नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले ब्लॉग वर हार्दिक स्वागत 💐💐..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत ... सुस्वागतम.... ����������������

बुधवार, १२ ऑगस्ट, २०२०

डॉ. विक्रम साराभाई Dr. Vikram Sarabhai

 Dr. Vikram Sarabhai

डॉ. विक्रम साराभाई यांची माहिती:
  • पूर्ण नाव: विक्रम अंबालाल साराभाई
  • जन्म: 12 ऑगस्ट 1919 (अहमदाबाद, गुजरात)
  • मृत्यू: 30 डिसेंबर 1971 (कोवलम, केरळ)
  • ओळख:
     भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक आणि संस्था निर्माते
  • शिक्षण: केंब्रिज विद्यापीठातून डॉक्टरेट (डॉ. सी.व्ही. रामन यांच्या मार्गदर्शनाखाली)

अंतराळ संशोधनात बजावलेल्या मोलाच्या कामगिरीसाठी इंटरनॅशनल अस्ट्रोनॉमिकल युनियनतर्फे भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार ठरलेल्या अश्या डॉ. विक्रम साराभाई यांची आज जयंती १२ ऑगस्ट १९१९

डॉ. विक्रम साराभाई यांच्या अथक परिश्रमानंतरच १९६९ साली भारतीय अवकाश संशोधन संस्थेची (इस्त्रो) स्थापना झाली.त्यांनी इस्रो (ISRO) च्या स्थापनेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि भारताला अवकाश संशोधनात आघाडीवर आणले.आईआईएम अहमदाबाद च्या स्थापनेतही डॉ. विक्रम साराभाई यांची मुख्य भूमिका होती.होमी भाभा यांच्या मृत्यु नंतर ते १९६६ मध्ये परमाणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष बनाले.अनेक आंतर्राष्ट्रीय संस्थांची अध्यशपदे त्यांच्याकडे होती.अवकाश संशोधन बरोबरच त्यांनी टेक्स्टटाईल,फार्मासिटिकल,अणुऊर्जा,कला या क्षेत्रात ही विशेष कामगिरी केली आहे .त्यांनी स्थापन केलेल्या ATIRA (Ahmedabad Textile Industry’s Research Association) ने आधुनिक वस्त्रोद्योगाचा पाया रचला.फार्मासिटिकल उद्योगात सर्वप्रथम इलेक्ट्रोनिक डाटा प्रोसेसिंग आणी रिसर्च टेक्निकचा वापर त्यांनीच केला.Electronics Corporation of India Limited (ECIL),Uranium Corporation of India Limited (UCIL)अशा अनेक संस्थांची स्थापना त्यांनी केली.

१९७५ डॉ. विक्रम साराभाई यांनी इंग्लंडच्या प्रयोगशाळेत संशोधन करणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ .वसंत गोवारीकर यांना भारताच्या मोहिमेत सहकार्य करण्याचं आवाहन करून भारतात आणलं होतं .” ब्रिटनप्रमाणे वातानुकुलित लॅब्ज आणि ऑफिससारख्या सोयी आम्ही देऊ शकणार नाही , पण बसायला एक टेबल, खुर्ची आणि एक कपाट नक्कीच देऊ शकतो “, असं म्हणून डॉ . साराभाईंनी देशापुढील आव्हानही स्पष्ट केलं होतं .कारण त्यावेळी संशोधनासाठी विशेष बजेट वैगेरे नव्हते. डॉ. विक्रम साराभाई यांनी शास्त्रज्ञांना स्वप्न दाखवलं, नवी दिशा दिली.खंबीर नेतृत्व हाही त्यांचा एक व्यक्तिविशेष.

डॉ. अब्दुल कलाम यानीही आपल्या अग्निपंख या आत्मचरित्रात साराभाई यांच्या नेतृत्व गुणाचे कौतुक केले आहे.ते स्वप्न पाहायचे आणी ते प्रत्यक्षात उतरवण्या साठी हवी ती मेहनतही घ्यायचे.त्यांचे व्यक्तिमत्व आणी कार्य त्यांच्या सह्कार्यासाठी नेहमीच एक प्रेरणा स्रोत म्हणून राहिल होत.त्यांनी त्यांच्या सहकार्यांना एक वेगळी दृष्टी दिली होती.मध्ये जो पहिला अंतरिक्ष उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडला गेला त्याची रचना विक्रम साराभाई यांच्या अहमदाबाद रिसर्च सेंटर मध्येच केलि गेली होती. आर्यभट्ट च्या सफल संक्षेपणा नंतर अनेक उपग्रह यशस्वीरीत्या प्रक्षेपित केले गेले ज्यासाठी साराभाई यांची नेहमीच आठवण केली जाते.कारण या सगळ्या यशामागे साराभाई यांचे अथक परिश्रम ,दूरदृष्टि आणी खंबीर नेतृत्व ह्यांचा मोलाचा वाटा आहे.डॉ.विक्रम साराभाई यांना सन १९६६ साली भारत सरकारचा पद्म भूषण आणी १९७२ साली मरणोत्तर पद्मा विभूषण हा पुरस्कार भारत सरकारतर्फे देण्यात आला. तिरुअनंतपुरम येथील थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन (TERLS) आणि संबंधित अवकाश संस्थांचे नामकरण महान शास्त्रज्ञाच्या सन्मानार्थ विक्रम साराभाई स्पेस सेंटर असे करण्यात आले. हे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे प्रमुख अंतराळ संशोधन केंद्र म्हणून उदयास आले आहे. 1974 मध्ये सिडनीस्थित इंटरनॅशनल अॅस्ट्रॉनॉमिकल युनियनने ठरवले की 'सी ऑफ सेरेनिटी' वरील बेसाल्ट मून क्रेटर आता साराभाई विवर म्हणून ओळखले जाईल.

1972 मध्ये त्यांच्या मृत्यूच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त भारतीय टपाल विभागाने एक टपाल तिकीट जारी केले होते.

(संकलित माहिती)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आगामी झालेले