नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

शुक्रवार, २९ डिसेंबर, २०२३

दादासाहेब गायकवाड Bhaurao Gaikwad

दादासाहेब गायकवाड (भारतीय सामाजिक कार्यकर्ते)
पूर्ण नाव : भाऊराव कृष्णराव गायकवाड ऊर्फ दादासाहेब गायकवाड 
 जन्म : १५ ऑक्टोबर १९०२ (दिंडोरी) 
 मृत्यू : २९ डिसेंबर १९७१ (नवी दिल्ली)
नागरिकत्व : भारतीय
पक्ष : भारतीय रिपब्लिकन पक्ष
पद : राज्यसभा सदस्य

पुरस्कार : सामाजिक कार्यामध्ये पद्मश्री (इ.स. १९६८) दादासाहेब गायकवाड हे भारतीय राजकारणी, समाजसेवक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विश्वासू सहकारी होते. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या चळवळीत प्रगल्भ, विश्वसनीय व्यक्तिमत्व म्हणजे कर्मवीर दादासाहेब गायकवाड होय. गायकवाड आंबेडकरांचा वारसा लाभलेल्या भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष होते तसेच पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य होते. मुंबई विधानसभेचे सदस्य (आमदार), लोकसभा सदस्य व राज्यसभा सदस्य (खासदार) म्हणून त्यांनी कार्य केलेले आहे.

♨️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दादासाहेब गायकवाड, नाशिक सामाजिक कार्य
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणतं, "माझ्या आत्मचरित्रात अर्धा भाग भाऊराव गायकवाड असणार आहे. तो नसला, तर माझे चरित्र पूर्ण होणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या म्हणण्यातच दादासाहेब गायकवाड यांचे आंबेडकरी चळवळीत व बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या रिपब्लिकन पक्षातील महत्त्वाचे स्थान दिसून येते. बाबासाहेबांच्या अनेक कामांत दादासाहेबांचा सहभाग होता. मार्च २, इ.स. १९३०च्या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या वेळी डॉ. आंबेडकरांना दादासाहेबांची खूप मदत झाली. अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशासाठी दादासाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि बाबासाहेबांच्या पुढाकाराने दिलेल्या लढ्याचा एक भाग म्हणजे हा सत्याग्रह होता. काळाराम मंदिर हे नाशिक मधील प्रसिद्ध रामाचे मंदिर आहे.
अनेक आंदोलनांत आंबेडकरांना साथ त्यांनी दिली होती. कर्मवीर दादासाहेब गायकवाड हे स्वतः दलित समाजातून आले असल्याने दलितांच्या व्यथा व त्यांना भोगाव्या लागणाऱ्या यातना या गोष्टींचा त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला होता. म्हणूनच दलित समाजाविषयींचा त्यांचा कळवळा हा आंतरिक उमाळ्यातून आलेला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येथील दलित जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी जो व्यापक संघर्ष सुरू केला त्या संघर्षात बाबासाहेबांना साथ देण्यासाठी सुरुवातीच्या काळात पुढे आलेल्या दलित युवकांपैकी कर्मवीर दादासाहेब गायकवाड हे एक होत. २० मार्च, १९२७ चा महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह आणि २ मार्च, १९३० चा प्रत्यक्षात ३ मार्च, १९३० रोजी केला गेलेला नाशिक येथील काळाराम मंदिरप्रवेश सत्याग्रह, या सत्याग्रहांमध्ये त्यांनी डॉ. आंबेडकरांच्या बरोबरीने भाग घेतला होता. डॉ. आंबेडकरांनी सुरू केलेल्या इतर चळवळीं मध्येही त्यांचा सक्रिय सहभाग होता. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झालेल्या आंदोलनात दादासाहेबांनी भाग घेतला होता. संयुक्त महाराष्ट्रसमितीचे एक प्रमुख नेते म्हणून ते ओळखले जात होते.

🌀 धर्मांतर
१४ ऑक्टोबर इ.स. १९५६ मध्ये दादासाहेब गायकवाड यांनी डॉ. आंबेडकरांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.

⚜️ राजकीय कारकीर्द
इ.स. १९३७ ते १९४६ या काळात गायकवाड मुंबई विधानसभेचे, तर इ.स. १९५७ ते १९६२ या काळात लोकसभेचे सदस्य होते. १९५७–५८ मध्ये ते लोकसभेत रिपब्लिकन पक्षाचे नेते होते. इ.स. १९६२ ते ६८ दरम्यान ते राज्यसभेवर सदस्य म्हणून कार्यरत होते.

🔮 रिपब्लिकन पक्षाचे नेतृत्व
भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाल्यावर त्या पक्षाचे नेतृत्व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी केले. पुढे या पक्षाची फाटाफूट झाल्यावर त्याच्या एका प्रभावी गटाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. रिपब्लिकन पक्षात ऐक्य निर्माण करण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले; पण दुर्दैवाने त्यामध्ये त्यांना यश आले नाही. तथापि, दलित समाजातील सर्वांत मोठ्या गटाने गायकवाडांच्या नेतृत्वालाच मान्यता दिली होती.
१९३७ मध्ये मुंबई राज्याच्या विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली होती. भारतीय संसदेच्या लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे ते अनुक्रमे १९५७ ते १९६२ आणि १९६२ ते १९६८ सदस्य होते. लोकसभेचे सदस्य म्हणून कार्यरत असताना दुसरे सदस्य प्रकाशवीर शास्त्री यांनी धर्मांतराविरुद्ध विधेयक आणण्याच्या केलेल्या प्रयत्नाच्या निषेधार्थ त्यांनी लोकसभेत मनुस्मृती फाडून १९२७ मध्ये डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन करून केलेल्या प्रतीकात्मक निषेधाची आठवण करून दिली. भारत सरकारने ‘पद्मश्री’ हा किताब देऊन त्यांच्या सार्वजनिक कार्याचा व समाजसेवेचा गौरव केला होता.
सन २००१-०२ मध्ये महाराष्ट्र शासनाने त्यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करून त्यांच्या कार्याची स्मृती जागवली.

📚 चरित्रे/गौरवग्रंथ
दादासाहेब यांच्या मृत्यूनंतर त्यांचे गुणवर्णन करणारे आणि त्यांची कार्याची माहिती देणारे अनेक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. त्यांतले काही हे ---

’डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दादासाहेब गायकवाडांना पत्रे’ या नावाचा मराठी व इंग्रजी ग्रंथ प्रा. वामन निंबाळकर यांनी संपादित केला आहे.

’आंबेडकरी चळवळीतील दादासाहेब गायकवाड यांचे योगदान’—लेखक डॉ. अविनाश दिगंबर फुलझेले

दादासाहेब गायकवाड यांच्या कार्याची माहिती देणारा ’पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड’ नावाचा गौरवग्रंथ रंगनाथ डोळस यांनी लिहिला आहे.

अरुण रसाळ यांचा ’जननायक कर्मवीर दादासाहेब गायकवाड’ हा ग्रंथ

भावना भार्गवे यांचा ’लोकाग्रणी दादासाहेब गायकवाड’ हा ग्रंथ

कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे एक चरित्र त्यांचे जावई आणि आंबेडकरी चळवळीच्या महत्त्वपूर्ण कालखंडाचे साक्षीदार अ‍ॅड. हरिभाऊ पगारे यांनी लिहिले आहे.

दि.रं. भालेराव यांनीही ’कर्मवीर दादासाहेब गायकवाड’ या नावाचे एक छोटे चरित्रवजा पुस्तक लिहिले आहे.

🎖️ पुरस्कार व सन्मान
कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाद्वारे २००२ पासून दिला जाणारा पुरस्कार आहे.
दादासाहेबांच्या नावाने महाराष्ट्र राज्य सरकारची ’कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना' या नावाची एक योजना २००४ पासून आहे. २०१२ साली तिचा लाभ ३८ भूमिहीनांना झाला होता. मात्र त्यापूर्वी केवळ २५० लोकांना जमिनी मिळाल्या होत्या.
भारत सरकारने गायकवाडांना १९६८ मध्ये पद्मश्री हा पुरस्कार दिला.
नाशिकमध्ये एका सभागृहाला ’दादासाहेब गायकवाड सभागृह’ नाव दिले आहे.
मुंबईत अंधेरीभागात 'दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्र' नावाची संस्था आहे.
दादासाहब गायकवाड यांचा परिचय करून देणारी एक १३ मिनिटांची ‘डॉक्युमेंटरी फिल्म’ आहे

🇮🇳 जयहिंद 🇮🇳
🙏🌹 विनम्र अभिवादन 🌹🙏

स्त्रोतपर माहिती 

बुधवार, १३ डिसेंबर, २०२३

सहकार महर्षि स्व. तात्यासाहेब कोरे Tatyasaheb Kore


सहकार महर्षि स्व. तात्यासाहेब कोरे Tatyasaheb Kore
(सहकार महर्षितथा स्वातंत्र्य सैनिक)

जन्म : १७ आॕक्टोबर १९१४
मृत्यू : १३ डिसेंबर १९९४

वारणा नगरी म्हणजे एका सामान्य माणसाचं पाहिलेलं स्वप्न लोक म्हणतात शून्यातून विश्व निर्माण करणं सोपं नाही, परंतु याच उत्तम उदाहरण म्हणजे वारणा नगरी एवढी मोठी वारणानगरी वसवणे म्हणजे चेष्टा नव्हे आज वारणा नगरीचे नाव पंचक्रोशीत गाजत आहे. त्याचे विधाते म्हणजे स्वर्गीय तात्यासाहेब कोरे. तात्यासाहेब कोरे यांचा जन्म १७ ऑक्टोंबर १९१४ साली झाला. त्यांच्या वडिलांचे नाव आण्णासाहेब व आईचे नाव भागीरथी असे होते, प्लेगच्या साथीमुळे तात्यासाहेबांच्या आई त्यांच्या लहानपणीच वारल्या कृष्णा काकूनी त्यांचा सांभाळ केला. १९२१ साली त्यांना कोडोली प्राथमिक शाळेत प्रवेश घेतला. संख्या, लेखन, आणि अंकगणित हे तात्यासाहेबांच्या आवडीचे विषय तात्यासाहेब लहानपणापासूनच मेहनत व अथक परिश्रम करत होते. जिद्दीच्या आणि कष्टाच्या जोरावर त्यांनी विद्यानगरी उभारली त्यांचे गुरुवर्य रामचंद्र राजमाने यांनी त्यांना अनुशासन आणि आदर्श वर्तन याच्या सोबत खेळ आणि शिक्षेची जीवन मूल्य शिकवली गुरुजी श्रीधरपंत कुलकर्णी यांनी त्यांना संस्कृत इंग्रजी मराठीचे ज्ञान दिलं गुरु जणांकडून राष्ट्र, राष्ट्रवाद, राष्ट्रभक्ती, सुख, त्याग याची समर्पकता तात्यासाहेबांना समजली. १९२९ पासून तात्यासाहेबांचे शिक्षण सांगलीत झाले. तिथे त्यांची मैत्री केशवराव पाटील कामेरी, डॉक्टर मगदूम आणि बी. ए. चौगुले यांच्याशी झाली परंतु म्हणतात ना कधीकधी जबाबदारी आपली परीक्षा घेते तसं काहीच तात्यासाहेबांच झालं, जबाबदारीमुळे त्यांना शिक्षण सोडून परंपरागत तराजू घेऊन घरचा व्यवसाय सांभाळायला लागला.
घरची जबाबदारी खांद्यावर असतानाच विसाव्या वर्षी म्हणजेच २२ डिसेंबर १९३४ मध्ये बेडग गावच्या वीर संगाप्पा आवटी यांची मुलगी सावित्रीबाई यांच्याशी तात्यासाहेब यांचा विवाह झाला. तात्यासाहेबांच्या म्हणण्यानुसार सावित्रीबाई अत्यंत समजूतदार सुसंस्कृत मनमिळावू होत्या, ते सावित्रीबाईंना प्रोफेसर असेही म्हणत. सावित्रीबाई वर्षातून दोन ते तीन मुलं आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळत या कारणामुळे त्यांना सगळे आक्का म्हणत असत. तात्यासाहेबांनी सन १९४२ साली भारत छोडो आणि चले जाओ आंदोलनामध्ये सक्रीय सहभाग घेतला. इन्कलाब जिंदाबाद करेंगे या मरेंगे परंतु चाळीस करोड लोक नाही दबणार अशा घोषणा सुद्धा दिल्या. वारणा नदीकाठचा डाग मळा तात्यासाहेबांनी भूमिगत कार्यकर्ते व प्रतिसरकार चालवण्यासाठी दिला. १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्याचा आनंद साजरा करत पुढे तात्यासाहेबांनी गांधीजी व साने गुरुजी यांच्या तत्वावर चालण्याचा निर्णय घेतला.
सन १९५१ मध्ये गुळाच्या व्यवसायात होणारा तोटा चिंताजनक होता यादरम्यान शेतकरी सहकारी संघ यांचे तात्यासाहेब मोहिते यांचा सहकारी साखर कारखाना तात्यासाहेबांनी पाहिला त्याची माहिती घेतली. त्यांना समजलं परंपरागत शेतीपेक्षा शास्त्रीय व आधुनिक यांत्रिक शेती करणे गरजेचे आहे. बाजारात गुळा पेक्षा साखरेला जास्त किंमत आहे. सन १९५२ मध्ये तात्यासाहेबांनी गावागावात घराघरात जाऊन कारखान्यासाठी सभासद तयार केले. या कार्यात लोकांचा चांगला सहभाग त्यांना मिळाला, आणि सहकारी तत्त्वावर तात्यासाहेबांनी कारखाना सुरू केला. दिनांक २६ ऑगस्ट १९५४ साली वारणानगर ची निर्मिती झाली. अनेक संकटांना सामोरे जात परदेशातून तात्यासाहेबांनी यंत्रसामग्री मिळवली. कारखान्याचा पहिला बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ १६ फेब्रुवारी १९५९ ला सावित्री अक्कांच्या शुभहस्ते हा समारंभ झाला. तो दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे दिवाळीचा पाडवा होता. हा तात्यासाहेबांच्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस होता. या दरम्यान मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि वेणूताई चव्हाण यांच्या हस्ते यंत्रसामग्रीची पूजा केली. आणि वारणा सहकारी साखर कारखान्याचा शुभारंभ झाला.
तात्यासाहेबांनी १९६४ मध्ये वारणा विभाग शिक्षण मंडळाची स्थापना केली. आणि २० जून १९६४ च्या दिवशी प्राचार्य भा.शं. भणगे यांच्या हस्ते शारदा पूजन करून वारणा महाविद्यालयाचा शुभारंभ केला. १२८ विद्यार्थी आणि १२ शिक्षक यांच्यासमवेत या महाविद्यालयालाचा शुभारंभ झाला. यावरून तात्यासाहेबांची दूरदृष्टी दिसून येते. आज वारणेच्या मुलांना जवळ शिक्षण सुविधा उपलब्ध झाल्यामुळे क्लर्क पासून कलेक्टर पर्यंत मुलांनी झेप घेतली, तात्यासाहेबांनी सर्वप्रथम उच्च शिक्षणाची सोय केली. आज सुद्धा वारणामहाविद्यालय तात्यासाहेबांच्या तत्त्वावर कार्य करत आहे. वारणा साखर कारखाना व महाविद्यालयाच्या स्थापने नंतर रोजगार करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी, म्हणून १९६९ मध्ये तात्यासाहेबांनी वारणा विद्यामंदिर ची स्थापना केली. कर्मचाऱ्यांच्या पैशाची बचत व्हावी व गरजेच्या वेळी पैसे उपलब्ध व्हावेत, म्हणून तात्यांनी वारणा सहकारी बँकेची स्थापना केली. घरातल्या महिलांना सुद्धा काम मिळावं म्हणून जनावरांपासून मिळणारे दूध विकून त्यांना चार पैसे मिळावे. या हेतूने तात्यासाहेबांनी २० जुलै १९६८ रोजी श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघ लि., ची स्थापना केली.
सावित्री आक्कांच्या म्हणण्यानुसार येथील महिलांना सुद्धा घरबसल्या काम मिळावे, म्हणून वारणा भगिनी मंडळ व महिला गृह उद्योग लिज्जत पापड केंद्र १९७४ ला सुरू केले. याच हेतूने लोकांना दैनंदिन वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर जावं लागू नये म्हणून १९७६ मध्ये वारणा ग्राहक मंडळ म्हणजेच वारणा बजार ची स्थापना केली. १९८३ मध्ये आय.टी.आय कॉलेज आणि इंजिनिअरिंग कॉलेज तर १९८४ मध्ये ट्रेनिंग आणि प्रोडक्शन सेंटर सोबतच कुकुट पालन केंद्र व महात्मा गांधी हॉस्पिटल सुरू केले. त्यांनी साखर कारखान्या सोबतच अन्य मुख्य लघु तथा सहायक उद्योग सुरू केले, तात्यासाहेबांचे स्वप्न होतं की आपल्या माणसांनी इथेच मेहनत करावी, इथेच कमवा व इथेच खर्चावा अर्थात इथे जो पैसा येईल तो इथेच राहावा लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दुसरीकडे जावे लागू नये. रोजगारासाठी भटकंती होऊ नये, व सर्वांचे जीवन सुखकर व सोयीस्कर व्हावे या विचाराने तात्यासाहेबांनी या संस्थांची स्थापना केली.
आणि अखेर १३ डिसेंबर १९९४ रोजी या महामावाची प्राणज्योत मावळली. आजही १३ डिसेंबर हा त्यांचा स्मृतीदिन मोठ्या समारंभाने साजरा केला जातो. विद्यमान आमदार आणि तात्यांसाहेबांचे नातू डॉ. विनयरावजी कोरे सावकर या स्मृतिदिनाच्या निमित्ताने अंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा, कृषिप्रदर्शन या आणि अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात आजही वारणा समूहाशी संबंधित शंभर हून अधिक गावातून लोक पहाटेचा अंधार चिरत हातात मशाली घेऊन तात्यांच्या स्मृतींचा जागर करत येतात, म्हणतात तात्यासाहेब कोरे अमर रहे! अमर रहे! अमर रहे! तात्यासाहेब कोरे अमर रहे!

🇮🇳 जयहिंद 🇮🇳
🙏 विनम्र अभिवादन🙏

आगामी झालेले