नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

शनिवार, २८ ऑक्टोबर, २०२३

भुलाबाईची गाणी Bhulabai Songs


भुलाबाईची गाणी Bhulabai Songs 
(संकलित माहिती)
महाराष्ट्रात वेगवेगळे सण वेगवेगळ्या प्रदेशात थोड्याफार फरकाने साजरे होतात. महाराष्ट्रात इतरत्र साजरा होणारा भोंडला, हादगा विदर्भात भुलाबाई च्या रूपात साजरा होतो.

भुलाबाई ही महाराष्ट्रातील एक देवी असून भिल्लीणीचा वेश घेऊन भिल्लरुपी शंकराला भुलवायला आलेल्या पार्वतीला भुलाबाई असे म्हणतात. भुलोबा म्हणजे शंकर तर भुलाबाई म्हणजे पार्वती.

भाद्रपदचा महिना आला । आम्हा मुलींना आनंद झाला ।
पार्वती म्हणे शंकराला चला हो माझ्या माहेराला ।
गेल्या बरोबर पाट बसायला । विनंती करून यशोदेला ।
सर्व मुली गोळा झाल्या । टिपऱ्या मध्ये गुंग झाल्या ।
प्रसाद घेऊन घरी गेल्या ।
या गीतांचे गायन भुलाबाई विधिचे वेळी होते. भुलाबाई हा लोककथागीत महोत्सव होय. हा महोत्सव भाद्रपदाच्या पौर्णिमे पासून ते शरद पोर्णिमेपर्यंत असा एक महिन्याच्या कालावधीत होतो.
गणपतीच्या आगमनानंतर भुलजा-भुलाबाई येतात. १६ वर्षांखालील मुली हा भुलाबाई महोत्सव साजरा करतात. हयामध्ये शिव-शक्तीच्या पुजेकरिता म्हणजेच भुलाबाई नऊवारी साडी नेसलेल्या आणि भुलजा धोतर नेसलेला आणि फेटा बांधलेल्या असतो या लोकखेळाचे मूळ कृशी परंपरेतून आलेले आपल्याला दिसते. भुलाबाई हा सृजनाचा विधी असतो. भुलजा-भुलाबाईला पाटावर बसवतात व ज्वारीच्या पाच धांडयाचा मखर त्यांच्या भौवती ठेवतात. त्यांना पिवळे वस्त्र चढवितात. हा कुळाचार आहे. शेजारी अन्नाच्या ढिगार्‍यावर कळस ठेवण्याची पध्दतही काही ठिकाणी आहे.

विदर्भातील हा लोककथा-गीत कला प्रकार फार मजेशीर आहे. या उत्सवा मध्ये ज्यांच्या घरी भूलाबाई बसतात त्यांच्या घरी शेजारच्या मुली गोळा होतात. आणि भुलाबाई समोर बसून मजेशीर गाणी म्हणतात. या उत्सवामध्ये ज्यांच्या घरी भुलाबाई बसतात ते घर म्हणजे भुलाबाईच माहेर आणि ज्या मुली गाणी म्हणतात त्या मुलींना जणू काही भुलाबाईने आपल्या सासुरवासाच्या सर्व कथा तेथील त्रास, आनंद सगळा स्वत: प्रत्यक्ष सांगितला आहे. आणि या मुली भुलाबाईच्या प्रतिनिधी म्हणून जणू काही सगळयांना त्या कथा गीतांद्वारे सांगत आहे असे वाटते. या लोककथा-गीत कला प्रकारात कुठल्या ही प्रकारचे वाद्य वाजविले जात नाही, परंतु मुली एकमेकींना दोन हाताची टाळी देऊन ही गाणी म्हणतात. व ती खूपच दूतगतीने म्हटली जातात.

१….

पहिली गं पुजाबाई देवा देवा सा देव
साथीला खंडोबा खेळी खेळी खंडोबा
खंडोबाच्या नारी बाई वर्षा वर्षा आवसनी
आवसनीच पाणी जस गंगेच पाणी
गंगेच्या पाण्याला ठेविला कंठ

ठेविला कंठ राणा भुलाबाईची
ठोकिला राळा हनुमंत बाळा
हनुमंत बाळाचे लांब लांब डोळे
टीकाळीचे डोळे हात पाय गोरे

भाऊ भाऊ एकसनी
माता पुढ टेकसनी
टेकसनीच एकच पान
दुरून भुलाबाई नमस्कार

एवढीशी गंगा झुळूझुळू वाहे
तांब्या पितळी न्हाय गं
हिरवी टोपी बाय गं
हिरवी टोपी हारपली

सरपा आड लपली

सरप दादा हेकोडा
जाई आंबा पिकला
जाई नव्हे जुई नव्हे
चिंचाखालची रानोबाय

चिंचा वेचत जाय गं
शंभर पान खाय गं
खाता खाता रंगली
तळ्यात घागर बुडाली

तळ्या तळ्या साखळ्या
भुलाबाई जाते माहेरा
जाते तशी जाऊ द्या

थालीभर पाण्याने न्हाऊ द्या
बोटभर मेण लाऊ द्या
बोटभर कुंकू लाऊ द्या
जांभळ्या घोड्यावर बसु द्या

जांभळ्या घोड्याचे उलटे पाय
आऊल पाऊल अमरावती गाव
अमरावती गावचे ठासे ठुसे
दुरून भुलाबाई चे माहेर दिसे

२….

आपे दूssध तापे
त्यावर पिवळी साय
लेकी भुssलाबाई

साखळ्यांचा जोड
कशी लेऊ दादा
घरी नंदा जावा
करतील माझा हेवा
हेवा कssरपली

नंदा गं लपली
नंदाचा बैल

डोलत येईल

सोन्याच कारलं

झेलत येईल

३….

घरावर घर बत्तीस घर

इतका कारागीर कोणाचा

भुलोजी च्या राणीचा

भूलोजीची राणी

भरत होती पाणी

धावा धावा कोणी

धावतील तिचे दोनी

दोनी गेले ताकाला

विंचू चावला नाकाला

४….

नंदा भावजया दोघी जणी

दोघी जणी

घरात नाही तिसर कोणी

तिसर कोणी

शिक्यातल लोणी खाल्ल कोणी

तेच खाल्लं वहिनीनी वहिनीनी

आता माझे दादा येतील गं येतील गं

दादाच्या मांडी वर बसील गं बसील गं

दादाची बायको चोट्टी चोट्टी

असू दे माझी चोट्टी चोट्टी

घे काठी लगाव काठी

घरा घराची लक्ष्मी मोठी

५….

काळा कोळसा झुकझुक पाना

पालखीत बसला भुलोजी राणा

भुलोजी राण्याचे कायकाय (आ)ले

सारे पिंपळ एक पान

एक पान दरबारी

दुसर पान शेजारी

शेजाऱ्याचा डामा डुमा

वाजतो तसा वाजू द्या

आम्हाला खेळ मांडू द्या

खेळात सापडली लगोरी

लगोरी गेली वाण्याला

वाण्या वाण्या सोपा दे

सोपा माझ्या गाईला

गाई गाई दुध दे

दुध माझ्या बगळ्याला

बगळ्या बगळ्या गोंडे दे

(गोंडे माझ्या राज्याला)

तेच गोंडे लेऊ सासर जाऊ

सासरच्या वाटे कुचू कुचू दाटे

पंढरीच्या वाटे नारळ फुटे

६….

नदीच्या काठी राळा पेरला

बाई राळा पेरला

एके दिवशी काऊ आला

बाई काऊ आला

एकच कणीस तोडून नेल

बाई तोडून नेल

सईच्या अंगणात टाकून दिल

बाई टाकून दिल

सईन उचलून घरात नेल

बाई घरात नेल

कांडून कुंडून राळा केला

बाई राळा केला

राळा घेऊन बाजारात गेली

बाई बाजारात गेली

चार पैशाची घागर आणली

बाई घागर आणली

घागर घेऊन पाण्याला गेली

बाई पाण्याला गेली

मधल्या बोटाला विंचू चावला

बाई विंचू चावला

७….

आला गं सासरचा वैद्दय

हातात काठी जळक लाकूड

पायात जोडा फाटका तुटका

नेसायचं धोतर फाटक तुटक

अंगात सदरा मळलेला

डोक्यात टोपी फाटकी तुटकी

तोंडात विडा शेणाचा

कसा गं दिसतो बाई म्हायरावाणी

गं बाई म्हायरावाणी

आला गं माहेरचा वैद्दय

हातात काठी पंचरंगी

पायात जोडा पुण्यशाई

नेसायचं धोतर जरीकाठी

अंगात सदरा मलमलचा

डोक्यात टोपी भरजरी

तोंडात विडा लालेला

कसा गं दिसतो बाई राजावाणी

गं बाई राजावाणी

८….

सा बाई सू sss सा बाई सू sss

बेलाच्या झाडाखाली महादेवा तूsss महादेवा तू

कृष्ण पंजरीsss कृष्ण पंजरी

खुंटी वरचा हार माझा श्याम पदरीss श्याम पदरी

काय करू माय कृष्णानी हार माझा नेलास कि काय ss नेलास कि काय

कृष्ण करे मोssर कृष्ण करे मोर चंदनाच्या झाडाखाली पाणी पितो मोर

डाव रंगीलाss डाव रंगीला गुलाबाचे फुल माझ्या पार्वतीलाss पार्वतीला

९….

काळी चंद्रकला नेसू कशी नेसू कssशी

जाईच तेल आणू कशी आणू कss शी

जाईच तेल आणल आणल

सासूबाईच न्हाण झाल

वन्साबाईची वेणी झाली

मामाजीची शेंडी झाली

उरलेलं तेल झाकून ठेवलं

रानोबाचा पाय पडला

सासूबाई सासूबाई अन्न द्या

दुधभात जेवायला द्या

आमच उष्ट तुम्ही खा

विडा घेऊन खेळायला जा

१०….

आमचे मामा व्यापारी व्यापारी

तोंडात चिक्कण सुपारी सुपारी

सुपारी काही फुटेना फुटेना

मामा काही उठेना उठेना

सुपारी गेले गडगडत गडगडत

मामा आले बडबडत बडबडत

सुपारी गेली फुटून फुटून

मामा आले उठून उठून

११….

अक्कण माती चिक्कण माती अशी माती सुरेख बाई

जातss ते टाकाव अस जात सुरेख बाई

गहू ते वल्वावे असे गहू सुरेख बाई

रवा तो पाडावा असा रवा सुरेख बाई

करंज्या भराव्या अशा करंज्या सुरेख बाई

तबकात ठेवाव्या अस तबक सुरेख बाई

शालुनी झाकाव असा शालू सुरेख बाई

खेळायला सापडते अस सासर द्वाड बाई

कोंडू कोंडू मारीते …


१२….

कारल्याची बी पेर ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा

कारल्याची बी पेरली हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना

कारल्याला कोंब येऊ दे ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा

कारल्याला कोंब आल हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना

कारल्याला वेल येऊ दे ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा

कारल्याला वेल आला हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना

कारल्याला फुल येऊ दे ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा

कारल्याला फुल आले हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना

कारल्याला कारले लागू दे ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा

कारल्याला कारले लागले हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना

कारल्याची भाजी कर ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा

कारल्याची भाजी केली हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना

कारल्याची भाजी खा ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा

कारल्याची भाजी खाल्ली हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना

कारल्याचा गंज घास ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा

कारल्याचा गंज घासला हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना

मला काय पुसते बरीच दिसते पूस आपल्या सासऱ्याला सासऱ्याला

मामंजी मामंजी मला मूड आल पाठवता की नाही नाही

मला काय पुसते बरीच दिसते पूस आपल्या भासऱ्याला भासऱ्याला

दादाजी दादाजी मला मूड आल पाठवता की नाही नाही

मला काय पुसते बरीच दिसते पूस आपल्या जावेला जावेला

जाऊबाई जाऊबाई मला मूड आल पाठवता की नाही नाही

मला काय पुसते बरीच दिसते पूस आपल्या नन्देला नन्देला

वन्स वन्स मला मूड आल पाठवता की नाही नाही

मला काय पुसते बरीच दिसते पूस आपल्या दीराला दीराला

भाऊजी भाऊजी मला मूड आल पाठवता की नाही नाही

मला काय पुसते बरीच दिसते पूस आपल्या नवऱ्याला नवऱ्याला

पतीराज पतीराज मला मूड आल पाठवता की नाही नाही

आन फणी घाल वेणी मग जा अपूल्या माहेरा माहेरा

आणली फणी घातली वेणी भुलाबाई गेल्या माहेरा

१३….

यादवरा या राणी रुसून बैसली कैसी

सासूरवाशीण सून घरात येना कैसी

सासू गेली समजावयाला

चला चला सुनबाई अपुल्या घराला

मी नाही यायची तुमच्या घराला

माझा पाटल्यांचा जोड देते तुम्हाला

तुमचा पाटल्यांचा जोड नको मजला

मी नाही यायची तुमच्या घराला

यादवरा या राणी रुसून बैसली कैसी

सासरे गेले समजावयाला

चला चला सुनबाई अपुल्या घराला

मी नाही यायची तुमच्या घराला

माझी घोडागाडी देतो तुम्हाला

तुमची घोडागाडी नको मजला

मी नाही यायची तुमच्या घराला

यादवरा या राणी रुसून बैसली कैसी

सासूरवाशीण सून घरात येना कैसी

………………………….

………………………

………………. …………………

पतीराज गेले समजावयाला

चला चला राणीसाहेब अपुल्या घराला

माझा लाल चाबूक देतो तुम्हाला

तुमचा लाल चाबूक हवा मजला

मी तर यायची अपुल्या घराला

यादवरा या राणी घरात आली कैसी

१४….

चादण्या रात्री आम्ही भुलाबाई जागवल्या जागवल्या

सासू म्हणते सुने सुने तो पाटल्यांचा जोड काय केला काय केला

हरवला हरवला, तुमच काय जाते माझ्या बाबाने घडवला घडवला

चादण्या रात्री आम्ही भुलाबाई जागवल्या जागवल्या

..................................................

.................................................


१५….

झापर कुत्र सोडा ग बाई सोडा ग बाई

चारी दरवाजे लावा ग बाई लावा ग बाई

कोण पाव्हणे आले ग बाई आले ग बाई

सासरे पाव्हणे आले ग बाई आले ग बाई

………………………………

.........................................

झापर कुत्र बांधा ग बाई बांधा ग बाई

चारी दरवाजे उघडा ग बाई उघडा ग बाई

कोण पाव्हणे आले ग बाई आले ग बाई

पतीराज पाव्हणे आले ग बाई आले ग बाई

१६….

पहिल्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा

सरता सरता नंदन घराच्या

नंदन घराच्या बगिच्या वरी

चिंचा बहुत लागल्या

भुलाबाई राणीचे डोहाळे

तिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी

पलंग फिरे चौक फिरे

शंकर बसिले शेजारी ।।१।।

...........................................

दुसऱ्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा

सरता सरता नंदन घराच्या

नंदन घराच्या बगिच्या वरी

पेरू बहुत लागले

भुलाबाई राणीचे डोहाळे

तिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी

पलंग फिरे चौक फिरे

शंकर बसिले शेजारी ।।२।।

.................................................

तीसऱ्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा

सरता सरता नंदन घराच्या

नंदन घराच्या बगिच्या वरी

संत्री बहुत पिकले

भुलाबाई राणीचे डोहाळे

तिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी

पलंग फिरे चौक फिरे

शंकर बसिले शेजारी ।।३।।

..................................................

चौथ्या माशीचा घडवा येतो येतो रे शिरवा

सरता सरता नंदन घराच्या

नंदन घराच्या बगिच्या वरी

मोसंबी बहुत पिकल्या

भुलाबाई राणीचे डोहाळे

तिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी

पलंग फिरे चौक फिरे

शंकर बसिले शेजारी ।।४।।

..................................................

पाचव्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा

सरता सरता नंदन घराच्या

नंदन घराच्या बगिच्या वरी

डाळिंब बहुत पिकले

भुलाबाई राणीचे डोहाळे

तिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी

पलंग फिरे चौक फिरे

शंकर बसिले शेजारी ।।५।।

..................................................

सहाव्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा

सरता सरता नंदन घराच्या

नंदन घराच्या बगिच्या वरी

द्राक्ष बहुत पिकले

भुलाबाई राणीचे डोहाळे

तिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी

पलंग फिरे चौक फिरे

शंकर बसिले शेजारी ।।६।।

..................................................

सातव्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा

सरता सरता नंदन घराच्या

नंदन घराच्या बगिच्या वरी

आंबे बहुत पिकले

भुलाबाई राणीचे डोहाळे

तिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी

पलंग फिरे चौक फिरे

शंकर बसिले शेजारी ।।७।।

..................................................

आठव्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा

सरता सरता नंदन घराच्या

नंदन घराच्या बगिच्या वरी

खरबूज बहुत पिकले

भुलाबाई राणीचे डोहाळे

तिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी

पलंग फिरे चौक फिरे

शंकर बसिले शेजारी ।।८।।

..................................................

नवव्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा

सरता सरता नंदन घराच्या

नंदन घराच्या बगिच्या वरी

टरबूज बहुत पिकले

भुलाबाई राणीचे डोहाळे

तिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी

पलंग फिरे चौक फिरे

शंकर बसिले शेजारी ।।९।।

१७-….

एक लिंब झेलू बाई दोन लिंब झेलू

दोन लिंब झेलू बाई तीन लिंब झेलू

तीन लिंब झेलू बाई चार लिंब झेलू

चार लिंब झेलू बाई पाच लिंब झेलू

पाचाचा पानोडा माय गेली हन्मंता

हन्मंताचे --------------------------

---------------येता जाता कंबर मोडी

नीज रे नीज रे तान्ह्या बाळा

मी तर जातो सोनार वाडा

सोनार वाड्यातून काय काय आणले

----------------------------------------

एक गेला खारीला एक गेला खोबरीला

खारी खोबऱ्याच आल जीऱ्या मिऱ्याच काही नाही आल

आपडमं तापडमं चंद्राची मागे पडली बेलाची

बाळ लेकरू राजाच सीताबाई रामाची

पार्वती शंकराची पाळणा हाले झुईझुई

तामण बाई तामण अस कस तामण

भूलोजीला लेक झाला नाव ठेवा वामन

अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होता बत्ता

भूलोजीला लेक झाला नाव ठेवा दत्ता

.................................................. …………………।

अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीतून पाय घसरला

भूलोजीला लेक झाला साखरपाना विसरला

आणा आणा पारीस उगळा उगळा काथ

आज आमच्या भुलाबाईचा शेवटचा दिवस

शेवट च्या दिवशी बाळाला टोपी मोत्यांनी गुंफली झोझो रे

बाणा बाई बाणा सुरेख बाणा

गाणे संपले खिरापत आणा

आणा आणा लवकर खाऊ द्या पट्कन

१८- ……

हत्तीच्या सोंडेवर पेरीला मगर

मगरच्या राजाने शाळा मस्त केली

शाळेच्या राजाचे चंदनाचे गोटे

एवढ्या रातरी धून कोण धुते

धून धुय ग बाई चंदन गोटयावरी

वाळू घाल ग बाई रंगीत खुंटी वरी

आला चेंडू गेला चेंडू लाल चेंडू गुलाबी

आपण सारे हत्ती घोडे हत्ती घोडे रवे रवे

रव्याचे भाऊ वाणीला गेले

एक गेला खारीला एक गेला खोबरीला

खारी खोबऱ्याच आल जीऱ्या मिऱ्याच काही नाही आल

आपडमं तापडमं चंद्राची मागे पडली बेलाची

बाळ लेकरू राजाच सीताबाई रामाची

पार्वती शंकराची पाळणा हाले झुईझुई

तामण बाई तामण अस कस तामण

भूलोजीला लेक झाला नाव ठेवा वामन

अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होता बत्ता

भूलोजीला लेक झाला नाव ठेवा दत्ता

……………………………………………………

…………………………… ………………………

अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीतून पाय घसरला

भूलोजीला लेक झाली नाव ठेवा सरला

आणा आणा पारीस उगळा उगळा काथ

आज आमच्या भुलाबाईचा शेवटचा दिवस

शेवट च्या दिवशी बाळाला टोपी मोत्यांनी गुंफली झोझो रे

बाणा बाई बाणा सुरेख बाणा

गाणे संपले खिरापत आणा

आणा आणा लवकर खाऊ द्या पट्कन

बुधवार, २५ ऑक्टोबर, २०२३

STARS प्रकल्पांतर्गत (प्रथम सत्र) (PAT) संकलित मूल्यमापन चाचणी क्र.१

संकलित मूल्यमापन चाचणी- १ (२०२३-२४ साठी)
वेळापत्रक :-
संकलित मूल्यमापन चाचणी 1 चे वेळापत्रक, अभ्यासक्रम व परीक्षा आयोजनाबाबत शासन परिपत्रक डाउनलोड करा.

STARS प्रकल्पांतर्गत नियतकालिक मूल्यमापन चाचणी (PAT) शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व खाजगी अनुदानित शाळांमध्ये इयत्ता ३ री ते ८वी वर्गासाठी संकलित मूल्यमापन क्र.१ आयोजनाबाबत..!!

उपरोक्त विषयान्वये STARS (Strengthening Teaching Learning And Results for States ) केंद्रपुरस्कृत प्रकल्पामधील SIG-2 (Improved Learning Assessment systems) २.२ अंतर्गत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे (PAT) आयोजन करण्यात येत आहे. त्यामध्ये पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी-१ व संकलित मूल्यमापन चाचणी-२ अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने माहे ऑगस्ट २०२३ मध्ये शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळातील विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणीचे आयोजन पूर्ण झालेले आहे. सदर चाचणीसाठी प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांचे परीक्षा साहित्य (चाचणी प्रश्नपत्रिका, उत्तरसूची तसेच शिक्षक सूचना) राज्यस्तरावर छपाई करुन. या कायालयमार्फत शाळांना पुरवठा करण्यात आलेला आहे.

संदर्भ क्र. २ अन्वये शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसोबतच खाजगी अनुदानित शाळांतील इ.3री ते ८वी वर्गांमधील विद्यार्थ्यांसाठी सकलित मूल्यमापन चाचणी १ चे आयोजन दि. ३० ऑक्टोबर ते ०१ नोव्हेंबर, २०२३ या कालावधीत करण्यात येणार आहे. सदर संकलित मूल्यमापन चाचणी-१ साठी छापील परीक्षा साहित्याचा (चाचणी प्रश्नपत्रिका, उत्तरसूची तसेच शिक्षक सूचना) पुरवठा राज्यस्तरावरुन करण्यात येणार आहे. याबाबत पुढीलप्रमाणे सूचनांचे अनुषंगाने कार्यवाही करण्यात यावी.

वेळापत्रक (2023-24)
संकलित मूल्यमापन चाचणी क्र. १
टिप :- १ प्रथम भाषा, गणित (सर्व माध्यम) व तृतीय भाषा इंग्रजी (इंग्रजी माध्यम वगळता सर्व माध्यम) या विषयांची तोंडी परीक्षा ही त्या-त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरुपात घेण्यात यावी. तसेच विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी उपलब्ध वेळेनुसार घ्यावी.

टीप :- २ प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्तानिहाय अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्तं केली आहे किंवा नाही याची पडताळणी होऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास या चाचणीमुळे शिक्षकांना मदत होणार होईल.

टीप :- ३ सदर चाचण्या इयत्ता १० वी व १२ वी बोर्ड परीक्षेप्रमाणे नाहीत यामुळे विद्यार्थ्यांना याचा अतिरिक्त ताण देऊ नये याची दक्षता घ्यावी. चाचण्यांचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केलेल्या आहेत हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप कृतीकार्यक्रमाची आखणी करणे हा आहे.

चाचणी अंमलबजावणीबाबत सूचना :-
१. सदर वेळापत्रक हे संबंधित सर्व शाळांच्या निदर्शनास येईल याची दक्षता घ्यावी.
२. चाचणीचे माध्यम व विषय :- सदर चाचणी ही एकूण दहा माध्यमात होईल. (मराठी, इंग्रजी, उर्दू, हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड, गुजराती, बंगाली, सिंधी) इयत्ता ३ री ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या तीन विषयांच्या चाचण्यांचे आयोजन करण्यात येईल.
३. चाचणीचा अभ्यासक्रम :- प्रथम सत्रातील अध्ययन निष्पत्तींवर आधारित असेल. 
४. चाचणीचे स्वरुप :- सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन कार्यपद्धतीमधील तरतूदीनुसार सदर चाचण्यांची इयत्तानिहाय गुणविभागणी असेल. त्यामध्ये लेखी, तोंडी व प्रात्यक्षिक प्रश्नांचा समावेश असेल.
५. चाचणी निर्मिती :- सदर चाचणीकरीता प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या चाचण्यांची निर्मिती राज्य स्तरावरून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे मार्फत करण्यात येईल.
६. चाचणी कोणासाठी संकलित मूल्यमापन चाचणी १ साठी छापील परीक्षा साहित्याचा पुरवठा (चाचणी प्रश्नपत्रिका, उत्तरसूची तसेच शिक्षक सूचना) शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसोबतच खाजगी अनुदानित शाळांनाही करण्यात येईल.
७. चाचणी कालावधीत सर्व विद्यार्थी शाळेत उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी. एखादा विद्यार्थी गैरहजरअसल्यास तो शाळेत हजर झालेल्या दिवशी त्याची चाचणी घेण्यात यावी.
८. शाळा स्तरावरील प्रश्नपत्रिका वेळापत्रकाप्रमाणे त्या-त्या दिवशी वापरल्या जातील याची दक्षता घ्यावी.
९. शिक्षकांनी चाचणीचे धर्तीवर नमुना प्रश्न निर्मिती करुन विद्यार्थ्यांचा सराव घ्यावा व मार्गदर्शन करावे
१०. दिव्यांग विद्यार्थ्याच्या बाबतीत सदर चाचणी घेण्याबाबतचा निर्णय संबंधित विद्यार्थ्याच्या दिव्यांग प्रकारानुसार शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांनी घ्यावा. आवश्यकतेनुसार तज्ज्ञ / विशेष शिक्षक यांची मदत घ्यावी.
११. प्रस्तुत चाचणी कशी घ्यावी, याबाबत शिक्षकांना सर्वसाधारण सूचना, इयत्तानिहाय व विषयनिहाय शिक्षक सूचनापत्रात देण्यात आलेल्या आहेत. शिक्षकांनी सदर सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून कार्यवाही करावी. तसेच या शिक्षक सूचनासोबत उत्तरसूची आहे. त्यानुसार चाचणी तपासून गुणनोंद करावी.
१२. चाचणीचे गुण नोंद प्रश्नपत्रिकेच्या पहिल्या पानावर दिलेल्या अध्ययन निष्पत्तीनिहाय रकान्यात करावी.
१३. मूल्यमापन / चाचणीमधील गुणांच्या आधारे शिक्षकांनी विद्यार्थीनिहाय कृतिकार्यक्रम तयार करून अंमलबजावणी करावी, जेणेकरून संकलित मूल्यमापन चाचणी १ व २ मध्ये अध्ययन निष्पत्तीनिहाय संपादणूक वाढण्यास मदत होईल.
१४. प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांचे संकलित मूल्यमापन चाचणी साहित्य शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना छापील स्वरुपात पुरवठा करण्यात येणार असलेमुळे सदर विषयांसाठी वेगळ्यांचाचणीचे आयोजन शाळांनी करु नये.

प्रश्नपत्रिका व परीक्षा साहित्य वाहतूक व सूचना :-
१. जिल्हास्तरावर चाचणी आयोजनाबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याची सर्वस्वी जबाबदारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद यांची असेल.
२. विद्यार्थी संख्येनुसार प्रश्नपत्रिका, शाळेस एक याप्रमाणे शिक्षक सूचनापत्र व विषयनिहाय उत्तरसूची याप्रमाणे तालुका स्तरापर्यंत पुरवठा करण्यात येईल.
३. तालुकास्तरावर परीक्षा साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी सुरक्षित व स्वतंत्र खोली गट शिक्षणाधिकारी यांनी ताब्यात घ्यावी. या खोलीमध्ये प्राप्त प्रश्नपत्रिका ठेवाव्यात प्रश्नपत्रिका फाटणार नाहीत किंवा भिजणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
४. तालुका स्तरावर साहित्य प्राप्त होताच संबंधित गटशिक्षणाधिकारी/ प्रशासन अधिकारी यांनी केंद्र स्तर व शाळास्तरावर वेळेत पोचतील याची व्यवस्था करावी.
५. इयत्ता ३ री ते ८ वी च्या विद्यार्थी संख्येनुसार पुरवठा झाला असल्याची खातरजमा तालुका समन्वयकांनी करून घ्यावी.
६. केंद्रस्तरावर शाळांच्या पटसंख्याप्रमाणे प्रश्नपत्रिका, शिक्षक सूचनापत्र व उत्तरसूचीचे वितरण करावे. त्यासाठी तालुका समन्वयकांनी सदर प्रश्नपत्रिका समक्ष मोजूनच आवश्यक तेवढ्या मुख्याध्यापकांच्या ताब्यात द्यावयाच्या आहेत. त्यामध्ये हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घ्यावयाची आहे..
७. कोणत्याही परिस्थितीत प्रश्नपत्रिका अथवा इतर साहित्याचे झेरॉक्स काढण्यात येऊ नये. अथवा • झेरॉक्ससाठी तालुका समन्वयकांनी कोणत्याही प्रश्नपत्रिका अथवा इतर साहित्य बाहेर जाणार नाही याची दक्षता घ्यावी. तथापि,
८. तालुका अंतर्गत कमी- जादा संख्या तपासून शाळानिहाय परीक्षा साहित्याचे समायोजन करता येईल.
९. जिल्हांतर्गत कमी- जादा समायोजनासाठी जिल्हास्तरावर ०५ टक्के अतिरिक्त परीक्षा साहित्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. सदर साहित्य शिक्षणाधिकारी (प्राथमिक) याचे ताब्यात असेल व जिल्ह्यातील सर्व शाळांना पुरसे परीक्षा साहित्य पोच झाले असलेची खात्री चाचणी पूर्वी करणे आवश्यक असेल.
१०. प्रश्नपत्रिकांचा मोबाईल मधून फोटो काढणे, समाजमाध्यमाद्वारे इतरांना पाठविणे असे प्रकार होणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी.
११. तालुका स्तरावर प्रश्नपत्रिका ताब्यात घेणे, सुरक्षित ठिकाणी ठेवणे व त्याचे शाळानिहाय वाटप करणे तसेच चाचणीचे कामकाज सुरळीतपणे होण्याची सर्वस्वी जबाबदारी तालुका समन्वय / गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी यांची राहील.
१२. शिक्षक सूचना व उत्तरसूची ही फक्त शिक्षकासाठी आहे ती विद्यार्थ्याना देऊ नये. विद्यार्थ्यांना फक्त प्रश्नपत्रिका देण्यात याव्यात.

चाचणी कालावधीत करावयाच्या शाळा भेटीबाबत :-
१) जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या शाळानिहाय भेटीचे दिनांकासहित नियोजन प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, व शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) यांनी एकत्रितरित्या बैठक घेऊन करावे.
२) जिल्हास्तरावरून केलेले नियोजन संबधित तालुक्यांना कळवावे. प्रत्येक तालुनयांनी जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना दिलेल्या भेटीच्या शाळा वगळून उरित शाळांसाठी शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय साधन व्यक्ती व विशेष तज्ज्ञ यांच्या भेटीचे नियोजन करावे.

उपरोक्त नियोजनानुसार दिलेल्या वेळेत सर्व वर्गाची चाचणी होईल याप्रमाणे कार्यवाही करण्याची जवाबदारी शाळा मुख्याध्यापकांची असेल. दिलेल्या दिवशी शाळेच्या वेळेत चाचणीचे आयोजन करण्यात यावे. तथापि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन अपरिहार्य कारणास्तव चाचणी वेळापत्रकात अंशत: बदल करणे आवश्यक असल्यास असल्यास संबंधित शिक्षणाधिकारी यांनी निर्णय घ्यावा व तसे या कार्यालयास अवगत करावे.

प्राप्त गुणांची नोंद चॅट बॉट च्या माध्यमातून करणे :-

चाचणी तपासून झाल्यानंतर शिक्षकांनी प्रश्ननिहाय प्राप्त गुणांची नोंद प्रश्नपत्रिकेवर करुन ठेवावी. सदर गुणांची ऑनलाईन नोंद करण्याची सुविधा विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचे मार्फत उपलब्ध केलेल्या चॅट बॉट वर तात्काळ करण्यात यावी.

शासकीय शाळा व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित व्यतिरिक्त अन्य शाळांना सदर चाचणी प्रश्नपत्रिका वापरायच्या असल्यास दिलेल्या वेळापत्रकानुसार चाचणी कालावधी पूर्ण झालेनंतर प्रश्नपत्रिका राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.

रविवार, २२ ऑक्टोबर, २०२३

वीर बाबूराव पुल्लासुर शेडमाके Baburao Shedacame


वीर बाबुराव पुल्लासूर शेडमाके Baburao Shedacame
जन्म: १२ मार्च १८३३ (मोलामपल्ली, अहेरी, गडचिरोली)
फाशी: २१ ऑक्टोबर १८५८ (वय २५) (चांदा, महाराष्ट्र, ब्रिटिश भारत)
कार्य: लष्करी नेता
सक्रिय वर्षे: १८५७-५८

लोकगीतातील उल्लेख ठरला महत्त्वाचा...
तेलंगणा, आंध्र प्रदेशातील भिक्षुक घरोघरी जाऊन लोकगीत सादर करतात आणि भिक्षा मागतात. अशाच एक भिक्षेकऱ्याच्या तोंडून ऐतिहासिक लोकगीत ऐकलं.त्या लोकगीताच्या ओळी होत्या "चंपलहेटी दौर्रा गारू वीर बाबुराव".यातील चंपलहेटी हे गावाचे नाव असून दौर्रा या तेलुगु शब्दाचा अर्थ राजा, पाटील, जमीनदार, साहेब असा होतो. गारू शब्दांचा अर्थ राया किंवा जी असा होतो. अतिशय प्रिय असलेल्या व्यक्तीच्या नावासमोर "गारू" हा शब्दप्रयोग तेलगूत केला जातो. वरील शब्दांचा अर्थ चंपल हेटी येथील राजा वीर बाबुराव असा आहे. चंपलहेटी हे गाव म्हणजे आजचे चपराळा असल्याचा दावा झगडकर यांनी केला आहे. वीर बाबुराव शेडमाके यांना फासावर लटकवलेला दिवस शहीद दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी चपराळा येथील या समाधीवर माता टेकायला लोक दूरवरून येत असतात.


यासाठी प्रसिद्ध: 1857 च्या भारतीय बंडाच्या वेळी चांदा (चंद्रपूर-गडचिरोली) जिल्ह्यातील बंड 1857 च्या स्वातंत्र्य लढ्यातही चंद्रपूर जिल्ह्याचे अमूल्य योगदान आहे. आपल्या न्याय्य स्वातंत्र्यासाठी चंद्रपूरच्या मातीच्या सुपुत्रांनी आनंदाने बलिदान दिले आणि इतिहासात अजरामर झाले. जरी आपल्या इतिहासकारांनी त्यांचे नाव, कार्य आणि बलिदान कमी लेखले असले तरी ते या वीरांचे शौर्य नाकारू शकत नाहीत. आपल्या जन्मभूमीची इज्जत वाचवताना असे किती आदिवासी वीर शहीद झाले कुणास ठाऊक, पण त्यांची नावेही इतिहासात दुर्मिळ आहेत. चंद्रपूर जिल्ह्याच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात अमर हुतात्मा क्रांतिसूर्य बाबुराव शेडमाके यांचे बलिदान विशेष महत्त्वाचे आहे, ते क्रांतीची मशाल होते. वीर बाबुराव शेडमाके यांचा जन्म १२ मार्च १८३३ रोजी मोलमपल्ली (अहेरी) येथील श्रीमंत शेडमाके जमीनदारी येथे झाला, त्यांच्या आईचे नाव जुर्जयाल (जुर्जाकुंवर) होते. बाबुरावांना वयाच्या 3 व्या वर्षी गोटूल येथे पाठविण्यात आले जेथे त्यांना कुस्ती, तिरंदाजी, तलवार आणि भाला यांचे प्रशिक्षण देण्यात आले. तो आपल्या साथीदारांसह जंगलात शिकारीला जात असे आणि शस्त्रांचा सरावही करत असे. ब्रिटिश एज्युकेशन सेंट्रल इंग्लिश मीडियम, रायपूर, (मध्य प्रदेश) येथून चौथीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते मोलामपल्ली येथे परतले. जसजसा तो मोठा होत गेला तसतसे त्याला सामाजिक मूल्येही कळत गेली.
हळुहळू त्यांनी आपल्या जमीनदारीच्या गावातील लोकांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली, त्यामुळे सावकार आणि ठेकेदारांकडून सर्वसामान्यांवर होणाऱ्या अत्याचारांची माहिती त्यांना मिळाली. तसेच इंग्रज आल्यानंतर त्यांनी केलेल्या छळाची माहिती मिळू लागली. त्यामुळे त्यांची समज आणखीनच वाढली. राजघराण्यातील असूनही, त्याच्याकडे जमिनीच्या मालकीपेक्षा समाजाप्रती समर्पणाची भावना अधिक होती, जी कालांतराने अधिक परिपक्व होत गेली. त्यांचा विवाह आंध्र प्रदेशातील आदिलाबाद जिल्ह्यातील चेन्नूर येथील मडावी राजघराण्यातील कन्या राजकुंवर यांच्याशी झाला होता. राजकुंवर हे बाबुरावांच्या कार्याप्रती तितकेच समर्पित होते.
त्यावेळी चंदगड आणि आसपासच्या परिसरात गोंड, परधान, हलबी, नागची, माडिया आदिवासींची संख्या जास्त असल्याने वैष्णव, इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माचा प्रभाव अधिक होता. 18 डिसेंबर 1854 रोजी चंदगड येथे आर.एस. एलिस यांची जिल्हा दंडाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि इंग्रजांकडून गरिबांवर अत्याचार सुरू झाले. ख्रिश्चन मिशनरी निरपराध आदिवासींना विकासाच्या नावाखाली धर्मांतरित करून फसवत असत. तसेच हा परिसर वनसंपत्ती आणि खनिज संपत्तीने परिपूर्ण होता आणि इंग्रजांना त्यांचा व्यवसाय चालवण्यासाठी या संपत्तीची गरज होती, त्यामुळेच इंग्रज आदिवासींच्या जमिनी बळजबरीने बळकावत आहेत हे बाबुरावांना आवडले नाही. जमिनीवर आदिवासींचा हक्क आहे आणि तो त्यांना नक्कीच मिळाला पाहिजे. आदिवासींनी सामुदायिक जीवनात आणि सांस्कृतिक जीवनशैलीत जसे जगावे तसे जगावे आणि इस्लाम धर्म स्वीकारून आपली खरी ओळख गमावू नये, असे त्यांचे मत होते. अशा गोष्टींमुळे त्यांच्या मनात विद्रोहाची ज्योत पेटली आणि त्यांनी मरेपर्यंत इंग्रजांविरुद्ध लढून आपल्या जनतेचे रक्षण करण्याचा संकल्प केला. हा ठराव पूर्ण करण्यासाठी त्यांनी २४ सप्टेंबर १८५७ रोजी 'जंगोम सेना' स्थापन केली.
त्यांनी अडपल्ली, मोलामपल्ली, घोट आणि त्यांच्या आजूबाजूच्या जमीनदारांमधून 400-500 आदिवासी आणि रोहिल्यांची फौज तयार केली, त्यांना औपचारिक शिक्षण दिले आणि इंग्रजांविरुद्ध युद्ध घोषित केले. इंग्रजांना धडा शिकवण्यासाठी त्यांनी चंदगडला लागून असलेला राजगड निवडला, राजगड इंग्रजांच्या ताब्यात होता, त्याची जबाबदारी रामशाह गेडाम यांच्याकडे सोपवण्यात आली. ७ मार्च १८५८ रोजी बाबुरावांनी आपल्या साथीदारांसह राजगडावर हल्ला करून संपूर्ण राजगड ताब्यात घेतला. या युद्धात राजगडचा जमीनदार रामजी गेडामही मारला गेला.राजगडमधील पराभवामुळे कॅप्टन प. एच. क्रिचटनला काळजी वाटली आणि राजगड परत मिळवण्यासाठी 13 मार्च 1858 रोजी कॅप्टन क्रिचटनने बाबुरावांच्या सैन्याला ताब्यात घेण्यासाठी आपले सैन्य पाठवले. राजगड पासून 4 कि.मी. दुर नांदगाव घोसरीजवळ बाबुराव आणि इंग्रज यांच्यात घनघोर युद्ध झाले. अनेक लोक मारले गेले, बाबुराव शेडमाके यांनी हे युद्ध जिंकले.
राजगडच्या लढाईनंतर अडपल्ली-घोटचे जहागीरदार व्यंकटराव राजेश्वर राजगोंड हेही बाबुरावांसह या बंडात सामील झाले. त्यामुळे कॅप्टन क्रिचटन अधिक अस्वस्थ झाला. त्यांनी बाबुराव आणि त्यांच्या साथीदारांनंतर आपले सैन्य तैनात केले, बाबुराव सावध होते, त्यांना इंग्रजांच्या कारवायांची माहिती होती. त्यांचा शोध घेण्यासाठी क्रिचटन नक्कीच आपले सैन्य पाठवेल, हे त्यांना माहीत होते, म्हणूनच ते पूर्ण तयारीनिशी गडिचुर्ला पर्वतावर थांबले. ही बातमी इंग्रजांना मिळताच २० मार्च १५१८ रोजी पहाटे साडेचार वाजता सैन्याने संपूर्ण डोंगराला वेढा घातला आणि गोळीबार केला. बाबुरावांच्या सतर्क सैनिकांनी प्रत्युत्तर देत त्यांच्यावर दगडफेक केली, इंग्रजांच्या गोळ्या सुटल्या पण दगडांचा पाऊस थांबला नाही, अनेक इंग्रज गंभीर जखमी होऊन पळून गेले. डोंगरावरून खाली आल्यावर बाबुरावांच्या जंगोम सैन्याने तिथे पडलेल्या तोफा आणि तोफ जप्त करून सर्वसामान्यांसाठी धान्याचे भांडार खुले केले. अशा प्रकारे बाबुराव आणि त्यांच्या सैनिकांनी पुन्हा एकदा विजय मिळवला.
बाबुराव, व्यंकटराव आणि त्यांच्या साथीदारांचे बंड संपवण्यासाठी त्रासलेल्या कॅप्टन क्रिचटनने पुन्हा चंदगडहून ब्रिटीश सैन्य पाठवले. 19 एप्रिल 1858 रोजी सगणापूरजवळ बाबुरावांचे साथीदार आणि ब्रिटीश सैन्य यांच्यात घनघोर युद्ध झाले, ज्यात ब्रिटीश सैन्याचा पुन्हा पराभव झाला. परिणामी बाबुरावांनी २९ एप्रिल १८५८ रोजी अहेरी जमीनदारीतील चिचगुडी येथील इंग्रज छावणीवर हल्ला केला. अनेक ब्रिटिश सैनिक जखमी झाले तर टेलिग्राम ऑपरेटर गार्टलाड आणि हॉल मारले गेले. त्याचा एक साथीदार पीटर तिथून पळून जाण्यात यशस्वी झाला आणि त्याने कॅप्टन क्रिचटनला सर्व गोष्टींची माहिती दिली. या हल्ल्यानंतर बाबुराव आणि व्यंकटराव इंग्रज सैन्यात घाबरले. त्यांना पकडण्याच्या सर्व इंग्रजांच्या योजना अयशस्वी झाल्या, दोन टेलिग्राम ऑपरेटरच्या मृत्यूमुळे कॅप्टन क्रिचटन संतप्त झाला. या घटनेची माहिती इंग्लंडच्या राणी व्हिक्टोरियाला मिळताच तिने बाबुरावांना मृत किंवा जिवंत पकडण्याचा आदेश काढला आणि बाबूराव शेडमाकेला पकडण्यासाठी नागपूरचे कॅप्टन शेक्सपियर नेमले.
शूर बाबुराव शेडमाके यांना पकडण्यासाठी कॅप्टन शेक्सपियरने त्यांची मावशी राणी लक्ष्मीबाई, अहेरीच्या जमिनदार यांचा वापर केला आणि त्या बदल्यात बाबुराव शेडमाके यांच्या जमीनदारीतील २४ गावे आणि व्यंकटराव, राजेश्वर यांच्या जमीनदारीतील ६७ गावे मिळवली. एकूण ९१ गावे.) देण्याचे आमिष दाखवले. नकार दिल्यास अहेरीची मालमत्ता जप्त करण्याची धमकीही दिली. राणी लक्ष्मीबाई लोभाला बळी पडून बाबुरावांना पकडण्यासाठी इंग्रजांशी सामील झाल्या. बाबुरावांना याची कल्पना नव्हती. बाबुराव आपल्या साथीदारांसह घोट गावात पर्सापान पूजेसाठी आले होते, ही बातमी लक्ष्मीबाईंनी इंग्रजांना दिली आणि ते बाबुरावांना अटक करण्यासाठी घोटला पोहोचले. बाबुराव आणि इंग्रज सैन्यात घनघोर युद्ध झाले आणि पुन्हा एकदा त्याला पकडण्यात इंग्रजी सैन्य अपयशी ठरले आणि बाबुराव तेथून सुखरूप निसटले. या पराभवानंतर शेक्सपियर चिडला आणि त्याने घोटची इस्टेट ताब्यात घेतली. आकस्मिक युद्धात बाबुरावांचे अनेक साथीदार मारले गेले आणि सामान्य लोकही त्याला बळी पडले. बाबुरावांच्या चळवळीत अनेक अडथळे निर्माण होऊ लागले. त्याच्या व त्याच्या साथीदारांच्या जमिनी व जप्ती जप्त करण्यात आल्या. व्यंकटराव जंगलात लपले.जंगोम सैन्याचे विघटन होऊ लागले आणि बाबुराव एकटे पडले.
घोट येथील पराभवानंतर इंग्रजांनी राणी लक्ष्मीबाईंवर अधिक दबाव आणला. बाबुराव एकटे असल्याची बातमी लक्ष्मीबाईंना मिळताच तिने रोहिल सैन्याला बाबुरावांना पकडण्यासाठी भोपाळपट्टणमला पाठवले, बाबुराव काही दिवस तिथेच राहिला. रात्री झोपेतच रोहिल्लास त्यांना पकडले.त्यावेळी बाबुरावांनी त्यांना विरोध न करता त्यांना त्यांच्या कामाचा उद्देश समजावून सांगितला. आणि योग्य वेळ पाहून ते शांतपणे तिथून निघून गेले. बाबुराव लक्ष्मीबाई सैन्यातून पळून गेल्याची बातमी कॅप्टनला मिळताच त्याला धक्काच बसला. बाबुराव अहेरीला आले. राणी लक्ष्मीबाई यांना याची माहिती मिळताच त्यांनी बाबुरावांना त्यांच्या घरी जेवायला बोलावले. त्यांनी आमंत्रण स्वीकारले आणि लक्ष्मीबाईंच्या घरी पोहोचले.लक्ष्मीबाईंनी ही बातमी इंग्रजांना दिली. जेवताना इंग्रजांनी लक्ष्मीबाईंच्या घराला वेढा घातला आणि बाबुरावांना कैद केले. बाबुरावांना इंग्रजांनी पकडल्याची बातमी व्यंकटरावांपर्यंत पोहोचली आणि ते बस्तरला गेले. बाबुरावच्या अटकेनंतर त्याच्या इतर साथीदारांनाही अटक करण्यात आली. बाबुराव आणि त्यांच्या साथीदारांवर गार्टलँड आणि हॉलच्या हत्येबद्दल आणि ब्रिटिश सरकारविरुद्ध कारवाई केल्याबद्दल क्रिचटनच्या न्यायालयात खटला चालवला गेला.
21 ऑक्टोबर 1858 रोजी या प्रकरणी निकाल देण्यात आला, तो पुढीलप्रमाणे होता -
१) पुराव्याच्या आधारे कैदी (बाबुराव) याला ब्रिटीश राजवटीविरुद्ध बंड केल्याबद्दल, सशस्त्र सैन्य उभे केल्याबद्दल दोषी ठरविण्यात आले, 10 मे 1858 रोजी घोट गावात सरकारी सैन्याला विरोध केला आणि 27 एप्रिल 1858 रोजी बामनपेटा या दोन सरकारी सैनिकांना तुरुंगात टाकण्यात आले. 12 दिवसांसाठी. कैद्यांना नेणे, त्यांना लुटणे, 29 एप्रिल 1858 रोजी चिंचगुंडी येथील मिस्टर गार्टलँड आणि मिस्टर हॉलच्या छावणीवर त्याच्या सैनिकांना हल्ला करण्यास प्रवृत्त करणे आणि त्यांची लुटलेली मालमत्ता हिसकावणे या आरोपांमध्ये दोषी आढळले.
२) न्यायालयाने, वरील आरोपांमध्ये कैद्याला दोषी ठरवून आणि जिल्ह्यात अशांतता निर्माण करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे लक्षात घेऊन त्याला ही शिक्षा सुनावली.
३) की पूलैसूर बापूचा मुलगा बाबुराव याला दुपारी चार वाजता चंद्रपूरच्या कारागृहात तुझा मृत्यू होईपर्यंत फाशी द्या.
४) कैद्याची सर्व मालमत्ता जिल्ह्याचे उपायुक्त आणि जिल्हा दंडाधिकारी कॅप्टन डब्ल्यू. एच. क्रिस्टन यांनी जप्तीचे आदेश दिले आहेत. त्याच दिवशी दुपारी ४ वाजता बाबुराव शेडमाके यांना चंद्रपूर कारागृहात फाशी देण्यात आली.
आपल्या निर्णयात त्यांनी बाबुराव आणि त्यांच्या साथीदारांना 14 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. 21 ऑक्टोबर 1858 रोजी बाबुरावांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. 21 तारखेला दुपारी 4 वाजता त्यांना चंदगड राजमहालच्या पिंपळाच्या झाडाला फाशी देण्यात आली, ज्याचे तुरुंगात रूपांतर करण्यात आले. त्यावेळी कॅप्टन क्रिचटन त्याच्या उजवीकडे आणि कॅप्टन शेक्सपियर डावीकडे उभा होता. बंदुकीच्या सलामीसोबतच दोन्ही कर्णधारांनीही सलामी दिली. मृत्यूची चौकशी केल्यानंतर त्याला कारागृहाच्या आवारात दफन करण्यात आले. ज्या पिंपळाच्या झाडावर वीर बाबुरावांना फाशी देण्यात आली ते आजही चंद्रपूर कारागृहात ऐतिहासिक वारसा म्हणून उभे आहे. दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी संपूर्ण जनता आणि समाज पिंपळाच्या झाडाजवळ जमतात आणि वीर बाबुरावांना आदरांजली अर्पण करतात.
वीर बाबुराव शेडमाके यांच्याबद्दल एक आश्चर्यकारक घटना नेहमी सांगितली जाते की त्यांनी एकदा ताडोबाच्या जंगलात 'तडवा' नावाचे बांबूचे फळ खाल्लेले असते.ते फळ अतिशय विषारी असून ते खाणाऱ्या व्यक्तीचे ते पचन होते आणि त्याचे शरीर बनते. वज्रदेही. बाबुरावांनी त्यांना मारहाण केली त्यामुळे ते बेशुद्ध झाले पण काही वेळाने ते शुद्धीवर आले आणि त्यानंतर त्यांच्या शरीरावर कोणताही आघात न झाल्याने त्यांच्यात एक अद्भुत शक्ती निर्माण झाली. ते खचून न जाता मैल वेगाने धावू शकत होते. जेव्हा इंग्रजांनी त्यांना लक्ष्मीबाईच्या घरी पकडले तेव्हा त्यांनी प्रत्युत्तर म्हणून अनेक सैनिकांना पिण्याच्या भांड्याने जखमी केले, त्यापैकी एक मरण पावला. तुरुंगात फासावर लटकले तेव्हा त्याचे शरीर दगडासारखे होते आणि मानही ताठ झाली होती, त्यामुळे फाशीची दोरी सैल झाली होती. त्याला पुन्हा फाशी देण्यात आली पण नंतर दोरी सैल झाली. असे तीन वेळा घडले.चौथ्या फाशीनंतर त्यांचा मृत्यू निश्चित झाला, परंतु इंग्रजांना त्यांची इतकी भीती वाटली की त्यांच्या मृत्यूची पुष्टी करण्यासाठी त्यांनी बाबुराव शेडमाके यांचा मृतदेह उकळत्या भट्टीत टाकला. या घटनेचा महाराष्ट्राच्या चांदा जिल्हा गॅझेटियर्समध्येही उल्लेख आहे, ज्यामध्ये असे लिहिले आहे की:-
““This rising in Chandrapur was spontaneous. It practically speared towards the end of the great Revolt. Though un-successful it stands out as a brilliant attempt of the Raj Gond Zamindars to regain their freedom. Many folk tales and songs are current in the Chandrapur area extolling the heroic exploits of the two Gond leaders. Baburao the Zamindar of Molampalli. According to one story had consumed tadava, and as a result of its extraordinary powers, when hanged, managed to break the noose four times. He was finally immersed in quick lime, and killed.”
बाबुरावांच्या फाशीनंतर त्यांचा साथीदार व्यंकटराव यालाही २ वर्षांनी इंग्रजांनी पकडले आणि ३० मे १८६० रोजी त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. बाबुरावांना अटक करणाऱ्या लक्ष्मीबाईंना बाबुराव आणि व्यंकटराव यांच्या जमिनीचे बक्षीस मिळाले. ज्या जमीनदारीसाठी लक्ष्मीबाईंनी बाबूरावांना लोभापोटी अटक केली होती तीही 1951 मध्ये रद्द करण्यात आली. आणि चंद्रपूर जिल्ह्याची बदनामी करणाऱ्या राजद्रोहाबद्दल लक्ष्मीबाईंचा निषेध करण्यात आला.
अशा प्रकारे वयाच्या 25 व्या वर्षी बाबुराव शेडमाके यांनी शौर्य दाखवून स्वातंत्र्यासाठी स्वतःचे बलिदान दिले. त्‍यांच्‍या शौर्य आणि शौर्याचा गौरव करण्‍यासाठी, भारत सरकारने 12 मार्च 2007 रोजी त्‍यांच्‍या वाढदिवसाच्‍या दिवशी भारतीय टपालाने त्‍यांच्‍या नावावर एक तिकिट जारी केले. अशा या महान शूर सुपुत्राच्या स्मरणार्थ चंद्रपुरात स्मारक उभारण्यासाठी आपला आदिवासी समाज अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे परंतु आजपर्यंत शासन यावर मौन बाळगून आहे. ऐतिहासिक चंदगड किल्ल्याची अवस्था बिकट होत चालली असून शासन या प्रश्नावर मौन बाळगून आहे.मात्र पुरातत्व विभागाचा फलक लावून किल्ल्याचे संरक्षण करता येणार नाही, त्याचीही डागडुजी व्हावी. दरवर्षी वीर बाबुराव शेडमा यांच्या हौतात्म्य दिनी हजारो आदिवासी चंद्रपूर कारागृहातील पिंपळाच्या झाडाजवळ जमून त्यांना आदरांजली वाहतात.
संदर्भ:-
– 1857 चे स्वाधीनता शहीद वीर बाबुराव पुल्लेसुर बापू राजगोंड – पुरूषोत्तम सेडमाके
– भारतीय स्वातंत्र्य संग्राम में चंद्रपुर – भगवती प्रसाद मिश्र, स्वातंत्र्य संग्राम सेनानी
– आदिवासी संस्कृति, त्यांच्या पुर्वजांचे कार्य व आता नवी दिशा – मधुकर उ. मडावी
– क्रांतीरत्न शहीद वीर बाबुराव पुलेसूरबापू राजगोंड – धिरज सेडमाके
– गोंडवानाचा सांस्कृतिक इतिहास – शेषराव एन. मंडावी

🇮🇳 जयहिंद 🇮🇳
🙏🌹 विनम्र अभिवादन 🌹🙏

संकलित माहिती

आगामी झालेले