
कोजागिरी पौर्णिमा
तुमच्या आयुष्यात सौख्य, मांगल्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य
घेऊन येणारी ठरो! ही आमची कामना
चंद्राच्या साक्षीने मिळाली बासुंदीची मेजवानी
कोजागिरीच्या रात्रीने लिहिली जागरणाची कहाणी
मंद प्रकाश चंद्राचा
त्यास गोड स्वाद सुधाचा
विश्वास वाढू द्या नात्याचा
त्यात असूद्या गोडवा साखरेचा
आपण व आपल्या परिवारास
माझ्यातर्फे गोड गोड शुभेच्छा...
कोजागरी पौर्णिमा हा आश्विन पौर्णिमेला येणारा भारतीय हिंदू धर्म संस्कृतीतील महत्त्वाचा दिवस मानला जातो. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार 'कोजागरी पौर्णिमा' बहुधा सप्टेंबर ते ऑक्टोबर या दरम्यान असते. 'कोजागरी पौर्णिमा" ही उजाळाची रात्र असल्यामुळे ह्या रात्री चंद्राची किरणे दुधात पडतात त्यामुळे जे आठवणारे दूध असते ते औषधीयुक्त तयार होऊन आपल्या शरीरासाठी उपयुक्त असते. कृषी संस्कृतीत ह्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या पौर्णिमेला 'माणिकेथारी' (मोती तयार करणारी) असेही संबोधिले जाते.
हिंदू मान्यतेनुसार या पौर्णिमेच्या दिवशी साक्षात लक्ष्मीदेवी चंद्रमंडळातून येऊन पृथ्वीवर उतरते. आणि मध्यरात्री (संस्कृतमध्ये) 'को जागर्ति' (म्हणजे 'कोण जागत आहे') असे म्हणत मनुष्याचे प्रयत्न पहात पृथ्वीतलावर संचार करीत असते अशी धारणा आहे. मान्यता आहे की कोण जागे आहे याचा मथितार्थ आहे कोण सजग आहे आणि ज्ञानासाठी आतुर आहे असे देवी विचारत येते.
कृषी संस्कृतीमध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. शेतकरी वर्गामध्ये हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. निसर्गाबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेपोटी कोकणात नवान्न पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी घराघरात नवीन धान्य आलेले असते. भात, नाचणी, वरी आदी प्रकारच्या धान्याची एकप्रकारे पूजा करण्याचा दिवस म्हणजे नवान्न पौर्णिमा. काही मान्यतांनुसार अश्विन पौर्णिमेला महालक्ष्मी देवीचा जन्म झाला आणि समुद्र मंथनाच्या दिवशी लक्ष्मी देवी भूतलावर प्रकट झाली, असे सांगितले जाते.चातुर्मासात अनेकविध प्रकारची व्रत-वैकल्ये, सण-उत्सव साजरे केले जातात. चातुर्मासात येणाऱ्या अश्विन महिन्यातील नवरात्र, विजयादशमी म्हणजेच दसऱ्यानंतर येणाऱ्या अश्विन पौर्णिमेला महालक्ष्मी देवीचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे प्रचलित असल्याचे दिसून येते. वर्षभरात येणाऱ्या पौर्णिमांपैकी अश्विन पौर्णिमेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ही पौर्णिमा शरद ऋतूत येत असल्यामुळे याला शरद पौर्णिमा असेही म्हणतात. तसेच या दिवशी जागरण करून लक्ष्मी देवीचे पूजन करण्याच्या प्रथेमुळे याला कोजागरी पौर्णिमा असेही संबोधले जाते.

काही ठिकाणी याला नवान्न पौर्णिमा असेही म्हणतात. कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण १६ कलांमध्ये असतो. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो आणि त्यामुळे तो मोठा दिसतो. चंद्राच्या या गुणांमुळेच 'नक्षत्राणामहं शशी' म्हणजे 'नक्षत्रांमध्ये मी चंद्र आहे', असे भगवान श्रीकृष्णाने श्रीमद्भगवद्गीतेत सांगितले आहे. कौजागिरी म्हणजेच शरद पौर्णिमा कधी आहे? महत्त्व, मान्यता, परंपरा आणि काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी जाणून घेऊया...
कोजागरीला लक्ष्मी चंद्रमंडलातून भूतलावर उतरून 'को जागर्ती'? असा प्रश्न विचारते, असे मानले जाते. त्यामुळे या पौर्णिमेला कोजागरी असे म्हणतात. मसाला दूध पिण्यामागेही शास्त्रीय कारण आहे. शरद ऋतुमध्ये मसाला दूध आरोग्याला चांगले असते, असे आयुर्वेदात सांगितले आहे. त्यामुळे कोजागरीच्या दिवशी मसाला दूध पिण्याची प्रथा आहे. तर, या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वांत जवळ म्हणजे कोजागरी पर्वतालगत आलेला असतो. त्यामुळे या पौर्णिमेला 'कोजागरी पौर्णिमा' म्हणतात, अशी मान्यता असल्याचे सांगिले जाते. या पौर्णिमेला माणिकेथारी (मोती तयार करणारी) असेही संबोधिले जाते.
भारतातील बहुतांश ठिकाणी शरद पौर्णिमेला लक्ष्मी नारायणाचे पूजन करण्याची प्रथा प्रचलित आहे. या दिवशी देवी नारायणांसह गरुडावर आरुढ होऊन पृथ्वीतलावर येते. लक्ष्मी देवीचे दर्शन घेण्यासाठी अनेक देवता स्वर्गातून पृथ्वी येतात, अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते. या दिवशी दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळी, वेलदोडे, जायफळ, साखर वगैरे गोष्टी घालून, लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते. उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते. या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची 'आश्विनी' साजरी करतात.
कोजागरी पौर्णिमेला लक्ष्मी देवीचे पूजन करून जागरण केल्यास लक्ष्मीदेवीचे शुभाशिर्वाद प्राप्त होतात. जी माणसे जागरण करत नाहीत, त्यांच्या दारावरून लक्ष्मी देवी परत जाते. कोजागरीला केलेले लक्ष्मी पूजन विशेष मानले जाते. यामुळे कर्जमुक्तीच्या दिशेने आपली वाटचाल गतिमान होते. लक्ष्मी देवीच्या आशिर्वादामुळे धन, धान्य, वैभव, ऐश्वर्य प्राप्त होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. या दिवशी श्रीसूक्त, कनकधारा स्तोत्र, विष्णूसहस्रनाम आदींचे पठण करणे शुभ मानले जाते. दमा किंवा अस्थमा यांसारख्या आजारांवरील औषधे खिरीमध्ये मिसळून कोजागरीच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवली जाते. चंद्राचे किरण या खिरीवर पडल्याने त्याचा गुणधर्म बदलतो आणि अशी खीर आजारी व्यक्तीला दिल्यास तिला आराम मिळतो असे मानले जाते.
शरद पौर्णिमेच्या दिवशी करायच्या व्रतात रात्री लक्ष्मी देवीची आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्राची पूजा केली जाते. उपवास, पूजन व जागरण या तीनही अंगांना या व्रतात सारखेच महत्त्व आहे. या व्रतात रात्रीच्या पहिल्या प्रहरी लक्ष्मी व इंद्र यांचे पूजन करतात व मग त्या दोघांना पुष्पांजली समर्पित करतात. अशी पूजा झाल्यावर पोहे व नारळाचे पाणी देव-पितरांना अर्पण करून आप्तेष्टांना देतात. विविध मंदिरांमध्ये कोजागरी पौर्णिमा साजरी केली जाते. लक्ष्मीची विशेष उपासना केली जाते. द्वापार युगात वृंदावनमध्ये श्रीकृष्णाने गोपिकांसोबत याच रात्री रासलीला केली होती. वृंदावनात आजही श्रीकृष्ण आणि गोपिका रासलीला रचतात, अशी मान्यता आहे. त्या विशेष प्रसंगाची आठवण म्हणून वैष्णव संप्रदायाचे भक्त रासोत्सव साजरा करतात. श्रीकृष्ण आणि राधाची विशेष उपासना केली जाते.कोजागिरीच्या रात्री, द्वापार युगात वृंदावनमध्ये भगवान श्रीकृष्णाने गोपिकांसोबत रात्री रासक्रीडा (महारासलीला) केली होती. वृंदावनात निधीवनात आजही श्रीकृष्ण आणि गोपिका रासलीला रचतात अशी मान्यता आहे. त्या विशेष प्रसंगाची आठवण करुन वैष्णव संप्रदायाचे भक्त कोजागिरीला रासोत्सव साजरा करतात. श्रीकृष्ण आणि राधाची विशेष उपासना या दिवशी केली जाते.
अनेक ठिकाणी कोजागिरीनिमित्त संगीतसंध्येचे आयोजन केले जाते. चंद्रावर आधारित गाण्यांनी कोजागिरीची सायंकाळ सुरेल होते. उगवला चंद्र पुनवेचा, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, चंद्र आहे साक्षीला, चंद्रिका ही जणू, चांदणे शिंपित जाशी चालता तू चंचले, चांदण्यात फिरताना, तोच चंद्रमा नभात, लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया, हे सुरांनो चंद्र व्हा...अशी कित्येक भावगीते आपल्या मनातही चांदणे शिंपडतात.
दूध हे सात्विक अन्न आहे, जे हिंदू संस्कृतीत पवित्रता, पोषण आणि समृद्धीचे प्रतीक आहे. शरद पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात, चंद्राच्या दिव्य किरणांना दुधात शोषले जाते जेणेकरून ते अमृतात रूपांतरित होते जे शरीराला शुद्ध करते आणि शरीराला रोगप्रतिकारक शक्ती देते. कोजागिरी पौर्णिमेला, खीर (तांदळाची खीर) बनवून ती चंद्रप्रकाशात ठेवण्याची परंपरा आहे. ही खीर दुसऱ्या दिवशी प्रसाद म्हणून खाल्ली जाते. या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनात आनंद, समृद्धी आणि शांतीचा आशीर्वाद मिळतो.
भारतातील विविध वांशिक जनजाती कोजागरी साजरी करतात. या रात्री होजागरी नृत्य केले जाते. मायलोमा आणि खोलोमा या देवतांची पूजा या रात्री केली जाते. मायलोमा ही भात शेतीची रक्षण करणारी देवता मानली जाते. लक्ष्मी पूजेशी साम्य असणारी हे परंपरा आहे.
कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व धार्मिक आणि सांस्कृतिक दोन्ही आहे. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते आणि चंद्राच्या तेजाने रात्री जागून काढली जाते. या पौर्णिमेला 'कोजागिरी' असे नाव पडले कारण देवी लक्ष्मी पृथ्वीवर येऊन 'को जागृ ति' म्हणजे 'कोण जागा आहे?' असे विचारते, असे मानले जाते. या दिवशी लक्ष्मी आणि १६ कलांनी युक्त असलेल्या चंद्राची पूजा केल्याने समृद्धी, आरोग्य आणि यश मिळते असे मानले जाते.
धार्मिक महत्त्व
लक्ष्मीची कृपा:
या दिवशी देवी लक्ष्मीचा जन्म झाला असे मानले जाते, त्यामुळे धन आणि समृद्धीसाठी ही पौर्णिमा खूप शुभ मानली जाते.
जागृत राहण्याचे महत्त्व:
कोजागिरी शब्दाचा अर्थ 'कोण जागा आहे?' असा होतो. या रात्री जागून प्रार्थना केल्यास लक्ष्मी प्रसन्न होते, असे सांगितले जाते.
चंद्र पूजा:
या पौर्णिमेला चंद्र १६ कलांनी परिपूर्ण असतो आणि पृथ्वीच्या जवळ असतो. या चंद्राची पूजा केल्याने आरोग्य आणि मानसिक शांतता मिळते.
सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व
सामाजिक एकत्र येणे:
कोजागिरी पौर्णिमेला लोक एकत्र येऊन रात्रभर जागे राहून दूध पिणे आणि गप्पा मारणे यांसारखे कार्यक्रम आयोजित करतात.
संपूर्णतेचे प्रतीक:
१६ कलांनी युक्त चंद्र पूर्णत्वाचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे या दिवशी सर्वजण मिळून हा सण साजरा करतात.
कोजागर पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा
देवी लक्ष्मीचे स्वरूप: पौराणिक कथेनुसार, समुद्रमंथनाच्या वेळी या पौर्णिमेच्या दिवशी धनाची देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता. म्हणूनच, हा दिवस देवी लक्ष्मीचा जन्मदिवस म्हणून देखील साजरा केला जातो.
"को जागृती" चा अर्थ: या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा असेही म्हणतात. असे मानले जाते की या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर फिरते आणि विचारते, "को जागृती?" (म्हणजे: कोण जागे आहे?). जे लोक रात्रभर जागरण करतात आणि तिची पूजा करतात त्यांच्यावर लक्ष्मी देवी आपली विशेष कृपा आणि धन आणि समृद्धीचे आशीर्वाद वर्षाव करते.
रास पौर्णिमा किंवा महा रास
ब्रज प्रदेश आणि वैष्णव परंपरेत, या दिवसाला रास पौर्णिमा असेही म्हणतात. असे मानले जाते की या रात्री भगवान श्रीकृष्णाने वृंदावनात आपल्या गोपींसह महारस केले, जे दैवी प्रेम आणि भक्तीचे प्रतीक आहे.
या शुभ दिवशी भक्त पहाटे उठून पवित्र स्नान करतात, पण पूजा विधी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असतात. काही ठिकाणी भक्त उपवास ठेवतात आणि लाकडी पाटावर लक्ष्मी देवीची मूर्ती ठेवतात.देशी तुपाचा दिवा लावला जातो.
हंगामी फळे, मिठाई आणि इतर नैवेद्य अर्पण केले जातात.
देवीची मूर्ती चूणी, सिंदूर, बांगड्या, हार, कमळाच्या फुलांनी सजवली जाते.
भोग म्हणून तांदळा आणि नारळाच्या पाण्याचे अर्पण केले जाते.