते तयार झाले. त्यांनी नोकरांना बोलावले व दारूच्या सगळया बाटल्या फोडून टाकायचा आदेश दिला. नोकरांनी साधूच्यादेखतच सर्व बाटल्या फोडून टाकल्या. साधूला आनंद वाटला, त्यांनी परत जाताना दिवाणसाहेबांकडून पुन्हा कधीही दारू पिणार नाही असे वचन घेतले व निघून गेले. साधू गेल्यावर एक नोकर दिवाणजीकडे आला व म्हणाला,''महाराज आजच्या रात्रीपुरती दारू मी एकेठिकाणी लपवून ठेवली आहे, आणू का'' दिवाणजींनी त्याला ती बाटली आणावयास सांगून नोकराने ती बाटली आणताच त्यांनी ती बाटलीही स्वत:च्या हाताने फोडली व आयुष्यात पुन्हा कधीच दारूला स्पर्श केला नाही. पुढे वृंदावनला जाऊन त्यांनी दीक्षा घेतली. मदनगोपाल यांच्या आयुष्याची दिशाच त्या एका प्रसंगामुळे बदलून गेली. पुढे श्रीकृष्णप्रेमात बुडालेल्या मदनगोपाल यांनी ''निमाईचंद'' हे उत्कृष्ट उर्दू पुस्तक लिहीले.
तात्पर्य – स्वत:ला बदलण्याची संधी मिळाल्यावर प्रत्येकाने त्याचा लाभ घेतला पाहिजे. कदाचित त्‍या संधीतूनच आपल्या आयुष्याला कलाटणी मिळून आयुष्याचे सोने घडू शकते.
 76) 👑🎤*बोधकथा - सामर्थ्य*
     एका मध्यरात्री सहदेव झोपेतून उठला आणि अशेजारच्या जंगलातील झोपडीत राहणाऱ्या पांडुरंग नावाच्या आपल्या मित्राकडे गेला. त्याच्या दारावर थाप मारून मारून सहदेवने त्याला उठविले. पांडुरंग झोपेतून उठला. दार उघडून पाहतो तर, बाहेर हातात कंदील घेऊन सहदेव उभा. पांडुरंग म्हणाला, "काय रे सहदेव ! इतक्या रात्री तुला काय हवंय? का माझी झोपमोड केलीस?"
सहदेव म्हणाला, "अरे पांडबा ! मला झोपच येईना. जरा विडी ओढवी म्हणून काडेपेटी शोधली तर सापडेना.  तेव्हा मला जरा विडी शिलगावण्यासाठी काडेपेटी कशाला हवी? कंदीलावर का नाही विडी पेटवलीस?" ते ऐकून सहदेव खजील झाला. आपल्या हाती दिवा आहे, हे त्याच्या लक्षातच आले नव्हते.
     *तात्पर्य :* स्वतःकडे असणाऱ्या सामर्थ्याची आपणाला ओळख पटायला हवी.
77) 👑🎤 *बोधकथा -  श्रमाचे मोल*
गुर्जर नरेश सम्राट कुमार पटलचे गुरु आचार्य हेमचंद्र यात्रेहून राजधानीचे शहर पाटणकडे चालले होते. वाटेत त्यांनी एका गावात रात्रीचा मुक्काम केला. तेथे एका गरीब विधवा महिलेच्या घरी ते राहिले होते. त्या महिलेने श्रद्धापूर्वक आचार्यांचे आदरातिथ्य केले. तिच्याकडून शक्य तितके चांगले जेवण दिले. ते मोडकेतोडके घर आचार्यांना महालाप्रमाणे भासले. दुस-या दिवशी जेव्हा आचार्य मार्गस्थ झाले. तेव्हा त्या महिलेने आचार्यांना स्वत:च्या हाताने कातलेल्या सुताची रजई भेट दिली. आचार्यानी ती रजई पांघरूनच नगरात प्रवेश केला. सम्राट कुमार पटल यांनी गुरुंचे स्वागत केले, परंतु त्यांच्या अंगावरील सुताची रजई पाहून त्यांना वाईटही वाटले. सम्राट म्हणाले,''गुरुवर्य, ही जाडीभरडी रजई एखाद्या सम्राटाच्या गुरुच्या अंगावर शोभून दिसत नाही. तुम्हाला खरेतर सुख आणि शोभा यांची गरज नाही पण माझ्या गुरुच्या अंगावर मौल्यवान उत्तरीय असण्याऐवजी हे जाडेभरडे वस्त्र कसेतरीच दिसते.'' आचार्य हेमचंद्र यांना सम्राटाचा अहंकार त्याच्या बोलण्‍यात दिसून आला. आचार्य म्हणाले,'' राजा, या रजईमागे अनेक लोकांचे परिश्रम जोडले गेले आहेत. मला त्या परिश्रमांची ऊब हवी आहे. परिश्रम हा खरेतर आपला अभिमान असायला हवा आहे. शिवाय त्या गरीब भगिनीने ज्या प्रेमाने ही रजई मला भेट दिली आहे ती भेट मला तुमच्या मौल्यवान उत्तरीयापेक्षाही जास्त किंमती वाटते.'' आचार्यांच्या उत्तराने सम्राटाचा अहंकार गळून पडला व त्याने आचार्यांची माफी मागितली.
तात्पर्य – परिश्रमातून साकार झालेली कोणतीही गोष्ट अतिशय मौल्यवान असते.
78) 👑🎤 *बोधकथा - मन करा रे प्रसन्न !*
     विश्वनाथरावांना तीन मुलगे होते, तर त्यांचा भाऊ जयंतरावांना तीन मुली होत्या. मुली म्हटल्या की, त्यांच्या लग्न कार्यासाठी खर्च येणार हे पूर्वीच्या काळी ठरलेले असे. त्यामुळे आपल्याला तीन मुलगे असल्याने विश्वनाथ राव खुश होते. मला तीन मुलगे आहेत. मला कशाचीही भीती नाही अशी शेकी ते मिरवायचे. दिवसामागून दिवस जात होते, वर्षे उलटत होती. मात्र विश्वनाथरावांचे पुत्र  स्वतःपुरते पाहू लागले. त्यांना कोणी विचारिना. उलट मुली असूनही जयंतरावांचे घर हसते खेळते होते. यामागचे कारण असे होते की, जयंतरावांना कशाचा अहंपणा नव्हता. सगळ्यांचा सांभाळ करणारा परमेश्वर आहे याची त्यांना खात्री होती. त्यामुळे ते परमेश्वराचरणी लीन होते. मुलींसाठी ते आणि त्यांची पत्नी अतोनात कष्ट घेत होते. त्याचा त्यांनी कधी स्वतःला त्रास करून घेतला नाही.
     *तात्पर्य :* मनाची प्रसन्नता हेच तर खरे सुख असते. त्याचा अहंकाराचा वारा लागला की ते दुःखाच्या सागरात बुडते.
79) 👑🎤 *बोधकथा - माणुसकी*
संस्कृतचे महाकवी माघ निर्धन असले तरी मदत करण्यास कधीच कमी पडत नसत. त्यांच्याकडून जितकी मदत गरजूला होत असे तितकी मदत करण्यास सदैव तयार असत. एकदा कवीराज माघ आपल्या घरी शिशुपाल वध या महाकाव्याचा नववा अध्याय लिहीत असताना दरवाजावर कोणाची तरी हाक ऐकू आली. कोणी हाक मारली हे पाहण्यासाठी ते गेले असता त्यांना दारावर त्यांच्याच गावातील एक गरीब व्यक्ती उभारलेली दिसली. त्यांनी त्या माणसाला आदराने घरात बोलावले. त्याचे योग्य ते आदरातिथ्य केले व येण्याचे प्रयोजन विचारले असता तो गरीब माणूस म्हणाला,'' कविराज मी मोठी आशा ठेवून आपल्याकडे आलो आहे. माझ्या मुलीचा विवाह ठरला असून त्यासाठी मला धनाची गरज आहे. माझी परिस्थिती तर आपण जाणून आहातच. तरी आपल्‍याकडून मला जी मदत होईल ती माझ्यादृष्टीने खूप मोठी असणार आहे.'' महाकवींकडेही आर्थिक चणचण होती. परंतु दारी मदत मागायला आलेल्या माणसाला परत पाठविणे त्यांना योग्य वाटेना. घरात सगळीकडे शोध घेतला पण त्‍यांना त्‍या माणसाला देण्याजोगे काहीच मिळेना. शिवाय दानवीर माणसाच्या घरात मौल्यवान असे काय शिल्लक राहणार. जे होते ते त्यांनी लोकांना देऊन टाकले होते. शेवटी महाकवींचे लक्ष पत्नीच्या हाताकडे गेले. पत्नीच्या हातात सोन्यांचे कंकण होते. त्यांनी एका हातातील कंकण काढून घेतले व त्या गरीब माणसाला देऊन टाकले. गरीब माणसाने महाकवींचे आभार मानून तो बाहेर पडणार इतक्यात कविराजांच्या पत्नीने त्या माणसाला परत बोलावले व आपल्या हातातील दुसरे कंकणही त्याला दिले व म्हणाली,''मुलीच्या लग्नात एकच कंकण कसे तिला देणार तिला रिकाम्या हाताने पाठवू नकोस.'' या दांपत्याच्या दानी वृत्तीला गरीबाने साष्टांग  नमस्कार केला.
तात्पर्य – आपली परिस्थिती नसतानाही दुस-याला मदत करणे हीच खरी माणुसकी.
80) 👑🎤*बोधकथा -  समाधान*
      एकदा काही कोळिणींना बाजारातून गावी परतण्यास वेळ झाला. अंधार पडला म्हणून वाटेत एका फुलबागेकच्या शेजारी झोपडीजवळ त्या विश्रांतीसाठी थांबल्या. माळी म्हणाला, "बायांनो ! रात्र खूप झाली आहे, या गरीबाच्या झोपडीत रात्र काढा आणि पहाटेस निघा."
     कोळिणींना ते पटले, त्या सार्याजणी त्या वृद्ध माळीबाबांच्या झोपडीत मुक्कामास राहिल्या. पण त्यांना त्या झोपडीत जराही झोप लागली नाही. त्या रात्रभर इकडून तिकडे, या कुशीवरून त्या कुशीवर वळत राहिल्या. त्या खोलीतील एका कोपऱ्यात चमेलीच्या फुलांनी भरलेली करंडी होती. त्या फुलांचा सुगंध असह्य झाल्यानेच कोळिणींना झोप येत नव्हती. काही वेळाने एक कोळीण उठली. म्हणाली, "हा दुर्गंध काही जात नाही. वाढतोच आहे." असे म्हणून तिने आपल्या मासळीच्या टोपलीवर थोडे पाणी टाकले. ती टोपली उशाशी घेताच तिला गाढ झोप लागली.
 *तात्पर्य :* कोणाला कशाने समाधान लाभेल, हे ज्याच्या त्याच्या सवयीवर अवलंबून असते.
81) 👑🎤 *बोधकथा -  समर्पण*
एका गावात एक संत राहात होते. ईश्वराच्या भक्तीत तल्लीन होऊन राहत असत. त्यांचे कोणतेही कार्य ईश्वराला समर्पित असे. एकदा ते खूप आजारी पडले. त्यांच्या भक्तांनी अनेक वैद्यांना पाचारण केले पण गुण काही येईना. त्यांचा आजार हा त्यांना घट्ट चिकटून बसला होता जणू. आजारपणातही त्यांचेकडून नामस्मरण मात्र सारखे सुरुच होते. अनेक प्रकारच्या वेदना होत असताना देखील ईश्वराबद्दल कोणतीही तक्रार त्यांच्या मुखातून बाहेर पडत नव्हती. एकेदिवशी त्यांचा एक शिष्य त्यांच्‍याजवळ आला व काहीच न बोलता तो नुसता त्यांच्यासमोर बसून राहिला. त्याला काहीतरी सांगायचे आहे हे संतांनी ओळखले व म्हणाले,''बाळा, तुला जर काही मला सांगायचे असेल तर पटकन सांगून टाक.'' संतांच्या या बोलण्यामुळे शिष्य हिंमत करून म्हणाला,''महाराज तुम्हाला इतक्या वेदना होत असतानाही त्या ईश्वराचेच नामस्मरण करत आहात हे काही पाहवत नाही. औषधांची मात्रा चालत नाही. अशा अवस्थेत तुम्ही ईश्वराकडे आजार दूर करण्यासाठी प्रार्थना का करत नाही. तुमच्‍या प्रार्थनेला ईश्वर काही ना म्हणणार नाही.'' त्याचे हे बोलणे ऐकून संत म्हणाले,'' अरे आजार हा कुणाच्या मर्जीने मला प्राप्त झाला हे तर तुला ठाऊक आहे. मला आजार होण्यास प्रभूचीच मर्जी असेल तर मी कुठल्या तोंडाने त्याला तो कमी करण्यास सांगू. त्याच्या मर्जीशिवाय तर काहीच चालत नाही. त्याच्या इच्छेविरूद्ध मी आजारापासून मुक्त व्हावे म्हणून मी कशी काय प्रार्थना करू. त्यानेच जर मला आजारी केले आहे तर तोच मला बरे करणे अथवा न करणे त्याच्या हातात राखून आहे. आपण मात्र त्याच्यावर अखंड विश्वास ठेवून राहणे हेच बरे.'' संतांच्या या बोलण्यामुळे भक्ताने आपल्या विचारसरणीत बदल घडविला.
तात्पर्य – खरी भक्ती ही समर्पित भावनेने केली जाते. जेथे समर्पणाची भावना असते तेथे सुख आणि दु:ख एकसमान अनुभूती देतात.
82) 👑🎤* बोधकथा -  प्रत्यक्ष अनुभव*
एका आश्रमात एक महात्मा राहत होते. त्यांच्या आश्रमात रोज सकाळी व संध्याकाळी धूप जाळला जात असे. धूपामुळे कीडे, कीटक आदींची संख्या कमी होते तसेच वातावरणातील जंतूची संख्याही कमी होते हे महात्म्यांना माहिती असल्याने त्यांनी धूप जाळण्याची पद्धत नित्यनेमाने सुरु ठेवली होती. आश्रमात धूप जाळला जाई तर आश्रमाच्या मागील बाजूच्या गोठ्यात कडुनिंबाचा पाला जाळला जाई कारण कडुनिंबाच्या पाल्याच्या धुरानेही कीडे-कीटक येत नाहीत. आश्रमातील एका शिष्याला मात्र हा भेदभाव पटला नाही. तो महात्म्यांना जाऊन म्हणाला,''गुरुदेव, आपल्याला माणसांना मात्र धूपाचा सुंदर वास तर दूधदूभते देणा-या जनावरांना मात्र कडुनिंबाचा कडवट वास असलेला धूर आपण देत आहोत. हे काही मला बरे वाटत नाही. तसेही आपल्या धर्मानुसार सर्वप्राण्यांमध्ये एकच परमेश्वर वसलेला आहे. आपल्या आत्म्याला चांगला वास आणि पशूंच्या आत्म्याला कडवट वास हे तुम्हाला पटते काय'' महात्मा म्हणाले,'' तुझे हे म्हणणे मलाही पटते. आजपासून तूच दोन्हीकडे धूप जाळत जा आणि एक महिन्यानंतर मला येऊन सांग'' त्या शिष्याने महिनाभर आश्रमात व गोठ्यात दोन्हीकडे धूप जाळला. सर्वत्र सुवास दरवळला होता. महिन्यानंतर तो शिष्य महात्म्यांकडे गेला असता ते म्हणाले,'' अरे मुला, आपल्या आश्रमाला दोन्हीकडे धूप जाळणे हे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. हे खूप खर्चिक होत आहे. तेव्हा काय करायचे हे तू बघ'' शिष्याने मग काहीच न बोलता दोन्‍हीकडे कडुनिंबाचा पाला जाळणे सुरु केले. किडे,कीटक तर निघून जायचे पण कडवट धुराच्या वासाने आश्रमात येणा-या भक्तांची संख्या मात्र कमी झाली. पंधरा दिवसांनंतर शिष्याला हे लक्षात आले व तो महात्म्यांकडे गेला. त्याने महात्म्यांची क्षमा मागितली व त्यांच्या आज्ञेनुसार पहिल्याप्रमाणे धूप व कडवट पाला योग्य ठिकाणी जाळणे सुरु झाले.
तात्पर्य – प्रत्यक्ष अनुभूती मिळाल्याशिवाय मनुष्य शहाणा होत नाही.
83) 👑🎤 *बोधकथा - शौर्य आणि शहाणपण*
रामाच्या सेनेत एक वानर होता. त्याच्या मनात एकदा आले की, रामात आणि आपल्यात काय फरक आहे. त्याला असलेले सर्व अवयव आपल्याला आहेत आणि आपल्याला एक शेपूटही जास्त आहे. सुग्रीवाने आपल्या सहका-याच्या मनातला भाव ओळखला. सुग्रीवाला किंचीत राग आहे. रामानेही त्याच्या मनातला भाव ओळखला पण त्याने त्या वानराला पुढे बोलावले व सांगितले,'' आज तू वानरसेनेचे आधिपत्य कर.'' वानर खूष झाला. राक्षससैन्य चालून येऊ लागले. धुडगुस घालू लागले. याबरोबर या वानरसेनापती महाशयांनी शेपटीने एक झाड उपटले आणि शेकडो राक्षसांवर फेकून दिले. त्याचा पराक्रम पाहून सुग्रीवही हरखून गेला. आता सुग्रीवाच्या मनातही रामात आणि या वानरात काय फरक आहे हा विचार येऊ लागला. हा विचारही रामाला कळून चुकला पण प्रभू रामचंद्र गप्प राहिले. काही वेळाने शस्त्रांचा उपयोग होत नाही हे पाहून राक्षसांच्या सेनापतीने युक्ती केली व त्याने मोठेमोठे नारळ काढून वानरसैन्याकडे फेकायला सुरुवात केली. वानरसैन्याने या नारळांचे काय करायचे हे न सुचल्याने ते फोडून खायला सुरुवात केली. वानरसैन्य व सेनापती नारळ खात आहेत हे पाहून राक्षससेनापतीने आपल्या सैन्यानिशी मोठा हल्ला केला व काही वानरांना ठार केले. यावरही प्रभू रामचंद्रांचे लक्ष होते. त्यांनी राक्षससैन्यावर बाणांनी हल्ला केला व राक्षससैन्यास मागे फिरवले. यात सुग्रीवाला रामचंद्र व वानर यांच्यातील फरक लक्षात आला.
तात्पर्य : माणसाचा मोठेपणा हा शौर्यापेक्षा शहाणपणाने ठरतो.
84) 👑🎤* बोधकथा - आत्मज्ञान*
एक संत वनात कुटी बांधून राहत होते. कंदमुळे खाऊन ते गुजराण करत असत आणि परमेश्वराचे चिंतन करत. वनातून जाणारा कोणी त्यांची कुटी पाहून थांबत असे. तेव्हा ते त्याच्याशी प्रेमाने बोलत. जे काही जवळ असेल ते त्याला खाऊ घालत. एक दिवस एक तरूण त्यांना भेटायला आला. त्यांच्या बोलण्याने तो प्रभावित झाला आणि त्यांचा शिष्य बनून तेथेच राहू लागला. संताने त्याला तपश्चर्या कशी करतात याविषयी माहिती दिली. शिष्याने गुरुच्या शिकवणीप्रमाणे वाटचाल सुरु केली. गुरुशिष्य स्नेहभावनेने राहू लागले. एकदा संत त्याला म्हणाले,'' मन मोठे चंचल असते, त्याला नियंत्रणातच ठेवले पाहिजे.'' ही गोष्ट शिष्याच्या मनावर ठसली. त्या दिवसापासून त्याने स्वत:ला एका खोलीत बंद करून घेतले. संताने त्याला विचारले असता शिष्य म्हणाला की, तो त्याच्या मनावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. शिष्य रात्रंदिवस खोलीतच राहू लागला. आश्रमात येणा-या जाणा-याकडे तो अजिबात लक्ष देईनासा झाला. एकेदिवशी गुरुने शिष्याला खोलीचा दरवाजा उघडावयास सांगितले. गुरु आत आले ते हातात एक वीट घेऊनच. गुरुंनी शिष्याला काहीच न बोलता ती वीट एका दगडावर घासायला सुरुवात केली. शिष्याने विचारले की, गुरुजी हे काय करताय तुम्ही. गुरु म्हणाले, या विटेपासून आरसा बनवायचा आहे. शिष्य म्हणाला, गुरुजी असे कसे शक्य आहे. गुरुजी शांतपणे शिष्याला म्हणाले,'' ज्याप्रमाणे विटेचा आरसा बनू शकत नाही तसे मनाचा आरसा बनू शकत नाही. मन तर धूळ आहे जी आत्म्यावर पडलेली असते. ती धूळ विसरण्याचा प्रयत्न केला तरच खरेपणा दिसून येतो.'' शिष्याला गुरुची शिकवण समजून आली.
तात्पर्य – चंचल मनाला नियंत्रणात ठेवूनच प्रगती साधता येते.
85) 👑🎤 *बोधकथा - भक्तिमार्ग*
      कबीर एका रस्त्यावरून निघाले होते. एका घराच्या सोप्यावर दळण दळत असलेली स्त्री त्यांनी पाहिली. सुपातले दाणे ती जात्यात टाकत होती. अन्  गरगर फिरणाऱ्या जात्यातून पीठ भरभर खाली पडत होते. हे दृश्य पाहून कबीर रडू लागले. बरेच लोक जमले. पण कबिरांच्या रडण्याचे कारण कुणालाच उमजेना. कबिरही एकही शुब्द बोलेनात. पण त्यांच्या गालांवरून अश्रू मात्र ओघळत होते. इतक्यात तेथे आलेल्या साधूने त्यांना रडण्याचे कारण विचारले. तेव्हा कबीर म्हणाले, "महाराज ! तुम्ही-आम्ही त्या सुपातल्या दाण्यासारखे. जन्म-मृत्यूच्या जात्यात आपलं पीठ होणार, याचं दुःख वाटतं." तेव्हा त्या साधूने त्यांना जात्याच्या खुंट्याजवळ असणारे दाणे दाखवून म्हटले, "जे दाणे खुंट्याच्या आधार घेतात, त्यांचं पीठ होत नाही, ते भरडले जात नाहीत.
*तात्पर्य :* जे लोक भक्तिमार्गाचा आधार घेतात, त्यांच्या आयुष्याचे पीठ काळाकडून, नियतीच्या जात्याकडूनही होत नाही.
86) 👑🎤 *बोधकथा -  लबाडी उघडकीस येते*
एक राजा रात्रीच्या वेळी वेश बदलून फिरत असताना एका बागेत चार मैत्रिणी बोलत होत्या. पहिली म्हणत होती की, मांस स्वादिष्ट असते. दुसरी म्हणत होती की, दारूचा स्वाद खूप चांगला असतो तर तिसरी म्हणत होती की प्रेम हेच सर्वश्रेष्ठ असते तर चौथी म्हणाली की, खोटे बोलणे हे सगळयात चांगले असते. राजाने चौघींना बोलावले आणि आपले म्हणणे सिद्ध करून दाखविण्यास सांगितले. पहिली म्हणाली की मांसाचा कोणताच भाग वाया जात नाही म्हणून ते चांगले असावे पण मी कधीच खाल्ले नाही. दुसरी म्हणाली, दारू ज्यावेळेला मस्तकात जाते, नशा चढते तेव्हा दारूचा स्वाद खूप चांगला वाटतो. तिसरी म्हणाली, प्रेम हे व्यक्तिसापेक्ष असते. कुणी कुणावर, कशावरही प्रेम करू शकते म्हणून प्रेम श्रेष्ठ आहे तर चौथी म्हणाली, महाराज जगात असा कुणीच नाही ज्याने खोटे बोलणे टाळले आहे. प्रत्येक जण कधी ना कधी खोटे बोलतोच. राजा म्हणाला, मी कधीच खोटे बोलत नाही आणि मी खोटे बोलतो आहे असे तू सिद्ध करून दाखव. चौथ्या महिलेने राजाला व त्याच्या सर्व मंत्र्यांना तिच्या घरी येण्याचे निमंत्रण दिले. घर पूर्ण दाखवल्यावर शेवट तिने एका मोकळया खोलीत सर्वाना नेले व रिकाम्या भिंतीकडे बघून तिने नमस्कार केला व म्हणाली, जे कुणी पुण्यवान आहेत त्यांना समोर साक्षात देवाचे दर्शन होईल. राजा व मंत्री यांची चलबिचल सुरु झाली. कारण नमस्कार न करावा तर आपण पापी ठरतो म्हणून सर्वांनीच हात जोडले व खोलीच्या बाहेर आले. बाहेर येताक्षणी महिला राजाला म्हणाली, महाराज तुम्हीसुद्धा हात जोडले याचाच अर्थ माझ्या खोट्या बोलण्याला तुम्ही दुजोरा दिला. मी खोटे सांगितले तरीही तुम्ही खोट्या देवाला नमस्कार केला आणि तुम्हीसुद्धा खोटे बोलता हे सिद्ध झाले.
87) 👑🎤* बोधकथा -  गर्विष्ठ मेणबत्ती*
एकदा एका गृहस्थाने आपल्या मित्रांना मेजवानीसाठी बोलाविले होते. सगळेजण दिवाणखान्यात एका मोठया मेणबत्तीच्या प्रकाशात जेवत होते, ते पाहून मेणबत्तीला स्वत:चा अभिमान वाटला, आपल्या प्रकाशाचा केवढा उपयोग आहे असे वाटून ती गर्वाने म्हणाली, "ज्या वेळी व ज्या ठिकाणी सूर्यचंद्राचा प्रकाश पोहोचू शकत नाही. त्या वेळी व त्या स्थळी माझा प्रकाश पडू शकतो, चंद्रसूर्यही माझ्यापुढेही क्षुद्र वाटतात.' तिचे हे गर्वाचे बोलणे ऐकून जेवणारी मंडळी हसली. त्यातला एक जण उठला. त्याने खिडकी उघडली. त्याबरोबर हवेची झुळूक आली व मेणबत्ती विझली. नंतर त्याने पुन्हा खिडकी बंद केली व मेणबत्ती पेटविली. मग तो गृहस्थ मेणबत्तीला म्हणाला, 'अगं वेडे आता तरी प्रकाश दे, एवढयाशा झुळकेने विझतेस, चंद्रसूर्याला क्षुद्र समजतेस त्यांच्यापेक्षा श़ेष्ठ असल्याची मिजास करतेस. चंद्रसूर्य कधी तुझ्यासारखे वाऱ्याच्या झुळकेने विझून गेले आहेत का?'
तात्पर्य : आपल्यावर सोपवलेली कामगिरी व्यवस्थितपणे पार पाडण्यातच मोठेपण आहे.
88) 👑🎤*बोधकथा -  पश्चाताप*
     एकदा एक कोल्हा भुकेने व्याकुळ होऊन अन्नासाठी भटकत होता. तेवढ्यात त्याला एक मोठ्ठा आवाज ऐकू आला. त्या आवाजाने कोल्हा घाबरला. पण तो आवाज कोणता प्राणी काढतोय हे जाणून घेण्याची उत्सुकता त्याला स्वस्थ बसू देईना. तो त्या आवाजाच्या दिशेने निघाला. शोधता शोधता त्या आवाजापर्यंत गेला, तेव्हा त्याच्या नजरेला एक नगारा दिसला. त्यावर एका झाडाची फांदी वाऱ्याने आपटत होती. म्हणून तो आवाज निघत होता. हे पाहून कोल्हा त्या नगाऱ्यावर चढला व त्यावर पाय आपटू लागला. थोड्या वेळाने त्याला वाटले की, हे कातडे जर ओरबाडून काढले, तर आत खूप मांस मिळेल, दोन दिवसांची भूक भागेल. तो कातडे कुरतडू लागला. त्याच्या दाढा दुखू लागल्या आणि कातडे फाटले, तेव्हा त्याला मांस न दिसल्याने तो दुःखी झाला. त्याला वाईट वाटले.
*तात्पर्य :* जो माणूस मागचा-पुढचा विचार करून वागतो, त्यावर पश्चाताप करण्याची वेळ येत नाही. अविचाराने कोणतीही गोष्ट केली की, वाट्याला दुःखच येते.
89) 👑🎤* बोधकथा - अतिरेक वाईटच*
एक माणूस आपल्या पत्नीच्या अतिकंजुषपणामुळे फार वैतागुन गेला होता. तो जेव्‍हा एखाद्या गरजूला मदत करायला जायचा तेव्हा त्याची बायको त्याच्या या प्रयत्नात खोडा घालत असे. तिला कायम वाटायचे जगात मोठमोठे शेठ-व्यापारी हे दान देण्यासाठी आहेत मग आपल्यासारख्या सामान्य माणसांनी काय म्हणून दान करावे. बायकोच्या या विचारसरणीमुळे माणूस जेरीला आला होता. शेवटचा उपाय म्हणून तो एका संतांकडे गेला व त्यांना सगळी हकिकत सांगून त्याने यावर संतांना उपाय विचारला असता संतांनी त्याला बायकोला बरोबर घेऊन येण्यास सांगितले. दुसरे दिवशी तो माणूस पत्नीसह संतांकडे पोहोचला तेव्हा संतांनी त्याच्या पत्नीला आपल्या हाताची बंद मूठ दाखविली. तेव्हा पत्नीने या गोष्टीचा अर्थ विचारला असता संत म्हणाले,'' माझी मूठ जर अशीच कायम बंद राहिली तर काय होईल.'' ती म्हणाली,''अशी जर कायमच मुठ बंद करून बसाल तर तुमच्या हातात व्यंग निर्माण होईल.'' संत म्हणाले,'' आणि जर मूठ उघडून हात कायमच सरळ करून ठेवला तर काय होईल'' ती महिला म्हणाली,'' मग हा पुन्हा कधीच बंद होणार नाही अशा प्रकारचे व्यंग निर्माण होईल.'' संत यावर त्या महिलेला म्हणाले,'' याचा अर्थ कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट आहे. जर हात बंद करून किंवा सरळ करून हातात व्यंग निर्माण होत असेल तर आपल्या प्रवृत्तीमध्ये सुद्धा व्यंग निर्माण होते. आपण गरजूना त्याच्या गरजेप्रमाणेच मदत केली जावी असे माझे तुला यातून सांगणे आहे. कृपया तू आपल्या वागण्यात बदल करावा.'' महिलेला संतांचा उपदेश पटला व तिने आपल्या पतीला गरजूना मदत करण्यास आडकाठी केली नाही.
तात्पर्य : कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो.
90) 👑🎤*बोधकथा - श्रद्धेचं बी*
     भगवान बुद्ध भिक्षाटनासाठी बाहेर पडले होते. ते भारद्वाजाच्या शेतावर आले, तेव्हा भारद्वाज मजुरांना जेवण वाटत होता. बुद्धही त्यांच्या ओळीत उभे राहिले. ते पाहून भारद्वाज म्हणाला, "तू भिक्षा का मागतोस? यांच्यासारखे श्रम कर. हातात नांगर धर." ते ऐकून बुद्ध म्हणाले, "अरे मीसुद्धा तुझ्यासारखाच शेतकरी आहे." भारद्वाजाने चमकून विचारले, "ते कसं काय?" "असं पाहा" , बुद्ध समजावून सांगू लागले, "मी श्रद्धेचं बी पेरतो. त्यावर प्रयत्नांची, तपश्चर्येची वृष्टी होते. माझा नांगर म्हणजे माझी प्रज्ञा. पाप, लज्जा, लज्जा, चित्त या दोऱ्या. स्मृती किंवा जागृती म्हणजे माझ्या नांगराचा फाळ व चाबूक आहे.  काया-वाचा-मने मी संयम करतो. संतोष म्हणजे माझी सुट्टी, विश्रांती आणि उत्साह म्हणजे माझे बैल. माझं वाहन नेहमी अशा दिशेकडे जात असतं की, जिथे शोक करण्याची पाळी येणार  नाही."
*तात्पर्य :* ज्ञानी माणसाचा संचार सर्वांच्या हितासाठी असतो.
91) 👑🎤*बोधकथा - परिश्रमांची किंमत*
एक प्रजादक्ष राजा होता. तो नियमितपणे वेश बदलून नगरात फिरायचा आणि प्रजेची हालचाल ज्ञात करून घेत असे. प्रजेवर येणारे कोणतेही संकट किंवा गरज राजापासून लपून राहत नव्हती. एकदा राजाने विचार केला की सीमेलगतच्या गावातील परिस्थिती पाहून घ्यावी. तो आपल्या सहाय्यकास सोबत घेऊन तो घोड्यावरून रवाना झाला. दोनचार गावे फिरला तेथील समस्या जाणून घेतल्यानंतर सहाय्यकास त्याने योग्य त्या सूचना दिल्या आणि पुढील गावाकडे कूच केले. रस्त्यामध्ये एक हडकुळा लाकुडतोड्या लाकडे तोडत असताना राजाला दिसला. लाकुडतोड्याचे पूर्ण अंग घामाने थबथबले होते. राजाला त्याची दया आली. राजा त्याच्याशी काही बोलणार इतक्यात राजाचे लक्ष त्याच्या कडेला असणा-या दगडाकडे गेले. तेथे काहीतरी चमकत असल्याचे राजाला दिसून आले. राजाने जवळ जाऊन पाहिले असता राजाला लक्षात आले की या शिळेमध्ये हि-याचे तुकडे आहेत. राजाला मोठे आश्चर्य वाटले की लाकुडतोड्याचे याकडे कसे काय लक्ष गेले नाही. राजा लाकुडतोड्याला म्हणाला,''अरे बाबा, तू एवढे परिश्रमाचे काम करण्यापेक्षा या शिळेतील एखादा जरी तुकडा नेऊन विकलास तरी आयुष्यभर पुरेल एवढे धन तुला मिळू शकते तरी पण तू का परिश्रम करून स्वत:ला शिणवून घेत आहेस का तुला हे हिरे दिसलेच नाहीत '' लाकुडतोड्याने आपले काम न थांबवता त्याला सांगितले,''राजन हा हिरेयुक्त दगड या परिसरात सापडतात हे मी लहानपणापासूनच मी पहात आलो आहे. पण देवाने माझे हात आणि पाय मला परिश्रम करण्यासाठी दिले आहेत. ऐषोराम करण्यासाठी दिले नाहीत. ज्यांच्याकडे करण्यासाठी काही पुरुषार्थ नसतो अशांना हि-यांची गरज भासते. देवाच्या दयेने माझे शरीर अजूनही या वयात धडधाकट आहे, माझे काम मी करू शकतो. तेव्हा आतातरी मला या हि-यांची गरज नाही.'' राजाला लाकुडतोड्याकडून एक धडा मिळाला.
92) 👑🎤*बोधकथा - सत्य आणि असत्य*
     एकदा एका राजाला ज्योतिष्याने भविष्य सांगितले की, "आपल्या नातेवाईकांचा अंत आपल्या आपल्या डोळ्यांदेखत होईल'. हे भविष्य सहन न झाल्याने राजाने दुसऱ्या ज्योतिष्याला बोलाविले. त्याने पहिल्या   ज्योतिष्याचेच भविष्य, पण वेगळ्या शब्दांत कथन केले. तो राजाला म्हणाला, "आपले आयुष्य आपल्या नातेवाईकांपेक्षा जास्त आहे." राजा खुश झाला. दोन्ही भविष्यांचा अर्थ एकच होता. पण माणूस मर्त्य आहे, हे कटुसत्य ऐकून घ्यायला राजा तयार नव्हता. नातेवाईकांपेक्षा आपण जास्त  दिवस जगणार या भविष्याने मात्र त्याला दिलासा मिळाला.
*तात्पर्य :* आयुष्यातील काही गोष्टी अप्रिय व कटू वाटल्या तरी सत्य ते सत्यच !
93) 👑🎤 *बोधकथा - सत्कारणी दान*
एका गावात शिमक नावाचा एक धनवान माणूस राहत असे. फार विचारपूर्वक तो आपला पैसा खर्च करत असे. त्याने कधीही पैशाचा दुरूपयोग केला नाही. त्यामुळेच त्याला लोक 'कंजुष' म्हणत असत. लोक काय म्हणतील याचा त्याने कधीच विचार न करता आपला पैसा जोडून ठेवला होता. एकदा त्याला खूप ताप आला. त्याच्या मुलांनी व नातवांनी त्याच्यावर उपचार करण्याचे सुचविले असता शिमक म्हणाला,'' औषधांनी केवळ तापाचा प्रभाव कमी होईल पण रोग समूळ नष्ट होणार नाही. निसर्गनियमानुसार ताप आपोआप कमी होऊन जाईल व मी बरा होईन'' शिमकच्या या गोष्टीचीही लोकांनी कंजुषपणातच गणना केली. शिमकने सर्वाचे म्हणणे ऐकले पण तो आपल्या मनाला येईल तेच योग्य याप्रमाणे वागत राहिला. त्याच्या नगरातील एक विद्वान आचार्य महिधरांनी वेदांवर काही ग्रंथ लिहीलेले शिमकच्या कानी आले. पण आचार्यांचयाकडे ते ग्रंथ प्रकाशन करण्यासाठी पुरेसे धन उपलब्ध नव्हते. शिमकला ही माहिती मिळताक्षणी तो आचार्यांकडे गेला व म्‍हणाला,''आचार्य, ज्ञान हे प्रवाही असावे. ज्ञानाचा प्रभाव हा समाजकारणासाठी झाला पाहिजे. ज्ञान वाटूनच समाजातील अनेक दुष्प्रभाव कमी करता येतील. या ग्रंथ प्रकाशनासाठी आपणास जितके धन हवे आहे तितके धन मी तुम्हाला द्यायला तयार आहे पण ग्रंथ प्रकाशन करून तुम्ही समाजाला शिक्षित करावे ही माझी विनंती.'' आचार्य महिधरांनी शिमककडून योग्य तेवढे धन घेऊन ग्रंथांचे प्रकाशन केले व शिमकला त्या ग्रंथप्रकाशनास बोलावले तेव्‍हा शिमकला मोठी धन्यता वाटली. लोकांनी शिमकच्या या उदारपणाचे कौतुक केले तेव्हा शिमक म्हणाला,'' माझ्याकडे असणा-या संपत्तीतून जर माझ्यासाठी किंवा माझ्या कुटुंबासाठी जर काही धन खर्च झाले असते तर त्यात विशेष असे काहीच नव्हते पण समाजासाठी मी काही धन देऊ शकलो याचा मला आनंद आहे.''
तात्पर्य – अपार संपत्ती जवळ आहे म्हणून तिचा मनमुक्तपणे उपभोग घेणे किंवा उधळपट्टी करणे यात शहाणपणा नसून त्‍या संपत्तीतून काही विधायक कार्य कसे करता येईल हे पाहणे गरजेचे आहे.
94) 👑🎤*बोधकथा -  नम्रता*
     आपल्यापेक्षा कुणी श्रेष्ठ नाही, ही भावना गैर आहे. अंधार होताच काजवे चमकतात. जणू ते म्हणतात, 'आम्ही सारी पृथ्वी कशी उजळवून टाकली आहे. आमच्यासारखे तेजस्वी कुणीही नाही.'
     इतक्यात आकाशात तारे चमकू लागतात. ते पाहून काजव्यांना वस्तुस्थितीची जाणीव होते. अपल्यापेक्षाही तेजस्वी कुणी तरी आहे, हे दिसून आल्याने ते नम्र होतात. काही वेळाने चंद्रोदय होतो. चंद्राला वाटते, 'मी सारी पृथ्वी उजळवून टाकली आहे. तारे माझ्यापुढे क्षुद्र आहेत, फिके आहेत.' अशा गर्वाने चंद्राची भ्रमंती सुरू असतानाच अरुणोदय होतो. पूर्व दिशा उजळू लागते आणि चंद्राची तेजस्विता फिकट होऊ लागते. त्याला आपल्या सामर्थ्याच्या मर्यादा जाणवू लागतात. तो नम्र होतो.
  *तात्पर्य :* धन, सत्ता, संपत्ती आणि पद यांपेक्षा नम्रता महत्वाची.
95)👑🎤 *बोधकथा - आनंद कसा मिळवाल ?*
एका साधूने जंगलातील गुहेत बसून अनेक वर्षे घनघोर तपश्चर्या केली. परंतु परमेश्वर दर्शनाची त्याची इच्छा काही पूर्ण झाली नाही. एकदा हिमालयातील एक ज्येष्ठ ऋषी तिकडून जात होते. त्यांचे दर्शन या साधूला घडले. साधूने ऋषींना आपली इच्छा बोलून दाखविली. ऋषी म्हणाले,''शेजारच्या गावात एक भिक्षूक राहतो. त्याला सदैव आनंदी पाहून असे वाटते की त्याने परमेश्वर पाहिला असावा. तू त्याची गाठ घे व माहिती मिळव.'' दुस-याच दिवशी साधूने त्या भिक्षूकाची गाठ घेतली. तो आपल्याच नादात तल्लीन होत भजन गात होता. साधूने त्याला विचारले,''बाबा रे, तू असे कोणते पुण्यकर्म केले की ज्यामुळे तुझ्यावर परमेश्वर प्रसन्न झालेला आहे.'' भिक्षूक म्हणाला,''साधूमहाराज, मी ना तपश्चर्या केली, ना दान केले, ना पुण्य जोडले, ना कधी मी कुठल्या मंदिरात गेलो. कधी उपवास सुद्धा केला नाही.'' साधूला आश्चर्य वाटले व तो म्हणाला,'' असे सर्व असतानासुद्धा तू आनंदी कसा आणि तू भिक्षूक कसा काय बनलास.'' भिक्षूक म्हणाला,'' महाराज मी पूर्वी एक श्रीमंत माणूस म्हणून जगत होतो. पण एकेदिवशी रस्त्याने जाताना एक महिला व तिचे तान्हे बाळ रडताना मी पाहिले. तिला मी विचारपूस केली असता मला कळाले की तिच्या पतीने कर्ज न चुकविल्यामुळे सावकाराने त्याला बंदी करून नेले आहे व त्यांची सर्व मालमत्ता जप्त केली आहे. स्त्री सुंदर असल्यामुळे येणारे जाणारे वाईट नजरेने तिच्याकडे पाहत आहेत.'' भिक्षूक म्हणाला की मला तिचे दु:ख पाहवले नाही. त्यांचे कर्ज फेडण्यासाठी मी माझी सर्व संपत्ती देऊन टाकली. घरदार सर्व विकून टाकले व त्यांना सोडवून आणले. तेव्हापासून मी भिक्षूक झालो. मी आतासुद्धा सुखी आहे कारण देण्यातला आनंद काय आहे हे मला कळाले आहे.'' साधूला भिक्षूकाला काय सांगायचे आहे ते कळून चुकले.
तात्पर्य :- दुस-याला सुखी करणारेच संतपदाला पोहोचू शकतात. साधूपणा हा पोशाखावरून किंवा तपश्चर्येतून ठरत नसतो तर तो सर्व जीवमात्रांना सुखी करण्यातून ठरत असतो.
96) 👑🎤*बोधकथा - उद्योगप्रियता महत्वाची*
     एकदा काही परदेशी वार्ताहर गांधीजींना भेटण्यासाठी साबरमती आश्रमात आले होते. गांधीजींसमोर ते मांडी घालून बसले होते. ते गांधीजींना प्रश्न विचारत. गांधीजी जे बोलत त्याची टिपणे घेत. मुलाखत घेऊन झाल्यानंतर सारेजण जाण्यास निघाले. त्यांतील एकजण गांधीजींना म्हणाला, बापू! आपण आमच्या देशात या. तुमच्या कार्यासाठी आमच्या देशात खूप पैसे जमा होतील."
      गांधीजी म्हणाले, "मला माझ्या कामासाठी पैसे मुळीच कमी पडत नाहीत. मी तुमच्या देशात जरूर येईन. पण ते तुमच्या देशातील लोकांचे उद्योग व स्वावलंबी जीवन पाहण्यासाठी. तुमच्या देशाच्या श्रीमंतीपेक्षा तुमची उद्योगप्रियता मला आवडते.
*तात्पर्य :* सातत्याने उद्योगी राहणे, खरी श्रीमंती.
97) 👑🎤*बोधकथा - अहंकाराने पराभव*
एक जातक कथा आहे. गंधर्वकुळातील गुत्तिलकुमार नावाचा एक गंधर्व वीणा वादनात सिद्धहस्त होता. संपूर्ण वाराणसीत त्याची ख्याती पसरलेली होती. त्याच वेळी उज्जयिनीमध्ये मुसिल नावाचा एक गंधर्व राहत होता. एकदा त्याला उज्जयिनीच्या राजदरबारात वीणा वादनासाठी निमंत्रित केले होते. मुसिलचे वीणावादन कोणालाच आवडले नाही. त्यानंतर मुसिलने गुत्तिलकडे शिकण्याचा निश्चय केला. मुसिल वाराणसीत गुत्तिलकडे गेला. त्याने त्याचे शिष्यत्व पत्करले. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने गुत्तिलकडे राजदरबारात काम करण्याची इच्छा प्रकट केली. गुत्तिलने मोठ्या मनाने राजाशी त्याची भेट घालून दिली. राजाने गुत्तिलला जेवढे मानधन होते त्यापेक्षा अर्ध्या मानधनात काम करण्याचे सांगितले. मुसिलचा अंदाज होता की आपल्यालाही तितकेच मानधन मिळायला कारण आपणही गुत्तिलच्या इतके श्रेष्ठ कलाकार आहोत. राजाने मुसिलला आपली क्षमता सिद्ध करण्यास सांगितले. त्या स्पर्धेत गुत्तिलने एक कठीण तान छेडली जी त्याने मुसिलला शिकविली नव्हती. शेवटी अशा प्रकारची तान न छेडता आल्याने मुसिलला आपला पराभव मान्य करावा लागला.
तात्पर्य : गुरुलाच अहंकाराने आव्हान देणे कधीच योग्य ठरत नाही.
98) 👑🎤*बोधकथा - सहाय्य*
      एक आंधळा व एक लंगडा भिकारी एक गावात एकत्र भेटतात. सुख-दुःखाच्या गप्पा सुरु होतात. आंधळा म्हणतो, "मला रस्ताही नीट समजत नाही, दिसत नाही आणि लोकही फसवतात." लंगडा म्हणतो, "अरे, माझी व्यथा वेगळीच आहे. मला रस्ता दिसतो. कुणी खोटे पैसे देऊन फसवतही नाही. पण, मला चालण्याचा खूप त्रास होतो."
     दोघे मिळून एक युक्ती करतात. लंगडा आंधळ्याला म्हणतो, "आपण असं करु. माझ्याजवळ एक शक्ती आहे. आपण एकत्र आलो, तर दोघांचंही काम होईल. आपल्याला ज्या रस्त्याने जायचं आहे, तो रस्ता, वळणं मला दिसतात. मी तुझ्या खांद्यावरती बसतो आणि तुला वळायचं कुठे, कसं हे सगळं सांगतो, म्हणजे तुझंही काम होईल आणि माझंही. वाटेत तू थकशील तेव्ह थोडे बसू. विश्रांती घेऊ.
आंधळ्याने व लंगड्याने एकमेकांच्या शक्ती एकमेकांना दिल्या आणि मग त्यांचे उर्वरित आयुष्य चांगले गेले.
 *तात्पर्य :* कोणीही परिपूर्ण नसतो. एकमेकांना सहाय्य करीत जगत राहिलो, तर आयुष्य सुखात व्यतीत होते.
99) 👑🎤 * बोधकथा - वृक्षसेवेतून समृद्धी*
एका गावात एक विधवा महिला आणि तिचा जगत नावाचा मुलगा राहत होते. त्यांच्या घराजवळ एक पिंपळाचे झाड होते. जगत आईच्या सांगण्यावरून त्या झाडाला रोज पाणी देत असे. त्याच्याजवळचा परिसर स्वच्छ ठेवत असे. एकदा जगत आजारी पडला तरी त्याने झाडाला पाणी देण्याचे व स्वच्छतेचे काम चालूच ठेवले. आजारपणातही हा मुलगा आपली सेवा करत आहे हे पाहून पिंपळवृक्षात निवास करणा-या एका देवतेला खूप समाधान वाटले. जगत जवळ येताच देवता त्याच्याशी बोलू लागली,'' हे मुला मी तुझ्या या सेवेवर प्रसन्न झालो आहे. तुला जो काही वर पाहिजे आहे तो मागून घे.'' जगत म्हणाला,'' हे वृक्षदेवते, मी तुमची सेवा काही मिळवायची अपेक्षा ठेवून करत नाही. तुमच्यामुळे आम्हाला स्वच्छ हवा, सावली आणि लाकूड मिळते. आमच्या जीवनाचा तूच एकमेव आधार आहेस. मला काहीही नको.'' यावर वृक्षदेवतेने त्याला काहीतरी मागण्याचा हट्टच धरला. तेव्हा जगतने झाडाखाली पडलेली पाने नेण्याची इच्छा व्यक्त केली. पिंपळदेवतेने त्याला अनुमती दिली. जगतने पाने गोळा केली व घरी आणून एका कोप-यात ठेवली. दुस-या दिवशी सकाळी जेव्हा तो व त्याची आई उठून पाहतात तर काय पिंपळाची सगळी पाने सोन्याच्या पानात बदलली होती. जगतने वृक्षदेवतेचे आभार मानले.
तात्पर्य – निरपेक्षबुद्धीने सेवा केल्यास आपल्याला फळ निश्चितच मिळते.
100) 👑🎤*बोधकथा - बोध*
     एका बागेच्या दारात बरीच वर्षे एक भिकारी बसत असे. वयोमानानुसार तो आता वृद्ध झाला होता. शरीराला कुष्ठरोगाने ग्रासले होते. अनेक रोग-व्याधींनी त्याचे शरीर पोखरले होते. तरीही तो तेथेच बसत होता. नित्यनियमाने भीक मागत होता. त्या गावच्या राजपुत्राने त्याला कित्येक वर्षे तिथे बसलेले पाहिलेले होते. पण, आता या अवस्थेत त्याला पाहून राजपुत्राला प्रश्न पडे की, 'हा या अवस्थेत का जगतो आहे ? जगण्याची इतकी लालसा का असावी याला ? अखेर एके दिवशी त्याने हा प्रश्न त्या वृद्ध भिकाऱ्याला विचारला. तो भिकारी म्हणाला, "अरे, हाच प्रश्न मी वारंवार परमेश्वराला करतो आहे की, का जगवतोस मला या अवस्थेत ? लवकर नेत का नाहीस ? कदाचित मला वाटतं, त्याने मला मुद्दाम या अवस्थेतही जगवलं असावं. मला पाहून इतरांना कळावं की, आज जरी ते सुखरूप, धडधाकट असले तरी, त्यांची वृद्धापकाळी अशी अवस्था होऊ शकेल. मला पाहून साऱ्यांनी बोध घ्यावा. असा कदाचित परमेश्वराचा हेतू असेल."
*तात्पर्य :* आयते खाल्याने मोक्षप्राप्ती नाही.

1 टिप्पणी:

टिप्पणी पोस्ट करा

आगामी झालेले