नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले ब्लॉग वर हार्दिक स्वागत 💐💐..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत ... सुस्वागतम.... ����������������

राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जन्मदिवस


शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटक आहे. भविष्यातले विचारवंत, कलाकार, लेखक, तत्त्वज्ञ, पुढारी, डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनीयर, शास्त्रज्ञ तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते. ज्या प्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देऊन त्यापासून एखादी प्रतिकृती तयार करत असतो, अगदी त्याचप्रमाणे शिक्षक बालकांच्या कोर्‍या मनावर योग्य संस्कार करून त्यातून भविष्यातील जबाबदार नागरिक घडवित असतात. आपल्या आई-वडीलांनंतर शिक्षक हे आपले अप्रत्यक्षरित्या पालकच असतात. 
शिक्षक हे आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान शिकवित नाहीत तर आपण त्यांच्याकडून जगण्याची कला आत्मसात करत असतो. 
आपल्या व्यक्तीमत्त्वावर त्यांच्याकडून संस्कार, संस्कृती, परंपरा, चालीरिती व आदर असे पैलू पाडले जात असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी‍ आपल्या गुरूंचा नेहमी आदरपूर्वक सन्मान केला पाहिजे. त्यांच्याविषयी शिक्षक दिनी कृतज्ञता व्यक्त करून त्याचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे.आपल्या भारतात ५ सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. आपल्या भारताचे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा हा जन्मदिवस. डॉ. राधाकृष्णन हे एक शिक्षक होते. शिक्षकांप्रती असलेले प्रेम पाहून त्यांचा हा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचे भारत सरकारने ठरवले. तसेच डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे आपल्या भारताचे दुसरे राष्ट्रपती होते. यादिवशी सर्व विद्यार्थी आपल्या शिक्षकांबद्दलचे प्रेम व्यक्त करतात. विद्यार्थी आपल्या शिक्षकांच्या पाया पडतात. आदरपूर्वक नमस्कार करतात. काही विद्यार्थी गुलाबाचे फुल देऊन तर काही विद्यार्थी एखादी भेटवस्तू देऊन आपले प्रेम व्यक्त करतात. शिक्षक हा समाजाचा निर्माणकर्ता आहे. शिक्षक हे आपले सर्वात मोठे आणि महत्वाचे गुरु आहेत. शिक्षकांना वैदिक काळापासूनच गुरुचे स्थान आहे. सर्वच शिक्षक हे समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचे महत्वाचे कार्य करतात. सर्वच शिष्यांनी आपल्या गुरूंविषयी आदरपूर्वक सन्मान, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. शिक्षक हे केवळ आपल्याला पुस्तकी ज्ञान देत नाहीत तर आपण त्यांच्याकडून जगण्याची कला आत्मसात करत असतो. विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढविण्याचे काम शिक्षक करतात. शिक्षकांमुळे आपण जीवनामध्ये बऱ्याच काही नवनवीन गोष्टी शिकतो. भविष्यातले शिक्षक, शास्त्रज्ञ, डॉक्टर, इंजिनियर, लेखक आणि काही विचारवंत तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते. आणि या सर्व शिक्षकांमुळेच मुले विचार करतात, चांगले शिक्षण घेतात आणि मोठमोठ्या पदांपर्यंत पोहोचतात. आपण जेव्हा पहिल्यांदा बालवाडीमध्ये शाळेत जातो तेव्हा आपल्याला या जगाची काहीच माहिती नसते त्यावेळी हे शिक्षक आपल्याला बऱ्याच काही नवनवीन गोष्टी शिकवतात सर्व वस्तूंची माहिती देतात. तसेच आपण आपल्या आई वडिलांपासून पहिल्यांदा दूर राहतो तेव्हा आपली संपूर्ण जबाबदारी शिक्षक घेतात. म्हणूनच शिक्षकांना दुसरे पालक ही म्हटले जाते. आपले विचार, मते घडवण्यामागे शिक्षकांचा मोठा वाट असतो. आपल्याला चित्रांवरून वेगवेगळ्या वस्तूंची माहिती करून देतात, जगभराच्या ज्ञान देतात. प्रार्थना म्हणायला शिकवतात आपल्यावर चांगले संस्कार करतात. अशाप्रकारे आपले हे शिक्षक आपल्याला घडवत असतात. या शिक्षकांबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी, गुरु शिष्यांमधील हे नाते कायम ठेवण्यासाठी हा शिक्षक दिन साजरा केला जातो. यादिवशी अनेक शाळांमध्ये शिक्षकदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. काही विद्यार्थी आपल्या शिक्षकांबद्दलचे आपले प्रेम, मनोगत व्यक्त करतात. शाळेकडून सर्व शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या जातात. तसेच शेवटी शिक्षक सुद्धा आभारप्रदर्शन करतात. काही शाळांमध्ये मुले एक दिवसासाठी शिक्षक बनतात आणि विद्यार्थ्यांना शिकवतात. डॉ. सर्वपल्ली यांच्याप्रमाणेच महात्मा फुले यांनाही शिक्षणाची खूप आवड होती आणि त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये चांगले कार्य केले. महात्मा फुले नऊ महिन्याचे असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचा विवाह वयाच्या बाराव्या वर्षी सावित्रीबाई यांच्याशी झाला. प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. त्यानंतर १८४२ मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कुलमध्ये प्रवेश घेतला. महात्मा फुले यांची बुद्धी अतिशय तल्लख असल्यामुळे पाच सहा वर्षातच त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. आपल्या देशातील अज्ञान, दारिद्र्य आणि समाजातील जातीभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. त्यांनी १८४८ साली बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढली आणि तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाई यांच्यावर सोपविली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळ पेठेत १८५२ मध्ये शाळा स्थापन केली. हे सर्व करत असताना महात्मा फुले यांना अनेकांच्या विरोधाला सामोरे जावे लागत असे पण सर्व सहन करूनही ते आपल्या मतावर ठाम होते. शाळेच्या मुख्याध्यापकपदी असलेल्या पहिल्या भारतीय महिला म्हणजे सावित्रीबाई आणि त्याचप्रमाणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय होते. असे हे थोर समाजसुधारक आपल्या सर्व स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देणारे आपले खरंच गुरूच आहेत. शिक्षणाचे महत्व समजून सांगणारे आणि त्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या सर्व समाजसुधारकांना, शिक्षक, शिक्षिकांना आपण या शिक्षक दिनाच्या दिवशी आपण मानाचा मुजरा करूयात.
शिक्षक महान आहेत, आम्हाला ज्ञान देतात.
शिक्षकाचा सन्मान करणे ही आपली स्वतःची शान आहे.
आम्ही चमनची फुले आहोत, शिक्षक माळी आहेत.
शिक्षकाचे महत्त्व संपूर्ण जग आहे.
शिक्षकाचा आदर करण्याचा आमचा अभिमान आहे.
शिक्षकाची आज्ञा पाळणे हा आपल्या सर्वांचा धर्म आहे.

शिक्षक :- मराठी कविता
आई – बाबांनी आम्हास जीवन दिले
पण जीवन कसे जगावे तुम्ही शिकविले …
आई- बाबाने आम्हास जेवणाचे ताठ वाढून दिले
ते जेवण कसे आणि किती खायचे तुम्ही शिकविले …
आई – बाबाने आम्हास संस्कार दिले
पण ते संस्कार कसे टिकवायचे तुम्ही शिकविले …
आई – बाबांनी आम्हास मोठे होताना पाहिले
पण तुम्हीच खऱ्या अर्थाने आम्हास मोठे केले …
आई- बाबानेही आमच्याकडे किंचित स्वार्थी अपेक्षेने पहिले
पण तुम्हीच सारे आमच्यासाठी निस्वार्थीपणे केले …
स्वामी तिन्ही जगाचे आई- बाबापुढे झुकले
ते आई – बाबाही आमच्यासाठी तुमच्यापुढे झुकले…
शिक्षक दिनाच्या मराठी कविता
शिक्षक म्हणजे विशाल वृक्षच असतो
ज्याच्य फांदी फांदीतून सळसळत असतात
बेदरकारपणे ज्ञानाची पानं
त्याच्याच छायेखाली सौख्य लाभते
अज्ञानाच्या उन्हात न्हाऊन निघालेल्या
अस्फुट चित्कांरांना किंवा त्याच्याच रेषेखाली अधांतरी
लटकेली असतात कित्येक भावनांच्या डोहात भिजून
नतमस्तक झालेली इवालाल्या चेहऱ्याची निरागस अक्षरे
शिक्षक नसतो कधीच बिचारा तोच तर असतो सर्वस्वी बादशहा शाळेचा त्याच्याच स्वमीत्वाने महत्व येत असते शाळेला तोच तर असतो खरा संशोधक, शास्त्रज्ञ
नखशिखान्त अंधर भरलेल्या चिमूकल्या गोळ्यातून
सूर्याचं तेज बाहेर काढणारा
तो समाज सुधारक क्रांती कारकही तोच
कित्येक चेतनांना पाठबळ असते
त्याच्या समर्थ तत्त्वज्ञानाचे
शिक्षकाला जपावी लागतात
कुतूहलाच्या झाडाची पानं जीवापाड
आणि आकार द्यावा लागतो
एका मुक्त पणे बागडणाऱ्या
निराकार चैत्यनाला…
कधी स्वतःला विसरून बागडावं ही लागतं
जाणून घ्यावी लागतात बोल खोल खोल काळजाच्या आत
निर्ममपणे…
कधी अंधाध ही प्यावा लागतो बोनबोभाट पणे
तेव्हा कुठे चमकतात उजेडाची किरणं उद्दीष्टांच्या वाटेवर
त्याच्या सोबतील असतेच की खडूची धारदार तलवार अन
फळ्याची ढाल असते पाठीशी
विश्वास ठेवा एक ना एक दिवस अंधार संपून उजेडाचे राज्य येईल.अन तेंव्हा मात्र शिक्षक म्हणून त्याची प्रतिमा अधिक स्पष्ट दिसेल.

*मराठी भाषण -1*
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर रोजी जन्मदिन‘शिक्षक दिन’म्हणून साजरा करण्यात येतो.‘शिक्षक’हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. आपल्या गुरू, शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस..
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षकांप्रती असलेले प्रेम व आदर पाहून भारत सरकारने त्यांचा जन्मदिन हा ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्याचा संकल्प केला. ती परंपरा अजूनही सुरू आहे व भविष्यातही सुरूच राहील. १९६२ मध्ये डॉ. राधाकृष्णन यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली तेव्हा त्यांचा जन्मदिवस हा शिक्षकांचा गौरव दिन म्हणून साजरा करण्याची इच्छा प्रकट केली होती. देशातील शिक्षकांचा गौरव हाच आपला गौरव असल्याचे त्यांनी सांगितले होते. प्रत्येकाच्या आयुष्यात समजण्याच्या आधीपासूनच आई नावाचा जगतगुरू सोबत करीत असतोच. व्यावहारिक आणि व्यक्तिमत्त्व घडविणा-या शिक्षकांची ओळख शाळेच्या पहिल्या पायरीवर अगदी अजाणत्या वयात होते, तेव्हापासूनच सर, मॅडम, बाई, गुरुजी अशा विविध नात्यांनी अनेकजण आपल्याला फक्त योग्य तेच शिकवण्याकरिता प्रयत्न करीत असतो. यातूनच संस्कार, शिक्षण आणि ध्येय घडत असते. स्वप्न बघण्याकरिताही आपापल्या कुवतीनुसार त्यांनीच तर मार्गदर्शन केलेले असते आणि अशाप्रकारे आपल्याला एक आदर्श ओळख देण्याचे काम करणा-या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा संस्मरणीय असा दिवस आयुष्यात भेटलेल्या प्रत्येक शिक्षकांप्रती समर्पित .
निसर्ग, पुस्तक, निरागस मुले बेस्ट टीचर..
शिक्षक आपल्या आयुष्यात खूपच महत्त्वाचे असतात, मग ते फक्त शाळा व कॉलेजातीलच असतील असे नाही तर अनेक मार्गाने अनेक जण शिक्षकाच्या भूमिकेत आपल्या आयुष्यात येत असतो. माझ्या मते निसर्ग, पुस्तक आणि निरागस छोटी मुले ही बेस्ट टीचर आहेत. हे सर्वजण आपल्याला आपण विसरत चाललेला निरागसपणा जिवंत ठेवण्याकरिता सातत्याने प्रोत्साहित करीत असतात. यापुढे जाऊन मी असे म्हणेन की आयुष्य, जीवन हाच एक मोठा अन् आदर्श शिक्षक असतो. तो रोज काही न काही शिकवत असतो. आपण ते कसे स्वीकारतो, हे महत्त्वाचे ठरते.. सर्वाना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
*मराठी भाषण - 2*

सर्वपल्ली राधाकृष्णन' हे भारताचे माजी राष्ट्रपती व नामांकित शिक्षणतज्‍ज्ञ हाते. डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन (सप्टेंबर ५, इ.स. १८८८:तिरुत्तनी, तमिळनाडू - १७ एप्रिल १९७५) हे भारताचे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते. त्यांच्या कार्यकाळ (इ.स. १९५२ - इ.स. १९६२) असा आहे. त्यांचा जन्म दक्षिण भारतात तिरुत्तनी या ठिकाणी झाला. हे गाव चेन्नई (मद्रास) शहरापासून ईशान्येला ६४ किमी अंतरावर आहे. राधाकृषणन यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिवस भारतात शिक्षक-दिन म्हणून साजरा केला जातो.

पाश्चात्त्य जगताला भारतीय चिद्‌वादाचा तात्त्विक परिचय करून देणारा भारतावरील ब्रिटिश सत्ताकाळातला महत्वाचा विचारवंत म्हणून राधाकृष्णन यांना ओळखले जाते.भारतीय तत्त्वज्ञानाचे भाष्यकार म्हणून ते ऑक्सफर्डमध्ये नावाजले गेले. त्यांच्या कार्याचे महत्त्व जाणून ऑक्सफर्ड विद्यापीठानेत्यांच्या नावाने 'राधाकृष्णन मेमोरियल बिक्वेस्ट' हा पुरस्कार ठेवला आहे.

राधाकृष्णन यांच्या जीवनात तीन प्रमुख प्रश्न होते.
पहिला प्रश्न असा की, नीतिमान पण चिकित्सक, विज्ञानोन्मुख पण अध्यात्मप्रवण असा नवा माणूस कसा निर्माण करता येईल? या दृष्टीने शिक्षणाचा काही उपयोग होऊ शकेल का? दुसरा प्रश्न असा होता की, प्राचीन भारतीय तत्त्वचिंतन सर्व जगाला आधुनिक भाषाशैलीत, आधुनिक पद्धतीने कसे समजावून सांगता येईल? भारतीय तत्त्वचिंतनाचे वैभव जगाला नेमकेपणाने कसे सांगावे? कसे पटवून द्यावे? तिसरा प्रश्न असा होता की; मानव जातीचे भवितव्य घडवण्यासाठी सांस्कृतिक संचिताचा उपयोग किती?' कुणाशीही ते याच तीन प्रश्नांच्या अनुरोधाने बोलत, असे नरहर कुरुंदकर लिहितात.[३]
१९५४ :' भारतरत्‍न' पुरस्काराने सन्मानित.


*मराठी भाषण - 3*

गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात परब्रह्म तस्मैः श्री गुरुवेः नमः।`
आज ५ सप्टेंबर... शिक्षक दिन... शिक्षक हा सामाजाचा निर्माण कर्ता आहे. छोट्या बालकाचे देशाचा उत्कृष्ट नागरिक म्हणून परिवर्तन करण्याचे कार्य शिक्षकाला कारायचे असते... त्याचमुळे या दिवसाला फार महत्त्व आहे.
आज डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस... हाच दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ. राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती.... शिक्षकांच्या भूमिकेचं महत्त्व आणि भविष्यातील पिढ्यांच्या जागरुकतेसाठी हा दिवस साजरा केला जातो.
शिक्षक दिन हा केवळ भारतातच साजरा केला जातो असं नाही... जगभरात वेगवेगळ्या दिवशी का होईना पण हा दिवस साजरा करतात. *युनेस्कोनं ५ ऑक्टोबर हा आंतराराष्ट्रीय शिक्षक दिन* म्हणून जाहीर केलाय. पण, भारतात मात्र राधाकृष्ण यांच्या सन्मानार्थ ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. १९६२ साली ते राष्ट्रपतीपदावर विराजन झाले होते. तेव्हा काही शिष्य आणि प्रशंसकांनी त्यांना त्यांचा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याची परवानगी मागितली. ‘माझा जन्मदिवस शिक्षक दिनाच्या रुपात साजरा करणं माझ्यासाठी गौरवास्पद आहे’ असं त्यावेळी राधाकृष्ण यांनी सांगितलं. शिक्षकांनी केवळ पाठ्यपुस्तकं मुलांना पढवून संतुष्ट होऊ नये, तर त्यांनी विद्यार्थ्यांना स्नेह आणि आदरही दिला पाहिजे. फक्त शिक्षक असून सन्मान मिळत नाही, तर हा सन्मान प्राप्त करावा लागतो, असं त्यांचं म्हणणं होतं...
जगभरातील शिक्षक दिन...
चीनमध्ये १९३१ मध्ये ‘नॅशनल सेन्ट्रल यूनिव्हर्सिटी’मध्ये शिक्षक दिनाची सुरूवात करण्यात आली. चीनी सरकारकडून मात्र १९३२ मध्ये या दिवसाला स्वीकृती मिळाली.
त्यानंतर १९३९ मध्ये कन्फ्यूशिअसचा जन्मदिवस, २७ ऑगस्ट हा दिवस शिक्षक दिन म्हणून घोषित करण्यात आला... पण त्यानंतर पुन्हा १९५१मध्ये हा निर्णय रद्द करण्यात आला. त्यानंतर १९८५ मध्ये १० सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून घोषित करण्यात आला.
आता मात्र पुन्हा एकदा अनेक लोकं कन्फ्युशिअसचाच वाढदिवस शिक्षक दिन म्हणून घोषित करण्याची मागणी करत आहेत. रशियामध्ये १९६५ ते १९९४ पर्यंत ऑक्टोबर महिन्यातील पहिला रविवार शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात होता. १९९४ सालापासून युनेस्कोच्या निर्णयानंतर त्यांनी ५ ऑक्टोबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून स्वीकारला.

*मराठी भाषण - 4*
मा.मुख्याध्यापक,  आदरणीय शिक्षक आणि माझ्या प्रिय सहका-यांना खूप शुभेच्छा. शिक्षक दिनाचा अत्यंत सन्माननीय कार्यक्रम साजरा करण्यासाठी आम्ही आज येथे आहोत. खरोखरच संपूर्ण भारतभरातील सर्व विद्यार्थ्यांसाठी हा एक सन्माननीय अवसर आहे. प्रत्येक वर्षी त्यांच्या आज्ञाधारक विद्यार्थ्यांकडून शिक्षकांचा आदर करण्यासाठी हे पाळले जाते. म्हणून, प्रिय मित्रांनो, आमच्या स्वतःच्या शिक्षकांना मनापासून आदर देण्यासाठी या उत्सवात सामील व्हा आणि सामील व्हा. त्यांना आपल्या समाजाचा मागचा हाड म्हणून संबोधले जाते कारण ते आपले पात्र तयार करण्यात, आपले भविष्य घडविण्यामध्ये आणि देशाचे आदर्श नागरिक होण्यासाठी आम्हाला मदत करतात.
शिक्षकांनी आमच्या अभ्यासामध्ये तसेच समाजासाठी आणि देशासाठी मोलाच्या योगदानाबद्दल श्रद्धांजली वाहण्यासाठी दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी संपूर्ण भारतभर शिक्षक दिन साजरा केला जातो. 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यामागे एक मोठे कारण आहे. वास्तविक, 5 सप्टेंबर हा सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस आहे. ती एक महान व्यक्ती आणि शिक्षणाकडे एकनिष्ठ होती . ते विद्वान, मुत्सद्दी, भारताचे उपाध्यक्ष, भारताचे राष्ट्रपती आणि सर्वात महत्वाचे शिक्षक म्हणून परिचित होते. 62 मध्ये भारतीय राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड झाल्यानंतर, त्यांना विचारण्यात आले आणि विद्यार्थ्यांनी 5 सप्टेंबर रोजी आपला वाढदिवस साजरा करण्याची परवानगी घ्यावी अशी विनंती केली. परंतु, त्यांनी उत्तर दिले की, 5  सप्टेंबर हा  माझा वाढदिवस म्हणून साजरा करण्याऐवजी संपूर्ण अध्यापनाच्या व्यवसायाला वाहिले तर ते बरे होईल. आणि 5 सप्टेंबर हा शिक्षक म्हणून सन्मान देण्यासाठी संपूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जावा.
भारतातील सर्व विद्यार्थ्यांसाठी शिक्षक दिन हा एक अवसर आणि त्यांच्या शिक्षकांना भावी आकार देण्याच्या अविरत, निस्वार्थ आणि अनमोल प्रयत्नांसाठी आदरांजली वाहण्याची संधी आणि संधी यासारखे आहे. देशातील सर्व दर्जेदार शिक्षण प्रणाली समृद्ध करण्याचे आणि थकल्याशिवाय सतत त्यावर प्रक्रिया करण्याचे हे कारणे आहेत. आमचे शिक्षक आम्हाला त्यांच्या स्वतःच्या मुलांपेक्षा कमी मानत नाहीत आणि मनापासून शिकवतात. लहान मुले म्हणून आम्हाला आपल्या शिक्षकांकडून नक्कीच प्रेरणा व प्रेरणा मिळण्याची आवश्यकता असते. ज्ञान आणि धैर्याने जीवनातील कोणत्याही वाईट परिस्थितीचा सामना करण्यासाठी ते आपल्याला तयार करतात. प्रिय शिक्षकांनो, आम्ही तुमच्या सर्वांचे खरोखर आभारी आहोत आणि कायमचे राहू.
धन्यवाद!!!

*मराठी भाषण - 5*
मुख्याध्यापक सर, आदरणीय शिक्षक आणि माझे प्रिय सहकारी यांना इथे भेट दिली. शिक्षक दिन नावाचा एक प्रसंग साजरा करण्यासाठी आपण सर्व येथे जमलो आहोत. आज 5 सप्टेंबर हा सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात असून विद्यार्थ्यांनी ज्ञान व समाजकार्यात मोलाच्या योगदानाबद्दल विद्यार्थ्यांना त्यांचा सन्मान करून विद्यार्थ्यांच्या कारकीर्दीला आकार दिला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी विद्यार्थ्यांच्या विनंतीनंतर शिक्षक दिन साजरा करणे हा एक लोकप्रिय कार्यक्रम झाला आहे. 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जाणारा डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण जयंती आहे. करिअर घडविण्यासाठी आणि देशभरातील शिक्षण व्यवस्था समृद्ध करण्यासाठी नि: स्वार्थी प्रयत्नांसाठी विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांचा सन्मान करतात.
शिक्षकांचा दिवस अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या तारखांना एक विशेष कार्यक्रम म्हणून साजरा केला जातो. चीनमध्ये दरवर्षी 10 सप्टेंबरला हा उत्सव साजरा केला जातो. सर्व देशांमध्ये हा कार्यक्रम साजरा करण्याचे उद्दीष्ट म्हणजे सामान्यत: शिक्षकांचा सन्मान करणे आणि शैक्षणिक क्षेत्रातील सर्व कामगिरीचे कौतुक करणे. हा कार्यक्रम साजरा करत असताना विद्यार्थ्यांनी शाळा व महाविद्यालयांमध्ये मोठी तयारी केली जाते. हा कार्यक्रम विशेष आणि संस्मरणीय बनविण्यासाठी अनेक विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम, भाषण आणि इतर उपक्रमांमध्ये भाग घेतात. काही विद्यार्थी त्यांच्या आवडीनिवडी शिक्षकांना एक रंगीबेरंगी फूल, शिक्षक दिन कार्ड, भेटवस्तू, ई-ग्रीटिंग्ज कार्ड्स, एसएमएस, संदेश इत्यादींचा आदर करून त्यांचे कौतुक करुन हा कार्यक्रम त्यांच्या पद्धतीने साजरे करतात.
शिक्षक दिन उत्सव ही सर्व विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या शिक्षकांच्या सन्मान आणि सन्मानार्थ काहीतरी करण्याची एक उत्तम संधी आहे. भविष्यात शिक्षणाकडे एक जबाबदार शिक्षक बनणे हे देखील नवीन शिक्षकांच्या कौतुकासारखे आहे. एक विद्यार्थी असल्याने मी माझ्या आयुष्यातील माझ्या सर्व शिक्षकांचे नेहमी आभारी राहीन.
धन्यवाद!!

*मराठी भाषण - 6*
शिक्षकाचा हेतू निर्माण करणे हा नाही स्वतःच्या प्रतिमेतील विद्यार्थी,
पण विद्यार्थ्यांचा विकास करण्यासाठी कोण त्यांची स्वतःची प्रतिमा तयार करू शकेल. "
आदरणीय शिक्षक आणि माझ्या प्रिय सहकाऱ्याना सुप्रभात. आपल्या सर्वांना इतक्या मोठ्या संख्येने एकत्र जमण्यामागचे कारण माहित आहे. आम्ही आज शिक्षक दिन साजरा करण्यासाठी आणि आपले व देशाचे भविष्य घडविण्याच्या कठोर प्रयत्नांसाठी त्यांना मनापासून श्रद्धांजली देण्यासाठी येथे आहोत. आज 5 सप्टेंबर हा दिवस असून आम्ही दरवर्षी शिक्षक दिन खूप आनंद, आनंद आणि उत्साहाने साजरा करतो. या महान प्रसंगी येथे मला भाषणाची इतकी मोठी संधी देण्यासाठी मी माझ्या वर्ग शिक्षकांचे आभार मानू इच्छितो. माझ्या प्रिय मित्रांनो, आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने मला आपल्या जीवनात शिक्षकांचे महत्त्व सांगायला आवडेल.
5 सप्टेंबर हा दिवस संपूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. वास्तविक 5 सप्टेंबर ही महान विद्वान आणि शिक्षक असलेल्या डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती आहे. नंतरच्या आयुष्यात ते प्रथम भारतीय प्रजासत्ताकचे उपराष्ट्रपती आणि त्यानंतर भारतीय प्रजासत्ताकाचे अध्यक्ष झाले.
देशभरातील विद्यार्थी आपल्या शिक्षकांचा आदर करण्यासाठी हा दिवस पाळतात. असे म्हटले जाते की शिक्षक हे आपल्या समाजातील कणासारखे असतात. विद्यार्थ्यांची पात्रता वाढविण्यात आणि त्यांना भारताचे एक आदर्श नागरिक होण्यासाठी आकार देण्यासाठी त्यांची मोठी भूमिका आहे.
शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या मुलांप्रमाणेच अगदी काळजीपूर्वक आणि प्रामाणिकपणे शिकवतात. पालकांपेक्षा शिक्षक मोठे असतात हे चांगलेच म्हटले जाते. पालक मुलाला जन्म देतात तर शिक्षकांनी तिच्या / तिच्या चारित्र्याचा आकार घेवून भविष्य उज्ज्वल बनवलं आहे. अशाप्रकारे आम्ही त्यांना कधीही विसरणार नाही आणि दुर्लक्ष करू शकत नाही, आम्ही नेहमीच त्यांचा आदर करतो आणि त्यांच्यावर प्रेम करतो. आमचे पालक आम्हाला प्रेम आणि गुणवत्तापूर्ण काळजी देण्यास जबाबदार आहेत परंतु आपले शिक्षक भविष्यातील उज्ज्वल आणि यशस्वी होण्यासाठी जबाबदार आहेत. त्यांनी आमच्या सतत प्रयत्नांद्वारे आपल्या जीवनातील शिक्षणाचे महत्त्व आम्हाला कळविले. ते आपल्यासाठी प्रेरणास्थान आहेत जे आम्हाला पुढे जाण्यात आणि यशस्वी होण्यास मदत करतात. जगभरातील महान व्यक्तींची उदाहरणे देऊन ते अभ्यासाकडे प्रेरित करतात. ते आम्हाला खूप सामर्थ्यवान बनवतात आणि जीवनातील कोणत्याही अडथळ्याचा सामना करण्यास तयार असतात. ते आपल्या आयुष्याचे पोषण करणाऱ्या  अफाट ज्ञान आणि शहाणपणाने परिपूर्ण झाले आहेत. माझ्या प्रिय मित्रांनो, एकत्र या, असे म्हणा की ‘आमचे आदरणीय शिक्षक, तुम्ही आमच्यासाठी जे काही करता त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत’. माझ्या प्रिय मित्रांनो, आम्ही नेहमीच शिक्षकांच्या आदेशाचे पालन केले पाहिजे आणि भारताचे पात्र नागरिक होण्यासाठी त्यांच्या सल्ल्याचे पालन केले पाहिजे.
धन्यवाद !!

*मराठी भाषण - 7*
भारत भूमीवरील बऱ्याच लोकांनी आपल्या ज्ञानाने आम्हा सर्वांना मार्गदर्शन केले. त्यापैकी डॉ. सर्वपल्लवी राधाकृष्णन, एक महान विद्वान, तत्वज्ञ, तत्वज्ञ, आणि विश्वासू विचारवंत यांनी शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांचा असा विश्वास होता की जर नीट शिकवले गेले तर समाजातील बऱ्याच गोष्टींचा नाश होऊ शकतो. (डॉ. राधाकृष्णन यांच्याबद्दल तपशीलवार वाचा, त्यांचे अमूल्य विचार येथे वाचा)
शिक्षक दिनासारख्या महान विभूतीचा वाढदिवस साजरा करणे आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जी यांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिणाम असा झाला की 1952 मध्ये राज्यघटनेच्या अंतर्गत तुमच्यासाठी उपाध्यक्षपदाची स्थापना झाली. 62  मध्ये जेव्हा स्वतंत्र भारताचे पहिले उपाध्यक्ष राष्ट्रपती झाले, तेव्हा काही शिष्य आणि चाहत्यांनी आपला वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याची विनंती केली. मग डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जी म्हणाले की माझा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केल्याने मला माझा अभिमान वाटेल. त्यानंतर 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात आहे.
 डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे ज्ञानाचे सागर होते. त्यांच्या प्रतिसादाची एक किस्सा आपल्यासह सामायिक करीत आहे:
मेजवानीच्या एका प्रसंगी, इंग्रजांची स्तुती करताना एका इंग्रजाने सांगितले - “देव आमच्यावर ब्रिटिशांवर खूप प्रेम करतो. त्याने आम्हाला मोठ्या प्रयत्नांनी आणि प्रेमाने तयार केले आहे. म्हणूनच आम्ही सर्व खूप सुंदर आणि सुंदर आहोत. ”डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन देखील त्या बैठकीस उपस्थित होते. त्याला हे आवडले नाही, म्हणून उपस्थित मित्रांना संबोधित करताना त्याने एक मजेदार कथा सांगितली-
“मित्रांनो, एकदा देवाला भाकर बनविण्याची भावना निर्माण झाली की, त्याने बनवलेली पहिली भाकर थोडी शिकार झाली. याचा परिणाम म्हणून ब्रिटीशांचा जन्म झाला. दुसरी ब्रेड कच्ची ठेवली आहे, म्हणून देवाने बऱ्यांच दिवसात तो बेक केला आणि तो जाळला. त्यातून निग्रो लोक जन्मले. पण या वेळी देव थोडा सतर्क झाला. त्याने भाकर व्यवस्थित शिजवायला सुरुवात केली. यावेळी बनविलेले रोटी न शिजवलेले किंवा कच्चे नव्हते. हा शिकार झाला आणि त्याचा परिणाम म्हणून आम्ही भारतीय जन्मलो. "
हा किस्सा ऐकून त्या अग्रेजची मस्तक लज्जास्पद झाली आणि बाकीचे लोक एका विचित्र हसण्यात आले.
मित्रांनो, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जी यांनी अशा सुसंस्कृत आणि न्यायालयीन उत्तराने कोणालाही इजा न करता भारतीयांना श्रेष्ठ बनवले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जी मानतात की व्यक्तिमत्त्व आणि चारित्र्य निर्माणात शिक्षणाचे विशेष योगदान आहे. जागतिक शांतता, जागतिक समृद्धी आणि जागतिक समरसतेत शिक्षणाचे महत्त्व विशेष आहे. सर्वपल्ली राधाकृष्णन, उच्च-अभ्यासक, भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते भारतरत्नने सन्मानित करण्यात आले.
डॉ. राधाकृष्णन म्हणायचे -
पुस्तके असे माध्यम आहेत ज्याद्वारे आपण भिन्न संस्कृतींमध्ये पूल बांधू शकतो.
मित्रांनो, शिक्षक दिनानिमित्त महामहिम अध्यक्ष सर्वपल्ली राधाकृष्णन जी यांचे महान विचार लक्षात घेता आपण सर्वांनी आपल्या जीवनात शिक्षणाचा प्रकाश प्रामाणिकपणे आत्मसात करूया असे वचन दिले आहे कारण शिक्षणाने कोणालाही वेगळे केले नाही त्याला त्याचे महत्त्व कळते आणि आपले भविष्य सुवर्ण करते.

*मराठी भाषण - 8*
एक राजा होता. त्यांना वाचन-लेखन फार आवडले होते. एकदा मंत्री मंडळाच्या माध्यमातून स्वत: साठी शिक्षकांची व्यवस्था केली. शिक्षक राजाला शिकवायला येऊ लागले. राजाचे शिक्षण घेत असताना कित्येक महिने झाले, पण राजाला काहीच उपयोग झाला नाही. गुरू रोज खूप कष्ट करायचे, पण राजाला त्या शिक्षणाचा काहीच फायदा मिळत नव्हता. राजा खूप अस्वस्थ होता, गुरूच्या कलागुण आणि क्षमतेवर प्रश्न पडणे देखील चुकीचे होते कारण ते खूप प्रसिद्ध व पात्र शिक्षक होते. शेवटी, एक दिवस राणीने राजाला सल्ला दिला की राजन यांनी तुम्हाला गुरुजींना या प्रश्नाचे उत्तर देण्यास सांगावे.
 राजाने गुरुजींना एक दिवस आपली उत्सुकता दर्शविण्याचे धाडस केले, "हे गुरुवार, क्षमस्व, मी बऱ्याच महिन्यांपासून तुझ्यापासून शिकत आहे पण मला याचा काही फायदा होत नाही. हे का आहे? "
 गुरुजींनी अतिशय शांत आवाजात उत्तर दिले, "राजन या कारणास्तव खूप सोपे आहे."
" कृपया या प्रश्नाचे उत्तर लवकरच द्या", अशी विनंती राजाने केली.
गुरुजी म्हणाले, "राजन खूप लहान आहे पण तुला 'मोठे' असल्याचा अभिमान वाटल्याने तुम्ही ते समजू शकला नाही आणि नाराज आणि दु: खी आहात. समजा तुम्ही खूप मोठे राजा आहात. प्रतिष्ठा आणि प्रतिष्ठेच्या बाबतीत तू माझ्यापेक्षा मोठा आहेस, पण इथे तू आणि माझं नातं गुरु आणि शिष्याचं आहे. एक गुरू म्हणून माझी स्थिती तुमच्यापेक्षा उंच असावी, परंतु आपण स्वत: सिंहासनावर बसा आणि मला तुमच्या खालच्या आसनावर बसायला लावा. हेच कारण आहे की आपण कोणतेही शिक्षण घेत नाही किंवा कोणतेही ज्ञान नाही. तुमचा राजा म्हणून मी हे सांगू शकत नाही.
उद्यापासून, जर तुम्ही मला उंच शिखरावर बसून स्वत: वर बसविले तर आपण शिक्षण घेऊ शकत नाही असे कोणतेही कारण नाही. "
 राजाने सर्व काही समजून घेतले आणि त्याने लगेचच आपली चूक मान्य केली आणि गुरुवरुन उच्च शिक्षण घेतले.
मित्रांनो, या लघुकथेचा सार असा आहे की आपण कोणत्याही नात्यात, स्थितीत किंवा संपत्तीत कितीही मोठे असलो तरीही, जर आपण आपल्या गुरूला त्याचे योग्य स्थान दिले नाही तर आपण बरे आहोत. आणि येथे जागेचा अर्थ फक्त उंच किंवा खाली बसणे नव्हे तर याचा अर्थ असा आहे की आपण आपल्या मनात गुरूला कोणती जागा देत आहोत. आम्ही खरोखरच त्यांचा सन्मान करीत आहोत किंवा आम्हाला आमच्या सर्वोत्कृष्ट असल्याचा अभिमान आहे? जर आपल्या शिक्षक किंवा शिक्षकांबद्दल कृतज्ञतेची भावना असेल तर त्यांच्या गुणवत्तेचा आणि चांगुलपणाचा आम्हाला काही फायदा होणार नाही आणि जर आपण त्यांचा आदर केला तर त्यांना महत्त्व दिल्यास त्यांचे आशीर्वाद सहज मिळतील.
धन्यवाद!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आगामी झालेले