नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

रविवार, १० मे, २०२०

BMI व आजचे वय काढणे

BMI व आजचे वय काढणे.
आज आता आपले वय किती वर्षे ,किती महिने , किती दिवस , किती तास , किती सेकंद याची माहिती मिळवा .  
Find how old am I? with this free online age calculator which finds the age of a person or any living things in years, months, days, hours, and minutes. Enter your Date of Birth to compute the age interval between your birth date and current date.
https://www.easycalculation.com/date-day/age-calculator.php

https://www.deliveryrank.com/tools/women-bmi-calculator


शालेय पोषण आहार योजना ... विद्यार्थी बी एम आय काढण्यासाठी खालील लिंक क्लिक करा. 
https://www.calculator.net/bmi-calculator.html



आपले वजन व उंची यानुसार आहे की नाही ते तपासा . बॉडी मास इंडेक्स 


Calculate Your Body Mass Index
Body mass index (BMI) is a measure of body fat based on height and weight that applies to adult men and women.

BMI table for children and teens, age 2-20

The Centers for Disease Control and Prevention (CDC) recommends BMI categorization for children and teens between age 2 and 20.
CategoryPercentile Range
Underweight<5%
Healthy weight5% - 85%
At risk of overweight85% - 95%
Overweight>95%

BMI table for adults
This is the World Health Organization's (WHO) recommended body weight based on BMI values for adults. It is used for both men and women, age 18 or older.
CategoryBMI range - kg/m2
Severe Thinness< 16
Moderate Thinness16 - 17
Mild Thinness17 - 18.5
Normal18.5 - 25
Overweight25 - 30
Obese Class I30 - 35
Obese Class II35 - 40
Obese Class III> 40

स्वास्थ्य आणि आरोग्य कॅल्क्युलेटर
https://www.calculator.net/fitness-and-health-calculator.html


Fitness and Health Calculators
The following is a complete list of our fitness and health related calculators.

अँटिट्यूड टेस्ट

अँटिट्यूड टेस्ट संकलित लिंक
https://www.indiabix.com/online-test/aptitude-test/
https://www.indiabix.com/online-test/aptitude-test/ 


लिंकमध्ये खालील टेस्ट असतील 

General Online Tests

Engineering Online Tests

Programming Online Tests

Technical Online Tests

Medical Science Online Tests

Engineering Online Tests


पहिला भारतीय स्वातंत्र्यलढा(१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध)

१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध
तारीख: १० मे, १८५७ – १ नोव्हें, १८५८
१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध हे १० मे १८५७ रोजी मीरत येथील लष्करछावणीतील बंडापासून सुरू झाले व लवकरच ते उत्तर व मध्य भारतातील अनेक ठिकाणी पसरले. हा लढा १८५७चे स्वातंत्र्यसमर, पहिला भारतीय स्वातंत्र्यलढा, शिपाई बंडाळी (इंग्लिश: Sepoy mutiny) अशा इतर नावांनीही ओळखला जातो.जवळपास वर्षभर चाललेल्या या युद्धात इंग्रजांचा विजय झाला पण या बंडामुळे भारतीय स्वातंत्र्यचळवळीला प्रारंभ झाला व ९० वर्षानंतर १९४७ साली भारत स्वतंत्र झाला.
१० मे १८५७ रोजी दिल्लीपासून ४० मैलांच्या अंतरावर मेरठ छावणीमध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतीय सैनिकांनी बंड पुकारले व बघता बघता उत्तर पुर्व व मध्य भारतात पसरले. १० मेला सुरु झालेले बंड २० जुन १८५८ रोजी ग्वाल्हेर कंपनीच्या ताब्यात पडल्यानंतरच थांबले. बंडखोर शिपायांनी मेरठ काबीज केले व लागोलाग दिल्लीवर जबरदस्त हल्ला चढवून दिल्लीत बसलेले कंपनीच्या अधिकाऱ्यांना व ब्रिटिश सैन्याला चिरडले व ८१ वर्षांच्या बहादूरशहा दुसरा यास हिंदुस्थानचा बादशहा घोषित केले. अवधचा मोठा भुभाग देखील शिपायांच्या ताब्याखाली आला व ब्रिटिश सैन्य घाबरले. तरी कंपनीने कुमक मागवून जुलै १८५७ मध्ये कानपूर व दिल्लीवर पुन्हा कंपनी शासन लागू केले. पण झाशी, अवध आणि लखनऊतील विद्रोह दडपण्यासाठी कंपनीला खुप वेळ लागला.
१ नोव्हेंबर १८५८ ला विद्रोह दडपल्यानंतर ब्रिटिश संसदेने संपुर्ण हिंदुस्थानचा कारभार राणी व्हिक्टोरियाकडे दिला व देशातील कंपनी राज संपुष्टात आले.
उठावाची कारणे
बंगाल प्रांत काबीज केल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने आपले साम्राज्यवादी धोरण पुढे नेत अनेक प्रदेश भारतीयांकडून जिंकले व रयतेवर जुलूमी शासन लादले.
कंपनीच्या सैन्यातील एकाच पदावर असलेल्या ब्रिटिश व भारतीय सैनिकांमध्ये भेद केला जात असे. ब्रिटिश सैनिकाला भारतीय सैनिकापेक्षा अधिक सोयीसुविधा व पगार दिला जात असे.
कंपनी सरकारने भारतीयांना नीळ,अफू अशी नगदी पीके घेण्यास सक्ती केली. भारतीयांकडून ही पीके ते स्वस्तात विकत घेत व चीनमधे जाऊन मोठ्या नफ्याने विकत. शेतकरी,कामगारांकडून मोठ्या प्रमाणात करवसुली केली जात असे.
१८५७ च्या सुरुवातीला सरकारने ईनफिल्ड नावाच्या नव्या बंदुका आणल्या. त्या बंदुकांची काडतुसे गुळगुळीत होण्यासाठी गायीच्या वा डुक्कराच्या चरबीत बुडवलेली असत. गाय हिंदूना पवित्र तर डुक्कर मुसलमानांना निषिद्ध असते. बंदुकीत भरण्यापूर्वी अशी काडतुसे ओठात धरून उघडावी लागत. त्यासाठी ती काडतुसे तोंडात घालण्याची जबरदस्ती केल्याने भारतीय सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता.
या व अशा कारणांमुळे शिपायांनी बंड पुकारण्याचे ठरवले. ही कारणे केवळ निमित्तमात्र होती. खरे कारण भारतीयांना देश ईस्ट इंडिया कंपनीपासून मुक्त करायचा होता, हे आहे.
१८५७चे स्वातंत्र्यसमर (पुस्तक)
वि.दा. सावरकरांनी ‘१८५७चे स्वातंत्र्यसमर’ हा अद्वितीय मराठी ग्रंथ लिहिला, त्यावेळी त्यांचे वय फक्त २५ होते. दुर्दैवाने ग्रंथाची हस्तलिखित प्रत इंग्रजांनी जप्त केली. सावरकरांनी केवळ आठबवणीतून हा ग्रथ परत सिद्ध केला, पण यावेळी तो इंग्रजीत लिहिला. तो यथावकाश प्रसिद्ध झाला. पुढे सावरकरांनी या मराठी ग्रंथाची आधीच लिहिलेली एक कच्ची प्रत त्यांचे स्नेही गोव्यातील डॉ. कुटिन्हो यांच्याकडे मिळाली. कुटिन्हो ख्रिश्चन आणि त्यातही गोव्यातले, त्यामुळे त्यांच्याकडे प्रत असल्याचा इंग्रजांना संशयही आला नाही. ह्या मराठी प्रतीवरून बाळाराव सावरकरांनी ‘१८५७चे स्वातंत्र्यसमर’ हा मराठी ग्रंथ प्रकाशित करवला.

आचार्य अत्रे यांनी जेव्हा हा ग्रंथ वाचला तेव्हा त्यांनी ‘नवयुग’मध्ये लिहिले, ’वाचकहो, मला खून चढला आहे. हा खून हर्षाचा आहे. हा दिव्य आनंदाचा खून मला वीर सावरकर यांचा ‘अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर’ हा ग्रंथ वाचून चढला आहे. हा ग्रंथ नाही, जिवंत ज्वालामुखी आहे. हा भडकलेला वणवा आहे. आरामखुर्चीवर पडल्या पडल्या किंवा अंथरुणावर लोळत वाचण्यासारखा हा ग्रंथ नाही. मी आजवर अनेक ग्रंथ वाचले, मात्र असा ग्रंथ मी कधी पाहिला नाही, वाचला नाही. जुलमी साम्राज्यशाहीचा विध्वंस करण्याचे सामर्थ्य या एका ग्रंथात आहे.’
स्रोतपर माहिती 

जलसंधारण दिन


🌌10 मे 💥💦जलसंधारण दिन💥
भारतात येऊन गेलेल्या विदेशी पर्यटकांनी आपल्या देशाचे वर्णन “तळ्यांचा देश” असे केले आहे. यावरुन आपल्या पुर्वजांनी जलसंधारणाचे महत्त्व त्या काळातच जाणले होते, याचा प्रत्यय येतो. पण, एकेकाळी “सुजलाम् सुफलाम्” असणाऱ्या आपल्या देशाला पाणीटंचाईचे ग्रहण लागले आहे. दुष्काळाच्या खुणा पावलोपावली दिसत आहे. या सगळ्यावर मात करण्यासाठी जालीम उपायांपैकी एक असलेला उपाय म्हणजे *“जलसंधारण”*
जलसंधारण व्यवस्थापनाचे तीन प्रमुख भाग आहेत.
पहिला भाग म्हणजे पाण्याची भूपृष्ठावर साठवण करणे, यासाठी लहान मोठी धरणे बांधली जातात. दुसरा भाग अर्थात पाण्याची भूगर्भात साठवण करणे, यासाठी पाणलोट क्षेत्र विकास आणि जलसंधारणाची कामे केली जातात. तिसरा भाग म्हणजे पावसाच्या पाण्याने शेत जमिनीवरील कसदार सुपीक मातीचा थर वाहून जाऊ नये म्हणून मृद संधारणाची कामे केली जातात. पावसाद्वारे पडणारे पाणी जास्तीत जास्त जमिनीत मुरवून भूजल साठे निर्माण करून भूजल पातळी योग्य प्रमाणात राखणे हे जल संधारणाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. अशा प्रकारे चांगले भूजल साठे राज्याच्या सर्वदूर क्षेत्रात निर्माण झाले तर विहिरीद्वारे त्या पाण्याचा उपयोग सिंचन व इतर कामासाठी केला जाऊ शकतो. ही कामे सिंचन प्रकल्पांच्या लाभ क्षेत्राबाहेरील जमिनीसाठी अत्यावश्यक आहेत. जे राज्याच्या एकूण लागवड योग्य क्षेत्राच्या अंदाजे सत्तर टक्के आहे. यावरून पाणलोट क्षेत्र विकास आणि जल संधारणाच्या कामाचे महत्व लक्षात येईल. आज महाराष्ट्र शासनाचा भर या जलसंधाणाच्या कामांना गती देण्याचा आहे. म्हणजे अजून यावर मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होणार आणि मूल्यमापन यंत्रणा नसल्यामुळे त्यातून काय लाभ होणार हे कळण्याची सोय नाही. पुढील काळात पाणलोट क्षेत्र विकासाच्या व भूजलच्या कामांसाठी केळकर समितीने ३०६५९ कोटीची तरतुद सुचविली आहे. असे म्हटले जाते की, राज्यात १२६ लाख हेक्टर्स क्षेत्रावर कामे झाली आहेत. त्यापासून ३१ लाख हेक्टर सिंचन समता निर्माण होणे अपेक्षित होते, परंतु ती झाली नाही. ही कामे योग्य पद्धतीने झाली नाहीत, असे समितीने नमुद केले आहे. जलसंधारणाची कामे पाणलोट क्षेत्र निहाय नियोजन पूर्वक तंत्रशुद्ध पद्धतीने होऊन त्या कामांची योग्य ती देखभाल आणि सातत्याने मूल्यमापन होत राहणे आवश्यक आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पाणलोट क्षेत्र विकास आणि जलसंधारणासाठी तांत्रिकदृष्ट्या सक्षम अशी स्वतंत्र यंत्रणा राज्याच्या जलसंपदा विभागाच्या अंतर्गत असणे आवश्यक वाटते.
महाराष्ट्रात मा.नाना पाटेकर व मा.मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे सुरू आहेत. तसेच अभिनेता आमीर खान याने स्थापन केलेल्या पाणी फाऊंडेशन अंतर्गत राज्यात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा आयोजीत केली जाते. या दोन्हीला भरघोस प्रतीसाद मिळतो.
आपण घरच्या घरी सुध्दा जलसंधारण करु शकतो. रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातुन.
रेनवॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पावसाचे पाणी जमा करणे. ही संकल्पना भारतात प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. बुंदेला चौक, कुंडी, तालाब, कुल, बावडी, कुंड, तलाई अशी अनेक नावे आहेत. जमिनीवर आणि इमारतींच्या छपरांवर पडणारे पावसाचे पाणी अशा दोन ठिकाणांहून शहरात पाणी मिळू शकते.
कसे करावे रेनवॉटर हार्वेस्टिंग
शहरी भागात पावसाचे पाणी दोन ठिकाणांहून मिळू शकते.
जमिनीवर पडलेले पाणी जमिनीवर पडलेला पाऊस आपल्याला शंभर टक्के गोळा करता येत नाही. त्यातील थोडाफार जमिनीत मुरतो. काहीचे बाष्पीभवन होते, तर काही वाहून जाते. त्यामुळे आपल्याला अंदाजे ५० टक्के पाऊस जमा करता येतो. आपण अंदाजे ०.८५ इतका जास्तीत जास्त पाऊस गोळा करू शकतो.
इमारतींच्या छपरावर पडणारे पाणी जर आपल्याकडे ५०० चौरस मीटरचा प्लॉट आहे. त्यावर १०० चौरस मीटरचे बांधकाम आहे. त्यावर पडणारे पाणी किती असेल व ते आपल्याला किती मिळेल, याचा विचार करावा. छतावर पडणारे पाणी तुलनेने खूपच स्वच्छ, शुद्ध असते. पहिल्या पावसाचे पाणी सोडून देऊन पुढील पाऊस अडवून आपण ते एखाद्या हौदात साठवू शकतो. एवढे पाणी साठविणे हे खर्चाचे असल्याने आपल्याला लागेल तेवढेच पाणी साठवून उरलेले पाणी बोअरवेलच्या पुनर्भरणासाठी वापरता येईल. पाणी साठविण्यासाठी कॉंक्रीट, वीट, सिंटेक्सर किंवा फेराक्रिट या कोणत्याही प्रकारात हौद बांधता येतो. हे पाणी कुंड्यांना, बागेला, गाड्या धुण्यासाठी व इतर सफाईसाठी वापरता येते. जिथे पाण्याची खूप कमतरता आहे, तिथे त्याची गुणवत्ता बघून ते शुद्ध करून पिण्यासाठीही वापरता येते. पाणी शुद्ध राहण्यासाठी हौदाला झाकण हवे व तेथे सूर्यप्रकाश आत जाणार नाही, याची काळजी घ्यावी. बोअरवेल किंवा विहीर नसल्यास आपल्या परिसरातील एखाद्या बोअरवेलमध्ये सामूहिक पद्धतीने पुनर्भरण करता येईल अथवा झिरप खड्डा तयार करून, जमिनीत चर खणून, झाडे लावूनही पाणी मुरविता येते.
कूपनलिका
पुनर्भरण कसे करावे?
पावसाचे पाणी कूपनलिकेत सोडणे म्हणजेच कूपनलिका पुनर्भरण होय. कूपनलिकेजवळ नाला अथवा ओढ्याचे पाणी वळवावे. (ओढ्याचे पाणी क्षार व रसायनविरहित हवे) कूपनलिकेच्या सभोवताली दोन मीटर रुंद व दोन मीटर खोल आकाराचा खड्डा खोदावा. खड्ड्यातील उंचीएवढ्या केसिंग पाइपच्या भागात एक-दोन सें. मी. अंतरावर सर्व बाजूंनी विशिष्ट व्यासाची छिद्रे पाडावीत.
या छिद्रांवर नारळदोरी (काथ्या) घट्ट गुंडाळावी. खड्ड्याचे चार भागांत विभाजन करून सर्वांत खालच्या भागात दगडगोटे, त्यावरील भागात खडी, त्यानंतरच्या भागात वाळूची चाळ व सर्वांत वरच्या भागात बारीक वाळू भरावी. अशा प्रकारे ओढ्याचे अथवा नाल्याचे गढूळ पाणी गाळणीतून स्वच्छ होऊन कूपनलिकेत जाईल आणि कूपनलिकेचे पुनर्भरण होईल.
विहीर पुनर्भरण कसे करावे
पाणलोट विहिरी, विंधन विहिरी, भूजल स्रोतांचे पुनर्भरण करण्याच्या दृष्टीने विहिरीजवळ गाळप उपचार करावेत. प्रारंभीच्या गाळप उपचाराचा विसर्ग, जाड वाळूच्या दुसऱ्या गाळप उपचाराद्वारा विहिरीत सोडण्यात यावा. गाळप उपचारांचे नियोजन विहिरीलगतच्या भूपृष्ठाच्या पातळीपेक्षा खालच्या स्तरात करण्यात यावे. विहिरी क्षेत्राच्या उंच भागात असल्यास क्षेत्राच्या नैसर्गिक खोल भागात गाळप उपचार घेण्यात येऊन सिमेंट वा प्लॅस्टिक पाइप (सहा इंच व्यास) अथवा बंद चराद्वारा विहिरीत योग्य खोलीवर जोडण्यात यावेत.
आज “जलसंधारण दिना निमीत्त आपणही संकल्प करुया पावसाचा थेंब न थेंब वाचवायचा….
======================
स्रोतपर संकलित माहिती





आगामी झालेले