नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

शनिवार, २१ मार्च, २०२०

जागतिक कविता दिन world poetry day


जगभरच्या लाखो प्रसिद्ध व अप्रसिद्ध कवींसाठी 'युनेस्को' ने २१ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय कविता दिन म्हणून साजरा करण्याचा उपक्रम सुरू केला. ह्याची सुरूवात १९९९ पासून झाली.
कविता... कविता म्हणजे नक्की काय...? कविता का लिहितात ...? ती लिहितात कशी..? काय मिळते कविता लिहून...? एखाद्या कागदावर शब्द मांडून काय समाधान मिळते...? अश्या असंख्य प्रश्नांचे उत्तर कविताप्रेमी आपल्यापरीने शोधत असतो...
खरे तर, कविता म्हणजे कोणासाठी प्रेम, तर कोणासाठी अहंकार... कोणासाठी भाव, तर कोणासाठी विचार...तर कोणासाठी आपला आक्रोश मांडण्याचं उत्तम साधन... सोपं नसतं एखाद्या कोऱ्या कागदावर असं काही मांडणं ज्यात सर्व भाव उमटून दिसावेत... जेव्हा सर्व भाव एकत्र येऊन खोळंबा तयार होतो तेव्हा सुरू होते शब्द शोधण्याची प्रतिक्रिया मग त्या शब्दांच चिंतन करून तयार होतात ओळी आणि त्या ओळींमधून बनते एक कविता...
प्रत्येकासाठी कवितेचे वेगवेगळे अर्थ असतात... काहींसाठी ती मज्जा तर काहींसाठी ते आपलं दुःख व्यक्त करण्याचं साधन... कोणी लिहून हसतात, तर कोणी रडून लिहितात... काहींसाठी ते मन मोकळं हास्य तर काहींच्या अश्रुंचे ते विकार...
कविता हा साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. कविता (मुख्यतः) छंदोबद्ध व रसबद्ध असतात. कवितेतून जीवन कळते, समजते व उमगते. कविता, ओव्या, अभंग किंवा श्लोक हे साहित्याचे माध्यम आहे. त्यामध्ये मनाच्या भावना, वस्तुस्थिती किंवा मनःस्थिती व्यक्त करता येते. भारतात कवितांचा इतिहास आणि कवितांचे तत्त्वज्ञान फार जुने आहे.कविता शब्दांनी खूप समृद्ध असतात.

कविता हा अभिव्यक्तीचा सुंदर प्रकार आहे. कवितेच्या अमूर्ततेइतकी संवेदना आणि भावनांची विपुलता इतर कोणत्याही प्रकारच्या साहित्यात निर्माण होत नाही. इ.स.पूर्व 2000 मध्ये काही काळ "गिलगामेश महाकाव्य" सह सर्वात जुनी काव्ये प्रकट झाली असे मानले जाते, परंतु साक्षरतेचा प्रसार होण्यापूर्वीच कविता अस्तित्वात असण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या प्रकारच्या कवितेचा कल प्रचलित झाला आहे आणि त्यात परिवर्तन झाले आहे. सॉनेटपासून रॅप गीतांपर्यंत, कवितेचा मूळ उद्देश एकच राहतो मानवी स्थितीचा शोध घेणे आणि शब्दांद्वारे भावनांना आमंत्रण देणे. कविता मानवजातीच्या अस्तित्त्वात असलेल्या दुविधांशी प्रतिध्वनित होते, आतून कल्पनांना उजाळा देते.
 सर्व संस्कृतीतील लोक ओळखू शकतील अशा भाषिक अभिव्यक्तीचा उत्सव साजरा करतात. प्रत्येक राष्ट्राच्या इतिहासात कविता आढळू शकते आणि ती आपल्याला सामायिक मूल्ये आणि समान मानवतेच्या अंतर्गत एकत्र आणते. सर्वात मूलभूत कवितांमध्ये संवाद ढवळण्याची ताकद असते. UNESCO ने 1999 मध्ये पॅरिस येथे आयोजित केलेल्या 30 व्या सर्वसाधारण परिषदेच्या निमित्ताने "राष्ट्रीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय काव्य चळवळींना नवीन मान्यता आणि प्रेरणा देण्यासाठी" हा दिवस प्रस्तावित आणि स्वीकारण्यात आला होता. या दिवसाच्या माध्यमातून जगभरातील कवितेचा उत्सव, लुप्त होत चाललेल्या भाषांचे जतन आणि काव्यात्मक अभिव्यक्तीला चालना मिळावी, अशी संस्थेची अपेक्षा आहे. भूतकाळातील आणि वर्तमानातील कवींना सन्मानित केले जाते आणि कविता पाठ करण्याच्या मौखिक परंपरांचे पुनरुज्जीवन केले जाते. कविता वाचणे, लिहिणे आणि शिकवणे याला प्रोत्साहन दिले जाते आणि संगीत, नृत्य, चित्रकला आणि बरेच काही यासारख्या अभिव्यक्तीच्या इतर माध्यमांसह एकत्रित केले जाते.
जागतिक कविता दिन विशेष
२१ मार्च
-------------------------------------------
शब्दरुपी अश्वावर आरूढ होते मी
काव्य प्रतिभेच्या पंखांनी भरारी घेते मी
कल्पनेच्या विश्वात संचार करिते मी
भावनांच्या तरंगांवर झुलते मी
यमकाचे बोट धरुनी
रचिले जाते मला
छंद-वृत्त आणि अलंकारांनी
सजविले जाते मला
कधी संगीताच्या तालावर
ठेका मी धरते
गीत रुपामध्ये
रसिकांसमोर अवतरते
कधी प्रेमाच्या तर कधी विरहाच्या
कधी राजकीय तर कधी सामाजिक
अशा विविध वस्त्रांनी नटत असते मी
भाषेच्या आणि प्रांताच्या
जातीच्या आणि धर्माच्या
पल्याड जाऊन वावरत असते मी
कलेच्या अथांग सागरात
नौकाविहार करत असते मी
कलावंत आणि दर्दी रसिकांच्या
शोधात असते मी
आजच्या जागतिक काव्यदीनी
कवितेच्या या रुपामध्ये
आपल्यासमोर प्रकट झाले मी

कविता कशी आली?
प्राचीन ग्रीसमध्ये, संपूर्णपणे मानवी भाषण, त्याच्या सर्व अभिव्यक्तींमध्ये (गद्य, नाट्य सादरीकरण, राजकारणी आणि वक्ते यांची भाषणे, कोणतेही तात्विक विवाद, कविता इत्यादी) कविता असे म्हणतात. तथापि, नंतर हे स्पष्ट झाले की जो माणूस सर्वात सामान्य आणि सामान्य गोष्टींमध्ये काहीतरी नवीन आणि उदात्त पाहू शकतो तोच कविता लिहिण्यास सक्षम आहे. कवींना त्यांच्या स्वतःच्या काल्पनिक जगात कसे बुडवून घ्यावे आणि इतरांपेक्षा कोणत्याही घटनांचा अनुभव कसा घ्यावा हे माहित आहे. याबद्दल धन्यवाद, श्लोकांमध्ये रचलेले विचार हजारो लोकांचे लक्ष वेधून घेतात, त्यांना सोबत घेऊन जातात, कवीने आपल्या निर्मितीमध्ये कोणती शक्ती ठेवली आहे हे त्यांना जाणवते.
*स्रोतपर माहिती *

जागतिक वन दिन world forest day

 
दृष्टीआड’ असलेल्या ‘सृष्टी’ चे महत्त्व मानवाला न समजण्याचे हे अगदी उघड उदाहरण म्हणता येईल. शुध्द हवा, पिण्याचे पाणी ( आणि इतरही अनेक बाबी) आपल्याला मिळतात त्या जंगलांमुळेच. मात्र चंगळवादी जीवनशैलीसाठी केल्या जाणा-या बेसुमार जंगलतोडीमुळे निसर्गाचा समतोल ढासळत असल्याचे १९७० च्या दशकात जाणवू लागले. त्यातून जंगले वाचवण्याची संकल्पना पुढे आली.या दिनानिमित्त वनिकी (Forestry) संदर्भातील उत्पादन, संरक्षण व रंजकता (recreation) या तीन महत्त्वाच्या घटकांबाबत जनजागृती करण्यात येते.
शुध्द हवा, पिण्याचे पाणी आणि इतरही अनेक बाबी आपल्याला मिळतात त्या जंगलांमुळेच. मात्र चंगळवादी जीवनशैलीसाठी केल्या जाणा-या बेसुमार जंगलतोडीमुळे निसर्गाचा समतोल ढासळत असल्याचे १९७० च्या दशकात जाणवू लागले. १९७१ मध्ये 'युरोपियन कॉनफीडरेशन ऑफ अॅग्रीकल्चर' च्या २३ व्या  बैठकीत हा दिन साजरा करण्याची संकल्पना पुढे आली. आणि त्यातूनच 'वनांचे महत्व व त्यांचे संवर्धन' याविषयी जनजागृती करण्यासाठी २१ मार्चला दरवर्षी जागतिक वन दिन साजरा केला जाऊ लागला. या दिनानिमित्त या दिवशी जंगलांसंदर्भातील उत्पादन, संरक्षण व रंजकता या तीन महत्वाच्या घटकांबाबत जनजागृती केली जाते.
"निसर्गाचे व सजीवांचे अस्तित्व
अबाधित ठेवण्यासाठी झाडांचे
संरक्षण व संगोपन करण्यासाठी
कटिबध्द होऊया...!!!"
👉 वनिकी (Forestry) हे वनव्यवस्थापन, वृक्षलागवड आणि संबंधित नैसर्गिक साधनसंपत्तीचे व्यवस्थापन करणारे शास्त्र आहे. वनांद्वारे पुरविल्या जाणार्या नैसर्गिक सुविधांचा शाश्वत पुरवठा करण्याच्या दृष्टीने वनांचे व्यवस्थापन करणे हा वनिकीचा मुख्य उद्देश आहे.
जंगल / वन म्हणजे केवळ झाडे नाहीत तर ती अनेक सजीव-निर्जीव घटकांनी बनलेली गुतांगुतीची परिसंस्था आहे. जंगल निरनिराळ्या प्रकारचे पक्षी, सस्तन प्राणी, वनस्पती, कीटक, सरपटणारे प्राणी यांनी समृद्ध असून हे सर्व घटक एकमेकांशी जोडलेले असतात. त्याचबरोबर अन्नघटकांचे पुनर्चक्रीकरण करण्याचे मह्त्त्वाचे कार्य करणारे स्मूक्षजीव व बुरशीवर्गीय जीव देखील वन-परिसंस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत.
👉 मूळ संकल्पना व सुरुवात
संयुक्त संघाच्या अन्न व शेती संघटनेच्या सदस्य देशांनी हा ‘वर्ल्ड फॉरेस्ट डे’ साजरा करण्यास सुरुवात केली.
पुढील मुद्यांची सर्वांनाच माहिती होण्यासाठी सरकार आणि विविध संस्था कार्यक्रम राबवतात.
अनावश्यक जंगलतोड टाळणे.
अधिक झाडे लावणे.
जंगलांपासून मिळणारी उत्पादने आणि होणारे फायदे
जंगलांना सतत भेट दिल्याने मिळणारी माहिती,
माणूस हा निसर्गाचा वैरी नसून त्याच्याच मदतीने निसर्गाचे जतन व संवर्धन होऊ शकते. जंगलांतून मिळणाऱ्या संसाधनांचा मानवाच्या उपजीविकेशी थेट संबंध आहे. २००२ साली जंगल संवर्धनासाठी जैवविविधता कायदा मंजूर झाला. सामुहिक वनहक्क कायदा आला. आदिवासींचे व इतर परंपरेने राहणाऱ्या आणि जंगलांचे संवर्धन करणाऱ्या वननिवासी यांचे जंगलावरील हक्क याला मंजूरी देण्यात आली. आणि याच कायद्यांचा व इतर शासकीय योजनांचा आधार घेत गावांमध्ये बदल घडू लागले. यातले काही उदाहरणे सांगता येतील. धुळे जिल्ह्यातील बारीपाडा हे गाव. काही वर्षांपूर्वी गावात वनव्यवस्थापन समिती स्थापन झाली. आणि उजाड झालेल्या जंगलाचे संवर्धन झाले. जंगलात चराईबंदी, कुऱ्हाडबंदी करण्याचे लोकांनीच ठरविले. जंगलांतील सर्व झाडांची मोजणी झाली. मोह या उत्पन्न मिळवून देणाऱ्या झाडांचा लिलाव होऊ लागला, जो गावातील लोकच घेऊ लागले. त्यातून जमा झालेल्या रकमेतून गावात विकासकामे झाली. जंगल वाढले. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली. उत्तम शेती होऊ लागली. गाव समृद्ध बनले.
दुसरे उदाहरण धुळे जिल्ह्यातीलच लामकानी गावाचे. शहरात राहणाऱ्या डॉक्टर धनंजय नेवाडकर ह्यांना झालेल्या अपघातामुळे ते काही महिने सक्तीची विश्रांती घेण्यासाठी गावी आले. त्यावेळी लोकांपुढे चार आणि विहिरीचे पाणी आटण्याची मोठी समस्या आहे असे त्यांच्या लक्षात आले. गावाच्या  बाजूलाच सातपुड्याची पर्वतरांग आहे. साधारण एक हजार एकरांचा हा डोंगर सुजलाम, सुफलाम करण्याचे त्यांनी ठरविले. त्यासाठी रोजगार हमी योजनेचा आधार घेतला. पाणी अडवा, पाणी जिरवा ही कामे तेथे सुरु केली. गावातील लोकांना रोजगार हमी योजनेचा फायदा मिळाला, रोजगार मिळाला. त्यातून गावातील पाण्याची समस्या मिटली आणि डोंगर पुन्हा समृद्ध बनला.
आदिवासी भागात सामुहिक वनहक्क मिळालेल्या गडचिरोली जिल्ह्यातील १०२५ गावांनी जैवविविधता समित्या स्थापन करून मोठ्या प्रमाणात जंगलसंवर्धनाला सुरवात केली आहे. यातूनच लोकांच्या उपजीविकेचा प्रश्नही सुटला आहे. २००५ ला आलेल्या या कायद्यानुसार जंगलांतील बांबू, तेंदूपत्ता या सर्वांचे मालकी हक्क ग्रामसभेला मिळाले. बांबूसारख्या वनोपजाची व्यवस्था लोकांनी केली. यातून बांबूकटाई साठीची मजुरी आधीपेक्षा तिप्पट प्रमाणात लोकांना मिळाली शिवाय या बांबूविक्रीतून गावासाठी आवश्यक विकासकामांसाठी लोकांना पैसे मिळाले. कोरची तालुक्यात तर सालेम, झेंडेपार, अरवीटोला, अंधेरी, टेंभली, काळेगाव या गावातील लोकांनी सात एकर नवीन बांबूची लागवड केली आहे. जे जंगल त्यांना जगवते त्या जंगलाला ते जगवत आहे, वाढवत आहे.
जसे वनांवरील हक्क लोकांना मिळत आहे तसेच जंगल संवर्धन आणि जतन करण्याची जबाबदारीही लोकांकडे आहे. ज्या भागांत वनव्यवस्थापन समिती नाही किंवा नुसतीच कागदोपत्री आहे अशा काही गावांतून लोकांना पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे, पण, बेजबाबदारपणामुळे त्यावर नियंत्रण नाही. यातून जंगलांचा नाशच जास्त होत आहे व नको त्या वाईट प्रवृत्ती बोकाळत आहे. यासाठी संतुलित, शाश्वत, जबाबदार लोकसहभागातून होणाऱ्या वनव्यवस्थापनातूनच शाश्वत उपजीविका निर्माण होईल व सर्वांनाच ‘शुद्ध हवा आणि शुद्ध आरोग्य’ अनुभवता येईल

आगामी झालेले