नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

गुरुवार, ९ मे, २०२४

कोडी व उत्तरे Kodi, puzzles

 ✨कोडी व उत्तरे✨

सात अक्षरी जिल्हा महाराष्ट्रात

ना असे काना नावात

ना असे मात्रा नावात

ना असे नी वेलांटी नावात

नांव सांगा त्याचे ?

उत्तर :- अहमदनगर ☑️


नाव एका माणसाचे चार अक्षरी!!

पहिले दुसरे अक्षर मिळून त्याच्या बायकोचे नाव

दुसरे तिसरे अक्षर मिळून त्याच्या मुलीचे नाव

तिसरे चौथे अक्षर मिळून त्याच्या मुलाचे नाव

चारही अक्षर मिळून त्याचे नाव

ओळखा पाहू ते नाव काय..??

उत्तर :- सिताराम ☑️


मुकुट माझ्या डोक्यावर आहे

जांभळा झगा माझ्या अंगावर आहे

आहेत मला काटे जरा सांभाळून

चविष्ट आहे मी खातात मला भाजून

सांगा पाहू मी आहे तरी कोण

उत्तर :- वांगे ☑️


चार खंडाचा आहे एक शहर

चार आड विना पाण्याचे

18 चोर आहेत त्या शहरात

एक राणी आणि एक शिपाई

मारून सर्वांना त्या आडात टाकी

ओळख पाहू मी कोण

उत्तर :- कॅरम ☑️


कोकणातून आली माझी सखी

तिच्या मानेवर दिली मी बुक्की

तिच्या घरभर पसरल्या लेकी

सांगा पाहू मी कोण

उत्तर :- लसुन ☑️


चार बोटे आणि एक अंगठा

तरीही माझ्या नसांमध्ये रक्त नाही

सर्वजण बेजार म्हणतात मला

तरी नेहमी उपयोगी मी राही

सांगा पाहू मी कोण

उत्तर :- हातमोजे ☑️


गोष्ट आहे मी अशी

मला घेता तुम्ही खाण्यासाठी

मात्र मला तुम्ही खात नाही

सांगा पाहू मी कोण ?

उत्तर :- ताट ☑️


जर आपल्याला तहान लागली असेल,

तर ते आपण पिऊ शकतो..

जर आपल्याला भूक लागली असेल,

तर आपण ते खाऊ सुद्धा शकतो..

आणि थंडी वाजत असेल,

तर आपण त्याला जाळू सुद्धा शकतो

सांगा ते काय आहे?

उत्तर :- नारळ ☑️


दिवसा झोप काढुनी मी

फिरतो बाहेर रात्रीला मी

आहे असा प्रवासी मी

पाठीला दिवा बांधून मी

कोण आहे मी ?

उत्तर :- काजवा ☑️


बाबांनी आपल्या मुलाला एक वस्तू दिली आणि म्हंटले

तुला तहान लागली तर ती खा

तुला भूक लागली तर ती खा

तुला थंडी वाजली तर ती जाळ

ओळखा पाहू ती वस्तू कोणती

उत्तर :- नारळ ☑️


पाच अक्षराचा एक पदार्थ

पहिल्या तीन अक्षराचे होते फुलाचे नाव

पाचवे आणि चौथे अक्षराचा अर्थ मौज

पहिल्या दुसऱ्या आणि शेवटच्या अक्षराचा अर्थ नोकर

सांगा पाहू मी कोण?

उत्तर :- गुलाबजाम ☑️


एका माणसाला बारा मुले

काही छोटी काही मोठी

काही तापट तर काही थंड

ओळखा पाहू मी कोण?

उत्तर :- वर्ष ☑️


भाऊराया माझा खूप शैतान

बस तू माझ्या नाकावर

पकडून माझे कान

सांगा आहे तरी मी कोण

उत्तर :- चष्मा ☑️


एका काळ्याकुट्ट राजाची

अद्भुत मी राणी

हळूहळू पिणार मी पाणी

सांगा पाहू मी कोण

उत्तर :- दिवा ☑️


कोकणातून आली एक नार

आहे तिचा पदर हिरवागार

आहे तिचा कंबरेला पोर

सांगा मी आहे तरी कोण

उत्तर :- काजू ☑️


अशी गोष्ट जी तुम्ही गिळू शकता

किंवा ती तुम्हाला गिळू शकते

सांगा पाहू ती आहे कोणती

उत्तर :- अहंकार ☑️


कोकणातून आलेला एक रंगू कोळी

आणि त्याने एक भिंगु चोळी

शिंपी म्हणतोय मी शिव तरी कशी

धोबी म्हणतोय मी धुवू तरी कशी

राणी म्हणते मी घालू तरी कशी

सांगा पाहू मी कोण

उत्तर :- कागद ☑️


एक मुलगा 100 फुटा च्या शिडीवरून पडला

तरीही त्याला काही जखम झाली नाही असे कसे

उत्तर :- तो पहिल्याच पायरीवर होता ☑️


कोकणातून आला एक भट

त्याला धर की आपट

सांगा मी आहे तरी कोण

उत्तर :- नारळ☑️


हिरव्या घरात लपले एक लाल घर

लाल घरात आहेत खूप लहान मुले

ओळखा पाहू मी कोण

उत्तर :- कलिंगड ☑️


अशी कोणती गोष्ट आहेे,

जिचा रंग काळा आहे?

ती प्रकाशात दिसते…

पण अंधारात दिसू शकत नाही…

उत्तर: छाया (सावली) ☑️


कंबर बांधून घरात राहतो

काय आहे ते? मला सांगा?

उत्तर :- झाडू ☑️


कोणता तो चेहरा…

सकाळपासून संध्याकाळ पर्यंत..

आकाशाकडे पाहत राहतो हसत…

उत्तर :- सूर्यफूल ☑️


काळ्याभोर रानात एक हत्ती मेला

लोकांनी त्याचा पृष्ठभाग उपसून नेला

सांगा मी कोण

उत्तर :- कापूस ☑️


तुम्ही एका माकडा सोबत त्याच्या घरात गेलात

तिथे त्याचा संपूर्ण परिवार केळी खात होता

तर त्या घरातील सगळ्यात हुशार कोण

उत्तर :- तुम्ही ☑️


काट्याकुट्यांचा बांधला मोठा भारा

निघालास कुठे शेंबड्या पोरा

ओळखा पाहू मी कोण

उत्तर :- फणस ☑️


एक वानर एक खारुताई आणि एक पक्षी

नारळाच्या झाडावर जोराने धावत होते

तर सांगा सर्वप्रथम केळी कुणाला मिळतील?

उत्तर :- नारळाच्या झाडावर केळी नसतात ☑️


माझ्याकडे बऱ्याच Keys आहेत

तरीही मी कोणते कुलूप उघडू शकत नाही

सांगा मी आहे कोण

उत्तर :- कीबोर्ड ☑️


कोणत्या महिन्यात

लोक सर्वात कमी झोपतात

उत्तर :- फेब्रुवारी ☑️


असे फळ कोणते

त्याच्या पोटात दात असतात

उत्तर :- डाळिंब ☑️


येथे एक फूल फुलले आहे,

येथे एक फूल फुलले आहे

आम्ही एक विचित्र आश्चर्य पाहिले,

पानांवर पाने.

उत्तर :- फुलकोबी ☑️


माणसासाठी कोणती गोष्ट हानिकारक आहे?

पण लोक अजूनही ते पितात.

उत्तर :- राग ☑️


दोन बोटांचा रस्ता..

त्यावर चाले रेल्वे..

लोकांसाठी आहे उपयोगाची..

काही सेकंदात आग लावते..

उत्तर :- माचीस काडी (मॅचस्टीक) ☑️


सर्वेशच्या वडिलांना 4 मुले आहेत

सुरेश

रमेश

गणेश

चौथ्याचे नाव सांगा?

उत्तर :- चौथेचे नाव सर्वेश आहे. ☑️


फळ नाही पण फळ म्हणतो,

मीठ आणि मिरपूड सह गोड

खाणार्‍याचे आरोग्य वाढते,

सीता मायेची आठवण करून द्देते.

उत्तर :- सीताफळ ☑️


अशी कोणती गोष्ट आहे,

जी आपण जागी असल्यावर वर जाते

आणि झोपी गेल्यावर खाली येते.

उत्तर :- डोळ्यांच्या पापण्या ☑️


बिना चुलही ची खीर बनवली..

गोड नाही नमकीन नाही..

थोडे थोडे खाल्याचे लोक खूप शौकीन.

उत्तर :- चुना ☑️


हा गौरव आहे मेजवानीत बनारसी

ही तिची ओळख वाढवते.

उत्तर :- पान ☑️


दिसत नाही पण घातलेले आहे हे दागिने..

हे स्त्रीचे रत्न आहे…

उत्तर :- लज्जा ☑️


अशी कोणती गोष्ट आहे

पती आपल्या पत्नीला देऊ शकतो?

परंतु पत्नी आपल्या पतीला देऊ शकत नाही.

उत्तर :- आडनाव (surname) ☑️


कोण आहे जो

आपली सर्व कामे

आपल्या नाकाने करतो

उत्तर :- हत्ती ☑️


दोन अक्षरात सामावले माझे नाव

मस्तक झाकणे आपले माझे काम

ओळखा पाहू मी आहे कोण

उत्तर :- टोपी ☑️


प्रत्येकाजवळ असणारी अशी गोष्ट कोणती

जी नेहमीच वाढत जाते कधीही कमी होत नाही

उत्तर :- वय ☑️


एक रहस्य बॉक्स पाहिला,

ज्याला नाही कव्हर

किंवा लॉक केलेला नाही..

खाली किंवा कोपरा बंद केलेला नाही,

त्यामध्ये चांदी आणि सोने आहे. कोण पाहू??

उत्तर :- अंडी ☑️


दोन गुहेचे आहेत दोन रक्षक

दोन्ही आहेत उंच आणि आहेत काळेभोर

सांगा पाहू मी कोण

उत्तर :- मिशा ☑️


थंडीतही वितळणारी गोष्ट मी

सांगा तुम्ही माझे नाव काय

उत्तर :- मेणबत्ती ☑️


पंख नाहीत मला तरीही मी हवेत उडते

हात नसूनही मी तुमच्याशी भांडते

सांगा पाहू मी कोण

उत्तर :- पतंग ☑️


मी आहे वस्तू सोन्याची

तरीही मला किंमत नाही सोन्याची

सांगा पाहू मी कोण

उत्तर :- Bed ☑️


तीन अक्षरांचे माझे नाव

वाचा उलटे किंवा वाचा सरळ

मी आहे प्रवासाचे साधन

सांगा पाहू माझे नाव

उत्तर :- जहाज ☑️


अशी कोणती गोष्ट आहे

जी फाटल्यावर अजिबात आवाज येत नाही

उत्तर :- दूध ☑️


आपण कोणत्या प्रकारचा

टेबल खाऊ शकतो?

उत्तर :- व्हेजिटेबल ☑️


एका कैद्याला तुरुंगातून पळून जाण्याची संधी दिली जाते

परंतु त्यासाठी तीन पैकी एका खोलीतून जायचे असते

पहिल्या खोलीत भयानक आग असते

दुसऱ्या खोलीत विस्फोटक आहेत

दुसऱ्या खोलीत एक्स सिंह आहे जो एका वर्षापासून भूकेला आहे

उत्तर :- तिसऱ्या खोलीतून एका वर्षापासून भुकेला सिंह जिवंत असणार नाही. ☑️


अशी कोणती गोष्ट आहे

जी सर्वात हलके असते

परंतु बलवान व्यक्ती तिला रोखू शकत नाही

उत्तर :- श्वास ☑️


भारत देशाबद्दल काही रोचक तथ्य

एकदा एक माणूस रस्त्याने जात होता

अचानक प्रचंड पाऊस पडण्यास सुरवात झाली

व संपूर्ण भिजून गेला

तरीही त्याच्या डोक्यावरील एकही केस ओला झाला नाही

असे कसे झाले

उत्तर :- कारण तो माणूस टकला होता ☑️


एका कोंबड्याने एका घराच्या छतावर अंडे दिले

तर ते कोणत्या बाजूला पडेल

उत्तर :- कोंबडी कधी अंडी देत नसतो


अशी कोणती संपत्ती आहे

जी वाटल्याने वाढते

उत्तर :- ज्ञान ☑️


हजार येतात हजार जातात

हजार बसतात पारावर

हाका मारून जोरात

हजार घेतात उरावर

उत्तर :- बस किंवा रेल्वे ☑️


डोळा असून सुद्धा

मी पाहू शकत नाही

उत्तर :- सुई ☑️


लाल मी आहे पण तो रंग नाही

कृष्ण मी आहे पण देव मी नाही

आड आहे पण पाणी त्यात नाही

वाणी आहे पण दुकान माझं नाही

सांगा पाहू मी कोण

उत्तर :- लालकृष्ण आडवाणी ☑️


मी आहे तरी कोण

तिच्या डोळ्यात बोटे टाकली की

माझं तोंड उघडते

उत्तर :- कात्री ☑️


तुम्ही जेवढे त्याच्या जवळ जाल,

तेवढा तो मोठा होत राहील..

सांगा पाहू कोण?

उत्तर :- डोंगर ☑️


आठवड्याच्या सात वारांचे व्यतिरिक्त

अजून तीन दिवसांची नावे सांगा

उत्तर :- काल, आज, उद्या ☑️


लई धाकड हा

तीन डोके आणि पाय दहा

उत्तर :- दोन बैल आणि एक शेतकरी ☑️


प्रश्न असा की उत्तर काय

उत्तर :- दिशा ☑️


हिरव्या पेटीत बंद मी

काट्यात मी पडलेली

उघडून पहा मला

मी आहे मोत्याने भरलेली

उत्तर :- भेंडी ☑️


नसते मला कधी इंजीन

नसते मला कसलेही इंधन

आपले पाय चालवा भरभर

तरच धावणार मी पटपट

सांगा मी आहे तरी कोण ?

उत्तर :- सायकल ☑️


नेहमीच असतो मी तुमच्या घरी

तरी काहींनाच मी आवडतो

एकावर एक कपडे मी घालतो

तरीही डोळ्यात पाणी तुमच्या येते

सांगा पाहू मी आहे तरी कोण

उत्तर :- कांदा ☑️


मी नेहमी तिथेच असतो

तुम्ही मला फक्त दिवसाच पाहू शकता

रात्री मी तुम्हाला दिसणारच नाही

सांगा पाहू मी कोण

उत्तर :- सूर्य ☑️


उन्हाळ्यात माझ्या पासून दूर तुम्ही पळता

हिवाळ्यात माझ्या जवळ तुम्ही येता

माझ्यामुळेच आकाशात दिसतात तुम्हाला सात रंग

सांगा पाहू मी कोण

उत्तर :- ऊन ☑️


अशी कोणती गोष्ट आहे तुमची

जी बाकीचे लोक तुमच्यापेक्षा जास्त वापरतात

उत्तर :- नाव ☑️


छोटेसे कार्टे

संपूर्ण घर राखते

उत्तर :- कुलूप ☑️


आम्ही जुळे भाऊ शेजाशेजारी

तरीही भेटत नाही जन्मोजन्मी

उत्तर :- डोळे ☑️


एक शेतकऱ्याकडे होते दोन बैल

एक मेला एक विकला

आता त्याच्याकडे किती बैल राहिले ?

उत्तर :- एक किंवा शून्य ☑️


प्रत्येकाच्या शरीराचा भाग मी आहे

तुम्ही मला डाव्या हाताने पकडू शकता

परंतु उजव्या हाताने नाही

सांगा पाहू मी आहे तरी कोण

उत्तर :- उजवा कोपरा ☑️


बारा जण आहेत जेवायला

एक जण आहे वाढायला

ओळखा पाहू मी कोण

उत्तर :- घड्याळ ☑️


मी सगळ्यांना उलटे करतो

तरीही स्वःतला काहीच हलवू शकत नाही

उत्तर :- आरसा ☑️


तो वेडा नाही तरीही कागद फाडतो

तो पोलिस नाही तरीही तो खाकी घालतो

मंदिर नाही तरीही घंटा तो वाजवतो

सांगा पाहू मी कोण?

उत्तर :- वाहक {Conductor} ☑️


एक कपिला गाय

आहेत तिला लोंखडी पाय

राजा बोंबलत जातो

पण ती थांबत नाही

उत्तर :- रेल्वे ☑️


मातीविना उगवला कापूस लाख मन

पडला मुसळधार पाऊस तरीही भिजला नाही एकही कन

ओळखा पाहू मी कोण

उत्तर :- ढग ☑️


बारीक असते लांब पण असते तरीही मी काठी नाही

दोन तोंडे आहेत मला तरीही मी गांडूळ नाही

श्वास घेते मी पण तुम्ही नाही

ओळखा पाहू मी आहे तरी कोण

उत्तर :- बासरी ☑️


संपूर्ण गावभर मी फिरते

तरीही मंदिरात जायला मी घाबरते

सांगा पाहू मी आहे तरी कोण

उत्तर :- चप्पल ☑️


दात असून सुद्धा मीच आवडत नाही

काळे शेतात गुंता झाल्यावर ती मी सोडती

ओळखा पाहू मी कोण

उत्तर :- कंगवा ☑️


एक रूमाल वाढायला एक तास लागतो

तर दहा रुमाल वाढायला किती तास लागतील

उत्तर :- एक ☑️


एक लाल गाई

नुसती लाकूड खाई

जर पाणी पिले

तर मरून ति जाई

ओळखा पाहू मी कोण

उत्तर :- आग ☑️


पाय नाहीत मला

चाके नाहीत मला

तरी मी खूप चालतो

काही खात नाही मी

फक्त रंगीत पाणी पितो

ओळखा पाहू मी कोण

उत्तर :- पेन ☑️


आम्ही दोघे जुळे भाऊ

एकाच रंगाचे आणि एकच उंचीचे

सोबत असता खुप कामाचे

एक हरविता नाही काम दुसऱ्याचे

उत्तर :- चप्पल ☑️


मी कधीही आजारी पडत नाही

तरीसुद्धा लोक मला गोळी देतात

उत्तर :- बंदूक ☑️


काळे बीज आणि पांढरी आहे जमीन

लावून ध्यान त्यात वहाल तुम्ही सज्ञान

ओळखा पाहू मी कोण

उत्तर :- पुस्तक ☑️


सगळीकडे आहे उजेड आणि गाणी

मी तर आहे सणांची राणी

सांगा पाहू मी कोण

उत्तर :- दिवाळी ☑️


दगड फोडता चांदी चकाकली

चांदीच्या आडात मिळाले पाणी

सगळे म्हणाले ही परमेश्वराचीच करणी

ओळखा पाहू मी कोण

उत्तर :- नारळ ☑️


जगाच्या खबरी साठवून ठेवतो

खूप मोठे माझे पोट

म्हणूनच तर प्रत्येक सकाळी

आता सर्वजण माझी वाट

उत्तर :- वर्तमानपत्र ☑️


रस्ता आहे परंतु गाड्या नाहीत

घरे आहेत परंतु माणसे नाहीत

जंगल आहे पण तू प्राणी नाहीत

ओळखा पाहू मी कोण

उत्तर :- नकाशा ☑️


पांढरे माझे पातेले

त्यात ठेवला पिवळा भात

ओळखेल मला जो कोणी

त्याच्या कमरेत घाला लाथ

उत्तर :- उकडलेले अंडे ☑️


अवतीभोवती आहे लाल रान

32 पिंपळाना फक्त एकच पान

सांग भाऊ मी कोण

उत्तर :- दात आणि जीभ ☑️


लाईट गेली माझी आठवण झाली

असो मी लहान किंवा मोठी

माझ्या डोळ्यातुन नेहमी गळते पाणी

सांग मी आहे तरी कोण

उत्तर :- मेणबत्ती ☑️


मी तिखट मीठ मसाला

मला चार शिंगे कशाला

सांगा पाहू मी आहे तरी कोण

उत्तर :- लवंग ☑️


गळा आहे मला पण डोकं नाही मला

खांदा आहे मला पण हात नाहीत मला

सांगा भाऊ मी आहे कोण

उत्तर :- शर्ट ☑️


एक सूप भरून लाह्या

त्यात फक्त एक रुपया

उत्तर :- चंद्र आणि चांदण्या ☑️


तीन पायांची एक तीपाले

बसला त्यावर एक शिपाई

सांगा पाहू मी कोण

उत्तर :- चूल आणि तवा ☑️


गावचे पाटील तुम्हाला राम राम

दाढीमिशी तुमची तांबूस खूप लांब लांब

उत्तर :- मक्याचे कणीस ☑️


हिरवा आहे परंतु पाने नाही

नक्कल करतो मी परंतु माकड नाही

ओळखा पाहू मी कोण

उत्तर :- पोपट ☑️


प्रत्येकाकडे असते मी

सगळे सोडून जातील

पण मी कधीच सोडून जाणार नाही

उत्तर :- सावली ☑️


वस्तू आहे मी अशी

छिद्रे असतानाही असतानाही

पाणी भरून मी घेते

उत्तर :- स्पंज ☑️


मी नेहमी तुमच्या पुढे असतो

तरीही तुम्ही मला पाहू शकत नाही

सांगा पाहू मी कोण

उत्तर :- भविष्य ☑️


एक काळा घोडा त्यावर बसली पांढरी स्वारी

एक उतरवली आता दुसर्‍याची पाळी

सांगा पाहू मी कोण

उत्तर :- तवा आणि पोळी ☑️


काळी मी आहे परंतु कोकिळा नाही

लांब मी आहे परंतु काठी नाही

थांब मी जाते परंतु दोरी मी नाही

सांगा पाहू मी कोण

उत्तर :- वेणी ☑️


ना खातो मी अन्न

ना घेतो मी तुमच्याकडून पगार

तरीही देतो पहारा दिवस रात्र

सांगा पाहू मी आहे तरी कोण

उत्तर :- कुलूप ☑️


सुरेश च्या वडिलांची चार मुले

रमेश निलेश गणेश चौथ्या चे नाव सांगा

उत्तर :- सुरेश ☑️


संपूर्ण पृथ्वीची करतो मि सैर

परंतु कधीही जमिनीवर ठेवत नाही पैर

दिवसा काढून झोपा

रात्रभर मी जागतो

सांगा पाहू मी कोण असतो

उत्तर :- चंद्र ☑️


मी गोष्ट कशी आहे जी

फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा गरमच राहणार

सांगा पाहू मी कोण

उत्तर :- गरम मसाला ☑️


उंचावरून पडली एक घार

तिला केले मारून ठार

आतील मास खाऊ पटापट

गोड रक्त पिऊ गटागट

ओळखा पाहू मी कोण?

उत्तर :- नारळ ☑️


ऊन्हात चालताना मी येतो

सावलीत बसता मी जातो

वाऱ्याचा स्पर्श मला नकोसा वाटतो

सांगा पाहू मी कोण?

उत्तर :- घाम ☑️


एक गोष्ट जी

खायला कुणाला आवडत नाही

पण सर्वांना मिळते

उत्तर :- धोका ☑️


आपण दिवसभर असे काहीतरी करता,

उचलतो आणि ठेवतो..

आपण त्याशिवाय कोठेही जाऊ शकत नाही.

सांगा काय आहे हे??

उत्तर :- पाऊल ☑️


अशी कोणती गोष्ट आहे

जी फक्त जून मध्ये असते

आणि डिसेंबर मध्ये नसते.

उत्तर :- उन्हाळा ☑️


हिरवे असते आणि लाख मोती असते

त्यात आणि असते शाल अंगावर सांगा तर काय.

उत्तर :- मक्याचे कणीस ☑️


मी काळी आहे पण कोकिळ नाही,

लांब आहे पण काठी नाही,

दोरी नाही पण बांधली जाते

माझे नाव सांग.

उत्तर :- वेणी ☑️


अशी कोणती गोष्ट आहे,

जी डोळ्यासमोर येताच डोळे बंद होते.

उत्तर :- प्रकाश ☑️


वाचण्यात आणि लिहिण्यात

दोन्ही ठिकाणी असते माझे काम

मी नाही कागद मी नाही पेन

सांगा काय आहे माझं नाव?🤔

उत्तर :- चश्मा ☑️


उंच वाढतो मी रंग आहे हिरवा

तुम्ही फक्त जमिनीत थोडे पाणी मुरवा

प्रदूषण करतो मी कमी

निरोगी पर्यावरणाची देतो मी हमी

सांगा पाहू मी कोण..??

उत्तर :- झाड ☑️


चार बोटे आणि एक अंगठा

तरीही माझ्या नसांमध्ये रक्त नाही

सर्वजण बेजान म्हणतात मला

तरी नेहमी उपयोगी मी राही

सांगा पाहू मी कोण??

उत्तर :- हातमोजे ☑️


हरी झंडी लाल कमान,

तोबा तोबा करे इंसांन….

उत्तर :- मिर्ची (मिरची तिखट असल्या कारणाने प्रत्येक व्यक्ती खाण्यास नकार देते.)


हातात आल्यावर शंभर वेळेस कापतो..

आणि थकल्यावर दगड चाटतो..

उत्तर :- चाकू (तुम्हाला काही कापायचे असेल, तर चाकूची बाब समोर येते आणि जेव्हा शार्प करायचा असेल तर काठ दगडाने घासली जाते)


एका आईचे 2 मुलगे

दोन्ही महान भिन्न निसर्ग..

भाऊ भाऊ पेक्षा वेगळा..

एक थंड दुसरा आग.

उत्तर :- चंद्र, सूर्य (ते एकाच स्वभावाची मुले आहेत, परंतु दोघांचे स्वरूप एकमेकाच्या विरुद्ध आहेत, एक गरम निसर्ग आणि दुसरे थंड निसर्ग)


अशी कोणती गोष्ट आहे

जी बनवण्यासाठी बराच वेळ लागतो

परंतु तो खंडित होण्यास काही क्षण लागत नाही.

उत्तर :- विश्वास ट्रस्ट (ट्रस्ट ही एक अनमोल वस्तू आहे जी लोकांना साध्य करण्यासाठी वर्षानुवर्षे लागतात परंतु तो खंडित होण्यासाठी फक्त एक क्षण लागतो, म्हणून एखाद्याने कधीही हा विश्वास मोडू नये.


प्रत्येकाकडे असे काहीतरी आहे,

पण काही मध्ये कमी आणि काही मध्ये जास्त आहेत

ज्याच्याकडे जास्त आहे त्याला शहाणे म्हणतात

उत्तर :- टॅलेंट, प्रतिभा, कला (मेंदू, कला, प्रत्येकाकडे असते, वेड्या व्यक्तीपासून ते वैज्ञानिकांपर्यंत, परंतु हा फरक यामुळे दोन्ही भिन्न बनतात, वेड्याला मेंदू असतो, कला कमी प्रमाणात असते आणि वैज्ञानिकांना जास्त प्रमाणात असते.


हिरवा हिरवा दिसावा तो दृढ किंवा कच्चा असेल,

आतून ते रेड क्रीम, कोल्ड स्वीट फ्लेक्ससारखे.

उत्तर :- टरबूज (उन्हाळ्याच्या हंगामात बाजारात टरबूज मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, जे लोक मोठ्या उत्साहाने खातात. तुम्ही पाहिलेच पाहिजे की टरबूजच्या वरच्या भागावर हिरव्या रंगाचा थर आला की तुम्ही तो कापला तर) आपल्याला आढळेल की आतील भाग लाल होईल. फळ मलईच्या रूपात खाल्ले जाते, आणि रस म्हणून खाल्ले जाते)


दोन अक्षरी नाव आहे

नेहमी सर्दी असते नाकावर

कागद माझा रुमाल आहे

माझे नाव काय आहे ते सांगा

उत्तर :- पेन (पेन दोन शब्दांनी बनलेला आहे, त्याची शाई नेहमीच लिहिण्यास तयार असते. कागदावर लिहिल्यामुळे, म्हणजे पुसण्याने त्याची शाई संपते, म्हणजे कागद रुमाल म्हणून काम करते.)

संकलन:-श्री नरहरी मारूती निकाडे सर कुर्ली

प्राथमिक शाळा इंदिरानगर, मौजे सांगाव.

बुधवार, ८ मे, २०२४

जागतिक थॅलेसेमिया दिन 8 मे World Thalassemia Day 8 May

जागतिक थॅलेसेमिया दिन 8 मे
World Thalassemia Day 8 May


प्रत्येक वर्षी 8 मे हा दिवस जगभरात जागतिक थॅलेसेमिया दिन म्हणून पाळला जातो.थॅलेसेमिया हा एक खूप गंभीर असा आजार आहे.शरीरात जनुकीय बिघाड झाल्याने थॅलेसेमिया हा आजार बळावतो. हा आजार तसा आनुवांशिक आजार आहे. म्हणजेच हा आजार आई- वडिलांमुळे मुलांना होत असतो. या आजारामुळे शरिरात रक्त बनणाच्या प्रक्रियेत अडथळा येतो. शरिरातील लाल रक्तपेशी 120 दिवसांपर्यंत जीवंत असतात पण निरोगी माणसाच्या शरीरातील संख्या आपोआप दूसऱ्या पेशी तयार होऊन ती कमतरता भरून काढतात. पण थॅलेसेमिया आजारात पेशींची संख्या झपाट्याने कमी होत जाते.साधारणत: 120 दिवस पुरली पाहिजे ती जेमतेम 15 दिवस पुरेल इतकीच असते. त्यामुळे अशक्तपणा येतो आणि त्यामुळे इतर आजार ही जडण्याची शक्यता असते. या आजारावर वेळीस उपचार केले नाही तर या आजारांनी त्रस्त रूग्णाचा मृत्यू देखील होण्याची शक्यता असते.

जागतिक थॅलेसेमिया दिनाचा इतिहास
थॅलेसेमिया इंटरनॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष आणि संस्थापक पॅनोस एंग्लेझोस यांनी 1994 मध्ये त्यांचा मुलगा जॉर्ज आणि इतर थॅलेसेमिया रुग्णांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्याचे निश्चित केले. कारण त्या सर्वांनी धैर्याने या आजाराशी सामना केला लढा दिला. तेव्हापासून दरवर्षी 8 मे रोजी जागतिक थॅलेसेमिया दिन साजरा केला जातो.

थॅलेसेमिया रोगाचे प्रकार
प्रामुख्याने थॅलेसेमियाचे दोन प्रकार आहेत.
१) थॅलेसेमिया मायनर आणि २) थॅलेसेमिया मेजर 
थॅलेसेमिया मायनर हा आजार असतो पण तो सहजरित्या लक्षात येत नाही. हे रूग्ण सर्वसामान्यपणे आपले जीवन जगत असतात. तसेच त्यांच्यात कुठल्याही प्रकारची आजाराची लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे आपण थॅलेसेमिया मायनरचे रूग्ण आहोत हे त्यांना कळतही नाही. पण थॅलेसेमिया मायनर हा आजार आहे. थॅलेसेमिया मेजर या आजाराची लक्षणे दिसून येतात. पण लहान बाळामध्ये जन्म झाल्यानंतर 4 ते 6 महिन्यामध्ये थॅलेसेमिया मेजर या आजाराची लक्षणे दिसू लागतात.एकदा या आजाराचे निदान झाल्या नंतर अशा थॅलेसेमियाग्रस्त आजारी मुलांना दर 15 ते 30 दिवसांनी बाहेरून रक्त पुरवठा करावा लागतो.

थॅलेसेमिया आजाराची लक्षणे
सतत सर्दी आणि खोकला
अशक्तपणा कायम राहणे
अनेक प्रकारचे संक्रमण
शारीरिक विकास वयानुसार होत नाही
दात बाहेरच्या बाजूने निघणे.
शरीरात अशक्तपणा व थकवा जाणवतो. 
शरीराचा बाह्यरंग पिवळसर दिसतो व त्वचेचा नैसर्गिक तजलदारपणा कमी होतो.
शारीरिक प्रगती कमकुवत होते.
कधी कधी हाडांमध्ये विकृती निर्माण होते (अस्थी विकृती). हृदयासंबंधी तक्रारी सुरू होतात.वजन कमी होते.

थॅलेसेमिया आजाराची काही तथ्ये
थलेसीमिया आजारामागील काही तथ्य - थॅलेसीमिया या गंभीर आजारात भरपूर प्रमाणात अरक्त आणि औषधे लागतात. त्यासाठी भरपूर पैसा सुद्धा खर्च होतो. सगळेच या आजारांवर खर्च करू शकतात असे नाही. त्यामुळे पैश्याअभावी उपचार मिळत नसल्याने वयोगट 12 ते 15 वर्षाची मुलं मरण पावतात आणि व्यवस्थित औषधोपचार मिळाल्यावर त्यांचे जगण्याचे प्रमाण जास्त अ गरज जास्त भासू लागते. वेळच्या वेळीच योग्य ती काळजी घेऊन आपण या आजाराला ओळखणे कधी ही चांगलेच.

भारतामध्ये थॅलेसेमिया या आजार जडलेल्या रूग्णा मदत करण्यासाठी *द विशिंग फॅक्ट्री* ही संस्था मदत करते. तसेच या संस्थेचे ध्येय हे आहे की या आजारांने पीडित रुग्णांना चांगल्यात चांगली उपचारपद्धती उपलब्ध करू देणे.

थॅलेसेमिया आजारावर उपचार
सध्यातरी यासाठी अस्थी मज्जा प्रत्यरोपण (बोन मॅरो ट्रान्सप्लान्टेशन) एक प्रकारची शल्य चिकित्सा असते ती करणे हा एकमेव उपाय आहे ती फायदेशीर आहे पण ते फारच खर्चिक असते. जगभरात थॅलेसीमिया, सिकल सेल, सिकलथेल, हिमोफिलिया, या आजाराचे मुलं पैशाअभावी वयोगट 8 ते 10 वर्षांपेक्षा जास्त जगत नाही. त्याचबरोबर क्रोनिक ब्लड ट्रांसफ्यूजन थेरेपी, आयरन कीलेशन थेरेपी हेसुद्धा इतर उपचार आहेत. या उपचारांनी शरीरातील हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजन मात्र योग्य प्रमाणात ठेवण्यास मदत होते.

थॅलेसेमियाग्रस्त रूग्णाचा आहार
त्यांच्या आहारात भात,गहू,मका यांचे विविध पदार्थ.
मूगडाळ,मसूरडाळ,चणाडाळ, सोयाबीनचे पदार्थ तसेच पेररू,पपई, सफरचंद, डाळिंब,केळी,अननस आणि सुके खोबरे अशाप्रकारे सर्व जीवनसत्त्वयुक्त आहार घेतल्यास बराच फरक पडतो.

थॅलेसेमिया आजाराची शोकांतिका
आई वडिलांकडून वारसा मिळालेल्या या आजाराची एक विचित्रता आहे की ह्या आजाराचे कारण माहिती असून सुद्धा या पासून बचाव करता येणे अशक्य आहे. खेळण्याचा बागडण्याचा वयामध्ये लहान मुलांना दवाखान्यात रक्त पेढींच्या भोवती सारख्या फेऱ्या माराव्या लागतात. त्यांच्या कुटुंबीयांचा मन:स्थितीचा विचार करा कसे वाटत असणार त्यांना. सततचे आजारपण, कोमजलेला चेहरा, वजन कमी होणे, असे अनेक लक्षण मुलांमध्ये हा आजार झाल्यास दिसून येतात. तर या आजच्या जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त परमेश्वराकडे प्रार्थना करूया की हा आजार कोणालाही होऊ देऊ नकोस.

थॅलेसेमिया आजार धोकादायक :हा रक्ताचा अनुवांशिक रोग आहे, ज्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन तयार करण्याची क्षमता कमी होते. हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे अशक्तपणा येतो, ज्यामुळे थकवा आणि इतर विविध लक्षणे शरीरात आढळून येतात. यानंतर शरीर सुदृढ ठेवण्यासाठी दर दोन आठवड्यांनी रक्त चढवावे लागते. थॅलेसेमिया अल्फा आणि बीटा या दोन प्रकारात आढळतो. फक्त काही लोकांना रक्ताशी संबंधित आजारांची लक्षणे आणि उपचार पद्धती माहिती आहेत. जेव्हा शरीरात पुरेसे हिमोग्लोबिन नसते, तेव्हा शरीरातील लाल रक्तपेशी नीट कार्य करत नाहीत आणि कालांतराने त्या नष्ट होतात. त्यामुळे लाल रक्तपेशी शरीरातील सर्व पेशींमध्ये ऑक्सिजन पोहोचवू शकत नाहीत आणि इतर अवयव खराब होतात.

जागतिक थॅलेसेमिया दिन: उद्देश
रोग, त्याची लक्षणे आणि त्यासोबत जगण्याचे मार्ग याबद्दल जागरूकता निर्माण करणे.
जर एखाद्या व्यक्तीला थॅलेसेमियाचा त्रास होत असेल तर लग्नाआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे याची जाणीव वाढवा.
मुलांच्या आरोग्यासाठी, समाजासाठी आणि संपूर्ण जगासाठी लसीकरणाच्या महत्त्वाविषयी जागरुकता निर्माण करणे.

जागतिक थॅलेसेमिया दिनाच्या वेगवेगळ्या थीमस्

2024-- Empowering Lives, Embracing Progress. Equitable and Accessible Thalassaemia Treatment for all.

2023-- Aware. Share. Care Strengthening Education to Bridge the Thalassaemia Care Gap.

2022-- Aware. Share. Care Working with the global community as one to improve thalassemia knowledge.

2021 – ”Addressing Health Inequalities Across the Global Thalassaemia Community”.

2020 – ”The dawning of a new era for thalassaemia: Time for a global effort to make novel therapies accessible and affordable to patients”

2019 – “Universal access to quality thalassaemia healthcare services: Building bridges with and for patients”

2018 – “Thalassaemia past, present and future: Documenting progress and patients’ needs worldwide” " थॅलेसेमिया भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य: जगभरातील प्रगती आणि रुग्णांच्या गरजा दस्तऐवजीकरण".

2017 – “Get connected: Share knowledge and experience and fight for a better tomorrow in thalassaemia”  “कनेक्ट व्हा! ज्ञान आणि अनुभव सामायिक करा आणि थॅलेसेमियामध्ये चांगल्या उद्यासाठी लढा.”

2016 – “Access to safe and effective drugs in thalassaemia”  "थॅलेसेमियामध्ये सुरक्षित आणि प्रभावी औषधांचा प्रवेश" होती.

2015 – “Enhancing partnership towards patient-centred health systems: good health adds life to years!”  "रुग्ण-केंद्रित आरोग्य प्रणालींसाठी भागीदारी वाढवणे: चांगले आरोग्य वर्षांमध्ये आयुष्य वाढवते!"

2014 – “Economic Recession: Observe – Joint Forces – Safeguard Health”

2013 – “The right for quality health care of every patient with Thalassaemia: major and beyond”

2012 – “Patients’ Rights Revisited

जागतिक थॅलेसेमिया दिन कसा साजरा केला जातो?
शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांसारख्या सार्वजनिक ठिकाणी लोकांना रोग, त्याची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपायांबद्दल जागरूक करण्यासाठी अनेक उपक्रम आणि कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच, रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना या आजाराविषयी ज्ञान मिळवण्यासाठी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. आम्हाला सांगू द्या की थॅलेसेमिया इंटरनॅशनल फेडरेशन (TIF) ही एक ना-नफा आणि गैर-सरकारी रुग्ण-चालित संस्था आहे जी अनेक देशांमध्ये संबंधित सदस्यांसह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात सक्रियपणे सामील आहे. इतकेच नाही तर जागतिक आरोग्य संघटना आणि इतर आरोग्य संस्था देखील थॅलेसेमिया आजाराने ग्रस्त रुग्णांच्या मूलभूत हक्कांवर लक्ष केंद्रित करतात.

आपली काळजी घ्या.

संकलित माहिती

स्पर्धा परीक्षा गणितीय प्रश्नावली Maths Questions


स्पर्धा परीक्षा गणितीय प्रश्नावली
Competitive Examination Mathematical Questionnaire

(1) एक इंच म्हणजे किती मिलीमीटर ?
उत्तर --- 25 . 4 मि. मि.

(2) एका प्लाॅटची लांबी 40 फूट व रूंदी 50 फूट आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती ?
उत्तर --- 2000 चौरस फूट

(3) 200 किलोमीटर प्रवासाला 4 तास लागले तर वाहनाचा सरासरी वेग किती ?
उत्तर --- 50

(4) दोन संख्याचा गुणाकार 200 आहे. त्यापैकी एक संख्या 20 असल्यास दुसरी संख्या कोणती ?
उत्तर --- 10

(5)एक मनुष्य आपल्या उत्पन्नाच्या 75 % खर्च करतो. जर त्याची शिल्लक 5000 असल्यास त्याचे उत्पन्न किती असेल ?
उत्तर --- 20000

(6) 1 हेक्टर म्हणजे किती चौरस मीटर ?
उत्तर --- 10,000

(7) 800 चे 25 टक्के किती ?
उत्तर -- 200

(8) एका संख्येचे 25 % (टक्के ) म्हणजे 125 तर ती संख्या कोणती ?
उत्तर --- 500

(9) 2 तासात एक बस 100 किलोमीटर अंतर जाते तर ती बस 30 मिनिटांत किती किलोमीटर अंतर जाईल ?
उत्तर --- 25

(10) सुमितचा क्रमांक त्यांच्या वर्गात वरून तसेच खालून 25 येतो तर वर्गात किती विद्यार्थी आहेत ?
उत्तर --- 49

(11) 40 किमी प्रति तास वेगाने वाहन चालविल्यास 240 किलोमीटर अंतर जाण्यास किती वेळ लागतो ?
उत्तर --- 6

(12) 200 गुणांच्या परीक्षेस किमान पात्रता गुण 75 % एवढे असल्यास पात्रतेसाठी किती गुण आवश्यक आहेत ?
उत्तर --- 150

(13) 12 माणसे 1 काम 12 दिवसांत करतात तर 6 माणसे तेच काम किती दिवसांत करतील ?
उत्तर --- 24

(14) 10 लीटर = किती पाव लीटर ?
उत्तर --- 40

(15) 5 बगळे 5 मासे 5 मिनिटात खातात तर 1 बगळा 1 मासा किती मिनिटात खाईल ?
उत्तर --- 5 मिनिटात

गुरुवार, २१ मार्च, २०२४

२१ मार्च – आजचा दिवस व रात्र समान

२१ मार्च – आजचा दिवस व रात्र समान

ग्रेगरीयन कालगणनेनुसार उद्यापासून दिवस मोठा होत जाईल व २१ जून हा सर्वात मोठा दिवस असेल. आजचा दिवस व रात्र समान असतील. म्हणजे आज १२ तासांचा दिवस व १२ तासांची रात्र!

पृथ्वीचा अक्ष २३. ४५ अंशाने कललेला असल्याने सूर्याची उगवण्याची आणि मावळण्याची जागा दररोज थोड्या प्रमाणात बदलत असते ह्या सूर्याच्या मार्गाला आपण आयनिकवृत्त असे म्हणतात. सहा महिने सूर्य उत्तर पृथ्वीच्या ध्रृवीय भागात व सहा महिने दक्षिण पृथ्वीच्या ध्रृवीय भागात असतो. अशा प्रकारे वर-खाली सरकताना तो दोन वेळा पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या समान पातळीत येतो. त्यावेळेस दिवस-रात्र समान १२ तासांचे असतात. हे दिवस म्हणजे २१ मार्च रोजी म्हणजेच ज्यावेळेस सूर्य पृथ्वीच्या उत्तर ध्रृवीय भागात प्रवेश करतो, आणि २३ सप्टेंबर रोजी ज्यावेळेस सूर्य पृथ्वीच्या दक्षिण ध्रृवीय भागात प्रवेश करतो. आपण विषुववृत्तावर असाल तर ह्या दोन दिवशी सूर्य दुपारी १२ वाजता बरोबर डोक्यावर असतो. २१ मार्च ह्या दिवशी सूर्य ज्या बिंदूवर असतो त्यास ‘वसंतसंपात’ म्हणतात तर २३ सप्टेंबर ह्या दिवशी सूर्य ज्या बिंदूवर असतो त्यास ‘शरदसंपात’ असे म्हणतात. तसेच २१ जून ह्या दिवशी सूर्य जास्तीत जास्त वर उत्तर भागात आलेला असतो ह्यालाच उत्तरायण असे देखिल म्हणतात, तर २२ डिसेंबर ह्या दिवशी सूर्य जास्तीत जास्त वर दक्षिण भागात असतो. ह्यालाच ‘दक्षिणायन’ असे देखिल म्हणतात. पृथ्वी स्वत:भोवती फिरता फिरता सूर्याभोवतीही फिरते. त्यामुळेच दिवस व रात्र हे प्रहर व ऋतु निर्माण झाले. पण पृथ्वीचा अक्ष थोडा कललेला असल्याने प्रत्येक वेळी विषुव वृत्तच सूर्याच्या समोर असते असे नाही. त्यामुळे दिवस लहान-मोठा होत राहतो. मात्र २१ मार्च व २३ सप्टेंबर या दोन दिवशी पृथ्वीचे विषुव वृत्त सूर्याच्या समोर येते व दिवस आाणि रात्र ढोबळ मानाने समान असतात. अर्थात दिवसाच्या गणनेतील काही त्रुटी आजही बाकी असल्याने लिप वर्षासारख्या काळात हा दिवस पुढे-मागेही होतो. आजपासून दिवस मोठा होऊ लागणार व त्यामुळे गोठवणारी थंडीही कमी होऊन वातावरण ऊबदार बनू लागते.

शनिवार, ९ मार्च, २०२४

जोडशब्द लिहा Marathi Jodshabda


प्रश्नमंजुषा - जोडशब्द लिहा. Marathi Jodshabda
१. फुलाचे नाव + घट्ट = गुलाबजाम
२. तीन + घर = त्रिभुवन
३. एक अवयव + दाखला = पाठपुरावा 
४. सोबत + गंध = सहवास
५. पाणी + ढब = जीवनशैली
६. वद्य + शुभ्र = कृष्णधवल
७. सदन + कुक्कुट = घरकोंबडा
८. शंभर + पूर्वीचे एक किरकोळ नाणे = शतपावली
९. आवाज + गोड = नादमधुर
१०. वदन + परिचय असणे = तोंडओळख
११. चित्त + आवड = मनपसंत
१२. प्रभा + वर्तुळ = तेजोगोल
१३. बुद्धी + अन्न चर्वण साधन = अक्कलदाढ
१४. सीतावर + शर = रामबाण 
१५. हिरा + मोठा उत्सव = हीरकमहोत्सव
१६. पद्धत + जेवणातील एक पदार्थ = रितभात
१७. सोने + बिल्ला = सुवर्णपदक
१८. दैनंदिन + थंड =रोजगार
१९. कृत्य + कथा = कर्मकहाणी
२०. दृष्टी + अटक = नजरकैद
२१. माफी + विनवणी = क्षमायाचना
२२. संक्रांत घटक + एक कुरकुरीत पदार्थ = तीळपापड
२३. वर्तुळाकार + सामान = गोलमाल
२४. पाच + जीव = पंचप्राण
२५. दास + डोंगर = गुलामगिरी
२६. धरणी + गेलेला = भूमिगत
२७. धान्य + जीवन = पीकपाणी
२८. देणे + साहसी = दानशूर
२९. पाच + मिठाई = पंचपक्वान्न
३०. पुत्र + जंगल = नंदनवन
३१. वारा + गिरणी = पवनचक्की
३२. नजर + रस्ता = दृष्टीपथ
३३. एकटा + भुसा = एकलकोंडा
३४. कष्ट + देणे = श्रमदान
३५. लवकर + तापट = शीघ्रकोपी
३६. चित्त + स्वतंत्र = मनमोकळा
३७. देणे + भांडे = दानपात्र
३८. भूमी + मित्र = जमीनदोस्त
३९. ओहळ + तणाव = ओढाताण
४०. सफेद + पर्ण = गोरापान
४१. झोपडी+दरवाजा=घरदार
४२. फायदा+नुकसान = नफातोटा
४३. वडील+मुलगा = बापलेक
४४. विवाह+काम = लग्नकार्य
४५. दिनांक+दिवस = तारीखवार
४६. शरीर+शिक्षा = देहदंड
४७. राहणे+घर = वसतिगृह

शनिवार, २४ फेब्रुवारी, २०२४

प्रतापराव गुजर Prataprao Gujar


प्रतापराव गुजर Prataprao Gujar (हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती)
जन्म : १६१५ (भोसरे (खटाव))
मृत्यू : २४ फेब्रुवारी १६७४ (नेसारी)

प्रतापराव गुजर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचे सेनापती होते. साल्हेरच्या लढाईत त्यांनी मोठ्या मुघल सैन्याचा पराभव केला. साल्हेर येथील मराठ्यांचा विजय हा मुघलांच्या बलाढ्य सैन्याविरुद्ध त्यांच्या लष्करी प्रक्रियेतील एक निर्णायक वळण म्हणून पाहिला जातो.
५ ऑगस्ट १६६८रोजी मोगलांशी झालेल्या तहानुसार शिवाजी महाराजांनी संभाजी राजांना संभाजीनगरला (औरंगाबाद) पाठवले. त्यावेळेस प्रतापराव गुजरही संभाजी महाराजांसोबत होते, अशी जेधे शकावलीत नोंद आहे.
प्रतापराव गुजर यांना आदिलशाही सरदार बहलोल खान याच्या नेतृत्वाखालील आक्रमक सैन्याचा सामना करण्यासाठी पाठवण्यात आले. मराठा सैन्याने नेसरीच्या ठिकाणी बहलोल खानच्या छावणीला वेढा घातला. प्रतापरावांच्या सैन्याने लढाईत विरोधी सेनापतीचा पराभव करून पकडले. खानाने मराठ्यांच्या प्रदेशावर पुन्हा आक्रमण न करण्याचे आश्वासन दिल्यावर प्रतापरावांनी बहलोल खानला सैन्यासह आणि जप्त केलेल्या युद्धसामुग्रीसह सोडले. (१५ एप्रिल १६७३ च्या सुमारास)
महाराज फार रागावले. त्यांनी पत्र लिहिलें, खानाशी ‘सला काय निमित्य केला?’ असा करडा सवाल महाराजांनी केला.

काही महिन्यांनी बहलोलखान पुन्हा करवीरच्या आघाडीवर स्वराज्याच्या रोखाने येत आहे, तो सुटला आहे, तो स्वराज्याला तोशीस देणार, अशा बातम्या येऊन धडकल्या. प्रतापरावानेही इरेला पडून या बहलोलचा फन्ना उडवावा व झालेल्या चुकीची भरपाई करावी या हेतूने महाराजांनी प्रतापरावास लिहिलें होतें,‘…हा (बहलोलखान) घडोघडीं येतो. तुम्ही लष्कर घेऊन जाऊन बहलोलखान येतो, याची गाठ घालून, बुडवून फते करणें. नाही तर (पुन्हा आम्हांस) तोंड न दाखविणें.’

२४ फेब्रुवारी १६७४ रोजी प्रतापराव गुजरांची बहलोलखानाशी गाठ पडली. कृष्णाजी अनंत सभासद यांनी केलेल्या वर्णनानुसार, 'त्यावरि प्रतापराव जाऊन बेलोलखानाशीं गाठले. नेसरीवरी नबाब आला. त्याने गाठीले. मोठे युद्ध झाले. अवकाल होऊन प्रतापराव सरनोबत तरवारीचे वाराने ठार झाले. रण बहुत पाडीले. रक्ताच्या नद्या चालिल्या.'

या लढाईत प्रतापराव गुजर यांच्यासोबत आणखी सहा वीरांना वीरमरण आले, अशी इंग्रज दुभाषी नारायण शेणवी यांच्या ४ एप्रिल १६७४ रोजीच्या पत्रात नोंद आहे. कोणत्याही विश्वसनीय साधनात इतर सहा वीरांची नावे सापडत नाहीत.

मराठ्यांच्या इतिहासात नवीन इतिहास घडला गेला होता. हे सर्व महाराजांच्या कानी पडल्यावर महाराज दुःखी झाले. ही नेसरीची लढाई २४ फेब्रुवारी १६७४ रोजी झाली. या प्रसंगावर "वेडात मराठे वीर दौडले सात" ही कविता गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या आवाजात प्रसिद्ध आहे. लोकशाहीर बशीर मोमीन (कवठेकर) यांनी 'वेडात मराठे वीर दौडले सात' याच नावाचे व्यवसायिक नाटक लिहिले.

सर सेनापती प्रतापराव गुजर यांचे दोन मुले खंडेराव गुजर व जगजीवन गुजर शाहू झुल्फिकारखानानें रायगड फितुरीनें घेतल्यानंतर येसूबाईसाहेब व शाहुमहाराज यांनां औरंगझेबाकडे पाठविण्यांत आलें, त्यावेळी गडावर असलेली कांहीं मानकरी मंडळीहि (केसरकर, गुजर वगैरे) पकडलीं जाऊन औरंगझेबाच्या छावणींत गेली. तींत हा खंडोजीहि होता. या सर्व मंडळींस बाटवून मुसुलमान करण्याची इच्छा औरंगझेबास नेहमी होई. परंतु तिच्या आड त्याची मुलगी येत असे. एके दिवशी मात्र त्यानें आज शाहूस बाटवावयाचेंच असा आग्रह धरला. तेव्हां तोहि त्याच्या कन्येनें मोडला. परंतु शाहूच्या ऐवजी दुसरा कोणी तरी मोठा सरदार बाटविण्याचाच जेव्हां त्यानें हट्ट घेतला, तेव्हां खंडोजी हा आपखुषीनें मुसुलमान होण्यास तयार झाला.

आता आपल्या राजाच्या बचावासाठी आले, 16 मे 1700 मध्ये मोहरम च्या मुहूर्तावर मुसलमान करून त्याचा नावे अब्दुर्रहीम व अब्दुरेहीमान अशी ठेवली खंडोजीचा हा उपकार शाहु राजे कधी विसरले नाहीत. त्यानें असें धर्मांतर केल्यामुळें शाहूवरील हा प्रसंग टळला.. (जे लोक संभाजी महाराज आणि राजाराम महाराज भावा संबंधाविषयी बोलतात त्यांनी लक्षात घ्यावे की प्रतापराव गुजर यांचे कुटुंब जास्त राजाराम महाराजांना जवळ होते ,कारण जानकीबाई ही त्यांची सख्खी बहीण राजाराम महाराजांची राणी होती.)

" आमचा मामा आम्हाबदल मुसलमान जाहला" असे उल्लेख समकालीन शाहू महाराजांच्या कागदपत्रांमधुन दिसते स्वराज्यासाठी केलेले हे धर्मांतर खूप मोलाचे होते त्यावर महाराजांनी त्यांना परळी खोऱ्यातील साठ गावाची जमीन इनाम म्हणून दिली. खंडेराव आणि जगजीवन गुजर याना हिंदू धर्म मध्ये घ्यायचे प्रयत्न झाले पण खंडेराव यांचे त्यांच्या मुस्लिम बायको वर प्रेम होते आणि तिला पण हिंदू धर्मात घ्या असा खंडेराव यांचा हट्ट होता. मात्र तत्कालीन ब्राह्मणांना ते मंजूर नव्हते आणि परिस्थितीचा वरवंटा या ना त्या कारणाने गुजर कुटुंबावर फिरताच राहिला. त्यांची मुस्लिम वंशज आज देखील परळी नजीक कामठी गावात राहतात भाऊसाहेब हैभतराव गुजर, देशमुख, इनामदार परळी सरकार आणी त्यांचा मुलगा सत्तार अमीन साहेब इनामदार आणी त्यांची मुले १.सिकंदर सतार इनामदार 2.ज़ुबेर सत्तार इनामदार
आज मुस्लिम म्हणून सातारा मध्ये राहतात. आता कामठी हे गाव धरणामध्ये गेले असून त्यांचा सध्याचा रहिवास हा परळी नजीक जकातवाडी या गावामध्ये आहे . या घराण्याचा मोलाचा वाटा स्वराज्याच्या साठी आहे.

🏛️ समाधी

प्रतापराव गुजर यांची समाधी कोल्हापूर जिल्ह्यातील नेसरी नावाच्या गावी (तालुका गडहिंग्लज) आहे. तर जन्मगावी स्मारक आहे एका स्मारकाची सुरुवात भुईकोट किल्ला रूपाने सुरू झाली होती. परंतु ते काम अपूर्ण राहिले आहे. सध्या ते पडीक एक खंडहर अवस्थेत आहे.

🚩 हर हर महादेव...!! 🚩

🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏 विनम्र अभिवादन🙏

स्त्रोतपर माहिती

गुरुवार, १५ फेब्रुवारी, २०२४

श्री संत सेवालाल महाराज Sevalal Maharaj


सेवालाल महाराज

पूर्ण नाव : सेवा भीमासिंह रामावत

जन्म : फेब्रुवारी १५, १७३९

(गुलालडोडी ता. गुत्ती जि.अनंतपुर आंध्रप्रदेश)

*मृत्यू : जानेवारी ४, १७७३*

(रुईगड, यवतमाळ जिल्हा महाराष्ट्र)

पूर्वाधिकारी : नाही

उत्तराधिकारी : रामराव महाराज

वडील : भीमासिंह नायक

आई : धरमणीमाता

राजघराणे : बंजारा (गौर)

सेवालाल महाराज हे एक भारतीय सामाजिक-धार्मिक क्षेत्रातील एक सुधारक होते. संत हाथीराम बाबा, बाबा लखीशाह बंजारा, संत रूपसिंह महाराज, क्रांतिकारी संत गोविंद गुरू बंजारा यासह हा शुरवीर गोरराजवंशी बंजारा समुदाय संत सेवालाल महाराजांना आपले आध्यात्मिक गुरू म्हणून मानतात. ते जगदंबेचे परम शिष्य होते. आयुष्यभर ब्रह्मचारी राहिले. रामावत क्षत्रिय कुळातील भीमासिंह नाईक यांचे ते चिरंजीव होते.

🧕🏻 *धर्मणीयाडी (मातोश्री)*

संत सेवालाल महाराज यांच्या आईचे नाव धरमणी होते. ती जयराम वडतीया (सुवर्णा कप्पा, कर्नाटक) यांची राजकन्या होती. भीमा नायक यांच्या लग्नानंतर त्यांना जवळजवळ १२ वर्षे मूलबाळ नव्हते, पुढे जगदंबा मातेची पूजा व कृपेमुळे धर्मनी व भीमा नाईक यांना सेवालाल महाराज यांचा जन्म झाला अशी बंजारा समाजात एक श्रद्धा आहे.

सेवालाल महाराज यांचे श्रीक्षेत्र रुईगड येथे निधन झाले. आणि महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील पोहरागड येथे त्यांची समाधी आजही जगदंबेच्या मंदिराशेजारी आहे. आध्यात्मिक आणि समाजप्रबोधनातून समाजाला दिशा देण्याचे कार्य केले. सेवालाल महाराज यांची भविष्यवाणी आजही काळाच्या कसोटीवर तंतोतंत खरी ठरली आहे. बंजारा समाजातील महायोद्धा राजा लखीशाह बंजारा, गोर राजाभोज, क्रांतिकारी संत गोविंद गुरू बंजारा ,बाबा मख्खनशाह बंजारा, शूरवीर बल्लुराय बंजारा, वीरांगना मल्लिका बंजारन , गोरा -बादल , आला उदल , नायक मनिसिंह पवार , राजागोपीचंद गोर , वीरांगना दूर्गावती बंजारन , वीर दुर्गादास राठोड , जयमल फत्ता सिंह या शुर पराक्रमीच्या इतिहासाच्या शौर्यगाथा आजही बंजारा साहित्य बरोबरच शिख इतिहासात सुद्धा दिसून येते. माता जगदंबा बंजारा देवी , व्यंकटेश्वर बालाजी , संत हाथीराम बाबा महाराज , संत रूपसिंह महाराज यासह संत सेवालाल महाराज आणि संत सामकी माता यांना समाजात विशेष आस्थेचे स्थान आहे.

🏵️ *क्रांतिसिंह सेवालाल महाराज यांची शिकवण*

जंगल आणि पर्यावरणाचे रक्षण करा.

कोणालाही किंवा कोणत्याही प्रकारात भेदभाव करू नका.

सन्मानाने आयुष्य जगा.

इतरांशी वाईट बोलू नका आणि इतरांना इजा करु नका.

स्त्रियांचा सन्मान करा, आणि मुली जिवंत देवी आहेत.

काळजी करू नका आणि संकटाला निर्भयपणे तोंड दया, धैर्यवान आणि आत्मविश्वासू जीवन जगा.

पाण्याचे रक्षण करा आणि तहानलेल्यांना पाणीपुरवठा करा आणि कधीही पाणी विकण्यास गुंतवू नका जे सर्वात मोठे गुन्हा / पाप आहे.

वडीलधारी माणसांचा आदर करा आणि तरुणांवर प्रेम करा आणि प्राण्यांचा देखील आदर करा.

जंगलाला कधीही सोडू नका आणि जंगल नष्ट करू नका, जर आपण जंगल नष्ट केले तर आपण स्वतःला नष्ट करीत आहात.

मनन केल्याने आंतरिक शांती मिळेल, आणि अभ्यास करा, ज्ञान मिळवा आणि ज्ञान इतरांना वाटा.

माणुसकीवर प्रेम करा.

आयुष्यावर तर्क करा आणि सर्व अंधश्रद्धायुक्त विश्वास टाळा.

कुटूंबाची आणि समाजाची काळजी घ्या आणि समाजातील बंधुता कधीही भंग करु नका.

धैर्य मानवतेच्या शिस्त, चिंतनशील आणि एक बुद्धीप्रामाण्यवादी संत होते. अंधकारात सापडलेल्या भक्तांना त्यातून मार्ग काढण्यासाठी सदोदित मार्गदाता म्हणून आजीवन भूमिका केली.

🔮 *सेवालाल महाराज यांचे वचन*

क्रांतिसिंह सेवालाल महाराज यांनी आपल्या गौर बंजारा भाषेत दिलेला उपदेश.

रपीया कटोरो पांळी वक जाय।- भावार्थः एका रूपयाला एक वाटी पाणी विकेल।

कसाईन गावढी मत वेचो। – भावार्थः खाटीकला गाय विकू नका। पशू प्राण्यावर प्रेम करा।

जिवते धंणीरो बीर घरेम मत लावजो। – भावार्थः जिवंत नवरा असणाऱ्या स्त्रीला आपली बायको म्हणून घरात आणू नका।

चोरी लबाडीरो धन घरेम मत लावजो। – भावार्थः चोरी करून खोट बोलून पैसा कमाऊ नका किंवा तशा पैसा घरात आणू नका।

केरी निंदा बदी चाडी जूगली मत करजो। – भावार्थः कोनाची निंदा चाडी चूगली लावा लावी करू नका।

जाणंजो छाणंजो पछच माणजो। -भावार्थः जाणून घ्या विचार मंथन करा नंतरच ती गोष्ट स्वीकारा।

ये जो वातेर पत रकाडीय वोन पाने आड पान तारलीयुंव। – भावार्थः ह्या गोष्टीचा जो कोनी आदर करेल, आचरणात आणेल स्वीकार करेल मी त्याचा रक्षण करेल. पाना आड पान मी त्याला तारेल।

संत सेवालाल महाराज हे थोर मानवतावादी संत होते. मानवी कल्याणासाठी त्यांनी सर्वदूर मानवता , पर्यावरण रक्षण,गोरक्षाचा संदेश दिला. महाराष्ट्र व‌ तेलंगाना राज्यात संत सेवालाल महाराज यांची जयंती शासन स्तरावर साजरी केली जाते. धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी निजामाविरूद्ध‌ लढा सुद्धा उभारला होता. समाजातील अनिष्ठ रूढी व शोषणाविरुद्ध त्यांनी आपल्या वाणीतून‌ प्रहार चढवून सामाजिक सुधारणासाठी आग्रही भूमिका घेतली.

🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌹🙏




रविवार, ११ फेब्रुवारी, २०२४

जगन्नाथ (नाना) शंकरशेठ Jagannath Shankarsheth


जगन्नाथ (नाना)शंकरशेठ
हे मराठी शिक्षणतज्ज्ञ, उद्योगपती होते. मुंबई शहराच्या घडणीत त्यांचा मोठा वाटा मानला जातो.
◆जन्म :~ १० फेब्रुवारी १८०३
◆मृत्यू :~ ३१ जुलै १८६५
🔷ठाणे जिल्ह्यातील मुरबाड हे त्यांचे मूळ गाव. त्यांना सार्वजनिक कार्याची आवड होती, त्यानुसार त्यांनी सार्वजनिक जीवनाच्या प्रमुख क्षेत्रांत सक्रिय सहभाग घेतला. मुंबई शहरातील अनेक सामाजिक व राजकीय संस्थांच्या उभारणीस त्यांनी हातभार लावला ज्यामध्ये “बॉम्बे असोसिएशन”,“बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी”,“एल्‌फिन्स्टन कॉलेज”,“ग्रेट मेडिकल कॉलेज”,“स्टुडंट्‌स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी” या सामाजिक व शैक्षणिक संस्थांचा समावेश होता. विशेष म्हणजे मुंबई विद्यापीठ आकाराला येण्यामागे नाना शंकरशेठ यांची दुरदृष्टी होती.नानांनी मुंबई विद्यापीठातर्फे १८६६ सालापासून जगन्नाथ शंकरशेठ संस्कृत शिष्यवृत्ती ही अत्यंत मानाची समजली जाणारी शिष्यवृत्ती सुरू केली ती आजतागायत सुरू आहे.
🔶नाना शंकरशेठ काऊंसिलमध्ये असतानाच १८६४ साली मुंबई शहरातील जनतेला पायाभूत सुविधांबरोबर आरोग्य-सुखसोयी मिळवण्यासाठी मुंबईसाठी स्वतंत्र म्युनिसपल आयोग नेमला. त्याचे पुढे मुंबई म्युनिसिपल कॉपरेरेशनमध्ये रूपांतर केले गेले. आज मुंबई महानगरपालिकेचा जो भव्य-दिव्य वटवृक्षाचा डोलारा वाढला ते रोपटे नानांनी लावले होते. नानांनी इंग्रजांच्या व राजा राममोहन रॉय यांच्या साहाय्याने बालविवाह, सती या रुढी समाजाला किती घातक आहेत, हे ठिकठिकाणी व्याख्याने देऊन पटवून देण्याचे काम केले. अंधश्रद्धा आणि ताठर धार्मिक चालीरितींवर त्यांनी कठोर शब्दात टीका केली. या चालीरितींमुळे समाजाचे होत असलेले नुकसान त्यांनी समाजाच्या निदर्शनाला आणून दिले. याची दखल इंग्रजी राजवटीने घेऊन १८३०मध्ये इंग्रजांनी अंधश्रद्धेबरोबर जुन्या रुढींना आळा घालण्यासाठी सतीची चाल, बालविवाह या चाली कायद्याने बंद केल्या. तसेच विधवांना पुनर्विवाह करण्यासाठी कायद्याने संरक्षण दिले. अशा तर्‍हेने बालविवाह, सतीची चाल या हिंदू धर्मातील अरिष्ठ रुढींवर बंदी आणण्यात नानांचा मोलाचा वाटा होता.
♦ एकशेसाठ वर्षापूर्वी सामान्य माणसाला लांब पल्ल्याचा प्रवासासाठी आणि सामानाच्या वाहतुकीसाठी बैलगाडय़ातून प्रवास करावा लागत असे; ही;खडतर बाब ओळखून नानांनी स्वत: १८४३ साली आगगाडीची कल्पना प्रगतीपथावर नेणार्‍या ध्यासापायी ग्रेट ईस्टर्न कंपनीची स्थापना केली. या कंपनीचे कार्यालय गिरगावातील नानांच्या वाडय़ात होते. शेवटी नानांच्या दहा वर्षाच्या अथक प्रयत्नांमुळेच १६ एप्रिल १८५३ दिवशी बोरीबंदर ते ठाणे या लोहमार्गावरून केवळ भारतातलीच नव्हे, तर आशिया खंडातील पहिली रेल्वेगाडी धावली. तेव्हापासूनच नाना शंकरशेठ यांना “भारतीय रेल्वेचे जनक” म्हणून ओळखले जाऊ लागले. मध्य रेल्वेच्या मुख्य कार्यालयाच्या (सीएसटी) प्रवेशद्वाराच्या भिंतीवरील नानां शंकरशेठांचा पुतळा त्यांची साक्ष देतो.16 एप्रिल 1853 रोजी पहिली प्रवासी रेल्वे बोरीबंदर म्हणजेच व्हिक्टोरिया टर्मिनस (VT) आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे धावली
     बोरीबंदर स्थानकातून दुपारी 3.30 वाजता 21 तोफांची सलामी घेऊन ठाण्याच्या दिशेने निघालेल्या या गाडीला 14 डबे होते. साहिब,सिंध आणि सुलतान अशी शक्तीशाली 3 वाफेची इंजिने लावलेली होती.21 मैल म्हणजे 34 किलोमीटर प्रवासाला या रेल्वेला 1 तास 12 मिनिटे लागली. लोकांनी या रेल्वे गाडीला चाक्या म्हसोबा हे नाव दिले होते.
     मोजक्याच प्रतिष्ठित अशा 400 माणसांना गाडीत बसण्याचे निमंत्रण होते. 25 व्हिआयपी होते त्यात ही रेल्वे सुरू करण्यासाठी ज्यांचे मोठे योगदान होते ते नाना शंकरशेठ होते.त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून रेल्वेने त्यांना सोन्याचा रेल्वे पास दिला होता.
🔷पूर्वजांप्रमाणे भटभिक्षुकी न करता नानांनी व्यापार केला व अतिशय विश्वासू आणि प्रामाणिक व्यापारी असल्याची ख्याती मिळविली. त्यामुळे अनेक अरब, अफगाण तसेच इतर परदेशी व्यापारी आपली भारतातील मालमत्ता बँकांकडे न देता शंकरशेठ यांच्याकडे सोपवत. मुंबई शहराच्या विकासाचा पाया रचणार्‍या त्याचबरोबर मुंबई शहराच्या शैक्षणिक, सामाजिक व राजकीय व्यवस्थापनाची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणार्‍या जगन्नाथ नाना शंकरशेठ यांना आधुनिक मुंबईचा शिल्पकार मानण्यात आले आहे.


सोमवार, २९ जानेवारी, २०२४

मुधोजी राजे उर्फ अप्पासाहेब भोसले Mudhoji Raje


मुधोजी राजे उर्फ 🤺 अप्पासाहेब भोसले 🏇
(नागपूर)
वीरमरण : 1851

नागपूरचे रघूजी राजे (दुसरे) १२ मार्च १८१६, निधन पावले, तेव्हा त्यांची आवडती राणी बाकाबाई हिने ठरविले की, रघुजीचा दासीपुत्र धर्माजी याला गादीवर बसवावे. कारण रघुजीचा मुलगा परसोजी (दुसरा) हा शरीराने अपंग होता. धर्माजी हा अनौरस असल्याने परसोजीचा चुलत भाऊ (बांकाबाईचा पुतण्या) मुधोजी यांचा धर्माजीला विरोध होता. बांकाबाईचा हेका पाहुन मुधोजीने तिला व धर्माजीला कैदेत टाकले. मुधोजी शूर, पराक्रमी व बाणेदार होते. त्यांनी परसोजीस राज्याभिषेक करवून त्याला नागपूरच्या गादीवर बसविले. स्वतः त्याचा कारभारी झाला. त्यांनी राज्यकारभाराची सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली व राज्यकारभार पाहू लागला.

मध्यंतरी ५ मे १८१६ रोजी धर्माजीचा अज्ञातात खून झाला. खूनी सापडला नाही. नतर मुधोजी चांद्याला (चंद्रपूरला) गेले असता १ फेब्रुवारी १८१७ रोजी रात्री परसोजी अंथरूणातच निधन पावला. परसोजीच्या खुनाचा आरोप मुधोजीवर त्यांच्या विरोधकांनी ठेवला. नागपूरच्या कंपनीसरकारच्या रेसिडेंटने नागपूर दरबारातील नारायण पंडित व नागो त्र्यंबक या दोघा
मारेक-यांच्या साह्याने मुधोजीवरचा तो आरोप खोटी ठरविला. त्यात इंग्रज रेसिडेंटचा स्वार्थी हेतू होता. त्याच्या बदल्यात नारायण पंडित आणि नारो त्र्यंबक यांच्या मध्यस्थीने इंग्रजांची तैनाती फौज नागपूरला ठेवण्यात मुधोजीला भाग पाडले.

मुधोजी २१ फेब्रुवारी १८१७ रोजी रीतसर नागपूरच्या गादीवर बसले. परंपरागत पद्धतीप्रमाणे पुण्याच्या पेशव्याकडून (दुस-या बाजीरावाकडून) मुधोजीला 'सेनासाहेब सुभा' ही पदवी मानाच्या वस्त्रासह आली. ती मुधोजींनी स्वीकारु नये, असे रेसिडेंटने मुधोजींना कळविले. "पेशव्यांचा व आमचा बिघाड झाला आहे. तुम्ही ही वस्त्रे स्वीकारु नयेत" असे रेसिडेंट म्हणाला. पण मुधोजींनी रेसिडेंटला न जुमानता ती पदवी आणि मानाची वस्त्रे स्वीकारली. कारण नागपूरच्या भोसल्यांचा तो परंपरागत हक्क होता.
कंपनी सरकारने नागपूर राज्यातील होशंगाबाद येथे वखार घालण्याची परवानगी मुधोजीराजांना मागितली. ती मुधोजीराजांनी फेटाळून लावली या दोन घटनांमुळे कंपनी सरकार मुधोजीराजांवर नाराज झाले. फितूर नारायण पंडित व नारो त्र्यंबक यांच्यामुळेच रेसिडेंट मुधोजीशी तैनाती फौजेचं तह करू शकले. त्यामुळे कंपनी सरकार या दोघांवर खुश झाले आणि या दोघा ब्राम्हणांना कंपनी सरकारने प्रत्येकी १५ हजार रुपयांची नेमणूक तह हयात दिली.
मुधोजी दुस-या बाजीराव पेशव्याचे अनुकरण करून लढाई करू नये, म्हणून जेन्किसने बैतूल, होशंगाबादहून इंग्रजी सैन्य नागपूरला आणून घेतले. इंग्रज फौजेचा मुख्य अधिकारी लेफ्ट. कर्नल स्कॉट हा सुद्धा तेलखेडीहून सैन्यासह नागपूरला येऊन ठेपला. २५ नोव्हेबर १८१७ रोजी रात्रीच्या कडाक्याच्या थंडीत नारायण पंडित हा वेषांतर करून रेसिडेन्सीत आला व त्याने जेन्किसला सांगितले, "अप्पासाहेबाने तुमच्यावर हल्ला करण्याचा निर्णय घेतला आहे. तेव्हा सावध राहा." बातमीमुळे सावध होऊन जेन्किसने लढाईची पूर्व तयारी केली.
अप्पासाहेबांच्या १० हजार घोडेस्वारांनी व ६ हजार पायदळाने सीताबर्डीच्या परिसरात इंग्रज सैन्याला चहुबाजूंनी घेरले. त्या सैन्याजवळ २५ तोफ़ाही होत्या. या सैन्याचा प्रमुख अप्पासाहेबाचा एकनिष्ठ सरदार मनभट्ट उपाध्ये हा होता. अप्पासाहेब मात्र रणांगणावर नव्हते. सीताबर्डीच्या या लढाईत इंग्रजांच्या विजय झाला. लढाई संपल्यानंतर अप्पासाहेबांनी नारायण पंडितामार्फत जेन्किसला निरोप पाठविला की, ' मनभट आणि त्याच्या अरब सैन्याने माझ्या हुकुमाशिवाय ही लढाई केली. "बांकाबाई ही इंग्रजांस अनुकूल होती. लढाई संपल्यावर तिने जेन्किसला निरोप पाठविला, तो असा "झालेल्या घटनेशी आपला मुळीच संबंध नाही. इंग्रजांनी भोसले घराण्याशी आपला संबंध पूर्ववत कायम ठेवावा."
लढाईनंतर जेन्किस याने अप्पासाहेबांस इंग्रज - भोसले संबंध पूर्ववतच आहेत, असे भासविण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. कारण जेन्किसला इंग्रज सैन्याची मोठी कुमक येण्यास अजून अवकाश होता.
१२ डिसेंबर १८१७ रोजी कॕ. डव्हटन एक डिव्हिजन इंग्रज सेनेसह नागपूरात येऊन धडकला. त्यानंतर जन्किसला जोर चढला. त्याने नारायण पंडितामार्फत अप्पासाहेबाला कळविले की, “अप्पासाहेबाने आपले सारे राज्य इंग्रजांच्या ताब्यात द्यावे, आपला तोफखानाही आमच्या ताब्यात द्यावा. अरब सैन्यास नोकरीतून मुक्त करावे व त्या सैन्याने आम्ही सांगू तेथे निघून जावे. या सर्व अटी पूर्ण होईपर्यंत अप्पासाहेबाने आमच्या रेसिडेन्सीत आमच्या देखरेखीखाली राहावे. त्यानंतरच भोसले - इंग्रज संबंध सलोख्याचे राहतील. तेव्हा यापुढे अप्पासोबाने लढाईच्या फंदात मुळीच पडू नये. यापुढे राज्याच्या अंतर्गत कारभारावर इंग्रजांचे योग्य नियंत्रण राहील." या अटी अत्यंत अपमानास्पद होत्या व अप्पासाहेबांसारख्या स्वाभिमानी व शूर व्यक्तीस त्या मान्य होणे शक्यच नव्हते.
१६ डिसेंबर रोजी जन. डव्हटन आपल्या सैन्यासह सक्करद-याकडे निघाला. अटीतटीची लढाई होऊन मराठ्यांचा पराभव झाला. या लढाईत इंग्रजांना अप्पासाहेबांच्या ७५ तोफा , ४० हत्ती, राजाचा शाही तंबू इतर बहुमोल वस्तू मिळाल्या. लढाई संपल्यावर मनभट व त्याच्या अन्य सैन्याने नागपूर शहर ताब्यात घेतले. नारायण पंडिताने फितुरी केली, म्हणून मनगट उपाध्ये याने त्याच्या घरावर हल्ला केला व त्याची संपूर्ण संपत्ती लूटून नेली. मनभटाने नारायण पंडितास त्याच्या फितुरील चांगलेच शासन केले.
शहर मुकाट्याने आमच्या ताब्यात द्या, असे जेन्किसने मनभटास कळविले. मनभटाने ते मानले नाही. शुक्रवार दरवाजाजवळ तुंबळ युद्ध झाले. त्यात इंग्रजांनी अप्पासाहेबांच्या सैन्याकडून हस्तगत केलेल्या ७५ तोफाचा उपयोग केला. २४ डिसेंबर रोजी इंग्रजांनी नागपूर शहरावर निकराचा हल्ला केला. ६ जानेवारी १८१८ पर्यंत नागपूर शहर इंग्रजांनी ताब्यात घेतले. इंग्रजांनी अप्पासाहेबांशी नवा तह केला, त्यानुसार नागपूर राज्याच्या उत्तरेकडील सर्व प्रदेश सिरगुजा व जसपूर ही संस्थाने, गाविलगड व नरनाळा हे किल्ले त्यांच्या सभोवतालच्या प्रदेशासह एकंदर साडेबावीस लाख उत्पन्नाचा प्रदेश इंग्रजांना मिळाला. अप्पासाहेबाला नामधारी राजा बनवून राज्याचा सगळा कारभार इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर बांकाबाई हिच्या सल्ल्याने जन्किन्सने १५ मार्च १८१८ रोजी अप्पासाहेबाला अटक करुन कैदेत टाकले. हेस्टिंग्जच्या आदेशानुसार अप्पासाहेब व त्याचे दोन सहकारी रामचंद्र वाघ आणि नागो यांना अलाहाबादला पाठवून तेथे कैदेत टाकण्याचे ठरविले. कैप्टन ब्राउन त्यांना घेऊन पुरेशा सैन्यासह वाटखर्चाची रक्कम घेऊन ३ मे १८१८ रोजी अलाहाबाद कडे निघाला. त्यांचा मुक्काम जबलपूरच्या अलीकडे रायचूर येथे असतांना अप्पासाहेब बेमालूमपण तेथून निसटले आणि हरईचा गोंड राजा चैनशहा याच्या आश्रयाला गेले. हरईचा प्रदेश डोगराळ व घनदाट अरण्याने व्यापलेला असल्याने तेच स्थान अप्पासाहेबाला सुरक्षित वाटले.
कॕ. ब्राऊनने या दिशांना आपले घोडेस्वार आप्पासाहेबाचा शोध लावण्या साठी पाठविले परंतु त्यांना रिकाम्या हातांनी परत यावे लागले. अप्पासाहेब हरईला गेलेषअसावे, म्हणून जबलपूरचा इंग्रज अधिकारी ओब्रेन याने व ब्रिगेडिअर जनरल वॉटसन याने हरईकडे घोडेस्वारे पाठविले पण त्यांच्याही हाती अप्पासाहेब लागले नाही. नंतर जेन्किसने अप्पासाहेबाला पकडून देणा-यास एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. जबलपूरच्या कमिशनरने सुद्धा त्यासाठी आधी २५ हजार नंतर एक लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली. पण बक्षीसाच्या लोभाने कोणीही ते काम करण्यास तयार झाला नाही. म्हणून जेन्किसने दोन लाख रुपये व एक हजार रुपये उत्पन्नाची जहागीर देण्याचे घोषित केले. परंतु या बक्षीसाचा कोणावरही थोडा सुद्धा परिणाम झाला नाही. अप्पासाहेब त्यानंतर कधीही इंग्रजांच्या हाती लागले नाही.
अप्पासाहेबानी आता नागपूरचे राज्य इंग्रजांच्या हातुन मुक्त करण्यासाठी लढा सुरु केला. दिवसेंदिवस त्यांच्या अनुयायांची संख्या वाढू लागली. याकामी त्यांची पत्नी उमाबाई व अन्य नातेवाईक त्यांना गुप्तपणे आर्थिक साहाय्य देऊ लागले. दुस-या बाजीरावाने जन. माल्कमपुढे शरणागती पत्करल्यानंतर त्याचे सैन्यही अप्पासाहेबांस येऊन मिळाले. हरईचा गोंडराजा चैनशहा व पंचमढीचा ठाकूर मोहनसिंग हे तर आधीपासूनच त्यांच्या पाठीशी उभे होते. तन, मन, धनाने सहाय्य करीत होते. अप्पासाहेबांनी आपल्या सैन्यासह बैतूल येथिल छावणीवर २० जुलै १८१८ रोजी अचानक हल्ला करुन कैप्टन स्पार्क याला त्याच्या १०० शिपायांसह कापून काढले. मेळघाट , भैंसदेही, सातनेर , अतनेर व आमला वगैरे भागावर अप्पासाहेबाने आपला अंमल बसविला. सा-या नागपूर राज्यात अप्पासाहेबांच्या सैनिकांनी धुमाकूळ गाजविला. बालाघाट जिल्यातील कामथ्याचा जमीनदार चिमणा पटेल यानेही इंग्रजांविरुद्ध युध्द पुकारले. अप्पासाहेबाने आरंभिलेला स्वातंत्र्यलढा हळूहळू सा-या नागपूर राज्यात पसरला.
नागपूरलाही इग्रजांविरुद्ध कट शिजू लागला. त्यात आप्पासाहेबांच्या त्या ५ नातेवाईकांना जेन्किसनने अलाहाबादला पाठवून दिले. दिवसेंदिवस अप्पासाहेबांना वाढता पाठिंबा मिळत होता. ब्रिगेडिअर जनरल जॉन माल्कम याने लाला शिवप्रसाद मार्फत अण्णासाहेबांना कळविले की, तो जर शरण आला, तर त्याला कैद केले जाणार नाही, पेन्शन देण्यात येईल. गव्ह. जनरल सांगेल त्या स्थानी सन्मानाने राहता येईल. पण अप्पासाहेब इंग्रजी कावा ओळखून होता. त्याने माल्कमचे म्हणणे धुडकावून लावले.
लवकरच अप्पासाहेबांन चित्तू पेंढारी आपल्या अनुयायांसह येऊन मिळाला. इंग्रज अप्पासाहेबाचा शोध घेतच होते. चित्तू पेंढा-यासह अप्पासाहेब अशीरगडाकडे गेले. अशीरगडाचा किल्लेदार यशवंतराव लाड याचेकडे किल्ल्यावर अप्पासाहेब सैन्यासह राहिले. कॕ. डव्हटन हा मोठी इंग्रज सेना तोफखान्यासह घेऊन अशीरगडाजवळ आला. कर्नल स्मिथ पुण्याहून मोठे सैन्य व प्रचंड तोफखाना घेऊन आला. अशीरगड त्यावेळी ग्वाल्हेरचे दौलतराव शिंदे यांच्या ताब्यात होता. इंग्रजांनी दौलतरावांतर्फे यशवंतराव लाड याला अशीरगढ इंग्रजांच्या ताब्यात देण्याचा हुकूम आणला. तेव्हा यशवंतराव म्हणाला, 'आमच्या किल्ल्यात अप्पासाहेब नाही.' तोपर्यंत जॉन माल्कम हा महू येथून सैन्य घेऊन अशीरगडाजवळ येऊन पोहचला.
इंग्रजांनी अशीरगडावर हल्ला केला. यशवंतरावांनेही जिद्दीने किल्ला लढविला. शेवटी यशवंतरावांने काही अटीवर अशीरगड इंग्रजांच्या ताब्यात दिला. किल्ल्यात अप्पासाहेब नव्हताच. तो अशीरगडापासून फार लांब निघून गेला होता. अप्पासाहेबांनी रणजितसिंहाच्या राज्यात आश्रय मागितला. पण रणजितसिंहाने आश्रय देण्याचे नाकारले. शिखांच्या राज्यातून टेहरी गढ़वाल मंडी इ. भागात अप्पासाहेब ससैन्य हिंडत होता. नंतर ते बिकानेर येथे व त्यानंतर जोधपूरच्या राजाकडे गेले. जोधपूरच्या राजाने त्यांना आपल्याकडे मोठ्या इतमामाने ठेवले.
नोव्हेंबर १८१७ पासून अप्पासाहेब इंग्रजाशी झुंज देत होते. १८२९ साली त्यांनी जोधपूरच्या राजाकडे आश्रय घेतला. त्यानंतर १८४० सालपर्यंत ते जोधपूर येथेच राहिले असावे. ते १५ जुलै १८४० मध्ये जोधपूर येथे मरण पावले. असा आतापर्यंतचा समज होता. परंतु नवीन संशोधनानुसार अप्पासाहेब जोधपूरहून दक्षिणेकडे गेले व हैद्राबाद येथे पोचले. १८५१ मध्ये त्यांनी हैद्राबादच्या कारागृहात देह ठेवला. नागपूरचे राज्य इंग्रजांकडून परत मिळविण्याचा त्यांचा अखेरपर्यंत निर्धार होता. परंतु मनुष्यबळ व साधनसामुग्री अभावी त्यांची ती महत्वाकांक्षा पूरी होऊ शकली नाही व हा झुंजार स्वातंत्र्यसेनानी अपयश पदरी घेऊन या जगातून कायमचा निघून गेला. 'घरकी फूट जगतमें बुरी' हेच खरे. त्या महान क्रांतिकारकाचे स्मरण नव्या पिढीला सतत स्फूर्तिदायी ठरावे.

🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳

🙏 *विनम्र अभिवादन* 🙏

गुरुवार, १८ जानेवारी, २०२४

छत्रपती प्रतापसिंह भोसले Pratap Singh


छत्रपती प्रतापसिंह भोसले
मराठा साम्राज्य - सातारा संस्थान
अधिकारकाळ : १८०८ - ४ सप्टेंबर १८३९
राज्याभिषेक : ३ मे १८०८
राज्यव्याप्ती : सातारा
राजधानी : सातारा

पूर्ण नाव : छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले
जन्म : १८ जानेवारी १७९३ (अजिंक्यतारा)
मृत्यू : ४ ऑक्टोबर १८४७ (वाराणसी)
पूर्वाधिकारी : छत्रपती शाहूराजे भोसले (दुसरे शाहू)
वडील : छत्रपती शाहूराजे भोसले
राजघराणे : भोसले

हा लेख साताऱ्याचे राजे श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्याबद्दल आहे. हे शाहू राजांचे ज्येष्ठ पुत्र होते.
सातार्‍याचे छत्रपती हे मराठय़ांच्या साम्राज्याचे खरे धनी. युगपुरुष शिवाजी महाराजांचे वंशज वंशपरंपरेने सातार्‍याच्या गादीवर होते. तथापि, पेशवाईचे महत्त्व वाढल्याने सातार्‍याचे छत्रपती केवळ नामधारी राहिले. सन १७९३ च्या सुमारास छत्रपती प्रतापसिंहांचा जन्म झाला. सातार्‍याचे छत्रपती दुसरे शाहू सन १८०८ च्या सुमारास मृत्यू पावल्यावर प्रतापसिंह छत्रपती झाले.
महाराष्ट्रातील एक सद्‌गुणी, प्रतापसिंह भोसलेप्रजाहितदक्ष पण दुर्दैवी राजा. हा छत्रपती दुसरा शाहू (कार. १७७७-९८) व आनंदीबाई यांचा थोरला मुलगा. छत्रपती शाहूनंतर साताऱ्याच्या गादीवर आला. सवाई माधवराव (कार. १७७४-९५) पेशवेपदावर असताना नाना फडणीस मुख्य कारभारी होता आणि छत्रपती पहिला शाहू यांनी स्वहस्ते लिहून दिलेल्या दोन याद्यांप्रमाणे मराठी राज्याचे पुढारीपण पेशव्यांकडे आले होते, तरी सवाई माधवरावाने छत्रपतिपदाची प्रतिष्ठा सामान्यतः राखली; परंतु दुसरा बाजीराव (कार १७९५-१८१८) पेशवेपदी आल्यावर त्याने हळूहळू छत्रपतिपदाचा अवमान करण्यास प्रारंभ केला व अखेरीस छत्रपती प्रतापसिंहांना त्याने प्रायः सातारच्या किल्ल्यात नजरकैदेत टाकले. हे सहन न होऊन छत्रपतींचा सेनापती चतुरसिंग भोसले याने पेशव्यांविरुद्ध बंड केले (१८०९).
ते बंड पेशव्यांतर्फे सेनापती बापू गोखले याने मोडले पण त्यामुळे दुसऱ्या बाजीरावाने प्रतापसिंहाची नजरकैद अधिकच कडक केली. त्या वेळचा इंग्लिश रेसिडेंट मौंट स्ट्यूअर्ट एल्फिन्स्टन याने या परिस्थितीचा फायदा घेऊन दुसऱ्या बाजीरावाशी युद्ध सुरू केले. हे करताना त्याने प्रकट केले, की ‘मी छत्रपतींना पेशव्यांच्या जाचातून सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. मला पेशव्यांचे राज्य बुडवावयाचे असून छत्रपतींची सत्ता राखावयाची आहे.’ परिणामतः अष्टी (सोलापूर जिल्हा) येथे झालेल्या शेवटच्या इंग्रज-मराठे लढाईत (१८१८) प्रतापसिंह इंग्रजांच्या सैन्याबरोबर होते. पेशवाईच्या अस्तानंतर एल्फिन्स्टनने प्रतापसिंह यांना छत्रपतींच्या गादीवर पुन्हा नेऊन बसविले.
एल्फिन्स्टनने प्रतापसिंहांशी तह करून त्यांच्या अनेक वाजवी हक्कांत काटछाट केली; तरी साताऱ्यात नेमलेल्या ग्रँट डफसारख्या रेसिडेंटने साताऱ्याची राजकीय व्यवस्था लावून प्रतापसिंहास सुशिक्षित आणि सुसंस्कृत केले, राज्यकारभारात उत्तजेन दिले व राज्यात शिस्त आणली. प्रतापसिंहांनी सातारा शहरात अनेक सुधारणा केल्या : शहरात नवा राजवाडा, जलमंदिर यांसारख्या काही वास्तू बांधल्या; शहराला पाणीपुरवठा व्हावा म्हणून यवतेश्वर डोंगरावर तलाव खोदून खापरी नळाने गावात पाणी आणले तसेच मुलांच्या शिक्षणासाठी पाठशाळा काढली आणि तीमधून संस्कृत-मराठी बरोबर इंग्रजी भाषेच्याही अध्ययनाला उत्तेजन दिले; छापखाना काढून अनेक उपयुक्त ग्रंथ छापविले. याशिवाय मराठा तरुण-तरुणींना लष्करी शिक्षण देण्यास प्रारंभ केला. त्यांत महाराजांची कन्या गोजराबाईही होती.
या लोकहितवादी राजाच्या कार्यक्षम प्रशासनाविषयी ग्रँट डफने गव्हर्नरकडे शिफारस केली. तेव्हा त्यांच्या काही अधिकारांत ईस्ट इंडिया कंपनीने ५ एप्रिल १८२२ च्या जाहीरनाम्याने वाढ केली. ग्रँट डफ हा रेसिडेंट म्हणून प्रतापसिंहाच्या दरबारी १८१८-२२ दरम्यान होता; त्याने या काळात मराठ्यांच्या इतिहासाची साधनसामग्री जमा करून पुढे हिस्टरी ऑफ द मराठाज हा ग्रंथ लिहिला (१८२६). एल्फिन्स्टनची कारकीर्द संपल्यावर इंग्रजांचे प्रतापसिंहाविषयीचे एकूण धोरण बदलले. मुंबईचा गव्हर्नर रॉबर्ट ग्रँट (कार. १८३५-३८) याने कर्नल ओव्हान्स या रेसिडेंटच्या सांगण्यावरून प्रतापसिंहांचे राज्य बुडविण्यासाठी हीन वृत्तिनिदर्शक अनेक कटकारस्थाने रचली.
शेवटी इंग्रजांविरुद्ध कट केल्याचा खोटा आरोप लादून ४ सप्टेंबर १८३९ रोजी त्यांना पदच्युत करून त्यांचा धाकटा भाऊ आप्पासाहेब (शहाजी) यास नामधारी छत्रपती म्हणून सातारच्या गादीवर बसविले व काशीला (बनारस) प्रतापसिंहांना स्थानबद्धतेत राजकुटुंबासह ठेवण्यात आले. प्रतापसिंहानी ईस्ट इंडिया कंपनीचे डायरेक्टर व ब्रिटिश पार्लमेंट यांपुढे रंगो बापूजी गुप्ते यांस इंग्लंडमध्ये पाठवून व इंग्लंडमधील काही प्रतिष्ठित इंग्रजांमार्फत आपली सत्य बाजू मांडण्याचा खूप प्रयत्न केला; पण यश आले नाही. अखेर रंगों बापूजी परत येण्यापूर्वीच काशी येथे प्रतापसिंह स्थानबद्धतेत मरण पावले.
आप्पासाहेबाच्या मृत्यूनंतर सातारा संस्थान दत्तक वारस नामंजूर करून खालसा करण्यात आले (१८४८).

🚩 🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳🚩

🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌹🙏

मंगळवार, ९ जानेवारी, २०२४

साक्षरता घोषवाक्य (Education Slogans)


साक्षरता घोषवाक्य (Education Slogans)

1. सुख समृद्धीचा झरा; शिक्षण हाच मार्ग खरा.
2. पाठशाला असावी सुंदर; जेथे मुले मुली होती साक्षर.
3. मुलगा मुलगी एक समान; द्यावे त्यांना शिक्षण छान.
4. जबाबदार पालकाचे लक्षण; मुलांचे उत्तम शिक्षण.
5. शिक्षणाने मनुष्य साक्षर होतो व अनुभवाने तो शहाणा होतो.
6. शिक्षण हा वास्तविक स्वातंत्र्याचा मार्ग आहे.
7. एकाने एकास शिकवावे.
8. साक्षरतेचा एकच मंत्र;शिक्षण देणे हेच तंत्र.
9. घरी सर्वांना शिक्षित करा,कुटुंबात आनंद आणा.
10. शिक्षण ही एक मजबूत शिडी,जेणेकरून पुढे जाईल पिढी.
11. शिक्षण हा आपला शृंगार आहे,अन्यथा संपूर्ण जीवन व्यर्थ आहे.
12. आमचा भारत साक्षर असो;साक्षर भारत संपन्न असो.
13. सुख समृद्धीचा झरा;शिक्षण हाच मार्ग खरा.
14. अज्ञानात आपली अधोगती,शिकण्यातच आहे खरी प्रगती.
15. साक्षरतेचा दिवा घरोघरी लावा.
16. विद्या ही संकटकाळी साथ देणारे शस्त्र आहे.
17. एक एक अक्षर शिकूया;ज्ञानाचा डोंगर चढूया.
18. शिक्षणामुळे देशाचे सामर्थ्य ठरते
19. राहू आपण एकोप्याने; देश घडवू शिक्षणाने.
20. केवळ सुशिक्षित लोकच मुक्त आहेत
21. शिक्षण हे एक साधन आहे जे आपल्याला यशस्वी होण्यास मदत करते
22. शिक्षणाने समृद्धी मिळते
23. अक्षर कळे,संकट टळे.
24. आजचे शिक्षण,उद्याचे भविष्य शिक्षण हे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे,जे जग बदलू शकते
25. जो राहे निरक्षर, तो फसे निरंतर.
26. साक्षरतेचा दिवा घरोघरी लावा.
27. गिरवू अक्षर, होऊ साक्षर.
28. शिक्षणात काट कसर नको. काटकसरीचे शिक्षण मात्र हवे.
29.  स्वाभिमान जागृत करून सन्मानाने जगवत ते शिक्षण.
30. मनुष्याच्या सहनशक्तीचा आविष्कार म्हणजे खरे शिक्षण.
31. विद्येने नम्रता आणि नम्रतेने विद्या शोभून दिसते.
32. विद्येविना मनुष्य पशू आहे.
33. ज्यामुळे स्वाभिमान जागृत होतो ते खरे शिक्षण होय.
34. विद्या ही संकटकाळी साथ देणारे शस्त्र आहे.
35. एक एक अक्षर शिकूया; ज्ञानाचा डोंगर चढूया .
36. वाचाल तर वाचाल.
37. साक्षरतेचा एकच मंत्र; शिक्षण देणे हेच तंत्र.
38. देणं समाजाचं फेडावं; काम शिक्षणाच करावं.
39. साक्षरतेचा एकच संदेश; अज्ञान संपून सुखी होईल देश.
40. एकाने शिकवूया एकाला; साक्षर करूया जनतेला.
41. देशाचा होईल विकास; घेवूनी साक्षरतेचा घ्यास.
42. होईल साक्षर जन सारा; हाच आमचा पहिला नारा.
43. ज्योतीने ज्योत पेटवा; साक्षरतेची मशाल जगवा.
44. आधी विद्यादान; मग कन्यादान.
45. राहू आपण एकोप्याने; देश घडवू शिक्षणाने.
46. माता होईल शिक्षित; तर कुटुंब राहील सुरक्षित.
47. नर असो व नारी; चढा शिक्षणाची पायरी.
48. अक्षर कळे संकट टळे.

आगामी झालेले